३ एप्रि, २०१५

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

 मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही  -   तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  इस्लाम धर्माची   चिकित्सा केली आहे . धर्म चिकित्सेशिवाय प्रगती अशक्य आहे.  हि चिकित्सा तटस्थ भूमिकेतून आहे - त्यामुळे ती चींतनिय आहे.  प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच शब्दात त्यांची इस्लाम धर्म  विषयक मते या लेखात पाहूया . आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी - प्रगतीसाठी  घटनाकारांनि  काय उपाय सांगितले ते हि पाहूया.

--------------------------------------------------------------------------------
डॉ आंबेडकरांनी आपल्या लेखनात इस्लाम धर्मावर चिकित्सेची कुर्हाड चालवलेली आहे,
हा लेख वाचताना एक निट लक्षात ठेवले पाहिजे कि घटनाकार बाबासाहेब अजिबात हिंदुत्व वादि नाहीत . किंबहुना हिंदु लोकांचे धर्म , सामाजिक व्यवस्था, इतिहास पुराणे आणि धर्मग्रंथ याना ते अमानुष  आणि जाळण्या योग्य मानतात . . बाबासाहेब हिंदुच्या धर्माचे विरोधक आणि शत्रू आहेत.
#################################
त्यामुळे होते असे कि , बाबासाहेबांच्या या इस्लाम धर्मा विषयीच्या मतांना तटस्थ चिकित्सेचा गंभिर आयाम प्राप्त होतो .
#################################
--------------------------------------------------------------------------------






[(८ - ३२०)  हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र  शासनाने  प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत  रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे.  बरेचसे  मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English)  मध्ये कंसात दिले आहेत.  ]



इस्लाम मध्ये  समता आहे का ?

पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात बाबासाहेबांनी या विषयावर एक पुर्ण प्रकरण लिहिले आहे.  त्या प्रकरणाचे नाव आहे सोशल स्टेग्नेशन . या प्रकराणाच्या पहिल्या पानावरचे त्यांचे  वाक्य असे आहे .
"केवळ हिंदुत सामजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमात नाहीत हा भ्रम आहे . असा कोणता सामजिक दुर्गुण आहे जो हिंदुत आहे आणि मुस्लिमात नाही ? " ( ८ -२२५) 
बालविवाह इत्यादी सामाजिक दुर्गुण हिंदु आणि मुस्लिम अशा दोघातहि  आहेत हे त्यांनी सांख्यिकी आधाराने  दाखवले आहे. इस्लाम धर्मातील विषमता , गुलामी आणि जातिव्यवस्था याबद्दल बाबासाहेब लिहितात :
" इस्लाम बंधुत्वाचि भाषा करतो. सर्वाना वाटते कि जणु  इस्लाम  मध्ये गुलामी नाही …. आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेंव्हा गुलामी होती तेंव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ   इस्लाम धर्म आणि इस्लामिक   देशातून झाला होता . " (  … support was derived from Islam and Islamic Countries) ( ८- २२८)
इस्लाम धर्मात गुलामी आणि विषमतेची मुळे आहेत यावर चर्चा  करताना आंबेडकर  म्हणतात , " गुलामांना माणुसकीने वागवा असे प्रेषित कुराणात म्हणतो पण त्याना मुक्त करा असे म्हणत नाही . इस्लाम धर्मानुसार गुलामाना मुक्त करण्याचे बंधन मुस्लीमावर नाहि. गुलामाला चांगले वागवत (!) गुलाम ठेवणे हा  उल्लेख आंबेडकरांनी जाणीवपूर्वक केला आहे. धर्मातली विषमता हि वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते -  इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या  रूपाने  टिकून राहिली आहे  , हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमातील जातींचे भलेमोठे कोष्टक पानभर  दिले आहे . (८-२२९)

मुस्लिम समाजात त्रैवर्णिक व्यवस्था असून अश्रफ , अजलफ आणि अर्जल अशी त्या वर्गांची नावे आहेत . मुस्लीमातल्या  अर्जल वर्गाला बाबासाहेबांनी डीग्रेडेड क्लास - पददलित म्हणुन संबोधले आहे . सेन्सस सुप्रिटेंडंट चे दाखले देत बाबासाहेब म्हणतात " मुस्लिमात जातीबाहेर लग्नाला प्रतिबंध  आहे  , व्यवसायावर  जाती निर्धारण  आहे.  " (८-२२९,३०) त्यापुढे जाउन आंबेडकर लिहितात :

" नक्कीच ,  हिंदुप्रमाणे मुस्लिमातहि  सर्व वाइट चाली  आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटहि  आहेत . अधिकच्या  वाइट चालीपैकी एक म्हणजे बुरखा "
 : डॉ आंबेडकर (८-२३०)



नक्कीच ,  हिंदुप्रमाणे मुस्लिमातहि  सर्व वाइट चाली  आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटहि  आहेत . अधिकच्या  वाइट चालीपैकी एक म्हणजे बुरखा : डॉ आंबेडकर (८-२३०)

.
मुस्लिम स्त्री हा एक दयनीय  प्राणि आहे . इस्लामी धार्मिक जुलमाचे ते प्रतिक आहे अशी बाबासाहेबांची मांडणी दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी जेंव्हा धर्म घेतो तेंव्हा - त्याची चिकित्सा करताना - डॉ.  आंबेडकरांच्या  लेखणीला वेगळीच धार येत असे . धर्म चिकित्सा करताना बाबासाहेब निर्भिडपणे - सर्व धर्मांची चिकित्सा करत असत . हा गुण दुर्दैवाने आज लोप पावला आहे . आज भारतात इस्लाम चिकित्सा केली जात नाही हे सत्य आहे.  तटस्थ , द्वेष रहित  पण धारधार  चिकित्सेची प्रेरणा बाबासाहेबांपासुन घेतली पाहिजे . डॉ  आंबेडकर बुरख्याबद्दल लिहितात  : -

" रस्त्या वर चालणार्या  बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे . (most hideous site ) बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात  . मुस्लिम स्त्रियात अनिमिया , टीबी आणि पायोरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची  शरीरे क्षतिग्रस्त , हात पाय व्याधीग्रस्त , हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत . पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा - मुस्लिम स्त्रीचे  शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही "  ( ८ - २३० , २३१) 






 पडदा पद्धतीच्या उगमाची आणि परिणामाची चर्चा करताना बाबासाहेब लिहितात - " बुरख्याची कारणे लैंगिक साशंकतेत आहेत. त्याचे मुस्लिम स्त्रिया आणि पुरुषांवर गंभिर परिणाम झाले आहेत. मुस्लिम पुरुषांचा घराबाहेरील स्त्रियांशी स्वच्छ मोकळा संपर्क बाधित झाला आहे. अशाप्रकारची बंधने पुरुषांच्याहि नितीमात्तेवर  घातक परिणाम करतात. स्त्री - पुरुषांचा संपर्क तोडणारी अशी समाजव्यवस्था वाइट प्रवृत्तीस जन्म देते हे सांगायला कोण्या मानसशास्त्रज्ञाची गरज नाही . अशा धार्मिक बंधनांमुळे लैंगिक अतिवासना आणि इतर अनैसर्गिक रोगट सवयिंचा प्रादुर्भाव या समाजात होतो . बुरख्यामुळे  हिंदु मुस्लिम संवादात हि  बाधा येते कारण  - अतिशयोक्त वाटले तरी-  हिंदुचे म्हणणे  खरेच आहे कि - एका बाजूचे स्त्रीपुरुष आणि दुसर्या बाजूचे फक्त पुरुष यांचा निर्भिड संवाद होणार तरी कसा ? " (८- २३०, २३१)

जातीय  स्तर आणि स्त्री / पुरुष अशा दोन्ही प्रकारची विषमता मुस्लिमात आहे आणि त्याचे समर्थन / प्रारंभ   इस्लामी धर्मशास्त्रात आहे असा बाबासाहेबांचा निष्कर्ष  दिसून  येतो.  







बौद्ध धर्माचा  विनाश का झाला ?

सर्व धर्मांची चिकित्सा करून झाल्यावर बाबासाहेबांना बुद्धाचा मार्ग योग्य वाटला होता. बुद्ध धम्मा च्या ऐतिहासिक उदय आणि अस्ताची  त्यांनी तपशीलवार मिमांसा केली आहे. अनेक ठिकाणी त्याची वेगवेगळी कारणे दिली आहेत .  माझे सर्वात शेवटचे मत प्रमाण मानावे असे त्यांनी अनेकदा आपल्या अनुयायांना निक्षुन सांगितले आहे . त्यामुळे या विषयावर त्यांनी सर्वात शेवटी दिलेले भाषण पाहूया.  साहेबांच्या महानिर्वाणापुर्वि सहा महिने २३ जून १९५६ रोजी अखिल भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्लीतल्या सभेत ते म्हणाले : -
" मुसलमानांनि या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून , बौद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्याना बूत  शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे असे म्हटले जाते. बूत  हा मुर्तिसाठीचा शब्द म्हणजे बुद्ध या शब्दाचे (अपभ्रंश ) रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे.….मुसलमानांनि बौद्ध व हिंदु धर्मावर आक्रमण केले होते . दोघांची मंदिरे उध्वस्त केली होती … .  बर्याच बौद्ध भिक्कुची कत्तल झाली आणि काहींनी देशाटन केले. त्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ? हेच कळेनासे झाले . बौद्ध अनुयायी अंध:कारात चाचपडत राहिले  " ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )
अगदी असेच मत १० जून १९५० च्या जनता पत्रातील लेखातही व्यक्त केले आहे . ( खंड १८ -३ पान : २१५)



 दुर्दैवाने घटनाकारांचे  लवकरच महानिर्वाण झाले. या विषयावर ग्रंथ लिहणे  जमले नाही .  पण आयुष्याच्या  शेवटी आंबेडकर अशा निर्णयाप्रत आलेले दिसतात कि, - मुस्लिमांकडुन विद्वान भिक्कुंचि कत्तल झाली वा  त्यांना देशत्याग करावा लागला .   मार्गदर्शन न मिळालेले बौद्धजन आता कोठे  जातील ? तिकडे बोलघेवडे ब्राम्हण पुरोहित   जन्मजात आयते तयार  होत होतेच !  त्यासाठी भिक्कू प्रमाणे कठिण प्रशिक्षण - संस्काराची गरज नव्हती .  इस्लामी  आक्रमणामुळे  वैचारिक   नेतृत्व हरवलेला बौद्ध समाज पुढे ब्राम्हणी धर्माच्या तोंडप्रचारी तडाख्यात अडकला असा निष्कर्श   बाबासाहेबांनी काढला आहे. आणि इस्लामी आक्रमण हे बुद्ध धर्माच्या नाशाचे  एक महत्व पुर्ण कारण मानले आहे. ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )
    

मुस्लिम इतिहासाचे आंबेडकरी आकलन :  


मुसलमान भारतात का आले ? त्यांच्या येण्या मागची कारणे - राज्य स्थापनेचे  हेतू आणि भविष्यातील धार्मिक योजना याचे मुद्देसूद विवेचन घटनाकारांनि केलेले आहे. बाबासाहेब लिहितात : -


भारतातील मुस्लिम प्रवेश  हे  केवळ जमीन आणि लुटमार यासाठी नाहीत . आर्थिक - राजकीय कारणाप्रमाणे भारतात इस्लामचा प्रसार करणे हे धार्मिक कारणही आक्रमणा मागे महत्वाचे  आहे. ( ८-५५).  बाबासाहेबांनी मुस्लिम आक्रमणाचा धार्मिक हेतू सिद्ध करण्यासाठी अनेक मुस्लिम इतिहासकारांचि अवतरणे उधृत केलेली आहेत.  उदा : तैमुर बादशाहाची बाबासाहेबांनी उधृत केलेली वाक्ये आहेत :

" माझ्या हिंदुस्थान वरील आक्रमणाचा हेतू काफ़िरांविरुद्धचि मोहीम चालवून त्यांना अल्लाच्या धर्मात आणणे हा आहे. प्रेषित मुहम्मदाच्या आज्ञेनुसार काफिरी श्रद्धांचे भंजन करून  ,  सर्वदेवता समभावाचे उच्चाटन करून ,  देवळे आणि मुर्त्या यांच्यापासून हिंदुस्थान मुक्त केला तर मला गाझी आणि मुजाहिद म्हटले जाइल ." (८-५६)


भारतात मध्ययुगात हिंदु मुस्लिम एकता वगैरे अजिबात अस्तित्वात नव्हती.  अगदी १८५७ चे बंड हा मुस्लिमांनी केलेला ब्रिटिश विरोधी जिहाद होता.  सहाशे वर्ष मुसलमान या देशाचे मालक म्हणुन वावरत होते . ब्रिटिश राज्यात त्यांना हिंदुच्या समान नागरी दर्जा मिळाला हे  मुस्लिमांच्या दृष्टीने अपमानास्पद होते. म्हणुन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला . १८५७ साली भारताला दार उल इस्लाम करण्यासाठी  मुस्लिमांनी केलेला तो जिहाद होता. असे आंबेडकरांचे  मत होते  (८-४९, २९५)  


मुस्लिम हल्ल्यांमागच्या धार्मिक हेतूचे विवेचन करताना बाबासाहेब लिहितात  
  • "इस्लामी धर्माने जगाची वाटणी दोनच भागात केली आहे ….  दार उल हरब म्हणजे शत्रूभूमिचे रुपांतर  -   दार उल इस्लाम मध्ये करण्यासाठी … जिहाद करणे हे मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे. " येथे बाबासाहेबांनी अनेक जिहादी युद्धांचे संदर्भ दिले आहेत.    (८-२९५, २९६) 
मुस्लिम आक्रमण - राज्य स्थापना - कर पद्धती यामागचे हेतू हि धार्मिक होते असे बाबासाहेबांचे मत आहे . हे मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकर कटाक्षाने मुस्लिम इतिहासकार किंवा बादशहा यांचेच संवाद आपल्या पुस्तकात पुन्हा उधृत करताना दिसतात .


 झिजीया कर लादण्यामागचा हेतू स्पष्ट करण्यासाठी त्यांनी  अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या काझी चा संवाद  संपुर्ण पणे  उधृत केला आहे . हा संवाद पुरेसा बोलका आहे .

 " अल्लाह सांगतो कि हिंदुना हीन गुलामीत (धीम्मी ) ठेवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे . कारण ते आपल्या प्रेषीतांचे कडवे शत्रू आहेत. आणि प्रेषीतांनिच आपल्याला आज्ञा केली आहे कि , हिंदुना इस्लामी बनवा नाहीतर ठार मारा , बंधक बनवा , त्यांची मालमत्ता लुटा . …. आपण सज्जन  हनिफी  मुस्लिम असल्यामुळे त्यांना झिजीया घेऊन सोडतो तरी.…  हनिफी सोडुन इतर पंथात झीजियाचा पर्याय नाही. हिंदुपुढे  दोनच पर्याय आहेत - "  इस्लाम  किंवा मृत्यू " (८-६३) 

या उधृता नंतर निष्कर्ष काढताना आंबेडकर म्हणतात : मुहम्मद गझनी पासून अहमदशहा अब्दाली पर्यंतचि  ७६२ वर्षांची कालकथा हि अशी आहे.  (८-६३) 



पाकिस्तान का बनले ?

डॉ. आंबेडकर फाळणीचे पुरस्कर्ते होते. हिंदु आणि मुस्लिम यांचे सहजीवन अवघड आहे . भारत अखंड राहिला तर धार्मिक संघर्ष इतके जास्त होतील कि हिंदुंचा  सामजिक सुधार अशक्य होऊन बसेल त्यामुळे फाळणी करावी असे त्यांचे मत होते . पाकिस्तान बाबतीतले इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना ते म्हणतात : 
"मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत .काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही . इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच  (low born )  आणि दर्जाहीन (without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात. हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे  आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही . "( ८ - ३०१) 
पाकिस्तानवरील पुस्तकाचे एक प्रकरण राष्ट्रीय फ़्रस्ट्रेशन  नावाचे आहे . त्यातील ३२८ -३३० या पानांवर बाबासाहेबांनी हिंदु मुस्लिम प्रश्नाची चिकित्सा केलेली आहे . बाबासाहेब लिहितात "  ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या नीतीमुळे हिंदु मुस्लिम संबंध बिघडले हे खरे नाही . ब्रिटिशांच्या पूर्वीपासून  भांडणे होतीच.  (८-३२८)  हिंदु आणि मुस्लिमातील राजकीय भांडण हा ऐतिहासिक, धार्मिक , सांस्कृतिक आणि सामजिक घटक परस्पर विरोधी ( Antipathy) असल्याचा परिणाम आहे. (8-229) . अकबर आणि कबीर  या सुधारकांच्या कार्याचा इष्ट परिणाम झालेला नाही . "  (८-३३०) याचे अधिक विश्लेषण करताना आंबेडकर लिहितात : -
" इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी  नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही .....  भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला  देत नाही . "  (८-३३०)



अशा धार्मिक कारणांमुळे हिंदु मुस्लिम ऐक्य अशक्य आहे म्हणुन बाबासाहेबांनी फाळणीला पाठींबा दिला होता.

फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - " जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक, परिणामशुन्य राज्य बनेल- जणु जिवंत प्रेत, न पुरलेला मृतदेह " (८-३४०) 

फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५  साली -  बाबासाहेब म्हणाले होते. --  " पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (१-१४६)

त्यावेळच्या  अखंड भारतातले मुस्लिम लोकसंख्येचे  ३५% हे प्रमाण लक्षात घेतले तर आंबेडकरांच्या लेखनाची खोली लक्षात येते आणि तत्कालीन कोन्ग्रेस किंवा हिंदुसभेला हि  गोष्ट कशी कळली नाही ? याचेही आश्चर्य वाटते .  

त्यापुढे जाउन बाबासाहेब असेही म्हणतात  कि - " जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " (१-१४६)



इशारा : हिंदु अधिक आक्रमक होत जातील  

 बाबासाहेबांनी ७५  वर्षा पुर्वी दिलेला इशारा आज महत्वाचा  ठरताना दिसतो आहे . बाबासाहेब लिहितात :-

"मुसलमान राजकारणात गुंडगर्दि आणत आहेत .या  दंगली त्याचे पुरावे आहेत.  मुसलमान  मुद्दाम  सुटेडन जर्मन नाझिंचे  अनुकरण करत आहेत. (झेक बाबतचे)  . जोपर्यंत एकटे मुस्लिम आक्रमक होते तोवर हिंदु मार खात होते.  भूतकाळ गेला आणि  आज हे सत्य राहिले नाही . हिंदु लोक प्रतिकार शिकाले आहेत (learned to retaliate ) आणि  मुस्लिमाना भोसकण्यात त्याना लाज  वाटत नाही . गुंडगर्दिचा विरोध सवाई गुंडगिरीने करणे हा हिंदुचा नवा चष्मा  बिभत्स आहे. ( ugly spectacle ) (८-२६९)




" मुस्लिम अतिरेक हा  (native endowment) अंगभुत आहे, हिंदुपेक्षा जुना आहे  आणि त्यांच्या संस्कृतीचे अंग आहे..  हिंदुचा अतिरेक हा  आजकाल नव्याने प्रतिक्रिया म्हणुन तयार होतो आहे. आज या बाबतीत मुसलमान पुढे असले तरी हे असेच जर चालू राहिले तर….   कदाचित भविष्यात हिंदु त्याना मागे टाकतील . " (८-२४९) 
हे दोन समाज अशाच प्रमाणे धर्मावरून भांडत राहिले तर , भारताचे काय होईल याचे चित्र  बाबासाहेब आपल्यासमोर १९४० साली उभे करतात . आज  फाळणी होऊन गेली आहे. काही वर्षाच्या शांततेत भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेश च्या तुलनेत दैदिप्यमान प्रगती केलेली दिसते . मात्र हिंदु मुस्लिम संघर्ष राजकीय आणि धार्मिक स्वरूपात सुरूच आहे . त्यामागच्या राजकारणाची आंबेडकरांनी  केलेली चिकित्सा अवश्य पाहिली पाहिजे .




 धार्मिक राजकारणाचा आंबेडकरी अन्वयार्थ      

हिंदु मुस्लिम राजकारणाच्या फियास्कोसाठी आंबेडकर हिंदु महासभा  आणि कॉंन्ग्रेस या दोघांना जवाबदार ठरवतात . बाबासाहेब लिहितात "भाबड्या मनाच्या हिंदु सभेच्या देशभक्तांना वाटते कि हिंदुनि हिंसक पावित्रे घेतले कि मुसलमान सरळ होतील…. खरे तर   हिंदु महासभा संवादाच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा आहे कारण त्याना एकता नकोच आहे. उदाहरणार्थ : ( ३५ % मुस्लिम असलेल्या अखंड हिंदुस्थानाच्या वास्तवात   )  " हिंदुस्थान हिंदुचा ! "  अशी घोषणा हिंदु  सभेच्या अध्यक्षांचि आहे . वास्तव स्थिती  पाहता हि घोषणा अतिशय अहंकारी आणि अक्षरश :  अर्थहिन आहे .  " (८-२७०)

कोंग्रेसच्या मुस्लिम अपिसमेंट मुळे   हिटलरचे चोचले पुरवणार्या युरोप  प्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . : डॉ आंबेडकर  

 कॉंग्रेसचेहि  मुस्लिम / इस्लाम बाबतीतले  धोरण पूर्णपणे चुकलेले आहे  असा आंबेडकरांचा आरोप आहे. कोंग्रेसच्या धार्मिक राजकारणाला आंबेडकरांनी  मुस्लिमांचा अनुनय / लांगुलचालन (Appeasement ) असे विशेषण वापरले आहे.  अशी  विशेषणे  पाकिस्तान वरील पुस्तकात कोन्ग्रेस साठी शेकडो वेळा वापरली  आहेत  . एकट्या पान २७० वर  लांगुलचालन (Appeasement ) हा शब्द सहा वेळा आलेला आहे. आंबेडकर लिहितात : -
" कॉंंग्रेसला  अपिसमेंट  आणि सेटलमेंट  यातला फरक सुद्धा कळत नाही. अपिसमेंट - अनुनय म्हणजे लांगुलचालन! आक्रमकाचे हृदय जिंकण्या साठी त्यांनी केलेल्या खून, बलात्कार आणि निष्पापांच्या लूटमारी कडे दुर्लक्ष करणे   हि कोङ्ग्रेसि अपिसमेंट ची नीती आहे . त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत .. सेटलमेंट म्हणजे  दोन्ही बाजू समाधानी होतील अशी मर्यादित तडजोड होय . मुस्लिमाना धार्मिक आधारावर सवलती दिल्यास त्यांची आक्रमकता वाढीस लागलेली दिसते या सवलतिंचा अर्थ हिंदुचा भ्याडपणा (defeatism) असे  मुस्लिम मनास वाटते.  कोंग्रेसच्या अपिसमेंट मुळे   हिटलरचे चोचले पुरवणार्या दोस्त राश्ट्रांप्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . "   (८ - २७०) 

सवाई गुंडगिरिचि आक्रमकता  किवा लांगुलचालन यापैकी कोणत्याही मार्गाने हिंदु मुस्लिम प्रश्न सुटणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे. 




समस्येवरील दोन उपाय  

 वकिली कायदे आणि सेटलमेंट  करून हिंदु मुस्लिम प्रश्न हाताळावा लागतो - अपिसमेंट अथवा गुंडगिरी  करून नाही -  याची प्रचीती अजून भारतीय राजकारणाला झालेली नाही. फाळणी घडून  भूतकाळात जमा झाली . आजच्या भारतातील हिंदु आणि मुस्लिमाना  सहजीवन अपरिहार्य आहे .  जुन्या मानसिकता जुने प्रश्न आजही तसेच्या तसे जिवंत आहेत . मुस्लिमांचा धार्मिक उन्माद , आक्रमकता, हिंदूची सवाई गुंडगिरी वा सवाई लांगुलचालन आजही तसेच आहे .



१) सेक्युलारीझम :  यावर बाबासाहेबांनी सुचवलेला उपाय सेक्युलारीझम हा आहे . सेक्युलारीझम हा सर्व धर्म समभावाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे . त्यात  धर्माचे स्थान फक्त पारलौकिक श्राद्धेपुरते मर्यादित असते. इहलोकात कसे वागावे ? किती विवाह करावेत ? बुरखा   घालावा का ? याचे कोणतेच धार्मिक स्वातंत्र्य मिळत नाही . सर्व गोष्टी कायदा आणि  शासनाच्या अखत्यारीत येतात . बाबासाहेबांची घटना आणि त्यातील कलमे सेक्युलर आहेत . त्यात कोणत्याहि धर्मास फाजील स्वातंत्र्य नाही . मात्र दुर्दैव असे कि   याच घटनेत अनुसृत्य असणारा समान नागरी कायदा अजूनही होत नाही . कोंग्रेसच्या नाही - भाजपाच्या राज्यातही नाही .. शासन सेक्युलर रहात नाही . तलाक पिडीत मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी समान नागरी कायदा केला जात नाही .  

 २) धर्म सुधारणा :  मुस्लिम समाजात समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा करण्याची प्रोसेसच अस्तित्वात नाही. धर्म चिकित्सा  हा विषय त्याज्य मानला गेला आहे . जी काही लाहान सहान सुधारक मंडळे आहेत ती कुराणाच्या परीभाषेबाहेर जात नाहीत . बुद्धीवादाचे समर्थन करण्यासाठी हदीस मधली पैगंबर वचने शोधली जातात. त्यामुळे  मुस्लिमांचे प्रचंड नुकसान होणार आहे. विज्ञान निष्ठा  आणि बुद्धिवाद याचा मुस्लिम समाजात प्रसार करणे  बाबासाहेब आवश्यक मानतात. त्यासाठी त्यांनी रेनन ला उधृत केले आहे : 
  • " इस्लाम विज्ञानाला सततच  शत्रू समजत आला आहे. हे त्या धर्माचे एकनिष्ठ एकमेव सातत्य आहे . पण हे सातत्य धोकादायक आहे. इस्लामच्या दुर्दैवाने इस्लामला यश मिळत आले. विज्ञानाचा  - बुद्धीवादाचा वध  करून खरे तर इस्लामने स्वत:चाच वध  केला आहे. जगाचे शाप घेतले आहेत आणि हीनत्व पत्करले आहे " ( ८ - २३५)      
मुस्लिमांनी विज्ञान निष्ठेचा, बुद्धिवादाचा , आणि धर्म चिकित्सेचा स्वीकार केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही इतरांचेही भले होणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे .




समारोप 


 हिंदुच्या भल्यासाठी त्यांची   धर्म चिकित्सा  आणि प्रबोधन अत्यावश्यक आहे . पण मुस्लिमाना यापासून वंचित ठेवण्याचे काही कारण नाही . इस्लामची चिकित्सा केली तर हिंदुत्व वाद्यांना फायदा होतो या भ्रमातून आता बाहेर पडायला हवे . आणि इस्लाम हा मुक्तिदाता , समतेचा , शांततेचा धर्म आहे या कम्युनिस्टांनि पसरवलेल्या अंधश्रद्धेतुन हि  मुक्त झाले पाहिजे .  कम्युनिस्टांचे प्लेन आणि डोकी अभ्यासू असली तरी पुरोगामी वा  संविधानिक  निश्चित नाहीत. आपण  आपले मेंदु कम्युनिस्टांकडे गहाण टाकण्याची  गरज नाही .या विषयावर बाबासाहेबांचे विचार अभ्यासले पाहिजेत .

बाबासाहेबांनी इस्लामची कठोर चिकित्सा केली. त्या धर्मात  समता नाही  - सहिष्णुता नाही -  आधुनिकता नाही -  असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे. मुस्लिम बांधवांना धार्मिक दलदलीतून बाहेर काढणे हे आंबेडकरांचा अनुयायी म्हणुन मला माझे कर्तव्य वाटते . विज्ञान आणि विवेक याच्या प्रचारा शिवाय हे अशक्य आहे . इस्लाम धर्म चिकित्सा अटळ आहे. आपल्याला  चिकित्सक बुद्ध्यांक वाढवावा लागणार आहे. बाबासाहेबांच्या   Thoughts on Pakistan च्या मुळ आवृत्तीतल्या पहिल्या पानावरचे कोटेशन होते :



"“More brain, O Lord, more brain! or we shall mar 
Utterly this fair garden we might win.”
―George Meredith


 मेंदू दे देवा, मेंदु दे - बुद्धी दे देवा, बुद्धी दे
अन्यथा 
मरेल  विजयाची - सुनिश्चित आशा  !








--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
[(८ - ३२०)  हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र  शासनाने  प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत  रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे.  बरेचसे  मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English)  मध्ये कंसात दिले आहेत.  ]

संदर्भ ग्रंथांचे तपशील :

(1) - Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(८ )- Volume 8.   Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(१८-३) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे : खंड १८ भाग ३ (मराठी ). उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन (२००२)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html

५५ टिप्पण्या:

  1. अभिरामदादा, अप्रतिम.
    खूप अभ्यासपूर्ण आणि प्रवाही मांडणी.

    उत्तर द्याहटवा
  2. कित्ती दिवसानि इतक अप्रतिम लिखान वाचल ! ! ! ! !

    उत्तर द्याहटवा
  3. मुस्लिम बांधवांना धार्मिक दलदलीतून बाहेर काढणे हे आंबेडकरांचा अनुयायी म्हणुन मला माझे कर्तव्य वाटते .

    उत्तर द्याहटवा
  4. Babasaheb Ambedkar ka naam kharab kar rahe ho Dr Ambedkar na favour mein thei na oppose mein thei unki book "Pakistan Or Partition of India" mein unhone RENAN ka point samzaya hai "Forgetfullness" thoda aur samaz lo "The prospects might perhaps be different if the past of the two communities can be forgotten by both, Renan points out the importance of forgetfulness as a factor in building up a nation :—
    "Forgetfulness, and I shall even say historical error, form an essential factor in the creation of a nation; and thus it is that the progress of historical studies may often be dangerous to the nationality. Historical research, in fact, brings back to light the deeds of violence that have taken place at the commencement of all political formations, even of those the consequences of which have been most beneficial. Unity is ever achieved by brutality. The union of Northern and Southern France was the result of an extermination, and of a reign of terror that lasted for nearly a hundred years. The king of France who was, if I may say so, the ideal type of a secular crystalliser, the king of France who made the most perfect national unity in existence, lost his prestige when seen at too close a distance. The nation that he had formed cursed him; and today the knowledge of what he was worth, and what he did, belongs only to the cultured.
    "It is by contrast that these great laws of the history of Western Europe become apparent. In the undertaking which the king of France, in part by his justice, achieved so admirably, many countries came to disaster. Under the crown of St. Stephen, Magyars and Slavs have remained as distinct as they were eight hundred years ago. Far from combining the different elements in its dominions, the house of Hapsburg has held them apart and often opposed to one another. In Bohemia, the Czech element and the German element are superimposed like oil and water in a glass. The Turkish policy of separation of nationalities according to religion has had much graver results. It has brought about the ruin of the East. Take a town like Smyrna or Salonica; you will find there five or six communities each with its own memories, and possessing among them scarcely anything in common. But the essence of the nation is, that all its individual members should have things in common; and also, that all of them should hold many things in oblivion. No French citizen knows whether he is a Burgundian, an Alan, or a Visigoth; every French citizen ought to have forgotten St. Bartholomew, and the massacres of the South in the thirteenth century. There are not ten families in France able to furnish proof of a French origin; and yet, even if such a proof were given it would be essentially defective, in consequence of a thousand unknown crosses, capable of deranging all genealogical systems." AGAR SIRF PARTITION K FAVOUR MEIN HI HOTE TOH RENAN KA POINT "FORGETFULLNESS " BOOK MEIN LIKHTE HI KYU---AFSOS ISI BAAT KA HOTA HAI KI APNE AAP KO AMBEDKARITE KEHNE WALE LOG DR AMBEDKAR SAMAAN DESH BHAKT NAHI BAN PAAYE AUR NAA HI BUDDHA(ENLIGHTENED BY SELF) BAN PAAYE

    उत्तर द्याहटवा
  5. http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_partition/102.html

    उत्तर द्याहटवा
  6. on partition of India Dr Ambedkar suggested to take public referendum .Did anybody know this?

    उत्तर द्याहटवा
  7. Monish Bowangade This para is followed by a discussion and there Dr Ambedkar says that this is not possible in India

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. A scene from Jabbar Patel directed the film Dr. Babasaheb Ambedkar in 2000 with Mammootty enacting the lead role. This biopic was sponsored by the National Film Development Corporation of India and the government's Ministry of Social Justice and Empowerment. please follow link Dr B R Ambedkar opposing Partition of India ----https://www.youtube.com/watch?v=4nY86mAriKk

      हटवा
  8. On December 15, 1946, in his maiden speech in the Constituent Assembly, he hoped that some day the light would dawn upon Muslims and "they, too, would begin to think that a united India was better for everybody." Secularism and democracy were the sole basis of coexistence. In the crowd of small and big villains of the Partition drama, Ambedkar stands out as the only hero, a true statesman.---pls follow link --->>http://www.outlookindia.com/printarticle.aspx?228340

    उत्तर द्याहटवा
  9. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  10. Monish Bawangade मोनीश बावनगाडे सिनेमा आणी साप्ताहिकातलि वाक्ये संदर्भ म्हणुन वापरत नसतात . मुळ लेखकाचे प्रकाशित लेखन वापरात असतात . हे तुम्हाला माहित आहे काय ?

    फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - " जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक, परिणामशुन्य राज्य बनेल- जणु जिवंत प्रेत, न पुरलेला मृतदेह " (८-३४०)

    फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली - बाबासाहेब म्हणाले होते. -- " पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (१-१४६)

    त्यापुढे जाउन बाबासाहेब असेही म्हणतात कि - " जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " (१-१४६)

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कमाल आहे परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला अस म्हणाले?
      डॉ.आंबेडकर परमेश्वराला तरी मानायचे का? कसले खोटेनाटे संदरभ देता

      हटवा
  11. 1946 madhein dr ambedkar kaay mhunaale hote te hi visarta yet naahi.government's Ministry of Social Justice and Empowerment.hi pann sanstha samvaidhanik aahe aaplya Rashtrachich aahe ...tumhi je mhuntaahet hey mala maahit aahe,yaa war cha lekh do varsha agodar mi loksatta paper madhein mi vaachla hota.anand babasahebaana jhala hota te hi thik aahe.Pann bhau Partition honya purvi tarr Babasahebaana anand naahi jhala hota tyanchi ichha hoti AKHAND Bharatachi.Tumhi Itihasache aaklan ekach drushtine kartaahet yaacha mala khedd aahe.aaj AIMIM rajnitik party dalitana jodnyacha prayatna karat aahe.Hi Party Bhartiya Musalmanani ubhi keli aahe aani sadhya Dalit lokanchya madatine Maharashtrat pude pann vaadli aahe.Asach vision Muslim league saathi hi Babasahebaana hota te Jinnah samjuu shakle naahi mhunun Babasahebaana Akhand Bharat hi hava hota.Jarr Pakistan vegdaa nahi jhala asta tar aaj jase AIMIM la Muslim-Dalit lokani pude nele tasech Pakistan Bhartat raahun hi Muslim -Dalit lok pude jaau shakat hote.Mhunun tyana faqt anandach jhala mhunta yet naahi.Jarr Pakistan Bharatat asta tarr Muslim Dalit miduun aata peksha jaast mothi shakti banu shakat hoti hie gosht pann aapan lakshat thevaylaa havie mhunun dr Ambedkar yanna faqt Anandach jhala mhunta yet naahi.

    उत्तर द्याहटवा
  12. मोनीश बावनगाडे सिनेमा आणी साप्ताहिकातलि वाक्ये संदर्भ म्हणुन वापरत नसतात . मुळ लेखकाचे प्रकाशित लेखन वापरात असतात . हे तुम्हाला माहित आहे काय ?--->Dhanyavaad yaa pude mi lakshat thevnaar--->>Dr,Abhiram Sir---.government's Ministry of Social Justice and Empowerment. yaa sansthey var tumcha visvas aahe kaa?

    उत्तर द्याहटवा
  13. "http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html?showComment=1428225259719#c1183341328679981484"---Dr,Abhiram Sir,yaa link cha mi konala reference deyuu shakto kaa?jarr mala vatll ki konala ha post share karaycha aahe aani yaat satya aahe tarr kaa mi konala share karu shakto kaa?

    उत्तर द्याहटवा
  14. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  15. Dr Abhiram Sir,please follow link------ http://parliamentofindia.nic.in/ls/debates/vol1p7.htm---- Tuesday, the 17th December, 1946-----Mr. Chairman:Dr-. B. R. Ambedkar (Bengal: General) ----....................Now I come to the first part of the Resolution, which includes the first for paragraphs. As I said from the debate that has gone on in.the House, this has become a matter of controversy. The controversy seems to be centred on the use of that word 'Republic'. It is centred on the sentence occurring in paragraph 4 "the sovereignty is derived from the people". Thereby it arises from the point made by my friend Dr. Jayakar yesterday that in the absence of the Muslim League it would not be proper for this Assembly to proceed to deal with this Resolution. Now, Sir, I have got not the slightest doubt in my mind as to the future evolution and the ultimate shape of the social, political and economic structure of this great country. I know to-day we are divided politically, socially and economic-,ally; We are a group of warring camps and I may go even to the extent of confessing that I am probably one of the leaders of such a camp. But, Sir, with all this,I am quite convinced that given time and circumstances nothing in the world will prevent this country from becoming one. (Applause): With all our castes and creeds, I have not the slightest hesitation that we shall in some form be a united people. (Cheers). I have,no hesitation in saying that notwithstanding the agitation of the Muslim League for the partition of India some day enough light would dawn upon the Muslims themselves and they too will begin to think that a United India is better even form them. (Loud cheers and applause).---->>Saheb aata tari maanya kara,tumhi je mhuntaahet te barobar aahe 1955 mi maanya karto ,pann aamhi je mhunto te hi chukicch naahi he pann tumhi maanya karave 17-12-1946 united India......don satya goshti madhun ekach gosht satya aahe ase mhunnaar tar kase chalnar?,don satya goshti aahet tar donghana satyach mhunnave laagel--hech satya!!krupa karun hie chuk aapan sudharavavie ashi kaadja paasun aaplyala vinanti---kaaran vidyarthi lokanchi deeshbhuul nahi hovyala pahije,lokaanmadhe Babasaheba vishayi gairsamaz naahi udbhavla pahije,aani Satya faqt satya asaila pahije,SAtya-mev-Jayate--->>Jai Bharat

    उत्तर द्याहटवा
  16. प्रत्युत्तरे
    1. On this Day 17th December, 1946 India was not divided means United India( Akhand Bharat )means India,Pakistan,,Bangladesh or east Pakistan------------->>brother I dont like aurguments,I am not argumenting and i am not argumentive person ----14-15/August/1947 are the days of freedom and Partition

      हटवा
    2. The Speech has a context of previous discussion not captured in your comment . He has written a full book of 400 pages to support partition

      हटवा
    3. Dr. Abhiram Dixit५ एप्रिल, २०१५ रोजी ६:१४ म.उ.
      United India after Removing Pakistan------>>According to Dr Ambedkar--17th December, 1946 ------>Muslims themselves and they too will begin to think that a United India is better even form them

      हटवा
  17. फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली - बाबासाहेब म्हणाले होते. -- " पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (१-१४६)

    त्यापुढे जाउन बाबासाहेब असेही म्हणतात कि - " जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " (१-१४६).

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Ho saheb tumhi 1955 varach atakle aahet pann tumhi je purave dile te mala manya aahet aani satya pann aahe,pann tumhi itihaasache aaklan barobar naahi karuun rahile aahet,tumche Blog Dr Ambedkar laa Deshdroha kade gheuun jaat aahe jase Dr Ambedkar ne Dr Iqbal laa deshacha shatru mhutle hote thodas khali pann vaachun bagha Discussion with B. R. Ambedkar
      October 17, 1932
      AMBEDKAR: I have not come to discuss untouchability but political matters.
      GANDHIJI: That is true. I cannot talk about it with you; even if you do I shall not be able to express an opinion—my mind does not work in that direction.
      A. I have come here for this. I want to request you to give up civil disobedience and to join the Round Table Conference. The point is that if you do not come, we shall get nothing in England and everything will be upset. People like Iqbal who are enemies of the country will come to the forefront. We have to work any sort of constitution. Hence though I am a small man, I request you to come.
      G. If you elaborate your argument, I shall think over it. I suggest you go and write about it at length in the newspapers. I shall think over it.
      A. It is not a thing that can be put down in writing. In it I shall have to say a lot that will hurt the Muslims and I cannot say that publicly. But I shall write anonymously or have someone write in a different way. Please have a look at it and, taking it to be mine, think over it.
      G. It will be good if you write under your own name. But of course you may do as you wish.
      A. I must honestly say that I have no interest in the temples being thrown open, common dinners and the like, because we suffer thereby. My people have to put up with beatings and bitterness increases. After the common dinner at Vile Parle, the Maratha workers went on strike. If the caste Hindus had the strength they would have engaged untouchables as servants. But that has not been so. Hence I do not feel interested in the thing. I only want that social and economic hardships should end.
      G. Give examples.
      A. The untouchables do not get houses to live in; they continue to suffer injustice and oppression. In one case, an untouchable was accused of having murdered a Maratha. I could have taken the case to Sessions and got him acquitted, but the magistrate changed the charge of murder to one of grievous injury. Now he will receive some punishment. You may not know what even I have to face. I do not get any other place to live in Bombay except the Port Trust chawl. In my village, I have to stay in the midst of the Mahars. In Poona, all others stay with their friends. I have to stay at the National Hotel and have to spend Rs. 7 and transport fare.
      G. Servants of India?
      A. Yes, I can perhaps stay there. But only perhaps. You will know if you ask Vaze. Once Vaze’s servant insulted me in his presence. I want to do away with all these hardships.
      G. I am at one with you. You ought to know that my fast has not ended yet, it is still on. To correct the agreement was a minor thing. The main thing still remains to be done. I am ready to give my life for it. All the injustices you mention ought to end.
      A. Birla said that I should be taken on the Committee for the Abolition of Untouchability. I declined to join, because what can I alone do? I would have to agree to the work of abolishing untouchability being done in accordance with your wishes. If we are in a majority we can get the reforms that we wish brought about. You wish that temples should be erected or wells should be dug. We might feel that that would be a waste of money that there should be another way out for it.
      G. I understand your point of view, and I shall keep it in mind and shall see what can be done.
      (Source: The Collected Works of Mahatma Gandhi-Vol. 57: 5 SEPTEMBER, 1932 - 15 NOVEMBER, 1932)

      हटवा
    2. http://www.mkgandhi.org/Selected%20Letters/amb-gandhi%20corr..htm

      हटवा
  18. People like Iqbal who are enemies of the country will come to the forefront. We have to work any sort of constitution.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. फाळणीला पाठींबा हा देशदोह नाहि. बिलकुल नाही . माझ्या समजुतीप्रमाणे तो एक अतिशय शहाणपणाचा निर्णय आहे . उद्या जर संघाचे स्वयंसेवक भारत पाकिस्तान आणि बांग्लादेश सकट अखंड हिदुस्तान बनवू लागले .- तर मी त्याला प्राणपणाने विरोध करेन …। गेल्या शतकातली सगळ्यात भाग्याची गोष्ट म्हणजे फाळणी असे मी मानतो …… हिंदु आणि हिंदुत्व वादि मूर्ख आहेत । त्यांना आपले हित कळत नाही …. पाकिस्तान बांग्लादेश वेगळे झाले ते बरेच झाले …। काश्मीर सुद्धा देऊन टाकले पाहिजे …। ज्या लोकांना इथे राहायचे नाही भारतीयांना ते बांधव मानता नाहीत …. काश्मीर र्ला फिरायला गेलो होतो तेंव्हा हिंदुस्थान्से आये हो ? क्या ? असे विचारत होते - त्याना खुशाला वेगळे होऊ द्या … पाकिस्तानात जाऊ द्या … काशी करू द्या …. आम्ही त्यांच्यावर करोडो रुपये का म्हणून खर्च करावेत ? देश म्हण्जे भूगोल नाही . देश म्हणजे माणसे . ज्याना इतर भारतीयांबद्दल बंधुत्व नाही आणि स्वत:ची इस्लामी शरियत वगैरे हवी आहे त्याना अतिशय सन्मानपूर्वक द्वेष न करता वेगळे केले पाहिजे …. पाच पैसे सुद्धा आमच्या करातले काश्मीरवर खर्च व्हायला नकोत आणि एकाही भारतीय सैनिकाचे एक थेंब सुद्धा रक्त त्यांच्या रक्षणासाथि खर्च ना होवो

      हटवा
    2. Agree. Ani rahilele muslimanna saman nagari kayada karava nahitar pakistan madhe ja mhanave,

      हटवा
    3. आज काश्मीर पाकिस्तानला दिला कि उद्या पासून पश्चिम बंगाल मधून बंगाली लोकांना हाकलून द्यायला चालू करतील आणि २० वर्षांनी तुम्ही म्हणाल पश्चिम बंगाल बांगलादेश ला द्या.. मग केरळ मधून हिंदू आणि ख्रिश्चन लोकांना हाकलतील. मग तुम्ही म्हणाल केरळ स्वतंत्र होऊ दे.. पडतोय का डोक्यात प्रकाश..??

      हटवा
  19. 1)Dr Ambedkar chya Rashtriyata,saarvbhoumta chya mate ,Phadni laa support karnare deshdrohich....jase dr Iqbal,17/Dec/1946 assembly cha speech pann ,15/august/1947 nantar 1955 hi mala manya aahe tumchya reference varuun 2)tumchya mate faadni laa support karnare desh drohi naahi he faqt tumche mat,tumhala svatantra aahe aaple vichar thevnyacha,mala khoop aadar aahe tumchya vicharavar.pann Dr Ambedkaraanche mat phadni vishayi kadhi ekach naahi rahile .jase dr Iqbal,17/Dec/1946 assembly cha speech pann ,15/august/1947 nantar 1955 hi mala manya aahe tumchya reference varuun .Mhunun aapan naahi mhunu shakat ki dr Ambedkar faqt faadni chyach pakshat hote kiva faqt faadnichya virodhat hote aani 3 gosht mhunje sagde lok je hi haa post baghtiel te sagde tumchya saarkhach vichar NAAHI kartiel ki Dr Ambedkar phadnilaa support kele mhunun tyani desh hitaachich gosht keli. mhunun vedeiy anusaar (with respect to time) Itihaasache aaklan karne khoop mahatvaachey---3)Akhand Bharat aata bannar naahi kaaran lok modern naahi jhale,Sanghache lok aaplya Bharat Deshatlya Musalmaanana nyaya deyu shaqle naahi,Babri Masjid,Hashimpura,Muzzafanagar,Godhra kaand,Maharashtrat Sarkarr yetach Musalamanache Aarakshan khatam kele aani Marathyanche Aarakshan naahi khatam kele,TERRORIST mhunun khoop sare Musalmaan mulana jaileet taakle,tyanche Bhavishya kharab kele aani hotach aahe,Hindu Rashtrat Musalman aani Christain lok yet naahit .mhunun Pakistan aani Bangladesh kadihi ek houu shakat naahit,yaat dusri gosht mhunje Bharat,Pakistan ,Bangladesh che lok aata hi khoop kattarvadi mansiktaa thevtat kameet kami average madhe 80% tar kattarvaadi Dharmil maansikta aahech samza 4)kashmir cha muddyavar tumchey vichar barobar aahet,mala hi asech kaahi vaat te...........pan nantar hie hech lok jarr pakistanat gele tar punha aaplyavarach aatankvaadi humla karteel kaaran aapan hindustanatley Hindu aahot mhunun ase te samajteel te naahi samajteel ki aapan Dharmneerpeksh aahot aankhi jar aapan tyana aaple maanto tar aaj 65 varsha paasun Bharataane Kashmir laa kaay dile?naahi tyana vyavastit shiksha naahi rozgar,kashmir cha dardpura banvuun taakla,kashmiri mahile che navre kadhi BSF,CRPF,Militants yaa sagdya lokaani marle aani Kashmiri mahile var atyachar hi kele,mhunun Kashmir vegde jhale naahi jhale mala kaahi farq padat naahi .tarihi Tyana free kelelech tar barr hoiel

    उत्तर द्याहटवा
  20. Yacha arth babasahebanni islam dharmacha abhyas islamchya madhymatun kela nahi.te western lekhkanchya chashmyatun islam baghun gele......ata hi jababdari tyanchya bhaktanchi ki khara Islam kay yacha abhyas karava.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Islam cha Abhyas Quran madhun hoto,musalamanancha abhyas tyancha Itihasaa madun hoto,Babasahebaani kasa abhyas kela hey faqt Babasahebaanach maahit asel,tyani western lekhna varunach abhyas kela ki naahi ase kaahihi mhuntaa yett naahi,Babasahebaani Islam cha abhyas kasa kela te sangyala Babasaheb urle naahit hei gosht pathakani lakshaat thevavi....tarihi hie aapan khara Islam cha abhyas karava hie gosht kautak karnyachi aahe aani anusaran karavie laagel dusri gosht aaplyala babasaheb bhakti saathi naahi tarr deshheetasathi pahijet

      हटवा
  21. ..

    Babasahebanni jar muslim aani islamcha abhyas kela adta tarcha gair samaj jhala nasta.udahrnarth.......eakach check kara te lihtat islam vigyan virodhi hota.khare tar aajchyvigyan unnatcha paya musalmanannich rachla.thidese vachnyache kasht kara.... Aaj mahitiche yug aahe.dole band karun ekhyadya manvache vichar jase tasech swikar karne kitpat barobar aahe.


    http://www.famousscientists.org/famous-muslim-arab-persian-scientists-and-their-inventions/

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. varchie link baghietlee ,ek hi muslim mahilaa scientist naahi tyat 15/3=5 scientist sagde maansach,kamiet kami 5 tar mahila pahije hotya,jar ek maanus kameet kamie 3 mahilaan sobat lageen karu shakte tyaa hishobaani 15x3=45 vyagyaniek mahila islami kaaydyane have hotya..........

      हटवा
    2. hindu lok hi kami naahiet mahilenchya soshan karnyat yaat hi kaahi shanka naahi.......

      हटवा
    3. aajchyvigyan unnatcha paya musalmanannich rachla---->>>Abu Nasr Al-Farabi (872 – 950) AD aahe ki BC spasht karave,jarr AD asel tar Abu Nasr Al-Farabi (872 – 950) AD tumche matt "aajchyvigyan unnatcha paya musalmanannich rachla" maanya naahi tya agodar hindu,buddh,jain ne hi khoob saari research keli aahe

      हटवा
  22. Preshitanchya kalat ji gulamanchi aani striyanchi dasha hoti tyacha abhyas kara.tya nantetr islam aani preshitanni dilelya adeshanna rabavlyananter jagavar tyacha kay prabhav jhala aani stri va gulamichi pratha kashi sampavli geli tyacha abhyas tatasth pane kara aani islamchya arebic strotatun.......krupya kona ekhadya mansache ksrya pahun islam vishyi nishkarsh kadhne adech aahe janu aaplya bhrashtachari satta dharinna pahun Bhart kinvha tyachya ghatnela samajne............swata ha niyam jar aapan vaparla taraaj bhartachi dashya pahun Babasaheban kade bote uthtil....pan aapan tase karit nahi.samajto ki jo paryant ghatnenusar apan vagnar nahi samaj badalnar nahi.pan jevha bat islamchi yete he visrun apan islamvar sarras arop lavto karan tech vikrut itihasane aaplyala shikavle ahe.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Islam purvi cha kaal mahile saathi khoop jasti bhayanak hota,Mohamad Paigambar SAW mule mahilaana khoop sare haqq midale aani Muslim mahilencha jeevan sturr unchavlaa yaat kaahihi shanka naahi,SAW laa dev naahi maanat aaho kaaran tyana ithe ek samajik krantikari karyakarta maanto.....SAW mule mahilaana nuksaan naahi jhale mahilaana faayda jhala jithe jithe Islam pohochla.......Pann SAW nantar,Islam cha Buddhivaad kami jhala,lok quran varach atakle vedeanusar musalmaan badlaav saathi pude naahi gele jya saathi Sir syed Ahmad Khan ne Musalmanana chetavani dilie ki aadhunik jagaat jar aadhunik shikshan naahi ghetla tar yaa vishva chya nakashyat musalmaan maage padteel....,aani musalmaan lok maage padlet,

      हटवा
    2. Babasaheb ek khoop motheiy vidvaan hote,je hi tyani Islam varchie Dharm chikitsaa keli aani kontya hie musalmaan maansala kiva gair musalmaan maansala vaaiet vaatle asel tarr tyani aaplya Islam varr chintan karave,e .g.mahila lokancha sturr kasa unchava (1 maanus 1 Bai cha ek joda) pahilie baayko asta dusri karnyachi parvaangi naahi dyavi kiva swatahh naahi karavie.Ase krantikari paauul kadhi uchalnaar?.Jase Dr. Asghar Ali Engineer--CENTER FOR STUDY OF SOCIETY AND SECULARISM Founder Chairman was an Indian reformist-writer and social activist. mhuntat ki Aamchya javadd Sir Syed Ahmad Khan tar aahet pann aata Ambedkar paida karaaycha aahe ....Sir Syed (Ahmed Khan, who established the Aligarh Muslim University in 1875). Sir Syed's main thrust was for zamindars and the children of zamindars.Ambedkar worked for the poorest of the poor. I say Muslims now need to produce an Ambedkar.

      हटवा
  23. https://www.facebook.com/notes/madhusudan-cherekar/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%BE/3448653555006

    उत्तर द्याहटवा
  24. बाबासाहेब म्हणतात:-
    "सारेच धर्म सारखे मानणारा एक भोंगळ हिंदू-धर्म-वाद्यांचा पक्ष आहे.परधर्मीय लोकही या भोंगळ पक्षाला पाठिम्बा देत असल्याचे दिसून येते.पण सर्वच धर्म सारख्या प्रमाणात सत्य असल्याचा दावा करण्याइतका असत्य असा निर्भेळ मूर्खपणा जगात दुसरा कोणताही नाही हेच खरे.
    धर्माच्या नांवावर विधवा स्त्रियांवर पतीबरोबर सती जाण्याची सक्ती करणारा धर्म,धर्माच्या नांवावर स्त्रियांना पडद्यात कोम्बणारा धर्म,धर्माच्या नांवावर कोवळ्या पोरासोरीवर बलात्कार करण्याचा हक्क नवर्यांना आहे असे सांगणारा धर्म,धर्माच्या नांवावर स्त्रिया व शूद्र यांना कुत्र्या मांजरापेक्षाही नीच मानणारा धर्म.हे सारे धर्म सारख्याच प्रमाणात सत्य आहेत हे मानणे बुद्धीहीनतेचेच द्योतक नाही काय?"-बाबासाहेब आंबेडकर.महाबोधी सोसायटी जर्नलच्या मे १९५०च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बाबासाहेबांच्या लेखातून.
    वर दिलेल्या वाईट गोष्टी हिंदू धर्मातील पुराणोक्त पंथालाच लागू होतात.आर्यसमाज,लिंगायत,महानुभाव,वारकरी सम्प्रदायास ही टीका लागू होत नाही.
    असो.सध्या कुराण वाचत आहे.त्यावरून बाबासाहेब असे का म्हणाले हे आणखी स्पष्ट होते.
    कुराणाविषयी लिहिण्यापूर्वी हे स्पष्ट करू इच्छितो की मुस्लीम बांधवांचे कल्याण ,कोटकल्याण व्हावे अशीच मनीषा मी बाळगतो.त्यांच्याविषयी माझ्या मनात कसलाही द्वेष नाही.पण हिंदू जनतेवर असलेल्या प्रेमापोटीच हिंदूंना समाजसुधारकांनी धर्मग्रंथ नाकारण्यास शिकवले,तसेच काहीसे...
    कुराणाचे माझे वाचन चालू आहे.
    काही गोष्टी खूप खटकल्या.त्या इथे देत आहे.
    १.कुराणाची दुसरी सूरह-अल बकरा,पारा २: अल्लाहने मूसाला सांगितले की वासराची पूजा करणार्यांना त्यापासून परावृत्त कर,जे ऐकतील त्यांना वाचव आणि जे ऐकणार नाहीत त्यांना ठार मार.ज्या गायीची ते पूजा करीत आहेत,त्या गायीचा बळी दे.
    २.नववी सूरह-अत तौबा:या भूतलावर राज्य करण्याचा अधिकार फक्त मुस्लीमांचाच आहे.मुस्लीमेतरांना तीन मार्ग खुले आहेत:१.मुस्लीम बनणे.२.जिझिया कर देणे.३.मृत्यूला सामोरे जाणे.
    ३.सामान्य मुस्लीमांना ४ पत्नी करण्याची अनुद्न्या आहे.स्वत: मो.पैगम्बरास त्यांच्या नात्यातल्या कुठल्याही स्त्रीशी विवाह करण्याची मग ४ पेक्षा अधिक झाल्या तरी अनुद्न्या आहे तसेच पत्नींशिवाय हाताखालील दासींशी शरीर संबंध ठेवण्याची अनुद्न्या आहे.
    ४.स्त्रीने आपल चेहरा नेहमी चादरीने झाकावा.

    आपण ब्रिटिशांना हिंदू-मुस्लीम समस्येविषयी दोष देतो.परंतु कुराणाच्या वरील आद्न्येतच सम्पूर्ण विश्वातील मुस्लील-मुस्लीमेतर समस्या दडलेली आहे.आपण हिंदू कोणताही धर्मग्रंथ आज वाचत नाही.आपल्याला पसायदान तेवढे माहित असते.आज १टक्के लोकांच्याही घरी मनुस्मृती सापडणार नाही.वयाच्या ४०व्या वर्षापर्यंत मनुस्मृती काळी का गोरी ते मी पाहिले नव्हते.
    पण मुस्लीम बांधवांचे तसे नाही.बहुसंख्य मुस्लीम हे दिवसातून एकदा तरी मशिदीत जातात.गांवोगांवी निर्माण झालेल्या मदरशांतून कुराण शिकवले जाते.अश्रद्धावंतांचा छळ होणार आहे असे कुराणात वारंवार म्हटले आहे.ही गोष्ट निरागस मुस्लीम बालकांच्या कोवळ्या मनावर कोरली जाते.
    कुराणात एक आदर्श जीवनपद्धती आणि विश्वबंधुत्व सांगितले आहे पण ते केवळ इस्लाम कबूल करणार्यांसाठीच आहे.ज्यांना इस्लाम कबूल नाही,त्यांच्याशी कसेही वागले तर ते काही आक्षेपार्ह समजले जात नाही असे दिसते.
    माझे मुस्लीम बांधवांना आवाहन आहे की आम्ही जसे धर्मग्रंथ नाकारून सुधारणा स्वीकारल्या तसे काहीसे तुम्ही करू शकणार नाही काय?अखिल मानवतेच्या कल्याणासाठी....!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. पहिली गोष्ट ते वासरु नव्हते। तो फ़क्त वासराचा पुतळा होता। आणि फ़क्त त्या पुतळ्याला तोडण्याचा आदेश देण्यात आला होता। अनुयायाना मारण्याचा नाही।

      कुराणात स्पष्टपणे सांगितले आहे की पर स्त्रीशी शरीर संबंध ठेवणाऱ्या पुरुषाला दगडाने संगसार करण्याची शिक्षा आहे। कुराणच्या नावाने तुम्ही हा नवीन शोध लावला आहे जो चुकीचा आहे की 'पत्नींशिवाय हाताखालील दासींशी शरीर संबंध ठेवण्याची अनुद्न्या आहे."

      हटवा
  25. मुस्लीम बांधवांचे कोटकल्याण
    November 7, 2012 at 8:15am
    काल रात्री आजचा सवाल मध्ये मुस्लिम स्त्रियांना दर्ग्यात मजारपर्यंत येऊ दिले जात नाही या विषयावर चर्चा चालू होती.मी सर्व मुस्लीम बांधवांचे अभिनंदन करू इच्छितो की त्यांच्यात ही आता धर्मचिकित्सा सुरु झाली आहे.मुस्लीम महिला संघटनेच्या नूरजहां यानी कुराणाच्या चौकटीतच राहून का होईना मुस्लीम धर्मगुरुंच्या अधिकाराविरुद्ध आवाज उठवला तर अब्दुल कादर मुकादम यांनी त्याही पुढे जाऊन आज केवळ मूळ कुराणाच्या २०%च शिल्लक असल्याचे सांगितले.
    माझ्या ४२ वर्षाच्या आयुष्यात कुराणाची अशी चिकिसा,विशेषत: कुराणात प्रक्शिप्त भाग आहे हे कुठल्याही मुस्लिम बांधवाने प्रकटपणे मान्य केल्याचे मी पाहिले वा ऐकले नव्हते.

    ही चर्चा आज सकाळी ९वाजता आणि दुपारी ४ वाजता आय बी वन लोकमत वर पुन्हा पाहता ये ईल.

    ८० वर्षापूर्वीच सावरकरांनी लिहिले होते की कुराण हा जरी एकच ग्रंथ ऐकला तरी टीका कारांनी त्याचे विविध अर्थ लावले आहेत.त्यांनी स्वत: कुराणाची विविध भाषांतरे अभ्यासल्याचा उल्लेख माझी जन्मठेप मध्ये आहे.त्यामुळे सावरकरांच्याच वाक्यात-पोथीवेड सोडून विद्न्याननिष्ठ बनण्यातच मुस्लीम बांधवांचे कोटकल्याण आहे.

    उत्तर द्याहटवा
  26. बाबासाहेबांची इस्लाम विषयक मते.
    August 24, 2012 at 3:46pm
    १.सर सय्यद अहमदखान यांनी १८८७ साली सर्वप्रथम द्विराष्ट्रवादाची कल्पना मांडली.त्यावेळी सावरकर ४ वर्षांचे होते आणि बाबासाहेबांचा जन्मही झाला नव्हता.
    १८जानेवारी १९२९ च्या बहिष्कृत भारत च्या अग्रलेखात बाबासाहेब म्हणतात:-भारतात हिंदू व मुस्लीम हे दोन समाज नसून दोन राष्ट्रे आहेत.
    ही वस्तुस्थिती सावरकरांनी तब्बल आठ वर्षांनी म्हणजे १९३७साली मान्य केली.

    २.http://www.ambedkar.org/ambcd/05B.%20Thoughts%20on%20Linguistic%20States%20PART%20II.htm
    I was glad that India was separated from Pakistan. I was the philosopher, so to say, of Pakistan. I advocated partition because I felt that it was only by partition that Hindus would not only be independent but free. If India and Pakistan had remained united in one State Hindus though independent would have been at the mercy of the Muslims. A merely independent India would not have been a free India from the point of view of the Hindus. It would have been a Government of one country by two nations and of these two the Muslims without question would have beenthe ruling race notwithstanding Hindu Mahasabha and Jana Sangh. When the partition took place I felt that God was willing to lift his curse and let India be one, great and prosperous.[page no.146,writing and speeches,volume1.
    भारत हा पाकिस्तानापासून वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता.म्हटले तर,मीच या पाकिस्तानचा तत्ववेत्ता होतो.केवळ फाळणीमुळेच हिंदू केवळ स्वतंत्रच नव्हे तर मुक्तही होतील असे वाटून मी फाळणीचा पुरस्कार केला.जर भारत आणि पाकिस्तान हे एकच देश राहिले असते तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते.हिंदूंच्या दृष्टीने एक केवळ स्वतंत्र भारत हा मुक्त भारत राहिला नसता.नि:संशय त्या अखंड भारताचे सरकार मुस्लीम वंशीयांनीच चालवले असते,हिंदुमहासभा आणि जनसंघ असूनही.जेव्हा फाळणी झाली तेव्हा मला वाटले की परमेश्वराने भारताला आता शापमुक्त केले आहे,एक,महान आणि वैभवशाली ्राष्ट्र बनण्यासाठी..[१९५५,पान क्र.१४६,बाबासाहेब आंबेडकर रायटिंग एण्ड स्पीचेस,खंड पहिला].

    उत्तर द्याहटवा
  27. वरील परिच्छेद बाबासाहेबांच्या हिंदू लोकांवरील प्रेमाने ओथंबलेला आहे.यालाच मी बाबासाहेबांचे ’हिंदुत्व’ म्हणतो.अंधश्रद्धा आणि विषमतायुक्त हिंदू धर्मास बाबासाहेब टाकाऊ आणि देशविघातक समजत होते.्पण हिंदू लोकांच्या बाबतीत मात्र त्यांच्या मनात सावरकरांइतकीच मैत्री,करुणा आणि प्रेम होते.हे वर दिलेल्या १९५५मधील लिखाणात स्पष्टपणे दिसते.१९५६ सालीही याच प्रेमातून बाबासाहेब म्हणाले की हिंदूंना आपले राष्ट्र जगवायचे असेल तर बुद्धधम्माशिवाय पर्याय नाही.

    ३...या बाबतीत सर्व हिंदुजनांना आम्हांस एकच सूचना करावीशी वाटते.
    आज जो कोणी हिंदुस्थानातील राजकारणाचे बारकाईने निरीक्षण करून पाहील,
    त्याला एक गोष्ट दिसून ये ईल की,
    इंग्रज सरकार हे मुसलमानांच्या घरी गहाण पडले आहे.
    ते सर्वस्वी मुसलमानांच्या ताब्यात गेले आहे.
    हिंदूंच्या संबंधाने इंग्रजांच्या मनात दुजाभाव असावा असा संशय येतो.
    ..
    इंग्रज व मुसलमान यांच्या संगनमताने,भागीदारीने व सहकार्याने आजचे हिंदुस्थानचे राजकारण चालले आहे.
    ..ही इंग्रज-मुसलमानांची भागीदारी हिंदूंना अत्यंत हानिकारक होणार हे कोणासही सांगावयास नको.
    ..या देशाला एकतर स्वराज्य मिळू द्यायचे नाही आणि दिलेच तर विचका करून द्यावयाचे हाच त्यांच्या भागीदारीचा परिणाम होणार आहे.
    या घोर परिणामापासून हिंदूंना जर आपला बचाव करून घ्यावयाचा असेल तर त्यांनी अस्पृश्यांबाबत समबुद्धीने वागण्याची उदारबुद्धी दाखवली पाहिजे..
    ["जनता पत्रातील लेख:डा.बाबासाहेब आंबेडकर",पान क्र.३२९,प्रकाशक,मुंबई विद्यापीठ]
    ४.याच पुस्तकात पान क्र.२६४वर बाबासाहेब लिहितात:-दुसरा दोष लष्करी पद्धतीत शिरला आहे तो असा की ,वर्षानुवर्षे सैन्यातील हिंदू लोकांचे प्रमाण कमी कमी होत जाऊन मुसलमानांचे प्रमाण सैन्यामध्ये वाढत चाललेले आहे.या गोष्टी जो मनुष्य ध्यानात घे ईल त्याला खेद वाटल्यावाचून राहील असे आम्हास वाटत नाही.ज्या स्वराज्यातील सैन्यात मुसलमानांचे प्रमाण ५०/६० टक्के आहे ते स्वराज्य आपणास कितपत लाभदायक होईल याचा हिंदूंनी विचार करावा.

    उत्तर द्याहटवा
  28. ५.पाकिस्तान किंवा हैदराबाद येथील अनुसूचित जातींनी मुसलमान किंवा मुस्लीम लीगवर विश्वास ठेवणे हानिकारक होईल.
    मुसलमान हे हिंदूंचा राग करतात म्हणून मुसलमानांना मित्र समजण्याची सवय अनुसूचित जातींना आहे.
    हा चुकीचा दृष्टीकोण आहे.
    मुसलमानांना अनुसूचित जातींचा पाठिंबा हवा होता परंतु त्यांनी अनुसूचित जातींना आपला पाठिंबा कधीही दिला नाही.
    जिन्ना हे नेहमी दुहेरी डाव खेळत होते.
    जेव्हा त्यांच्या फायद्याचे होते तेव्हा त्यांनी अनुसूचित जातींचे अस्तित्व स्वतंत्र आहे यावर फार जोर दिला.
    पण जेव्हा त्यांना ते अडचणीचे ठरले तेव्हा त्यांनी तेवढ्याच जोरकसपणे सांगितले की ते[अनुसूचित जाती] हिंदू आहेत....

    धर्मांतराबाबत सांगावयाचे झाल्यास आम्हा अनुसूचित जातींवर शेवटचा पर्याय म्हणून ते हिंसाचाराने लादले गेलेले आहे.
    हे समजून घेतले पाहिजे.
    तरीसुद्धा जे बळाने व हिंंसाचारामुळे धर्मांतरित झाले असतील त्यांना माझे सांगणे आहे की ,त्यांनी असे मुळेच समजू नये की त्यांनी आपली जुनी अवस्था नेहमीकरता गमावली आहे.
    मी त्यांना शपथेवर शब्द देतो की ते जर परत येऊ इच्छित असतील तर मी बघेन की त्यांना त्यांच्या जुन्या स्थानी परत घेतले जावे व धर्मांतराआधी त्यांना ज्या बंधुभावाने वागविले जात असे तशीच वागणूक त्यांना मिळावी.
    [कायदेमंत्री असताना १४जानेवारी१९४८रोजी बाबासाहेबांनी हे पत्रक काढले.२८जानेवारीच्या the national standardमध्ये ते प्रसिद्ध झाले.]

    मुसलमान झालेल्या दलितांना परत हिंदू धर्मात येण्याचे हे आवाहन आहे.एवढेच नव्हे तर त्यांना परत आल्यानंतर बंधुभावाची वागणूक देण्याचे आश्वासनही त्यात आहे.हे आश्वासन त्यांनी या प्रांतातील आर्यसामाजास समोर ठेवून केले आहे.कारण पुढील प्रकरण वाचा:-
    जातिभेद व विषमता की उपेक्षा करके शुद्धि अभियान के पाखण्डी पक्ष पर आक्षेप होते हुए भी अन्य परिस्थितियों में इच्छानुसार धर्मांतर करने के विषय में बाबासाहब को आपत्ति होने का कोई कारण नही था.प्राचीन काल में हिंदु धर्म एक मिशनरी धर्म था यह कहकर उन्होंने उसकी प्रशंसा ही की थी.स्वयं उन्होंने धर्मांतर का निर्णय घोषित किया था,तब शुद्धि और धर्मांतर की ओर वे सरसरी तौर पर नफरत की दृष्टी से नही देखते,अपितु उसकी गुणवत्ता की आधार पर उसका विचार करते हैं.जब शुद्धि की,अर्थात धर्मांतरित व्यक्ति को अपने मूल धर्म में लाने की आवश्यकता प्रतीत हुई तो उन्होंने उसका समर्थन ही किया.देश विभाजन के पश्चात पाकिस्तान के अस्पृश्यों को जबरदस्ती मुस्लिम बनाया जा रहा था.वैसी ही दुर्दशा निजाम के हैदराबाद रियासत में शुरु हुई थी.

    उत्तर द्याहटवा
  29. दिनांक १८ नवंबर १९४७ को बाबासाहब ने परिपत्र निकालकर इन सबको भारत में या हिंदु प्रांत में आने का आवाहन किया था.इन सब की शुद्धि कर फिर से हिंदु धर्म में मिलाने की व्यवस्था करने का व पूर्ववत उनसे आचरण करने का आश्वासन भी उन्होंने दिया था.
    सन १९४७ में जब हिंदु-मुस्लिम दंगे भडके,हिंदुओं की मार से बचने के लिए मुसलमान चोटी रखने लगे,माथे पर तिलक लगाने लगे,तो इस पर प्रतिक्रिया व्यक्त करते हुए श्री सोहनलाल शास्त्री से बाबासाहब ने कहा था-
    "किसी एक आर्यसमाजी नेता को मेरे पास ले आइए.मैं उन्हें समझाकर बतलाउंगा की अब ऐसा समय आ गया हैं कि उन्हे[मुसलमानों को] हिंदुओं में शामिल कर लेना चाहिए,वे बेचारे बच जाएंगे और हिंदुओं की संख्या भी बढेगी."

    कहा जाता है कि हैदराबाद के निजाम ने २५ करोड रुपये के बदले में इस्लाम कबूल करने की पेशकश बाबासाहब को की थी.बाबासाहब ने उसे यह कहकर ठुकरा दिया की मेरे जमीर को कोई खरीद नही सकता. [बाबासाहेब और आर्यसमाज,ले.कुशलदेव शास्त्री/शेषराव मोरे.]

    ६.जेव्हा बाबासाहेब हिंदुसमाज म्हणतात तेव्हा त्यांना बौद्ध,जैन आणि शीख त्यात अभिप्रेत अहेत.[जनता,१०फेब्रुवारी१९५१च्या अंकात बाबासाहेबांनी ६फेब्रुवारी १९५१ला संसदेत केलेले भाषण छापले आहे.बाबासाहेब म्हणतात-समाजशास्त्रदृष्ट्या हिंदु कायद्या खालीच हे सर्व पंथ येतात.बुद्धाचे नि वैदिक ब्राह्मणांचे मतभेद होते ते तरी तात्विक होते.त्याने धार्मिक निर्बंधशास्त्र कायमच ठेवले.स्वत:च्या अनुयायांसाठी नवा कायदा निर्माण केला नाही.महावीर व शीखांचे दहा गुरू यांचीही हीच गोष्ट आहे.]

    ७.असो.आता पान क्र.२४,पाकिस्तान या ग्रंथात बाबासाहेब म्हणतात[सुगत बुक डेपो,द्वितीयावृत्ती,२००४]-
    हिंदु-मुस्लीम दोन्ही समाज आपल्या भूतकालीन घटना विसरूच शकत नाहीत.कारण त्या घटनांचा मोठा संबंध त्यांच्या धर्माशी आहे.
    त्या विसरून जाणे म्हणजेच धर्माला मुकणे होय.
    यामुळे दोघांकडूनही अशी आशाच व्यर्थ आहे.
    याप्रमाणे सामान्य पूर्व ऐतिहासिक तथ्यांच्या अभावाने हिंदू-मुस्लीम परस्पर मिळून राष्ट्र निर्माण करतात हा हिंदूंचा दृष्टिकोन निराधार आहे.
    त्याचे समर्थन देखील भ्रामक आहे.
    जशी मुसलमानांत आपसात मिळून राहण्याची भावना आहे तशी हिंदू व मुसलमानांत नाही.

    उत्तर द्याहटवा
  30. ८.शंकराचार्याचे तत्वद्न्यानामुळे आणि युक्तिवादामुळे बौद्ध धर्म निष्प्रभ ठरला असे अनेक लोक म्हणताना आढळतात.
    माझ्या मते ही गोष्ट चुकीची आहे.
    कारण शंकराचार्यांच्या निधनानंतर देखील बौद्ध धर्म अनेक वर्षे उत्कर्षाने वावरत होता.
    मला तर असे वाटते की शंकराचार्य व त्यांचे गुरु हे दोघेही बौद्ध धर्मीयच होते.
    ..
    विदेशी आक्रमकांपैकी मुसलमानांद्वारा बौद्ध धर्माला अधिक ढळ पोहचली.
    मुसलमान लोक प्रतिमा व मूर्तीचे विरोधी होते.
    त्यांनी बुद्धाच्या मूर्तीची तोडफोड केली व भिक्षूंना ठार मारले.
    त्यांनी नालंदाच्या विशाल विश्वविद्यालयाला सैनिकी किल्ला समजून व चीवरधारी भिक्षूंना सैनिक समजून त्यांचा संहार केला.
    ..
    नालंदा येथील विशाल विश्वविद्यालयात ताडपत्र व भोजपत्रावर लिहिलेले सुमारे दोन लाख ग्रंथ होते.
    त्यात हजारो वर्षाचे द्न्यान साठवलेले होते.
    त्यांना बख्तियार खिलजीने आग लावून दिली.
    सहा हजार विद्यार्थांपैकी काहींना ठार मारले व काहींना जबरदस्तीने मुसलमान करून सोडले.
    मुसलमानांनी आक्रमण जेथे जेथे केले तेथे तेथे बोद्धांना ठार तरी मारले किंवा मुसलमान तरी केले: आणि बुद्धमूर्तींची तोडफोड केली.
    ग्रंथालये जाळली व विहार नष्ट केले.
    [संदर्भ:कोलम्बो येथे ६जून १९५०ला यंग मेन्स बुद्धिस्ट असोशियनच्या विद्यार्थ्यांपुढे दिलेले भाषण]
    ९.५ औगस्ट १९५६ या दिवशी बाबासाहेब म्हणाले-ख्रिस्ती अगर इस्लामी धर्मांनी आपली भारतीय संस्कृती नष्ट होईल.
    [डा.बाबासाहेब आंबेडकर चरित्र,खंड १२वा,ले.चांगदेव खैरमोडे,पान४४/४५].
    १०.मुसलमानांनी या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून बुद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्यांना ’बुत शिकन’ म्हणजे मूर्ती फोडणारे म्हटले जाते.यातील बुत हा शब्द मूर्तीसाठी आहे. तो ’बुद्ध" या मूळ शब्दाचे विकृत रूप आहे...
    एकेकाळी अफगाणिस्तान हा संपूर्ण बौद्ध देश होता.
    आक्रमक मुसलमानांना तेथे पिवळी वस्त्रे परिधान केलेले लोक इकडून तिकडे जाताना आढळले.मुसलमान सरसेनापतीने त्यांना इस्लामी धर्माचा स्वीकार करण्यासाठी निरोप पाठविला.पण भिक्खूंनी तसे करण्यास नकार दिला.एक दिवस हा सरसेनापती अरण्यातून जात असताना त्याला तेथी झाडावर माणसांची मुंडकी लटकलेली आढळली व आश्चर्य वाटले.जवळ जवळ सातशे बौद्ध भिक्षुंची कत्तल करून त्यांची डोकी झाडावर टांगण्यात आली होती.हे पाहून आपल्या हुकमाची चुकीची अंमलबजावणी झाल्याचे पाहून त्या सरसेनापतीस खेद झाला.
    [२३ जून १९५६,दिल्ली बौद्धजन महासभेतर्फे आयोजित बुद्धजयंतीतील भाषण]
    ११.हिंदूंवरील आपला राग कसा आहे हे सांगताना बाबासाहेब म्हणतात:-
    आईने आपल्या मुलाला चापट मारली तर तिला कोण काय म्हणेल?
    मुलाने सदाचारी व्हावं म्हणून आई मुलाला मारत असते.
    माझा रागही प्रेममूलक आहे.तुम्ही समतेनं वागावं म्हणून मी राजकारणात शिव्या देतो.
    [१२ डिसेम्बर १९५५,मिलिंद महाविद्यालय,औरंगाबाद]
    १२.मुस्लिमांची बंधुता त्यांच्या धर्मापुरतीच मर्यादित आहे.
    त्यात प्रामुख्याने मानवतेचा अभाव आहे.
    [३एप्रिल,१९५५,मुंबई,सिद्धार्थ महाविद्यालय]

    उत्तर द्याहटवा
  31. https://scontent-mxp.xx.fbcdn.net/hphotos-xfa1/v/t1.0-9/430209_3135722491925_1172856453_n.jpg?oh=a753b91104af25108c0b60fa97df701f&oe=55B6041C

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. dr cherekar saheb बाबासाहेबांचे ’हिंदुत्व" ---->>aapan kashala Babasahebana Hinduvaat Mixed kartahet--->>To understand his positive proposals, one must grasp some of his basic conceptions. Mr. Savarkar lays great stress on a proper understanding of the terms, Hinduism, Hindutva and Hindudom. He says: /4/
      "In expounding the ideology of the Hindu movement, it is absolutely necessary to have a correct grasp of the meaning attached to these three terms. From the word "Hindu" has been coined the word "Hinduism" in English. It means the schools or system of Religion the Hindus follow. The second word "Hindutva" is far more comprehensive and refers not only to the religious aspects of the Hindu people as the word "Hinduism" does but comprehend even their cultural, linguistic, social and political aspects as well. It is more or less akin to "Hindu Polity" and its nearly exact translation would be "Hinduness." The third word "Hindudom" means the Hindu people spoken of collectively. It is a collective name for the Hindu World, just as Islam denotes the Moslem World."

      हटवा
    2. http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_partition/307a.html#part_2---------aaplya deshachya 10% lokaana hi Hindutva Maahit naahi magg kasala mix kartaahet?....Jar Hindutva mhuntaahet tarr Tatva har vedes spasht karave,Pravin Togadiya chandra grahan hota mhunun gharchya baaher naahi nighalet.Jevha Hindutvaat ase kaahi hie naahi,?"Babasahebancha Hindutva " tarr pathak confuse houu shaktat.Veer Savarkar Hindutvaache janak aahet faqt Hindutva tyanchyach Itihahasat asu dyaa,naahi tar hindutvaache janak koun ?saangnya saathi vegdi mehnat karavie laagel---VEer Savarkars Hindutva tatva kiva elements The five elements of his philosophy were Utilitarianism, Rationalism and Positivism, Humanism and Universalism, Pragmatism and Realism------Mazya mate babasaheb mhunje kiva tumhi yalach Babasahebaanche Hindutva Mhunnu shakta Equality,Liberty,Fraternity,JUstice---->>Pann mix kelell thik naahi,tumhi Babasahebaana Hindutvaa shi naka joduu---Andhvisvaasi Hindu lokana jaage karnya saathi Hindutva upyogi aahe aani Hindutvacha credit Veer Savarkar yevji mie konala hie naahi devuu denaar aani naahi gheuu denaar

      हटवा
  32. भारतातला शेवटचा मुस्लीम जोवर पाकिस्तानात जात नाही तसेच पाकिस्तानातील शेवटचा हिंदू अथवा गैर मुस्लीम भारतात येत नाही तोवर फाळणीस मान्यता देवु नये असेही बाबासाहेब बोलले होते.जर मुस्लीम भारतात राहीले तर भविष्यात भारताची पुन्हा फाळणी होईल याचीही भिती आंबेडकरांनी बोलुन दाखवली होती.पण गांधींच्या मवाळ धोरणामुळे ते शक्य झाले नाही.त्याचे परिनाम आता दिसत आहेत.

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *