२५ ऑग, २०१३

मोडलेला कणा



.




कार्यमग्न  , निस्पृह , विवेकी दाभोलकर सरांचा पाशवी खून … आणि त्यानंतर माध्यमात आलेल्या उद्दाम सनातनी प्रतिक्रिया ऐकून प्रतिकाराची  शक्ती सुद्धा संपुन गेल्यासारखं वाटल होत. लहानपणापासून ज्या काही कल्पना डोक्यात होत्या - अपेक्षा होत्या - आकांक्षा होत्या त्या सार्या उन्मळून पडल्या होत्या. मराठी माणसाने कणा ताठ ठेवावा असे काही अभिजात या  संस्क्रुतित आहे . इथे तुकोबा आहेत  - आगरकर आहेत - विवेक आहे या सार्या समजुती मोडुन पडल्या. सतत प्रेरणा  देणारी  कुसुमाग्रजांची कविता सुद्धा मोडुन पडली होती … 





मोडलेला कणा 



ओळखतो मी सर तुम्हाला , मनाशी बोललो आम्ही 

तुमचे कपडे होते चुरगळलेले , पण डोक्यामध्ये गांधी 


कधी न बसलात , नाही हसलात , बोललात डोळ्यात पाहून 

 " गंगामाई अस्वच्छ झाली , घर गेले वाहून 


माहेरवाशीण पोरिंनाहि जाळणारा हा समाज आपला

मोकळ्या हाती दलिताला बुकलणारा माज आपला


 देश खचला , मने विझली , होते न्हवते गेले

 प्रसाद म्हणुन गोमुत्राचे आचमन तेव्हढे राहिले


खिशामध्ये हात रोज बाबा बुवा घालत आहेत

पैसे सोडा , मन आणि माणुसकीही विकत आहेत


मोडुन पडला समाज , तरी तुम्ही हरू नका

विज्ञानाच्या वेगाने बुद्धीवादाला लढ म्हणा "



कालेवार आज पाहिले तुमचे मी नदीकाठी

आशा मेली , बुद्धी विझली , डोळ्यामधे उरले पाणी








२१ ऑग, २०१३

दाभोळकर : शहाणपण मेले आणि पुरोगामित्वाचा खून झाला .




आज महाराष्ट्रातल्या सुजाण पणाची हत्या झाली . शहाणपण मेले आणि पुरोगामित्वाचा खून झाला . या मागचे धर्मांध सनातनी आता चेष्टेचे विषय वाटत नाहीत . त्यांची खरोखर भीती वाटते . या पुढे विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी काही बोलायचे नाही . पाशवी सनातन्यांचे राज्य भारतावर येणार आहे .… जर हे थांबवायचे असेल तर … डॉ नरेंद्र दाभोळकरांचे काम आता आपल्या सर्वांना मिळुन पुढे न्यायचे आहे . तीच त्यांना श्रद्धांजली ठरेल !

अंधश्रद्धा निर्मुलन कायदा हेच दाभोळकरांचे ध्येय होते . त्यासाठीच त्याना विरोधही होत होता . मारायच्या धमक्या येत होत्या .सनातन प्रभात नावाच्या वर्तमान पत्रात विष ओकले जात होते .  सनातन्यांना घाबरून सरकारही नांगी टाकत होते . बिल पास होत नव्हते . त्याचा निषेध म्हणुन दाभोळकरांनि स्वत:च्याच थोबाडीत मारून घ्यायचे आंदोलन केले होते . एखादा सच्चा गांधीवादी अजून काय करू शकतो ? एका विचारवंताला आज संरक्षण नाही देऊ शकलो . म्हणुन उभ्या महाराष्ट्राने स्वत:च्या हाताने स्वत:चे थोबाड फोडून घ्यावे .

ज्या कायद्यासाठी दाभोळकर लढत होते । तो कायदा आजच्या आज अध्यादेश काढुन लागू करावा . नाहीतर सनातनी मोकाट सुटतील . आणि कायदे थांबवण्यासाठी बंदुका वापरल्या जातील . खुन्यांना पोलिस अवश्य पकडतील . पण दाभोळकरांच्या विरुद्ध विषारी गरळ ओकणारे त्यांचे खरे मारेकरी ठरतात . त्या द्वेषाची रोपटी लावणार्या सनातन प्रभात आणि त्यांचा पप्पू गुरुजी पण अटक झाला पाहिजे .

आणि सरकारी अद्ध्यादेश काढुन आजच्या आज - अंधश्रद्धा निर्मुलन बिल पास झाले पाहिजे …











बावळट हिंदुत्ववादि बरळु लागले - दाभोळकर ख्रिश्चन - मुस्लीमाताल्या अंधश्रद्धाबद्दल बोलत नसत म्हणे ! अस्लमबाबाचा पर्दाफाश कुणि केला ? दाभोळकरांचे ख्रिस्ती अंधश्रद्धेबद्दल्ची भाषणे मी ऐकली आहेत . सनातन प्राभातच्या आरड्याओर्ड्याने कान किटले कि काहीच ऐकू येत नाही … असो ……मी म्हणतो हींदुत्व वादि साहेब तुमच ख्रिश्चनांवर , मुस्लिमांवर लैच प्रेम दिसतंय … त्याना अंधश्रद्धेतून बाहेर काढून त्यांचं भल करायचं काम तुम्हीच हातात घ्या … दाभोळकर आमच - हिंदुंच भल करण्यासाठी जगले त्यातच गेले !

विनोदाचा भाग वगळा पण दाभोळकरांना मारणारे , खुन्यांचे समर्थन करणारे आणि सनातन ला पाठीशी घालणारे राजकीय - सामाजिक पटलावरून अदृश्य होणार आहेत … समाज त्यांना नाकारणार आहे

मग पुन्हा म्हणाले … हे काम सनातनचे कशावरून … मग काय तुमचे आहे । दाभोळकरांचा खून पैशाच्या किंवा जमिनीच्या वादातून झालेला नाही . ते त्यांच्याकडे नव्हतेच .दाभोळकरांनि खाप स्टाइल जात पंचायति , सनातन प्रभात आणि बाबा बुवांचा रोष ओढवून घेतला होता . पोलिसांच्या प्राथमिक तर्कानुसार संशयाचि सुई तिघांवर आहे : - १.सनातन संस्था,२.पोल खोलले गेलेले बुवा,३.जात पंचायती.

तिघांची युती झालेली असणे हि अशक्य नाही . या तिघांवर कारवाई झाली पाहिजे. चौकशी झाली पाहिजे .
उद्या म्हणतिल कोंग्रेस ने सुपारी दिली ….
परवा म्हणतिल कि सनातनचे दोन साधक नदीकिनारी नेमबाजी खेळत होते । दाभोळकर मध्ये तडमडला म्हणुन मेला …
.

अरे जरा शरम वाटु द्या । लाजा वाटु द्या … इतके दिवस हि सनातन्यांचि पिल्लावळ पोसली । दुध पाजून वाढवली … त्यांच्या हिंदु हिंदु हिंदु हिंदु च्या ऐतिहासिक किण्किणाटात … तुम्ही कॉमन सेन्स तर घालवलाच आहे पण तुमची माणुसकीही संपलीय । दु:ख त्याचे आहे ।


काही सुचत नाही . लेखणी बंद पडली . संताप । उद्वेग . हताशपणा … आणखी काही नाही ………


जनावरे मोकाट सुटली आहेत
लवलवत्या जिभांचि टोकदार नखांची आणि
रक्ताळलेल्या डोळ्यांची

जनावर आधी रेटून खोटं बोलली
धर्मद्रोही म्हणुन भुंकलि
धर्म रक्षक म्हणुन नाचली
आम्ही काही केले नाही
कारण आम्ही धर्म स्वातंत्र्य मानतो


जनावरे मग लिहू लागली
टीव्हीवर सडेतोड चर्चा करू लागली
आम्हाला आनंद झाला
कारण आम्ही संवादप्रिय आहोत


जनावरे विष ओकू लागली
मारा ठोका चित्कारू लागली
भरसभेत याचा गांधी करू म्हणाली
काही झाले नाही
कारण पुरावा नव्हता


जनावरांनी मग जिभा पारजल्या
नखांना धार केली , स्नायू बळकट केले
आणि माणसाला फाडून खाल्ला
जीवो जीवस्य जीवन्ति !


माणुस मेल्यानंतर तर अजून हाइट झाली
एका विवेकावाद्या साठि जनावरांनिच शहर बंद पुकारला
उद्या एका लोकशाहिवाद्यासाठि जनजीवन विस्कळित होईल
कदाचित खळ खट्या क होईल
नास्तिकाच्या  आत्म्याला शांति लाभो असे ढेरपोटे बरळतिल


ती मोकाट सुटली होती तेंव्हाच
काहीतरी करायला हव होत बॉस 

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *