१७ एप्रि, २०१४

नरेंद्र मोदि : सामान्य माणसांचा सामान्य नेता

 सामान्य माणसे 

मोदींना सामान्य माणसाने निवडून दिलेले आहे . मोदिना कोन्ग्रेस पेक्षा सात कोटि मते जास्त मिळाली आहेत . कोंग्रेस आघाडीच्या च्या दहा कोटि समोर भाजपाच्या आघाडीचा सतरा कोटींचा आकडा टरटरून फुगीर आहे. भाजपाला स्वत:ला हि अनपेक्षित असे संपूर्ण बहुमत मिळवुन देताना जुन्या वाजपेयी सरकारपेक्षा कोट्यावधि अधिक मते मोदिनी खेचून आणली आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजपाची आघाडी २/३ बहुमतापासून फक्त २७ सिटान्नि दूर आहे. भाजपाचे हे कोटकल्याण कसे घडले ? असे कोट्यावधि मतदार कोणत्याहि रंगाचे नाहीत. समिक्षक विद्वानांचे जातीधर्माचे रंग इथे फिके पडले. ८१ कोटि मतदारांपैकी प्रत्यक्षात ५३ कोटींनी मतदान केले . त्यातले नोटा वाले , प्रादेशिक पक्ष वाले वगैरे बाजूला काढले तर सात कोटीचा विजय आणि सतरा कोटि मते हि आजच्या काळात दणदणित म्हणावीत अशीच आहेत . हि कोटीच्या कोटि मोदि उड्डाणे कशी घडली ? मोदि उत्तरेच्या सत्तेकडे कसे झेपावले ? कोट्यावधी सर्व सामान्य भारतीयाने मोदित काय पाहिले ?




मोदि महान नाहीत .


मोदि महान नाहीत . त्यांचा इतिहास बर्याच वेळेला चुकतो .सनावळी चुकते . समाजशास्त्र , पोस्ट मोर्ड्निझम आणि बाकीचे राज्यशास्त्र…. शिवाय त्याच्या आधुनिक परिभाषा मोदिना फारशा अवगत नाहित. त्याना साधे जातीचे राजकारणही फारसे समजत नाही. बर विकास म्हणाल तर तो थोडा बहुत आहे जरूर ........पण फारसा नेत्रदीपक वगैरे अजिबात काही नाही गुजरातेत..... . मोदिना सफाईदार इंग्लिश बोलता येत नाही . त्यांचे दिसणे जवाहरलाल नेहरु प्रमाणे राजबिंडे - रुबाबदार नाही . इंदिरा गांधी सारखा कामाचा झपाटा आणि नेत्रुत्व गुणही मोदीने अजून दाखवलेले नाहीत . . अटल बिहारी वाजपेयी प्रमाणे " झुलासाता जेठ मास । शरद चांदनी उदास । अंतर्घट रीत गया । एक बरस बीत गया । । " अशी तरल काव्य रचना मोदिना जमणे शक्य नाही . फार काय ? मनमोहन सिंग यासारखे अर्थ शास्त्राचे सखोल ज्ञानहि मोदींकडे अजिबात नाही . 



नरेंद्र मोदि हा एक अतिशय सामान्य माणुस आहे . 

मोदि विरोधक तिखट मिठ लावून सांगतात त्याप्रमाणे मोदि खाटिक नाहित. आणि समर्थक सांगतात त्याप्रमाणे जादुगार हि नाहीत . 

मोदि झोकून देऊन - घाम गाळून काम करतो . सुट्टी घेत नाही . स्वत:च्या विशिष्ट पुर्व् ग्रहा सकट सामान्य भारतीयाप्रमाणे देशावर प्रेम करतो . सामान्य माणसाप्रमाणे , मोदी मनापासून हसतो . कधी खोटे खोटे रडतो . त्याला राग येतो . मोदि द्वेष करतो . डूख धरतो. पाळत ठेवतो . सूड घेतो . मोदि बिनधास्त आहे . मोदि दिगविजयात इतर अनेक गोष्टी सहित त्यांच्या सर्व सामान्य व्यक्तिमत्वाचा मोठा सहभाग आहे. 

मोदि मुस्लिम टोपी नाकारतो . माफी - बाफी मागायला मोदि अति संवेदना शील नाहीत . मोदि विकास बोलतो . विरोधक हिंदुत्वाचे आरोप करत राहतात . माजी मनमोहन सिंग… भारतीय साधन संपत्तीवर दलित आणि अल्पसंख्य (मुस्लिमाचा ) पहिला अधिकार आहे असे म्हणाले होते. मोदिनि दलित , शोषित आणि गरीब हे शब्द कायम ठेवले परवाच्या भाषणात . पुढचा धार्मिक शब्द वगळला … मोडी खाकडु आहेत 








मोदिंचे सेक्युलर प्रचारक 

ह्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदीने एकदाही… चुकुनही …संघिष्ट वा सनातनी हिंदू , हिंदुत्व आणि हिन्दुराश्ट्राचा जयघोष केला नाही . आपल्या देशाचा कायदा आणि घटना मोदिना अशा हिंदुत्वाचा प्रचार करण्याची परवानगी देत नाही. आणि कायद्याच्या कचाट्यात न अडकण्या एव्हढे शहाणपण मोदिकडे निश्चित आहे. भारतातल्या ८५ % मतदारांना धार्मिक हाक देऊन मोदींकडे आकर्षित करण्याचे काम आमच्या सेक्युलर बांधवांनी केलेले आहे . मोदि हा हिंदुचा पक्षपाति आहे… हिंदुच्या बाजूचा आहे … हा विचार सेक्युलर माध्यमांनी पसरवला …… बदलत्या काळात । इण्टर्नेटच्या युगात …इतर देशातल्या अनेक इतर लोकांशी आणि इतर धर्मांशी संपर्क वाढत असताना भारतात देशीवाद किंवा स्वत्व वाद किंवा एत्तद्देशिय स्थानिक जाणीव हि जन्म घेणार …आणि तीला हिंदू हि आयडेण्टिटि आपोआप प्राप्त होणार हे आपण लक्षातच घेतलेले नाहि. 




विकास , राष्ट्रवाद आणि बहुजन वाद 

स्पष्ट बोलायचे झाले तर ... काही मोजके आणि सन्माननीय अपवाद वगळता …. बरेचसे पुरोगामी, बहुजन वादि , कथित समाज वादि हे हिंदुत्व वाद्या इतकेच जातीवादी आहेत . ते त्यांचे विचारवंत वगैरे मंडळी स्वजातीचे प्रेमी आहेत . अथवा भाडोत्री … किंवा तद्दन महा मूर्ख …… आणि एक बहुजन समाजातला पहिला प्रधान मंत्रीपदाचा उमेदवार घोषित करून भाजप संघाने सर्वावर मात केली आहे . आजवर भारतात १४ प्रधानमंत्री झाले . त्यातले ६ ब्राहम्ण, कायस्थ वगैरे भद्रलोक अथवा उरलेले ७ खत्री , राजपूत , ठाकूर वगैरे क्षत्रिय हुच्चवर्णिय . बिचारा एकटा देवेगौडा अपघाताचा अल्पकाळ प्रधानमंत्री पण तोही गरीब घरातला नाही तर जमीनदारच !







मोदि नावाच्या दरिद्री घरातल्या चहावाल्या ओबिसिला भाजपाने प्रधान मंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले आहे. निदान जातीची पुरोगामी गणिते इथे ढिल्ल्ली पडली आहेत . आणि सदोसदि बहुजन वाद आणि प्रतिनिधित्व आणि ओबीसी आणि इतर गोष्टी करणारे लोक मोदिला पुन्हा बहुजन वादाचेच निमित्त करून जेंव्हा झोडपू लागतात तेंव्हा त्यांवर पोट धरून सामान्य जनता हसत असते !

विकासाबद्दल बोलायचे झाले तर मोदि हा माणुस , भाजप हा पक्ष कोन्ग्रेस च्या कितीतरी पुढे आहे .असे सामान्य माणसाला वाटते. 





उदारमतवादाची सद्दी 


उदारमत वाद हा खरा नाही . असू शकत नाही . त्यामागे ढोंग आहे. फसवणूक आहे. असे सामान्य माणसाचे ( प्रामाणिक !!) मत असतेच . मोदिनी सर्व सामन्य माणसाची भूमिका मांडत उदार मतवादाची सद्दी संपवली . 

सामान्य पण शक्तिशाली मोदि 

१) आत्मौप्य , आत्म्परिक्षण आणि सहिष्णुता ह्या आपल्या जुन्या महान परंपरा आहेत असे एक मत आहे . 

२) दुसरे मत ह्या सर्व भाकड गायी निरुपयोगी असून फालतू आहेत असे आहे . 

पहिले मत गांधीचे दुसरे सावरकरांचे . असे म्हणण्याचा वैचारिक इझम संघर्ष आहे . 

मोदि आणि सर्व सामान्य भारतीय दुसर्या मताकडे झुकले आहेत हे मान्य केले पाहिजे . हा विजय माध्यमांचा नाही . प्रचाराचा आणि ब्रेण्डिग चा नाही . हा विजय सर्व सामान्य माणसाच्या बदललेल्या मताचा आहे . सर्व सामन्यांचे मत कायमच शक्तिशाली राहणार आहे . हा शाप नाही . हे भारतीय लोकशाहीचे वरदान आहे . सत्य स्वीकारून … हि मते का बदलली ? हा खरा अभ्यासाचा विषय व्हायला हवा . त्यासाठी आपापल्या पूर्वग्रहांचे चष्मे उतरवून पाहिले तर ठीक … अन्यथा …सर्व सामान्य माणसाची शक्ती ..... . लोकशाहीत सर्व सामान्य माणसाचे विचार जिंकणार आहेत . हे पहिले समजून घेतले पाहिजे . इझमचे चष्मे आणि विचारधारांच्या सद्दी संपलेल्या आहेत . इलेक्ट्रोनिक आणि सोशल मिडिया चा उदय झाला आहे . लोकशाहीला नाके मुरडून किती दिवस आत्ममग्न राहता येईल ? नवे युग सर्व सामान्य माणसाचे असेल . 


बाकी आता पुढचे काळावर सोपवू . 


पण मोदि महा विजयाचे तटस्थ विश्लेषण… समर्थक आणि विरोधक करणार का ? हा माझ्या पुढचा प्रश्न आहे . 
या निवडणुकीत धार्मिक विषय कोणि चघळले ? त्याचा कोणाला फायदा झाला ? मोदींवर तीच तीच जुनी पुराणी टिका केल्याने कोणाचा फायदा झाला ? बदलता भारत समजून घेण्यात कोण कमी पडले ? आणि का ? हा चिंतनाचा खरा विषय ! बाकी जर उदार मतवादाची सद्दी संपली तर ते खरेच चिंतनीय आहे . 




९ एप्रि, २०१४

आयुर्वेद : गुणकारी ? दुर्लक्षित ? कि निव्वळ बंडलबाजी ?

आयुर्वेद : गुणकारी ? दुर्लक्षित ? कि निव्वळ बंडलबाजी ? 

विज्ञानाच्या चष्म्यातून आयुर्वेद :






 

सर्वप्रथम आयुर्वेदाला साष्टांग दंडवत :

आयुर्वेदाविषयी माझ्या मनात कुतूहल आहे . चरक आणि सुश्रुत या महान संशोधक पूर्वजांविषयी अतिशय आदर आहे . पण विज्ञान सतत बदलत जाते . गेलिलिओ चे भौतीकशास्त्र न्युटन ने खोडून काढले म्हणुन गेलिलिओ लहान ठरत नाही . … कि न्युटन महान ठरत नाही . …. हाच न्याय चरक , सुश्रुत आणि आजच्या आधुनिक विद्न्यानालाहि लागू आहे .


आयुर्वेदात साइड इफेक्ट नाही . जुन्या दुखण्यांवर आयुर्वेद उपयुक्त आहे अशी चर्चा आणि कुजबुज सतत चालू असते. छोट्या मोठ्या मासिकातून , वर्तमान पत्रातून आयुर्वेदाची स्तुती करणारे भरपूर लिखाण चालू असते .  सांधे दुखीपासून , डायबिटिस पर्यंत आणि केन्सर पासून एडस पर्यंत अनेक रोगावर आयुर्वेदात उपचार आहेत असे सांगितले जाते . हे खरे आहे काय ? मग आयुर्वेद फक्त भारतातच का ? अमेरिका युरोप आदी प्रगत देशात आयुर्वेदाला उपचाराची मान्यता का नाही ? प्रस्तुत लेखात आपण आयुर्वेदाची वेगवेगळ्या अंगाने चर्चा करायची आहे .


काय आहे आयुर्वेद ? 


मान्य ग्रंथानुसार आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. चरक आणि सुश्रुत या आचार्यांनी स्थापन केलेल्या विचारशाला यात महत्वाच्या आहेत . आणि प्राचीन काळी इतरही अनेक मान्यवरांनी यात भर टाकली आहे . पण आयुर्वेद हि केवळ उपचार पद्धती नाही . वात , पित्त आणि कफ हे तीन दोष संतुलित असले तर मनुष्य निरोगी राहतो आणि त्यांचे असंतुलन झाले तर रोग होतात असे आयुर्वेद मानतो . नाडी, मूत्र, मल , जिंव्हा , शब्द, स्पर्श , दृक, आकृती, या आठ गोष्टी बघून आयुर्वेदात निदान केले जाते. त्यास अष्टविध निदान पद्धती असे म्हणतात.
                    


सोप्पे शास्त्र 

आजचे आधुनिक वैद्यक शास्त्र शरीरातील केमिकल रेणूंची तपासणी करते , एक्स रे , सिटी स्केन , मायक्रोस्कोप खाली रक्त परिक्षा , डिएनए परिक्षा यापैकी कशाचाही भानगडीत आयुर्वेद पडत नाही . आयुर्वेदाच्या कोणत्याहि ग्रंथात कोणत्याहि आधुनिक टेस्ट चा उल्लेख नाही . पण निव्वळ नाडिपरिक्षेतुन इसीजी पेक्षा अधिक माहिती वैद्याला कळते असे दावे मात्र आज आहेत . तीन दोष आठ निदान पद्धती खेळ खल्लास . बरे आजच्या माणसाला होणारे बहुसंख्य रोग हे जीवाणू आणि विषाणू यांच्या संसर्गाने होत असतात . चरक आणि सुश्रुत संहितेत या बापड्या जीवांवर भाष्यच नाही !


सबब आयुर्वेद हि जीवनपद्धती आहे …. मुळात आयुर्वेदानुसार जीवन जगले कि रोग होतच नाहीत …त्यामुळे जीवाणू विशाणुच्या शेकडो प्रजातीन्बद्दल भाष्य करण्याची गरज आयुर्वेदाला वाटतच नाही ! त्यामुळे रोगनिदानाच्या कोणत्याहि आधुनिक पद्धती शिवाय आणि जीवाणूच्या इन्फेक्शन कडे संपूर्ण दुर्लक्ष करत आयुर्वेद भारतात दुमदुमत राहतो . त्याकाळी धर्म शास्त्रानुसार मानवी शरीराच्या डिसेक्शन ला परवानगी नव्हती . त्यामुळे आयुर्वेदाला मानवी शरीराची ( सखोल रचना ) एनाटोमि नीटपणे माहित नाही . जसे कि मेंदूचे निरनिराळे भाग आणि त्यांची कार्ये.... चरक आणि सुश्रुत संहितेत यावर भाष्यच नाही !


                                                    


आधुनिक परिभाषेचा द्वेष 


हे अणु , ते रेणू , हि टेस्ट ती पेस्ट , हे एक्स रे ते इसीजी हे सारे पाश्च्यात्य शब्दांचे बुडबुडे आहेत . आधुनीक विज्ञानाच्या चष्म्यातून आमच्या प्राचीन शास्त्राकडे पहाणे चूक . मात्र डायबेटीस आदी आधुनिक विकारांवर मात्र जालीम औषध आमच्याकडे आहे असे हे आयुर्वेदाचे तर्कशास्त्र आहे. बदलत्या जीवनपद्धतीनुसार रोग बदलत असतात . त्या आधुनिक रोगांवरचे जालीम इलाज सांगणार्या प्राचीन शास्त्राला आधुनिक परिभाषेचा मात्र राग करावा लागतो . 








इफ़ेक्ट आणि साईड इफ़ेक्ट 


खडूची पुड आणि लाकडाचा भूसा मेणात कुस्करून खाल्ला तर साइड इफेक्ट काही नाही . पण त्याचा इफ़ेक्टहि नाही हा मुद्दा आहे . आयुर्वेदाने केंन्सर बरा केल्याचे राणा भीमदेवी दावे मी वाचले आहेत . पिडलेली किडनी , बिघडलेले यकृत आणि गेलेली स्मृती परत आणणारी चूर्णे, भस्मे आणि आसवे आयुर्वेदापाशी आहेत असेही बिनबोभाट लिहिले जाते . आधुनिक वैद्यक शास्त्रातले एखादे औषध मान्य होण्यासाठी त्याला कठोर परिक्षेतुन - क्लिनिकल ट्रायल मधून पास व्हावे लागते . सुरवातीला औषधाचे प्रयोग प्राण्यांवर आणि मग माणसांवर केले जातात . रुग्ण आणि निरोगी अशा दोघान्वरही प्रयोग केले जातात . प्लासिबो इफ़ेक्ट ची शहानिश केली जाते . सर्व संख्याशास्त्रीय चाचण्यातुन पास झालेले औषधच मग रोग्याला दिले जाते . त्यावेळी त्या आधुनिक औषधाच्या सर्व इफ़ेक्ट आणि साइड इफ़ेक्ट ची माहिती डॉक्टरला असते . क्लिनिकल ट्रायल मध्ये ती माहिती डोक्युमेण्ट झालेली असते . आजवर आयुर्वेदाचे एकही राणा भीमदेवी औषध एकही क्लिनिकल ट्रायल पार करू शकलेले नाही . इच्छुकांनी क्लिनिकल ट्रायल बद्दल अधिक माहिती अवश्य करून घ्यावी . आणि आयुर्वेदातलि सर्व औषधे यात साफ नापास होतात हेही जाणुन घ्यावे . नापास होण्याच्या भीतीने क्लिनिकल ट्रायल साठि बहुतेक प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधे उतरलीच नाहीत त्यामुळे त्यांचे दूरगामी साइड इफ़ेक्ट आपल्याला माहित नाहीत हे हि समजून घ्यावे .

http://en.wikipedia.org/wiki/Clinical_trial

http://www.openthemagazine.com/article/living/ayurveda-hoax-or-science





                               




आता थोडे अर्थशास्त्र 


एकेक गुणकारी औषधाचे पेटंट करोडो रुपयांना विकले जात असते . प्रोस्टेट केन्सरच्या एका औषधावर औषध कंपन्या डॉलरचा पाउस पाडत असतात . नवीन औषधांच्या संशोधनासाठी लाखो डॉलरचा अव्याहत खर्च चालू असतो . आयुर्वेदात एकजरी गुणकारी औषध असते तर या धंदेवाईक चालू कंपन्यांनी ते सोडले असते काय ? त्या औषधाचे स्वामित्व मिळवुन त्याचा जगभर व्यापार करण्याची संधी सोडुन द्यायला या कंपन्या मूर्ख आहेत काय ? आयुर्वेद फक्त भारतातच का ? अमेरिका युरोप आदी प्रगत देशात मेन्स्ट्रिम मध्ये  आयुर्वेदाला उपचाराची मान्यता का नाही ? 


दुर्बल मनाचे एकमेव आशास्थान : कोन्स्पिरसी थेअरी 

भाबड्या मनाचा काही गोश्टिवर ठाम विश्वास बसलेला असतो . पण हा विश्वास तर्कशास्त्राच्या आणि अर्थशास्त्राच्या सर्व पारड्यात गळून पडत असतो . बुद्धीला पटते पण मनाला पटत नाही मग …… आयुर्वेदाविरुद्ध या बहुराष्ट्रीय कंपन्यांची कारस्थाने सुरु आहेत …. आयुर्वेदाविरुद्ध अमेरिकेचा कट सुरु आहे अशा कोन्स्पिरसी थेअरिचा जन्म होत जातो . सशाविरुद्ध सिंह कट करत नसतात हे हि भाबड्या मनाला मग समाजात नाही


 . 
खरे दु:ख असे आहे :


मेडिकलच्या प्रवेश परिक्षेत अपघाताने दोन मार्क कमी पडले म्हणुन हुशार विद्यार्थी आयुर्वेद शाखेत प्रवेश करतो . मग स्वत:च्या व्यवसायाशी निष्ठा म्हणुन आयुष्यभर आयुर्वेदाची भलामण करत बसतो . जर दोन मार्क जास्त पडले असते तर ? आधुनिक वैद्यकाला प्रवेश मिळण्याएव्हढे मार्क मिळाले असते तर आयुर्वेदाला एडमिशन घेतली असती काय ? आणि तर आयुर्वेदाची भलामण केली असती काय ? 

मेडिकलची मिळणारी सीट नाकारून विश्वास म्हणुन आयुर्वेद स्वीकारलेले किती वैद्य मोजता येतील . कोल्ह्याला द्राक्षे आंबट असतात . जे त्या विद्यार्थांबाबत खरे आहे तेच भारतीय मानसिकतेबद्दल हि खरे आहे . वेदातल्या उडत्या तबकड्या , महाभारतातले एटम बोंब , रामायणातली विमाने आणि आयुर्वेदातले औषध ! पाश्चात्य सन्स्क्रुतिचा निषेध असो ! वेलीवर उंच लटकलेल्या द्राक्षाचां निषेध असो . 








प्लासिबू इफेक्ट 

पाद्र्याने हात लावला कि रोगी बरे होतात . मनाला बरे वाटले कि काही आजार बरे होतात . काही आजार मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती मुळे आपोआप बरे होतात . तसाच आयुर्वेदाच्या काही औषधांचा , काही लोकाना , काही वेळेला चांगला अनुभव येतो .
 हा व्यक्तिगत अनुभव म्हणजे विज्ञान नाही . 
क्लिनिकल ट्रायल् च्या संख्या शास्त्रीय मोजपट्टीवर पास झाले पाहिजे . दु:ख आयुर्वेदिक औषधे नापास होतात याचे नाही . दु:ख भारत सरकार नापास होते याचे आहे . एका अशास्त्रीय आणि परिणाम शून्य थेरपी चे शिक्षण देण्यासाठी महाविद्यालये चालवली जातात . अनुदानात सरकारी पैशाची उधळपट्टी सुरु राहते . अनेक हुशार विद्यार्थ्याना आयुर्वेदिक कालबाह्य काढे शिकत पाच वर्षे फुकट घालवावी लागतात . त्यातले अनेक पुढे जाउन आयुर्वेदाची प्रेक्टिस करतच नाहीत . त्याना ओ कि ठो न समजणारी आधुनिक औषधे देत बसतात . पेशण्ट च्या जीवाशी खेळतात . या सर्व लबाडिला भारत सरकार अनुदान देते . वैद्यांनी काढे , आसवे देत जीवन व्यतीत केले असते तर फक्त एका हुशार विद्यार्थ्याचे करिअर बरबाद होईल . त्यांच्या आंधळ्या एलोपेथि प्रेक्टिसने लाखो पेशनटचे हाल होतात. काही प्राणाला हि मुकतात . सर्व आयुर्वेदिक / होमिओपाथिक कोलेजांचे रुपांतर आधुनिक वैद्यकीय महाविद्यालयात केले पाहिजे . आणि त्या हुशार विद्यार्थ्याना आणि रुग्णाना न्याय मिळवुन दिला पाहिजे . आपल्या भारत देशात डॉक्टरांची संख्या कमी आहे . वैद्यकीय सुविधा कोमात आहेत . बालमृत्यू , कुपोषण , साथीचे रोग भारत देश पोखरत आहेत . आणी सरकारने आपला आर्थिक सट्टा आयुर्वेदाच्या प्लेसिबू इफ़ेक्ट वर लावला आहे . 




विज्ञान होणे सोप्पे नसते 

ज्योतिष पाहून आजाराचे निदान करण्याचे उल्लेख आयुर्वेदात आहेत . सापाचे विष उतरवायचे मंत्र आहेत. औषध सिद्ध करण्यासाठी पाच कुमारिकांनी त्याचे  पूजन करण्याचा विधी आहे .      मानवी भावनांचे आणि विचाराचे स्थान मेंदू नव्हे तर हृदय असे पारंपारिक आयुर्वेद मानतो . त्याला जीवाणू, विषाणू , डी  एन ए कश्शा  कश्शाचा आता पता नाही . तरी आयुर्वेदाला स्वत:स विज्ञान / शास्त्र म्हणवून घ्यायचे आहे . ठीक आहे. पण विज्ञान होणे सोप्पे नसते. 

आधुनिक वैद्यक शास्त्रावर कायद्याचा कडक वचक आहे . ती एक चांगली गोष्ट आहे . आयुर्वेदावर हे बंधन का नाही ? प्रथम औषध आणि त्याची परिणाम कारकता सिद्ध  करायची , पुन्हा ते औषध कसे बनवायचे ? याचा निर्बंध् सिद्ध करायचा … आणि जर पेशंटला त्याचा उपयोग झाला नाही - तोटा झाला   तर कोर्टाची पायरी चढायला मुक्तद्वार ठेवायचे . हे सर्व नियम आणि कायदे आधुनिक वैद्यक शास्त्राला आहेत . ते योग्य आहे पण भारत सरकारने या सर्व नियमातून आयुर्वेद आणि होमिओ पाथी ला सुट दिली आहे ! आयुर्वेदाच्या समर्थकाना   जर विज्ञान युगात यायचे असेल तर प्रथम हा कायद्याचा अंकुश   आमंत्रित केला पाहिजे . मंत्रित बुवाबाजीचे दिवस आता संपले . 

अमेरिकेतल्या कुठल्यातरी राज्यात आयुर्वेदाचे एखाद दुसरे  कोलेज आहे.  मोजकी आयुर्वेदिक औषधे क्लिनिकल  ट्रायल मध्ये बाजी मारू शकली आहेत . पण पुन्हा क्रोस ट्रायल घेतली तर त्यातलीच कित्येक हरतात . कधी संख्याशास्त्रीय माहितीतच  लोचा आढळून येतो .  अमेरिकन एफ डी  ए ने आयुर्वेदिक औषधे आमच्यातर्फे सिद्ध झालेली नाहीत असे वॉर्निंग लेटर हि प्रसिद्ध केलेले आहे.  ती पेशंट ने स्वत:च्या जवाबदारीवर वापरावीत। दुश्परिणामाना  आम्ही जवाबदार नाही   असेही म्हटले आहे . खरे पाहता आयुर्वेदात हेवी मेटल ची अनेक विषारी संयुगे वापरलि जातात . ती घातक आहेत आरोग्याला । दुसरीकडे आयुर्वेदाचा दावा आहे कि -   लिंबा पासून तुळशी पर्यंत सर्व औषधे सर्दी पासून केंसार पर्यंत सर्वांवर जालीम छावा   इलाज आहेत !  पुन्हा क्लिनिकल ट्रायल इल्ला . 



राणा भीमदेवी दावे : 


आयुर्वेदाची उपयुक्तता आधुनिक विज्ञानाने मान्य केली आहे असे दडपून खोटे लिहिले जाते . त्यासाठी अनेक उदाहरणे दिली जातात . सर्पगंधा नावाच्या एका आयुर्वेदिक औषधाचे उदाहरण चर्चेला घेऊ . 

सर्पगंधा हि वनस्पती उच्च रक्तदाबावर (हायपर टेन्शन वर ) चांगले औषध आहे . खरे आहे . आधुनिक औषधशास्त्र ती वापरते . या गोष्टीतून भलते अर्थ काढले जातात . 

आयुर्वेदात सर्प गन्धेचा उल्लेख आहे पण हायपर टेन्शनचा नाही . आयुर्वेदानुसार सर्प गन्धेचा हा श्लोक पहा :  

 सर्पगन्धा अति तिक्त  उष्णा रुक्ष कटु विपकिनी .
पित्तवृद्धिकारि रुच्या शूल प्रशमनी सरा.
कफ़वातहरा निद्रप्रदा ह्रुद्रव्सादिनी.
कामवसदीनी चैव हन्ति शूल ज्वर् क्रिमिन.
अनिद्रा भूत उन्माद अपस्मरं भ्रमं तथा.
अगनिमान्द्यं विषं रक्तवातधिक्यं व्यपोहति.

आयुर्वेदात सर्पगंधा पेन किलर - वेदनाशामक म्हणुन येते . पुन्हा तसेही नाही ! …  नेमके शास्त्र शुद्ध बोलेल तर तो आयुर्वेद कसला ? आयुर्वेदानुसार सर्प गंधा हे औषध चक्कर येणे , विषबाधा , मंद अग्नी  , पोटातले जंत , फेफरे येणे आणि वेडेपणावरहि  उपयुक्त आहे .  

आयुर्वेदानुसार सर्पगंधा रक्त दाबावारचे औषध  नाही .  हिंग पुस्तक आणि तलवारीचा अन्योन्य संबध … असा सगळा इल्ला कारभार आहे. परत बघा बघा रक्त दाबावरचे आयुर्वेदिक औषध सिद्ध झाले म्हणुन बोंब आहेच . हे सारे विवाद तर्कदुष्ट आहेत . फेलसी आहेत. 


विज्ञान सतत बदलत प्रगती करत जात असते . धर्माप्रमाणे हाजारो वर्षा पूर्वीच्या ग्रंथात अडकलेले नसते हे समजून घेतले पाहिजे .  वात पित्त कफावर आज्ज्या, काकू,  मावशा आणि पार्कातले आजोबा चर्चा करू शकतात म्हणुन त्याचे कुजबुज मार्केटिंग चालू राहते . कुजबुज मार्केटिंग म्हम्हणजे  विज्ञान नाही . विज्ञान होणे सोप्पे नसते . 

आधुनिक वैद्यकशास्त्राची पुस्तके दर वर्षी अपडेट होतात . हजारो  वर्षापूर्वी लिहिलेलि चरक आणि सुश्रुत संहिता आजही आयुर्वेदाचा मुख्य अभ्यासक्रम आहे . साध्या विंडोजचे  नवे व्हर्जन दर वर्षी येत असते .



जी  गोष्ट हजारो वर्ष बदलत नाही :


त्याला धर्म म्हणतात -  विज्ञान नाही. 


पुन्हा एकदा आयुर्वेदाला साष्टांग दंडवत :


आयुर्वेदाविषयी माझ्या मनात खरेच प्रेम  आहे . शिवाजी महाराजांचाही मी नितांत भक्त आहे म्हणून मी गाडी ऐवजी घोड्यावरून फिरावे काय ? 


चरक आणि सुश्रुत या महान संशोधक पूर्वजांविषयी  आदर आहे . पण विज्ञान सतत बदलत जाते . गेलिलिओ चे भौतीकाशास्त्र न्युटन ने खोडून काढले म्हणुन गेलिलिओ लहान ठरत नाही . … कि न्युटन महान ठरत नाही . 

मानवी बुद्धिमत्ता टप्प्या टप्प्याने आनि एकत्रितपणे काम करते . कालचे विज्ञान आज इतिहास ठरते . आयुर्वेद हा औषध शास्त्राचा महान इतिहास आहे . त्याचा जरूर अभ्यास व्हावा . 

इतिहासाच्या कला शाखेत आयुर्वेद शिकवला जावा . वैद्यकीय महाविद्यालयात नाही . आणि जर शिकवायचाच असेल तर अजून एक गोष्ट जरूर करावी . पाकिस्तानी सीमेवरील सैन्याच्या बंदुका, तोफा काढून घ्याव्यात आणि त्याना जिरेटोप , वाघनखे आणि ऐतिहासिक भाले बरच्या वाटण्यात याव्यात .

--------

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *