२२ जुलै, २०१६

गेम थेअरी : सवाल नैतिकतेचा (भाग १)

 सवाल नास्तिकाच्या नैतिकतेचा (भाग १)

देवा धर्मा मुळे नैतिकता टिकून राहते असे मानले जाते.  नरक, स्वर्ग, कर्मफळ इत्यादी गोष्टींना घाबरून सामान्य माणसे खरे बोलतात, चोऱ्या, खून, लबाड्या, बलात्कार करत नाहीत असेही म्हणतात. ईश्वराच्या संकल्पाने प्रमाणे कायदा काही सर्व व्यापी - सर्व साक्षी  नाही . कायद्याच्या कचाट्यातून सुटणेही फार सोपे असते. त्यामुळे खरे खोटे कसेही असो - देव धर्म उपयुक्त आहेत - कारण त्यामुळे नीतिमत्ता आणि सचोटी टिकते असे  म्हटले जाते.  प्रस्तुत लेखात आपण विज्ञान, गणित आणि जीवशास्त्र नैतिकतेकडे कसे पाहते ? याची चर्चा करायची आहे.

दोन माणसांनी एकमेकांशी कसे वागावे ? याचे नियम म्हणजे नैतिकता . आपण येथे गेम थेअरीतले दोन कैद्यांचे प्रसिद्ध उदाहरण पाहायचे आहे. समजा....

गेम थेअरी

बबन  आणि मगन  असे दोन चोर आहेत. त्यांनी एक मोठा दरोडा घातला . हे दोन्ही चोर अतिशय बुद्धिवादी आणि नास्तिक आहेत असे आपण गृहीत धरायचे आहे. पोलिसांनी त्या चोरांना पकडले आहे. दोन वेगवेगळ्या कोठड्यात ठेवलेले आहे . बबन आणि मगन ची स्वतंत्र पोलीस चौकशी सुरू आहे. या दरोड्याला कोणीही साक्षीदार नाही . कोणताही पुरावा नाही . पण बबन आणि मगन पैकी एक जण माफीचा साक्षीदार बनू शकतो .

१) जो गुन्हा कबूल करेल तो माफीचा साक्षीदार ठरेल. त्याला कोणतीही शिक्षा नाही (शून्य  वर्षे ) - दुसर्याला २० वर्ष खडी फोडावी लागेल .

२) दोघांनी गुन्हा कबूल केला तर पोलीस हलकी कलमे लावून पाच वर्षात दोघांनाही  सोडून देतील.

३) मगन  आणि बबन या दोघांनीही गुन्हा मान्य केला नाही   - गप्प राहिले तर - केस चाले स्तवर एखादे वर्ष तुरुंगात काढावे लागेल . साक्षीदार नसल्याने दोघेही वर्षभरात सुटतील .









तिसरा पर्याय सरळच दोघांच्याही फायद्याचा आहे.  दोघे गप्प राहिले तर - वर्षभरात सुटतील . पण हे गणित इतके सोपे नाही . दुसरी बाजू काय निर्णय घेते ? हे दोघांनाही माहीत नाही .  संगनमत करायला पोलीस संधी देत नाहीत.

 एक वर्षाची माफक कैद सुद्धा टाळण्याचा मोह आपल्या सहकार्याला होऊ शकतो . त्यामुळे   मी गप्प राहिलो आणि समोरच्याने गुन्हा कबूल  केला तर ? वीस वर्ष मला तुरुंगाची हवा खावी लागेल - या भीतीने तो धोका कोणीही पत्करणार नाही.  मग  मगन  आणि बबन ने कोणता निर्णय घ्यावा  ? स्वतःचा तोटा कमीत कमी  कसा करावा ? तर्कशास्त्रा नुसार गुन्हा कबूल करणे हाच सेफ गेम आहे . यात फार तर पाच वर्ष शिक्सला होईल किंवा कदाचित लगेच सुटका !

बबन आणि मगन या दोघांनीही गुन्हा कबूल केला !

हा एक अतिशय नैतिक निर्णय दोन अनैतिक दरवडे खोरानी घेतला आहे . त्यांनी बुद्धिवाद वापरला ! तर्कशास्त्र वापरले ! हे अनैतिक स्वार्थीच होता - पण त्यापायी दोघांनीही नैतिक निर्णय घेतला !

पण हे थोडे तोट्याचे आहे - शिवाय मैत्री भावनेशी अनैतिक देखील आहे ... आता थोडे पुढे जाऊ ....


खेळ मांडीयेला 


मगन आणि बबन ला पोलिसांपुढे साक्ष देण्याची एकच संधी होती . नेहमीच्या जीवनात आपल्याला सतत नैतिक निर्णय घ्यायचे असतात. समोरची व्यक्ती कशी वागेल याचा आपण सतत अंदाज घेत असतो. त्यानुसार आपले धोरण ठरवत असतो . त्यातून आपला स्वभाव बनतो . व्यक्तिमत्व बनते . म्हणजे मानवी गेम थेअरीत सातत्य आहे. वारंवारता आहे . आता एक पत्त्याचा डाव मांडूया .....

समजा तुमच्या कडे दोन रंगाचे पत्ते आहेत - सहकार्य आणि विश्वासघात

हे दोन पत्ते म्हणजे तुमचे दोन निर्णय.  हे निर्णय तुम्हाला आयुष्यात वारंवार घ्यायचे आहेत. सहकार्य आणि विश्वासघात . तुम्ही कोणता पत्ता निवडणार ? इथेही समोरचा माणूस काय खेळी खेळणार आहे ते तुम्हाला माहीत नाही .



निर्णय घेणारे दोन पक्ष 



हे निर्णय सतत घेताना तुम्ही काही धोरणे आखू शकता

१) सतत सहकार्य
२) सतत विश्वासघात
३) जशास तसे 
४) अनियमित (रॅन्डम ) चाली खेळायच्या 
५) अचानक केलेली फसवणूक
६) पश्चात्ताप धोरण - आपण फसलेल्या माणसाने सहकार्य केल्यास त्यास पुन्हा नाही फसवायचे
७) सूडाचे धोरण - जो एकदा फसवेल त्यास सतत फसवायचे

इत्यादी ....

पण या खेळात केवळ दोन पक्षी नाहीत . अनेक आहेत . खर्या आयुष्यातील निर्णय घेताना देखील अनेक पक्ष आहेत. कोण जिंकेल ?



संगणकीय प्रयोग 

रॉबर्ट अक्सेलरॉड  या अमेरिकन शास्त्रज्ञाने कॉम्पुटर प्रोग्राम वापरून हा प्रयोग केला . त्याने एकूण पंधरा शास्त्रज्ञाना यात सहभागी केले . हे सर्व गेम थेअरी मधील तज्ञ होते .  सहकार्य की  विश्वासघात ? आणि त्यांचा क्रम काय असला तर अंतिम विजय प्राप्त होईल ? पंधरा वेगवेगळी धोरणे कॉम्प्युटर ला फीड केली. सर्व धोरणांना एकमेकांशी दोनशे वेळा खेळवले. 


-----------------------------------------------------------
प्रोग्रामचे नियम : - 

दोघांनी सहकार्य केले तर दोघांना १०० मार्क
एकाने दगा केला आणि समोरच्याने सहकार्य केले - तर पराभूतला शून्य  मार्क , विजेत्याला १०० मार्क
दोघांनी दगा केला तर दोघांनाही  ५० - ५० मार्क


या १५ धोरणांनी एकदा स्वतः:शी देखील खेळायचे होते - म्हणजे १५ X   १५ = २२५ लढती 
प्रत्येकी दोनशे वेळा ४५००० लढती  झाल्या 

या इतक्या शक्यतांत ज्या धोरणाला जास्त मार्क मिळतील ते विजेते धोरण 
----------------------------------------------------------




सतत विश्वासघात करणारे या खेळात टिकू शकत नाहीत . जशास तसे वाले जिंकू लागतात . त्यांचे परस्परांशी सहकार्य निर्माण होते - आणि मग सतत विश्वास घात  करणारे अल्पसंख्य बनून हरू लागतात . कारण ते कोणाशीच सहकार्य करत नाहीत . (इतर विश्वास घात  वाल्यांशी सुद्धा नाही )

रॉबर्ट च्या संगणकीय प्रयोगात प्रयोगात जशास तसे हे धोरण जिंकले . आणि गंमत म्हणजे या पंधरा पैकी जी लबाड धोरणे होती ती शेवटच्या नंबरात आली . सज्जन धोरणे पहिल्या सात मध्ये आली .



दुसरा संगणकीय प्रयोग 

एक प्रयोग करून रॉबर्ट थाबला नाही. पहिल्या प्रयोगात एक त्रुटी राहून गेली होती . इतरांची धोरणे सहभागी शास्त्रज्ञाना माहीत नव्हती . साधारणतः कोणती धोरणे जिंकतात याचाही अंदाज नव्हता. हा अंदाज आल्यावर मग पुन्हा नवी धोरणे मागवली .

 त्यातले एक प्रसिद्ध धोरण , दोनदा फसवल्यास एकदा शिक्षा - असे उदारमत वादी - दुसर्याला सुधारायची एक संधी देणारे - पण सतत बदमाशी करणार्यांना धडा शिकवणारे असे होते

सज्जन धोरणे जिंकतात या पहिल्या निकालाच्या अंदाजाने इतर लोक सज्जन धोरणेच पाठवतील असा अंदाज बहुतेक गेम थेअरी वाल्या सहभागी शास्त्रज्ञानी केला . आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून  यावेळी आलेली बरीच धोरणे ही लबाड आणि बदमाश होती . पुन्हा दोनशे वेळा खेळ मांडीयेला .... या प्रयोगाचा निर्णय अजूनच विचित्र लागला !

फसवणार्या लबाडाची संख्या फार जास्त होती . त्यामुळे .... 

१) जशास तसे वाले बर्याच वेळेस लबाडी करू लागले - सूड वाले सूड चक्रात अडकले -  लबाडाची संख्या अजूनच वाढली

२) सज्जन धोरणे हरली .

३) दोनदा फसवल्यास एकदा शिक्षा वाल्याचे देखील काही चालेना . त्याला सतत बहुसंख्येकडून  फसवणूक झाल्याने हरावे लागले.

आजूबाजूच्या परिस्थिती वरून आणि समाजातील इतर धोरणावरून जय / पराजय ठरत होता . 




आता जीवशास्त्रीय प्रयोग 

मानवी व्यवहार म्हणजे कॉम्प्युटर चा प्रोग्राम नाही. मानवी व्यवहार अधिक जटील आहेत. याहून अधिक धक्कादायक निष्कर्ष  हाती लागणार आहेत .... त्यानंतर आपण ट्रेनचा प्रयोग पाहणार आहोत ...

(क्रमश:)




गेम थेअरी : सवाल नैतिकतेचा (भाग १)

 सवाल नास्तिकाच्या नैतिकतेचा (भाग १)

देवा धर्मा मुळे नैतिकता टिकून राहते असे मानले जाते.  नरक, स्वर्ग, कर्मफळ इत्यादी गोष्टींना घाबरून सामान्य माणसे खरे बोलतात, चोऱ्या, खून, लबाड्या, बलात्कार करत नाहीत असेही म्हणतात. ईश्वराच्या संकल्पाने प्रमाणे कायदा काही सर्व व्यापी - सर्व साक्षी  नाही . कायद्याच्या कचाट्यातून सुटणेही फार सोपे असते. त्यामुळे खरे खोटे कसेही असो - देव धर्म उपयुक्त आहेत - कारण त्यामुळे नीतिमत्ता आणि सचोटी टिकते असे  म्हटले जाते.  प्रस्तुत लेखात आपण विज्ञान, गणित आणि जीवशास्त्र नैतिकतेकडे कसे पाहते ? याची चर्चा करायची आहे.

दोन माणसांनी एकमेकांशी कसे वागावे ? याचे नियम म्हणजे नैतिकता . आपण येथे गेम थेअरीतले दोन कैद्यांचे प्रसिद्ध उदाहरण पाहायचे आहे. समजा....

गेम थेअरी

बबन  आणि मगन  असे दोन चोर आहेत. त्यांनी एक मोठा दरोडा घातला . हे दोन्ही चोर अतिशय बुद्धिवादी आणि नास्तिक आहेत असे आपण गृहीत धरायचे आहे. पोलिसांनी त्या चोरांना पकडले आहे. दोन वेगवेगळ्या कोठड्यात ठेवलेले आहे . बबन आणि मगन ची स्वतंत्र पोलीस चौकशी सुरू आहे. या दरोड्याला कोणीही साक्षीदार नाही . कोणताही पुरावा नाही . पण बबन आणि मगन पैकी एक जण माफीचा साक्षीदार बनू शकतो .

१) जो गुन्हा कबूल करेल तो माफीचा साक्षीदार ठरेल. त्याला कोणतीही शिक्षा नाही (शून्य  वर्षे ) - दुसर्याला २० वर्ष खडी फोडावी लागेल .

२) दोघांनी गुन्हा कबूल केला तर पोलीस हलकी कलमे लावून पाच वर्षात दोघांनाही  सोडून देतील.

३) मगन  आणि बबन या दोघांनीही गुन्हा मान्य केला नाही   - गप्प राहिले तर - केस चाले स्तवर एखादे वर्ष तुरुंगात काढावे लागेल . साक्षीदार नसल्याने दोघेही वर्षभरात सुटतील .









तिसरा पर्याय सरळच दोघांच्याही फायद्याचा आहे.  दोघे गप्प राहिले तर - वर्षभरात सुटतील . पण हे गणित इतके सोपे नाही . दुसरी बाजू काय निर्णय घेते ? हे दोघांनाही माहीत नाही .  संगनमत करायला पोलीस संधी देत नाहीत.

 एक वर्षाची माफक कैद सुद्धा टाळण्याचा मोह आपल्या सहकार्याला होऊ शकतो . त्यामुळे   मी गप्प राहिलो आणि समोरच्याने गुन्हा कबूल  केला तर ? वीस वर्ष मला तुरुंगाची हवा खावी लागेल - या भीतीने तो धोका कोणीही पत्करणार नाही.  मग  मगन  आणि बबन ने कोणता निर्णय घ्यावा  ? स्वतःचा तोटा कमीत कमी  कसा करावा ? तर्कशास्त्रा नुसार गुन्हा कबूल करणे हाच सेफ गेम आहे . यात फार तर पाच वर्ष शिक्सला होईल किंवा कदाचित लगेच सुटका !

बबन आणि मगन या दोघांनीही गुन्हा कबूल केला !

हा एक अतिशय नैतिक निर्णय दोन अनैतिक दरवडे खोरानी घेतला आहे . त्यांनी बुद्धिवाद वापरला ! तर्कशास्त्र वापरले ! हे अनैतिक स्वार्थीच होता - पण त्यापायी दोघांनीही नैतिक निर्णय घेतला !

पण हे थोडे तोट्याचे आहे - शिवाय मैत्री भावनेशी अनैतिक देखील आहे ... आता थोडे पुढे जाऊ ....


खेळ मांडीयेला 


मगन आणि बबन ला पोलिसांपुढे साक्ष देण्याची एकच संधी होती . नेहमीच्या जीवनात आपल्याला सतत नैतिक निर्णय घ्यायचे असतात. समोरची व्यक्ती कशी वागेल याचा आपण सतत अंदाज घेत असतो. त्यानुसार आपले धोरण ठरवत असतो . त्यातून आपला स्वभाव बनतो . व्यक्तिमत्व बनते . म्हणजे मानवी गेम थेअरीत सातत्य आहे. वारंवारता आहे . आता एक पत्त्याचा डाव मांडूया .....

समजा तुमच्या कडे दोन रंगाचे पत्ते आहेत - सहकार्य आणि विश्वासघात

हे दोन पत्ते म्हणजे तुमचे दोन निर्णय.  हे निर्णय तुम्हाला आयुष्यात वारंवार घ्यायचे आहेत. सहकार्य आणि विश्वासघात . तुम्ही कोणता पत्ता निवडणार ? इथेही समोरचा माणूस काय खेळी खेळणार आहे ते तुम्हाला माहीत नाही .



निर्णय घेणारे दोन पक्ष 



हे निर्णय सतत घेताना तुम्ही काही धोरणे आखू शकता

१) सतत सहकार्य
२) सतत विश्वासघात
३) जशास तसे 
४) अनियमित (रॅन्डम ) चाली खेळायच्या 
५) अचानक केलेली फसवणूक
६) पश्चात्ताप धोरण - आपण फसलेल्या माणसाने सहकार्य केल्यास त्यास पुन्हा नाही फसवायचे
७) सूडाचे धोरण - जो एकदा फसवेल त्यास सतत फसवायचे

इत्यादी ....

पण या खेळात केवळ दोन पक्षी नाहीत . अनेक आहेत . खर्या आयुष्यातील निर्णय घेताना देखील अनेक पक्ष आहेत. कोण जिंकेल ?



संगणकीय प्रयोग 

रॉबर्ट अक्सेलरॉड  या अमेरिकन शास्त्रज्ञाने कॉम्पुटर प्रोग्राम वापरून हा प्रयोग केला . त्याने एकूण पंधरा शास्त्रज्ञाना यात सहभागी केले . हे सर्व गेम थेअरी मधील तज्ञ होते .  सहकार्य की  विश्वासघात ? आणि त्यांचा क्रम काय असला तर अंतिम विजय प्राप्त होईल ? पंधरा वेगवेगळी धोरणे कॉम्प्युटर ला फीड केली. सर्व धोरणांना एकमेकांशी दोनशे वेळा खेळवले. 


-----------------------------------------------------------
प्रोग्रामचे नियम : - 

दोघांनी सहकार्य केले तर दोघांना १०० मार्क
एकाने दगा केला आणि समोरच्याने सहकार्य केले - तर पराभूतला शून्य  मार्क , विजेत्याला १०० मार्क
दोघांनी दगा केला तर दोघांनाही  ५० - ५० मार्क


या १५ धोरणांनी एकदा स्वतः:शी देखील खेळायचे होते - म्हणजे १५ X   १५ = २२५ लढती 
प्रत्येकी दोनशे वेळा ४५००० लढती  झाल्या 

या इतक्या शक्यतांत ज्या धोरणाला जास्त मार्क मिळतील ते विजेते धोरण 
----------------------------------------------------------




सतत विश्वासघात करणारे या खेळात टिकू शकत नाहीत . जशास तसे वाले जिंकू लागतात . त्यांचे परस्परांशी सहकार्य निर्माण होते - आणि मग सतत विश्वास घात  करणारे अल्पसंख्य बनून हरू लागतात . कारण ते कोणाशीच सहकार्य करत नाहीत . (इतर विश्वास घात  वाल्यांशी सुद्धा नाही )

रॉबर्ट च्या संगणकीय प्रयोगात प्रयोगात जशास तसे हे धोरण जिंकले . आणि गंमत म्हणजे या पंधरा पैकी जी लबाड धोरणे होती ती शेवटच्या नंबरात आली . सज्जन धोरणे पहिल्या सात मध्ये आली .



दुसरा संगणकीय प्रयोग 

एक प्रयोग करून रॉबर्ट थाबला नाही. पहिल्या प्रयोगात एक त्रुटी राहून गेली होती . इतरांची धोरणे सहभागी शास्त्रज्ञाना माहीत नव्हती . साधारणतः कोणती धोरणे जिंकतात याचाही अंदाज नव्हता. हा अंदाज आल्यावर मग पुन्हा नवी धोरणे मागवली .

 त्यातले एक प्रसिद्ध धोरण , दोनदा फसवल्यास एकदा शिक्षा - असे उदारमत वादी - दुसर्याला सुधारायची एक संधी देणारे - पण सतत बदमाशी करणार्यांना धडा शिकवणारे असे होते

सज्जन धोरणे जिंकतात या पहिल्या निकालाच्या अंदाजाने इतर लोक सज्जन धोरणेच पाठवतील असा अंदाज बहुतेक गेम थेअरी वाल्या सहभागी शास्त्रज्ञानी केला . आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून  यावेळी आलेली बरीच धोरणे ही लबाड आणि बदमाश होती . पुन्हा दोनशे वेळा खेळ मांडीयेला .... या प्रयोगाचा निर्णय अजूनच विचित्र लागला !

फसवणार्या लबाडाची संख्या फार जास्त होती . त्यामुळे .... 

१) जशास तसे वाले बर्याच वेळेस लबाडी करू लागले - सूड वाले सूड चक्रात अडकले -  लबाडाची संख्या अजूनच वाढली

२) सज्जन धोरणे हरली .

३) दोनदा फसवल्यास एकदा शिक्षा वाल्याचे देखील काही चालेना . त्याला सतत बहुसंख्येकडून  फसवणूक झाल्याने हरावे लागले.

आजूबाजूच्या परिस्थिती वरून आणि समाजातील इतर धोरणावरून जय / पराजय ठरत होता . 




आता जीवशास्त्रीय प्रयोग 

मानवी व्यवहार म्हणजे कॉम्प्युटर चा प्रोग्राम नाही. मानवी व्यवहार अधिक जटील आहेत. याहून अधिक धक्कादायक निष्कर्ष  हाती लागणार आहेत .... त्यानंतर आपण ट्रेनचा प्रयोग पाहणार आहोत ...

(क्रमश:)




१९ जुलै, २०१६

विज्ञान विरुद्ध छद्म विज्ञान : Causation Vs Correlation

विज्ञान विरुद्ध छद्म विज्ञान :
छद्म म्हणजे खोटारडे . विज्ञान आहे असे सोंग आणते पण खरे पाहता जी एक अंधश्रद्धा असते त्याला छद्म विज्ञान म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिकेतील बहुसंख्य लोकांचा एलियन वर विश्वास आहे . अनेकांची श्रद्धा देखील आहे . परग्रहावरील जीव उडत्या तबकड्यातुन पृथिवीवर येतात असे त्यांना मनापासून पटले आहे. ते सर्व खोटे बोलतात काय ?.... नाही .

ललित साहित्य सिनेमे याचा मानवी मनावर परिणाम होत असतोच. त्याला काही विचित्र अनुभवाची जोड देऊन आपण आपली मते बनवतो. विज्ञानात ज्याप्रमाणे तर्क असतात त्याप्रमाणे तर्क छद्म विज्ञानात असतात . श्रद्धेत असतात आणि अंध श्रद्धेत सुद्धा तर्क असतातच . तर्क करण्याची पद्धत मात्र चुकलेली असते.




अमेरिकेत उडत्या तबकड्या दिसण्याचा एक काळ होता. १९८० सालच्या दहशकात अमेरिकेत एलियन येण्याचे प्रमाण वाढले होते. अनेक वर्तमानपत्रातून त्यावर लेख येत . उडत्या तबकड्यांचे फोटोही छापून येत. एलियन पाहिल्याचे दावे करणारे महापुरुष भाषणे करत . पुस्तके लिहीत पैसेही कमावत . त्यातले काही लोक्स लबाड धरले तरी सगळेच खोटारडे होते असे म्हणता येणार नाही. एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घावी लागेल , ती म्हणजे १९८० च्या दशकात एलियन ने गर्दी केली पुढे गायब झाले ! हे एलियन मुख्यतः अमेरिकेत येत .. इतर देशाचा व्हिजा त्यांकडे नसावा अथवा एलियन लोकांना अमेरिकन बर्गर आवडत असावेत ! कारण इतर देशात उडत्या तबकड्या अभावानेच दिसल्या !





१९८० च्या दशकात अमेरिकन संरक्षण संस्था - पेन्टयागोंन - एका नवीन प्रकारच्या विमानावर गुप्तपणे काम करत होती - स्टेल्थ विमान . हे विमान लांबून उडत्या तबकडी सारखे दिसते . हा कार्यक्रम पूर्ण झाला . विमाने लष्करात दाखल झाली . आणि एलियन नि अमेरिकेतून गाशा गुंडाळला ! त्यानंतर एकही उडत्या तबकडीच्या नोंद नाही ! ( संबंधित बातमी Click Here )

इथे अमेरिकन लोकांनी केलेला तर्क बरोबर आहे . एखादी विचित्र उडती वस्तू आकाशात दिसली की तिचा संबंध परग्रहावरील प्राण्यांशी लावणे यात तर्क आहेच ! तर्क करण्याची पद्धत चुकलेली आहे .




----------------------------------
Causation Vs Correlation : 

कार्यकारण भाव विरुद्ध सहसंबंध
----------------------------------

इथे कार्य कारण भाव आणि सहसंबंध यातील फरक समजावून घ्यावा लागेल. दोन घटना एका मागोमाग एक घडल्या की मानवी मन त्यात संबंध जोडते. मांजर आडवी गेल्यावर अपशकुन होतो हा असाच जोडलेला संबंध आहे . दिवसभरात काही बर्या वाईट घटना घडतातच . त्यातील वाईट घटना सकाळच्या रस्ता क्रॉस करणाऱ्या मांजरावर टाकता येतातच ! यात तर्क आहेच पण अमेरिकन एलियन प्रमाणेच तर्क करण्याची पद्धत चुकली आहे . चांगली तारीख , मुहूर्त , लकी कलर , लकी डे या सर्वात सहसंबंध (correlation) असते पण त्यामागे (causation) कार्य कारण भाव नसतो.

कार्य कारण भाव म्हणजे काय ?

अपशकुन नेमका मांजरा मुळेच झाला हे सिद्ध करावे लागते. त्यासाठीचे एक साधन गणित आणि संख्याशास्त्र आहे . शंभर मांजरे शंभर माणसापुढून गेली , शंभर माणसापुढून डुकरे , शंभरा पुढून गायी गेल्या ... कोणाचा दिवस कसा गेला ? किती वाईट घटना घडल्या ? किती चांगल्या घटना घडल्या ?
त्या सर्वांची निरीक्षणे घेतली पाहिजेत .
त्यातून मग मांजराचे अपशकुनी असणे किंवा नसणे सिद्ध होते . व्यक्तिगत अनुभवा वरून तर्क करणे चूक आहे . त्यासाठी गणिती किंवा सांख्यिकी पाद्धत वापरली पाहिजे .
अजून एक पद्धत म्हणजे एखाद्या सिस्टीम मध्ये मुद्दाम मांजर सोडायची किंवा काढून घ्यायची ! म्हणजे रोज सकाळी उठल्यावर मांजर आडवी गेलीच पाहिजे याची व्यवस्था करायची - मग पाहायचे ! काय घडते दिवसभरात ? किंवा ज्या दिवशी काही वाईट घडणार आहे याची खात्री आहे - त्यादिवशी सोसायटीतल्या सर्व मांजरी जेल मध्ये टाकायच्या ! नेमके ठरवले पाहिजे अपशकुन नेमका मांजरा मुळे की अजून कशामुळे ?
अशाप्रकारे वेगवेगळ्या वैज्ञानिक पद्धती वापरून कार्य कारण भाव सिद्ध करावा लागतो .

--------------------------

श्रद्दा , अंधश्रद्धा , वेदातली विमाने आणि डाव्या लोकांच्या सोशल थेअर्या - या सार्या सहसंबंध - (correlation) वर आधारालेल्या आहेत . त्यामुळे ते छद्म विज्ञान आहे. विज्ञान नाही . कारण त्यात कार्य कारण भाव नाही .
विज्ञान ही विचार करायची पद्धती आहे . त्यातला प्रमुख भाग म्हणजे कार्य कारण भाव शोधणे आणि सतत तपासत राहणे.

१८ जुलै, २०१६

संस्कार की अनुवंश ? : नेचर विरुद्ध नर्चर

१२ जुलै, २०१६

इस्लामी दहशत वाद आणि भारतीय सेक्युलारीझम समोरील आव्हाने

होय इस्लाम खरोखरच खतरेमे आला आहे .


बांग्ला देशात इस्लामिस्टांनि २० लोक ठार केले . आधी त्यांचे धर्म विचारले , मग त्यांना कुराणातील आयती  म्हणून दाखवायला सांगितले . ज्यांना जमले नाही त्यांचे गेले चिरले . नुकताच एक काश्मिरी दहशत वादी मारला गेल्यावर हजारोंचे मोर्चे निघाले . कन्हैया कुमार कंपूतला उमर खालिद अतिरेक्यांना बाप बोलता झाला . 

या आधी पेरिस च्या 'चार्ली हेब्दो' या साप्ताहिकावर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. मुहम्मद पैगंबर आणि इसीस च्या नेत्याची व्यंगचित्रे छापली म्हणुन कडव्या इस्लामिस्टांनि एक डझन लोकांना गोळ्या घालून ठार केले आहे. यावेळी ते अल्लाहू अकबर , आम्ही प्रेषित अपमानाचा सूड घेतला आणि धर्म्ररक्षण केले अशा अर्थाच्या घोषणा देत होते. यामुळे त्यांचा धर्म टिकेल, वाढेल आणि इस्लामला सन्मान मिळेल असे त्यांना वाटते .
वास्तवात जगभरात आधीच अस्तित्वात असलेल्या इस्लाम विरोधाला आता अजून धार येणार आहे .  

 विवेकवाद आणि सहिष्णुता यांच्याशी इस्लाम धर्माचे काहीही देणे घेणे नाही. मुळात इण्टोलरन्स आणि इतर विचाराशी / धर्माशी असहिष्णुता हा कुराण आणि हदीस या धर्मग्रंथांचा गाभा आहे . सर्वच धर्म मनुष्यकृत आहेत . मानवाच्या रानटी अवस्थेत धर्माची निर्मिती झाली असल्याने सर्वच जुन्या धर्मात थोडाबहुत रानटीपणा आढळतोच . इस्लाम मध्ये हे प्रमाण जास्त आहे कारण अरबांचा वाळवंटि प्रदेश , टोळीयुद्ध , सततचा कोरडा दुष्काळ  , वाळवंटि दुर्भिक्ष या सार्या घटकांचा परिणाम इस्लाम वर झाला आहे . त्याहून वाइट म्हणजे इस्लाम मध्ये धर्म सुधारणा चळवळीची वानवा आहे . मुद्दा असा कि या सार्याचा इस्लामला काहीही उपयोग होताना दिसत नाही . इस्लामची म्रुत्युघंटा वाजू लागली आहे .

सुबुद्ध आणि सुसंस्क्रुत मुस्लीमाला या इसीसशी किंवा अल कायदाशी माझा संबंध नाही असे म्हणणे आवश्यक ठरणार आहे . पण त्यातून सुधारणा चळवळ जन्म घेताना दिसत नाही याउलट "खरा" इस्लाम शांतता प्रिय आहे वगैरे अकलेचे तारे तोडले जातात . इस्लामचे असहिष्णू रूप कुराण आणि हदीसच्या पाना पानावर आहे. सत्य फार काळ लपत नसते . इस्लाम सुधारणा घडवू शकत नसल्यास तो संपणार आहे. जो वाकत नाही तो मोडतो . नव्या आधुनिक जगाशी ज्याना जुळवून घेता येणार नाही त्या सर्वच धर्मांची हि हालत होणार आहे .
 



सेक्युलारीझम का हरतो ?


दहशत वादी   हल्ल्यानंतर भारतीय सेक्युलरांच्या प्रतिक्रिया पहाण्याजोग्या आहेत . एकिकडे दहशतवादाचा निषेध आणि दुसरीकडे  अमेरिका चुक्या - भारत तुम्हाराभी चुक्याच   ! असा अर्थ सेक्युलर प्रतिक्रियांच्या लसावितून निघतो …  

इस्लाम चिकित्सा नावाचा प्रकार भारतीय पुरोगामी हुंगत सुद्धा नाहीत . मुसलमानांनी दहशतवादी हल्ले केले की अमेरिकेला शिव्या दे भारत सरकारला शिव्या दे वाढीव म्हणून ज्यूनाच शिव्या दे - अशी बौद्धिक कसरत ते करतात !

मुस्लिम दहशत वादाचा संघ फायदा घेतो की काय ? या फालतू मानसिकतेतून जन्मलेली ही पुरोगामी तर्कटे आहेत. पुरोगाम्यांच्या इस्लामिक चाटूगिरीमुळे संघ फोफावला - संघाच्या वाढीला सर्वस्वी जवाबदार म्हणजे भ्याड पुरोगामी होत. हिंदू समाज बदलून गेला . पुरोगाम्यांची बौध्दिवाद गेल्या साठ वर्षात झालीच नाही . आणि त्याचेच हे परिणाम आहेत.  या कथित सेक्युलर पुरोगाम्यांकडे पिजर्यातील विनोदी माकडासारखे हिंदू समाज पाहतो .
भारतातल्या स्वत:ला सेक्युलर म्हणणार्यांनि इस्लाम धर्म रक्षणाचि भूमिका घ्यावी यात काहीच धक्कादायक नाही . आजवरचा इतिहास पाहता ,जमाते इस्लामी आणि भारतीय सेक्युलर यांच्या भूमिकात विलक्षण साम्य आहे . साम्यवादी विचारवंतांचे भारतीय बौद्धिक जगतावर साम्राज्य आहे .त्यातून हा   विचार  जन्मला आहे .. इस्लाम हा धर्म इथल्या वर्ण व्यवस्थेतून मुक्ती देणारा समतावादी धर्म आहे अशी जमाते इस्लामीची मांडणी आहे . सार्या भारताने इस्लाम स्वीकारून समतेच्या धर्मात सामील व्हावे यासाठी जमाते इस्लामी ने इस्लाम सर्वांसाठी असे अभियान चालवले आहे . भारतीय सेक्युलर या अभियानात जाणता / अजाणता सामील आहेत .
मुळात इस्लाम हा भारतीय धर्म नसल्याने त्यात वर्ण व्यवस्थेचे समर्थन नाही . वर्ण व्यवस्था वाइटच ... पण वर्ण व्यवस्थेचे समर्थन नसणे हा समतेचा एकमेव क्रायटेरिया आहे काय ? सर्व धर्म मानवनिर्मित आहेत . भारतातले धर्म इथल्या सामजिक गोष्टीवर भाष्य करतील … अरबी धर्म कसे करतील ?

इस्लाम मध्ये समता आहे हा साफ खोटा प्रचार आहे . तत्कालीन अरबांचि स्त्रियांकडे पाहण्याची                   " विशिष्ट "  दृष्टी इस्लाम मध्ये ओतप्रोत भरली आहे . बहुपत्नीत्व तलाक बुरखा या केवळ रूढी नाहीत .       " स्त्रिया म्हणजे पुरुषांची शेती " अशी वाक्ये कुराणातून अल्लाहनेच लिहून ठेवली आहेत . कुराणात गुलामांना चांगले वागवा असे उल्लेख येतात . गुलामगिरी प्रथा नष्ट करा असे कुराण म्हणत नाही . आजही मुस्लिम राष्ट्रात गुलामगिरी आहेच . चातुवर्ण नसले तरी विषमता विषमता असू शकतेच . काफिर आणि मोमीन अशी सार्या जगाचीच दोन भागात विभागणी करणारा इस्लाम हा समतावादी किंवा शांतता प्रिय धर्म आहे असे म्हणण्याचे धाडस फक्त भारतातले सेक्युलर आणि जमाते इस्लामीच करू शकतात . 


भारतातल्या मुस्लिमात असलेल्या जातिप्रथेचे, विषमतेचे, मुलतत्व वादाचे जनकत्व दरवेळी हिंदु धर्माकडे दिले तर बौद्धिक वावदुकीत जिंकता येईल अशी भाबडी आशा  सेक्युलर मनात वसते आहे . त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य याच भाबड्या आशेवर जगायला आमची ना नाही . पण बहुसांस्कृतिक वाद , सर्व धर्म समाभाव , अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे आधुनिक बुरखे पांघरुन तथाकथित सेक्युलरांनि इस्लाम धर्म रक्षणाचि बांग ठोकल्याने त्यांची चिकित्सा क्रमप्राप्त ठरली आहे .




सेक्युलरांना दुसर्याच्या धर्माचा आदर करणे हे योग्य मुल्य वाटते.


सेक्युलरांना दुसर्याच्या धर्माचा आदर करणे हे योग्य मुल्य वाटते. हीच मुळात भयंकर गोची आहे . धर्म हि एक कालबाह्य आणि घातक गोष्ट आहे . हिंदुधर्म घातक आहे . तो मुख्यत: आत्मघातक आहे . सती प्रथेपासुन अस्प्रुश्यते पर्यंत सारा हिंदु धर्म आत्म घातक आहे . त्यामुळे हिंदु समाजाच्या भल्यासाठी त्याला धर्म मुक्त करणे आणि हिंदु धर्माची कठोर चिकित्सा करणे क्रमप्राप्त ठरते . इस्लामची केस वेगळी आहे . बुरखा तलाक मुळे तो आत्म् घातक तर आहेच . पण दार उल इस्लाम - जिहाद - मुजाहिदीन अशा धार्मिक संकल्पनामुळे इस्लाम पर घातक हि आहे .


इस्लाम इतर  धर्म घातक असल्याने  इस्लामेतरांनाहि इस्लामची चिकित्सा करण्याचा नैतिक अधिकार आहे . पिके सिनेमातला हास्यास्पद शंकर योग्य आणि मुहम्मदाचे फ्रेंच कार्टुन अयोग्य हा कोणता उफराटा बुद्धिवाद ? इस्लामची चिकित्सा करण्याची परंपरा भारतीय बुद्धीवाद्यात आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर , कुरुंदकर , शहा , दलवाई या आधुनिक विचारवंतानि इस्लामची कठोर चिकित्सा केलेली दिसते . सध्या हि परंपरा खंडित झालेली दिसते . 

बहुसांस्कृतिक वाद आणि परधर्म सहिष्णुतेचे गोंडस बुरखे घेऊन कधी कन्हैय्या कंपूची तरफदारी कधी चार्ली हेब्दोचा विरोध भारतीय बुद्धिमंतानि चालवलेला दिसतो . व्यंगचित्र ते पण इस्लामच्या प्रेषिताच … काश्मीर चे वास्तव कधी तुम्ही समजून घेतले आहे काय ?

------------------------------------
तुमच्या मानवता वादि मागणी नुसार तिथे सार्वमत घेतले तर ? परिणाम काय होतील ?

भारत कश्मीरात सार्वमत का घेत नाही ? या प्रश्नाचे उत्तर त्याला या सार्वमताचा निकाल काय लागेल ?हे आधीच माहिती आहे यात दडलेले आहे ..सार्वमताचा निकाल तिथे काय लागेल? त्यातून पुढे काय होऊ शकते? त्याचे उर्वरित भारतावर काय परिणाम होतील? याचे योग्य आकलन नेहरु व तत्कालीन नेते यांना झाल्यामुळे त्यांनी ते घेण्यास नेहमीच टाळाटाळ केलेली आहे ..

भारतातील उर्वरित मुस्लीमांच्या हितासाठी शेख अब्दुलांने सार्वमताची मागणी सोडून द्यावी असा निरोपही नेहरुंनी एका सैन्यअधिकार्यामार्फत अब्दुला यांच्या कडे पाठवला होता ..कारण असे सार्वमत झालेच तर जम्मू मधील हिंदू,लडाख मधील बौद्ध तर भारताच्या बाजूने कौल देतील पण घाटीतील मुस्लीम हे पाकिस्तानकडे जाण्याचा कौल देतील..हे त्यांना कळत होते..अशा परिस्थितीत सार्वमत जर फुटीरवादी व पाकिस्तानवाद्यांनी जिंकले तर त्याचे परिणाम उर्वरित भारतातील मुस्लीम लोकांना भोगावे लागतील याची राजकीय दृष्टिकोनातून जागरुक असलेल्या कुणासही सहज कल्पना येईल...

एका फाळणीनंतरच त्यांच्या देशप्रेमाविषयी आजही शंका घेतली जाते..तिथे कश्मीरात अजून हेच घडल्यानंतर काय होईल? याची कल्पनाही करवत नाही ...भारतात आराजक माजेल..त्यापासून कुणीही वाचनार नाहीत ..त्यामुळे देशाच्या एका छोट्याशा भागातील आराजक मानवतावाद मिरविण्यासाठी सर्व भारतात पसरविणे शहाणपणाचे व देशहिताचेही नाही ... (शिवराज दत्तगोन्डे)
------------------------------------------------

जमाते इस्लामीशी सुसंगत भूमिका घेणार्या सेक्युलरांना आपण का हरतो आहोत हे समजणार नाहीच ! अल्लाहनेच त्यांच्या बुद्धीवर सील ठोकले आहे !


 

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *