२५ जाने, २०१५

द इमिटेशन गेम : इतिहास बदलणारे प्राध्यापक (चित्रपट परिक्षण )

द इमिटेशन गेम : इतिहास बदलणारे प्राध्यापक
(चित्रपट परिक्षण )

प्रस्तुत गोष्ट हि केम्ब्रीज च्या एका होमो गणिती प्राध्यापकाची सत्यकथा आहे . दुसऱ्या  महायुद्धाचा समय आहे. युद्धखोर नाझी जर्मनीचा सर्व आघाड्यावर विजय होतो आहे . हुकुमशाही वंशवाद आणि हिट्लर शाही विरुद्ध उभी असलेली दोस्त राष्ट्रे हरणार बहुतेक ! इग्लंडच्या एम आय - ६ आणि इतर गुप्तहेर संस्थानि  विद्वान लोकांना पाचारण केले आहे . एक बुद्धिबळपटू ,  एक स्त्रेटिजिस्ट , अनेक बुद्धिमान आणि एक गणिती … प्राध्यापक

मुख्य मुद्दा कधी हाणा मारिचा नव्हताच … मूळ मुद्दा आहे रणनितिचा … शत्रूची जहाजे कोठे चालली आहेत ? रसद कोण -कोठे  रसद पुरवतो आहे …. हल्ला कोठे करायचा आहे ? हि सारी माहिती माहिती जर्मन रेडियो वर बोलत आहेत .  ती माहिती कोड केलेली आहे.   रेडिओ फ्रिक्वेन्सी हेक वगैरे करूनही    काही समाजात नाही . कारण जर्मन सांकेतिक बोलत आहेत . आता A  ला B म्हटले C ला D म्हटले तर ? ABCD  ला  BCDE म्हटले जाइल .  एक चे अंतर आहे ,(A+1)  हे झाले कोड चे सूत्र. (A+6, A-1, ) … या हजारो लाखो शक्यातातून  … जर्मन कोडचे रहस्य शोधून काढतोय तो गणिताचा प्राध्यापक .

जोपर्यंत जर्मन कोडचे रहस्य काळात नाही । तोपर्यंत गणिती प्राध्यापकाला चैन नाही … रात्रंदिवस जागून प्राध्यापक जर्मन नाझीचा कम्युनिकेशन कोड हुडकतो आहे . त्यासाठी प्राध्यापक टीम  बनवतो…  एक बुद्धिबळपटू ,  एक स्त्रेटिजिस्ट , अनेक बुद्धिमान आणि एक गणिती … प्राध्यापक




मग एक दिवस प्राध्यापकाच्या लक्षात  येते कि  , जर्मन  लोक मशिनच्या सहाय्याने कोड देत आहेत … त्या कोडचे कोडे डिकोड करून उलगडण्या साठी  मानवी बुद्धी अपुरी आहे … मग कारर कट्ट चालणार्या काट्यांचे आणि आर्यांचे ..एक प्रचंड अभिनव यंत्र तयार होते । त्यास गणीति प्राध्यापक ख्रिस्तोफर असे नाव देतो .

या यंत्राने रोज जर्मन कोड डिकोड झाल्याने दोस्त राष्ट्र दुसरे महायुद्ध जिंकतात . हि गोष्ट ब्रिटिश सरकारकडून गुप्त ठेवली जाते.

१) पुढे त्या गणिती प्राध्यापकास समलिंगी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून अटक होते . त्यावेळच्या ब्रिटिश कायद्यानुसार प्राध्यापकास शिक्षा म्हणुन नपुंसक बनवले जाते . प्राध्यापक पुढे आत्महत्या करतो .

२) पन्नास वर्षांनी इंग्लंडचि राणी गुपित उघड करते आणि युद्ध जिंकण्यात प्राध्यापकाने शोधलेल्या यंत्राचा आणि तंत्राचा यथोचित गौरव होतो .

३) आज सर्व युरोपीय राष्ट्रात समलिंगी संबंधाला कायदेशीर मान्यता मिळाली आहे .

४) गणिती प्राध्यापकाने शोधलेल्या यंत्राला आज कोम्प्युटर म्हणुन ओळखले जाते .

सदर चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे आणि अवश्य पहावा असाच आहे . अभिनय, दिग्दर्शन, एडिटिग केमेरा वगैरे तांत्रिक बाजू उत्तम असल्या तरी चित्रपटाची कथाच एव्हढी जबरदस्त आहे कि इतर गोष्टींकडे लक्षच जात नाही . ५/५ स्टार .








१२ जाने, २०१५

चार्ली हेब्दो च्या निमित्ताने : भारतीय सेक्युलारीझम समोरील आव्हाने



होय इस्लाम खरोखरच खतरेमे आला आहे .

पेरिस च्या 'चार्ली हेब्दो' या साप्ताहिकावर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. मुहम्मद पैगंबर आणि इसीस च्या नेत्याची व्यंगचित्रे छापली म्हणुन कडव्या इस्लामिस्टांनि एक डझन लोकांना गोळ्या घालून ठार केले आहे. यावेळी ते अल्लाहू अकबर , आम्ही प्रेषित अपमानाचा सूड घेतला आणि धर्म्ररक्षण केले अशा अर्थाच्या घोषणा देत होते. यामुळे त्यांचा धर्म टिकेल, वाढेल आणि इस्लामला सन्मान मिळेल असे त्यांना वाटते .

वास्तवात जगभरात आधीच अस्तित्वात असलेल्या इस्लाम विरोधाला आता अजून धार येणार आहे . ज्या साप्ताहिकावर हल्ला झाला ते डाव्या पुरोगामी विचारांचे आहे. सर्व प्रकारच्या (पाश्चात्य ख्रिस्ती / इस्लामी ) उजव्या विचारसरणींच्या लोकांना मात्र हे साप्ताहिक अगदी सुरुवातीच्या अंकापासुन खटकतं राहिले आणि राहिल.

पण त्यावर जीवघेणा हल्ला करणारे मुस्लिमच असावेत यात काहीही नवल नाही . विवेकवाद आणि सहिष्णुता यांच्याशी इस्लाम धर्माचे काहीही देणे घेणे नाही. मुळात इण्टोलरन्स आणि इतर विचाराशी / धर्माशी असहिष्णुता हा कुराण आणि हदीस या धर्मग्रंथांचा गाभा आहे . सर्वच धर्म मनुष्यकृत आहेत . मानवाच्या रानटी अवस्थेत धर्माची निर्मिती झाली असल्याने सर्वच जुन्या धर्मात थोडाबहुत रानटीपणा आढळतोच . इस्लाम मध्ये हे प्रमाण जास्त आहे कारण अरबांचा वाळवंटि प्रदेश , टोळीयुद्ध , सततचा कोरडा दुष्काळ  , वाळवंटि दुर्भिक्ष या सार्या घटकांचा परिणाम इस्लाम वर झाला आहे . त्याहून वाइट म्हणजे इस्लाम मध्ये धर्म सुधारणा चळवळीची वानवा आहे . मुद्दा असा कि या सार्याचा इस्लामला काहीही उपयोग होताना दिसत नाही . इस्लामची म्रुत्युघंटा वाजू लागली आहे .

सुबुद्ध आणि सुसंस्क्रुत मुस्लीमाला या इसीसशी किंवा अल कायदाशी माझा संबंध नाही असे म्हणणे आवश्यक ठरणार आहे . पण त्यातून सुधारणा चळवळ जन्म घेताना दिसत नाही याउलट "खरा" इस्लाम शांतता प्रिय आहे वगैरे अकलेचे तारे तोडले जातात . इस्लामचे असहिष्णू रूप कुराण आणि हदीसच्या पाना पानावर आहे. सत्य फार काळ लपत नसते . इस्लाम सुधारणा घडवू शकत नसल्यास तो संपणार आहे. जो वाकत नाही तो मोडतो . नव्या आधुनिक जगाशी ज्याना जुळवून घेता येणार नाही त्या सर्वच धर्मांची हि हालत होणार आहे .

जी चित्रे का छापली ? म्हणुन हा हल्ला केला ती चित्रे आज अनेकांची फेसबुक प्रोफ़ाइल म्हणुन फिरत आहेत . ती चित्रे महाराष्ट्र टाइम्स नेही प्रसिद्ध केली आहेत . किती लोकांवर हल्ले करणार ? धर्म ग्रंथाचे पान मिटुन विज्ञान ग्रंथाचे पान उघडावे लागेल . मध्ययुग संपले -- विज्ञान युग आले.. त्यातल्या विवेक वादाशी इस्लामला जुळवून घ्यावे लागेल. नाहीतर संपावे लागेल . इस्लाम मध्ये सध्या तरी सुधारणेचे कोणतेहि चिन्ह दिसत नसल्याने इस्लाम खत्र्यात आहे हे खरेच . (त्यांच्याप्रमाणे कडवे होऊन आपले धर्म रक्षण होईल असे ज्यांना वाटते . ते हि खत्र्यातच येणार आहेत )

 ती चित्रे महाराष्ट्र टाइम्स नेही प्रसिद्ध केली आहेत 


सेक्युलारीझम का हरतो ?


फ्रांस मधील हल्ल्यानंतर भारतीय सेक्युलरांच्या प्रतिक्रिया पहाण्याजोग्या आहेत . एकिकडे दहशतवादाचा निषेध आणि दुसरीकडे व्यंग चित्रकार चार्ली हेब्दो तुम्हाराबी चुक्याच ! असा अर्थ सेक्युलर प्रतिक्रियांच्या लसावितून निघतो … इस्लाम हा मुर्तिपुजेचा / चित्रनिर्मितिचा कडवा विरोधक असल्याने त्यांच्या प्रेषिताचे व्यंगचित्र काढणे चूक आहे . विनाकारण मुस्लिमांच्या भावना दुखावू नयेत वगैरे नेहमीचे सेक्युलर रडगाणे आहेच . एका बसपाच्या खासदाराने हल्लेखोरांना बक्षिस जाहीर करून आणि मणिशंकर अय्यरने थेट प्रेशितांच्या समर्थनार्थ धावून जावून आपली अल्ला भक्ती सिद्ध केली आहे . तिस्ता सेटल्वाडनेहि इस्लाम समर्थनाची बांग ठोकली आहे .


भारतातल्या स्वत:ला सेक्युलर म्हणणार्यांनि इस्लाम धर्म रक्षणाचि भूमिका घ्यावी यात काहीच धक्कादायक नाही . आजवरचा इतिहास पाहता ,जमाते इस्लामी आणि भारतीय सेक्युलर यांच्या भूमिकात विलक्षण साम्य आहे . साम्यवादी विचारवंतांचे भारतीय बौद्धिक जगतावर साम्राज्य आहे .त्यातून हा   विचार  जन्मला आहे .. इस्लाम हा धर्म इथल्या वर्ण व्यवस्थेतून मुक्ती देणारा समतावादी धर्म आहे अशी जमाते इस्लामीची मांडणी आहे . सार्या भारताने इस्लाम स्वीकारून समतेच्या धर्मात सामील व्हावे यासाठी जमाते इस्लामी ने इस्लाम सर्वांसाठी असे अभियान चालवले आहे . भारतीय सेक्युलर या अभियानात जाणता / अजाणता सामील आहेत .

मुळात इस्लाम हा भारतीय धर्म नसल्याने त्यात वर्ण व्यवस्थेचे समर्थन नाही . वर्ण व्यवस्था वाइटच ... पण वर्ण व्यवस्थेचे समर्थन नसणे हा समतेचा एकमेव क्रायटेरिया आहे काय ? सर्व धर्म मानवनिर्मित आहेत . भारतातले धर्म इथल्या सामजिक गोष्टीवर भाष्य करतील … अरबी धर्म कसे करतील ?

इस्लाम मध्ये समता आहे हा साफ खोटा प्रचार आहे . तत्कालीन अरबांचि स्त्रियांकडे पाहण्याची                   " विशिष्ट "  दृष्टी इस्लाम मध्ये ओतप्रोत भरली आहे . बहुपत्नीत्व तलाक बुरखा या केवळ रूढी नाहीत .       " स्त्रिया म्हणजे पुरुषांची शेती " अशी वाक्ये कुराणातून अल्लाहनेच लिहून ठेवली आहेत . कुराणात गुलामांना चांगले वागवा असे उल्लेख येतात . गुलामगिरी प्रथा नष्ट करा असे कुराण म्हणत नाही . आजही मुस्लिम राष्ट्रात गुलामगिरी आहेच . चातुवर्ण नसले तरी विषमता विषमता असू शकतेच . काफिर आणि मोमीन अशी सार्या जगाचीच दोन भागात विभागणी करणारा इस्लाम हा समतावादी किंवा शांतता प्रिय धर्म आहे असे म्हणण्याचे धाडस फक्त भारतातले सेक्युलर आणि जमाते इस्लामीच करू शकतात . 


भारतातल्या मुस्लिमात असलेल्या जातिप्रथेचे, विषमतेचे, मुलतत्व वादाचे जनकत्व दरवेळी हिंदु धर्माकडे दिले तर बौद्धिक वावदुकीत जिंकता येईल अशी भाबडी आशा  सेक्युलर मनात वसते आहे . त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य याच भाबड्या आशेवर जगायला आमची ना नाही . पण बहुसांस्कृतिक वाद , सर्व धर्म समाभाव , अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे आधुनिक बुरखे पांघरुन तथाकथित सेक्युलरांनि इस्लाम धर्म रक्षणाचि बांग ठोकल्याने त्यांची चिकित्सा क्रमप्राप्त ठरली आहे .

इसीस चे प्रेरणास्थान कालि  माता आहे अशा अर्थाचे सेटलवाड उद्गार  



सेक्युलरांना दुसर्याच्या धर्माचा आदर करणे हे योग्य मुल्य वाटते.


सेक्युलरांना दुसर्याच्या धर्माचा आदर करणे हे योग्य मुल्य वाटते. हीच मुळात भयंकर गोची आहे . धर्म हि एक कालबाह्य आणि घातक गोष्ट आहे . हिंदुधर्म घातक आहे . तो मुख्यत: आत्मघातक आहे . सती प्रथेपासुन अस्प्रुश्यते पर्यंत सारा हिंदु धर्म आत्म घातक आहे . त्यामुळे हिंदु समाजाच्या भल्यासाठी त्याला धर्म मुक्त करणे आणि हिंदु धर्माची कठोर चिकित्सा करणे क्रमप्राप्त ठरते . इस्लामची केस वेगळी आहे . बुरखा तलाक मुळे तो आत्म् घातक तर आहेच . पण दार उल इस्लाम - जिहाद - मुजाहिदीन अशा धार्मिक संकल्पनामुळे इस्लाम पर घातक हि आहे .


इस्लाम इतर  धर्म घातक असल्याने  इस्लामेतरांनाहि इस्लामची चिकित्सा करण्याचा नैतिक अधिकार आहे . पिके सिनेमातला हास्यास्पद शंकर योग्य आणि मुहम्मदाचे फ्रेंच कार्टुन अयोग्य हा कोणता उफराटा बुद्धिवाद ? इस्लामची चिकित्सा करण्याची परंपरा भारतीय बुद्धीवाद्यात आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर , कुरुंदकर , शहा , दलवाई या आधुनिक विचारवंतानि इस्लामची कठोर चिकित्सा केलेली दिसते . सध्या हि परंपरा खंडित झालेली दिसते .
चित्रकला विरोध मान्य करणे म्हण्जे सहिष्णुता नाही . चार्ली हेब्दोने कार्टुन काढायची किंवा बघायची मुस्लिमांना सक्ती केलेली नाही . कार्टुन काढणे आणि नग्नता हि फ्रेंच संस्क्रुतित मान्य गोष्ट आहे . फ़्रेंचाच्या अभिव्यक्तीचा मान राखणे हे इस्लामचे दायित्व आहे । कोणाची किती चिकित्सा करायची याची त्या धर्माकडून परवानगी घेतली जाणार नाही . पण भारतीय सेक्युलरांना व्यक्तिवाद , व्यक्तिसवातंत्र्य , अभिव्यक्तिस्वातंत्र्य , स्वातंत्र्य समता बंधुता या फ्रेंच संकल्पना अजून कळलेल्या नाहीत .

बहुसांस्कृतिक वाद आणि परधर्म सहिष्णुतेचे गोंडस बुरखे घेऊन चार्ली हेब्दोचा विरोध भारतीय बुद्धिमंतानि चालवलेला दिसतो . व्यंगचित्र ते पण इस्लामच्या प्रेषिताच … ज्याला चित्रे आणि मूर्ती मान्यच नाहीत त्याच व्यंगचित्र ? हे म्हणजे फारच झाल बुवा ! असा तो सूर आहे . मग इस्लामने मान्य केल्लेल्या परिघातच त्याची चर्चा व्हावी काय ? तसे असेल तर इतर धर्माला हि हाच न्याय लावणार काय ?


जमाते इस्लामीशी सुसंगत भूमिका घेणार्या सेक्युलरांना आपण का हरतो आहोत हे समजणार नाहीच ! अल्लाहनेच त्यांच्या बुद्धीवर सील ठोकले आहे !!



फ्रेंच राज्यक्रांतिचा आदर्श 

भारताच्या राज्यघटनेतिल स्वातंत्र्य , समता,  बंधुता हि तत्वे फ्रेंच राज्यक्रांतितुन स्फुरली आहेत . या सेक्युलर राज्य घटनेमुळे आज भारत  देश एकसंघ आणि प्रगतीपथावर आहे.  सध्याच्या भारतीय सेक्युलरांना मात्र फ्रेंच राज्यक्रांतिच्या मुलभूत तत्वांचा विसर पडलेला दिसतो . 
फ्रेंच राज्यक्रांती हा माणसाच्या बौद्धिक उत्क्रांतितला महत्वाचा टप्पा आहे.  माणुस केंद्रस्थानि ठेवून नव्या अभिनव तत्वज्ञानाचि मांडणी फ्रेंच राज्यक्रांतितुन झाली .व्यक्ती श्रेष्ठ आहे . समाज , धर्म , राष्ट्र या सर्वापेक्षा व्यक्तीचे स्थान उच्च आहे . अभिव्यक्ती स्वातंत्र्यात धर्म- धर्मगुरू - प्रेषित या सर्वावर तिक्ष्ण हल्ले होणे क्रमप्राप्त आहे . 

 व्यक्तीचे स्वातंत्र्य , अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मानणार्या फ्रेंच डाव्या पुरोगामी साप्ताहिकावर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला करावा हे त्यांच्या परंपरेला साजेसेच आहे . हा धर्म आणि व्यक्तिस्वातंत्र्य यातला संघर्ष आहे . फ़्रेंचाच्या जुन्या पिढ्यांनी या कुस्तीत ख्रिस्ती धर्माला चीतपट केले आहे . आता इस्लामची बारी आहे . धर्म चिकित्सा अपरिहार्य आहे आणि चिकित्सेचे उत्तर गोळी नाही .

हे इस्लामिस्टांना आणि भारतीय सेक्युलरांना उमजले तर ते दोघे टिकतील . अन्यथा नाही . 


.   

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *