३० जाने, २०१३

गांधीहत्या आणि मी


 
 गांधीहत्या आणि मी 

 माझा प्रवास :  नथुराम भक्ती ते गांधी समर्थक  
मला समजलेले गांधीजी   (भाग - १ )

विद्यार्थिदशेत मी मुंबई ला राहायचा . बांद्रे . मातोश्री पासुन पाच मिनिटावर . हिंदुत्वान भारलेलं वातावरण होत . रुद्राक्षाच्या माळा . गंध . शाल . खणखणाट. शिवसेनेच्या शाखेवर कोलनितलि पोरं पडिक असत. कैरम खेळताना तिथं चाललेल्या देशभक्तीच्या चर्चा कानावर पडत असत. त्यात गांधिजिंचा उल्लेख टकल्या असाच हमखास होत असे. त्यानं देशाची वाट लावली असं ठाम मत सोंगट्या उडवताना व्यक्त केल जाई . आणि त्यावर माझाही विश्वास बसलेला होता. त्यांची बकरी , पंचा, मुसलमानांच लांगुलचालन हे सारे आमच्यासाठी विनोदाचे  विषय होते. गांधिंनि सगळ्या हिंदुना बकरी बनवायचा ध्यास घेतला होता . मुसलमानांच्या बकरी  ईद ची सोय करायला ... किवा ... हो गांधीजी हे राष्ट्र पिता आहेतच कारण -  त्यांनी देशाची आई    XXली...... . किंवा याहून घाणेरड्या विनोदांना आम्ही धो धो हसून दाद देत असू.  पुढे कुठल्यातरी पुस्तक प्रदर्शनात गोपाळ गोडसे यांच   पुस्तक हाती लागलं . पुस्तकाच्या कव्हरवर आगीच्या ज्वाळा होत्या . विकत घेऊन वाचल. त्या पुस्तकांनी त्यावेळी मनात आग पेटली होती  . देशाची फाळणी करणाऱ्या आणि दुश्मन पाकड्यांसाठि पंच्चावन्न कोटीचे दान देणार्या या अधमाला नथुराम गोडसे मारतो ते एक राष्ट्रीय काम होते असे मला वाटत असे. देशभक्ती हे पाप असेल तर मी पापी घोर भयंकर । मात्र पुण्य ते असेल जर मग नम्र माझा अधिकार तयावर !



अहिंसे  चे बाळकडु पाजून गांधीने देश षंढ बनवला.   हिंदुस्थान च्या नामर्द पणाचा हा बाप  आणि पाकिस्तानचा राष्ट्रपिता - त्याविषयी आदर वाटणं मला शक्यच न्हवतं . वाचनाच्या गोडितुन पुढे मला विज्ञानाविषयी प्रचंड आकर्षण आणि कुतूहल निर्माण झालं . प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो आणि मानवी बुद्धीला अधिक प्रयत्नाने आज ना उद्या तो उलगडू शकतोच असे मला वाटे. पूर्वी वरुणराजा पाउस पाडत असे. त्यानं तो पाडावा म्हणुन ऋषी यज्ञ करत असत . आता समुद्रातल्या वाफेचे ढग बनून नैऋत्य मोसमी वार्यांमुळे पाउस पडतो हे ठौक झालय. आपण कृत्रिम पाउसही पाडू लागलोय .

जगातली सर्व रहस्ये विज्ञान उलगडू शकते ... आज नाही तर उद्या  पण मानवी तर्कशास्त्राला  सारे उलगडेल .. अशी आमची विज्ञान निष्ठ  - बुद्धिवादी दृष्टी विकसित होत होती . त्यामुळे तर गांधी विषयीच्या तीरस्कारात भरच पडत गेली. अस्पृश्यता काढता म्हणुन भुकंप होतात असे म्हणणारे सनातनी आणि अस्पृश्यता पाळता म्हणुन भुकंप होतात असे म्हणणारे गांधी.... दोघेही सारखेच मूर्ख आहेत असे मला वाटे .  गांधिजिंचे अध्यात्म -  आत्मशुद्धीचे उपास, श्रद्धावानांचा सेनानी होण्याचा त्यांचा मनसुबा,  त्यांची विज्ञान   विरोधी भूमिका , हिंद स्वराज मध्ये त्यांनी रेल्वे पासून सर्व तंत्रद्न्यानाला केलेला विरोध  त्यांचे ब्रह्मचर्य आणि सत्याचे प्रयोग सार - सार बालिश खेडवळ आणि बावळटपणाच आहे असा मजबूत ग्रह मी करून घेतला होता. विज्ञान निष्ठ - बुद्धिवादी अशा समग्र सावरकर साहित्याचे वाचन केल्यावर  (थोड्याकाळासाठि का होईना) पण  सावरकर वाचले असते तर खुद्द मोहनदास करमचंद गांधीही -- गांधिवादाचे विरोधक बनले असते असे वाटे. 


पुढे वाचन वाढलं तसतसं देशासमोरचे अधिक प्रश्न नजरेस पडु लागले. डॉ आंबेडकरांच कीर लिखित चरित्र वाचल्यावर-  जातिव्यवस्था हा रोग संपविल्याशिवाय देशाच भल होणार नाही हे मनापासून पटल. तिथेही व्हिलन गांधीच होता. चातुर्वणाचा समर्थक गांधी हा सनातनी होता आणि म्हणुनच त्याचे विचार आपल्या देशाला जातिमुक्त होऊ देत नाहीत असेही वाटे.  पुढे सावरकर लिखित गांधी गोंधळ , अरुण सारथिंचे गांधिंवरिल टिकास्त्र आणि डॉ आंबेडकरांचे -  गांधी आणि कोंग्रेस ने अस्पृश्यांसाठी काय केले ?  हि पुस्तके माझ्या मनातला गांधी विरोध अधिकाधिक प्रबळ करत गेली . 
एक वेळ अशी आली कि वेगवेगळ्या पुस्तकातली उलट सुलट मते आणि तर्क  वाचण्या बरोबरच  ... माणसं वाचण अधिक आवश्यक आहे अस मला वाटु लागलं.  कारण मत बनत ते माणसाच्या अनुभवातून . माणसं वाचू लागलो तसे नवे गांधी कळत गेले ... 
आणि गांधिंच हे पुस्तकाबाह्य आकलन फार वेगळ होतं . 

हिंदुत्व वादी  आणि आंबेडकरवादी या दोघांचाही गांधी हा प्रमुख आणि  समान शत्रू आहे. तरीही या मुद्द्यापुराता का होईना पण या दोन प्रवाहांचा  संगम झाल्याचे आढळत नाही. ते का ? हा चिंतनिय प्रश्न आहे. आणि लेखमालेच्या उद्याच्या दुसर्या भागात त्याचा उहापोह आपण करू . 


या भागात नथुराम वाद्यांच्या युक्तिवादाचे खंडन करायचे आहे . 


नथूरामच्या नाटकाने आणि गोपाळ गोडसेंच्या पुस्तकाने असे भरपूर अज्ञान पसरले आहे.  सर्व सामन्य मराठि माणसात : मुख्य गोंधळ आहे तो वध - हत्या - खून या शब्दावरून .संस्कृतात किवा मराठीत कोणत्या अर्थाने हे शब्द वापरले जातात ? हिंदुराष्ट्र वादाच्या ध्येयाने पछाडलेल्या बहुसंख्य अतृत्प आत्म्यांना मात्र गांधी "वध " हा समर्थनीय आणि वधकर्ता पूजनीय वाटतो . ( कधी उघड पण निदान मनात तरी  कायम ! ) इथपासून गोंधळ सुरु होतो.

 संस्क्रुत डिक्शनरी -

 संस्क्रुत डिक्शनरी पाहिली तर वध  आणि हत्या यात फारसा फरक नाही हे चटकन लक्षात येईल . वध म्हणजे  वाइट व्यक्तीला ठार मारणे असा अर्थ तर बिलकुल नाही . संघाचे मुखपत्र  'पाञ्चजन्य'मध्येसुद्धा 'गोवधबंदी' असा शब्द वापरला गेलेला आढळला. गोवध  हा शब्द कसा रुढ झाला मग ? गाय हि आपल्या पूर्वजांच्या मते दुष्ट होती काय ?   

दोन व्यक्तींच्य समोरासमोरच्या द्वंद्वात होतो तो वध. आणि युद्धात सामुहिक होतात त्या हत्या . 

 साधरणत: असे वापरण्याचा प्रघात आहे. मी नथुराम बोलतोय नाटकाचे मराठीला योगदान काय ? असा प्रश्न कोणि विचारला तर वध  शब्दावरून घातलेला घोळ असे त्याचे उत्तर येईल. 




नाटकातला नथुराम म्हणतो :

 " आपण शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला असे म्हणतो - हत्या नाही  - म्हणुन मी पण गांधीचा वध केला असे म्हणावे" असे नाटकातल्या नथूरामचे म्हणणे आहे. कंसवध हा शब्द वापरला जातो ते दोन व्याक्तीतले द्वंद्व युद्ध  होते म्हणुन . चांगल्याचा वाइटावर विजय या अर्थाने नव्हे. हे नाटकातल्या नथुरामला कळलेले दिसत नाही . इथे त्या  नथुरामचे  संस्कृत भाषेविषयीचे अज्ञान दिसून येते. नाहीतर वध हा शब्द अनेकदा वाइट अर्थानेही वापरला जातो हे त्याच्या लक्षात आले असते. निदानपक्षि गोवध , अभिमन्यू वध, पितृवध, मातृवध, इत्यादी शब्द तरी "पंडित"  नथुरामला ठाउक नकोत  का?  

मुळ मुद्दा असा आहे कि इथे नाटकी नथुरामला स्वत: ला शिवरायांची आणि गाधिंना अफझलखानाची उपमा द्यायची आहे. नथूरामची उपमा चुकली आहे. कंसवध , जरासंधवध , अफझलखान वध  इत्यादी वधांच्य प्रसंगी समोरासमोरचे द्वंद्व युद्ध झाले होते . दोन्ही बाजू सशस्त्र होत्या . युद्धसज्ज होत्या . तूल्यबळ होत्या. एका शक्तिहीन निशस्त्र म्हातार्या  माणसावर गोळ्या झाडणे हे समोरासमोरचे  द्वंद्व आहे काय ? पुरुषार्थ आहे काय ? निदान नथुराम ने गांधिंना प्रतिकाराची संधि तरी दिली होती काय ?

गांधिंनि प्रतिकार केला नसता हि गोष्ट वेगळी .. पण जिथे द्वंद्व् झालेच नाही तिथे वध  होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . तो एक भ्याड खून होता. 

गांधिंना हरवण्याचा द्वंद्वात्मक मार्ग  होता . -  तो म्हणजे  लोकशाही मार्गाने कोंग्रेसला पराभूत करणे.  हि लोकशाही गांधीची कोंग्रेसच देऊ  पाहात होती. नथुरामला प्रतिकार करण्याची संधि गांधीच देत होते. पण नथुरामला आणि त्याच्या हिंदुमहासभेला गांधिंना निवडणुकीत हरवणे शक्य वाटत न्हवते. म्हणुन त्यांनी निवडणुकांच्या लढाइतुन पळ काढला . आणि खुनाचा शोर्ट कट स्वीकारला. 
राजकीय खून हे इतिहासात घडलेले आहेत. जेंव्हा इतर सर्व मार्ग बंद होतात तेंव्हा खुनाचा पर्याय शिल्लक राहतो. मदनलाल धिंग्रा किंवा भगतसिंग यांनीही राजकीय वध केले होते . पण इंग्रजांशि लढण्यासाठी तेंव्हा लोकशाहीचे कोणतेहि मार्ग शिल्लक न्हवते. त्यामुळे  ते समर्थनीय वाटतात . गांधीजी तर पक्के लोकशाही वादि  होते. त्यांचा राजकारणात सामना करण्याऐवजी खून करणे हे भ्याड कृत्य आहे.  




मग नथुरामचा शोर्ट कट त्याच्या अनुयायांना का समर्थनीय वाटतो ? 

देशाची फाळणी हा हिंदुत्व वाद्यांच्या लेखी एका  महान  गुन्हा आहे. आणि मातृभूमीचे तुकडे  करणार्याला त्यांच्या लेखी एकच  शिक्षा आहे - वध ! ज्या दिवशी मी बाबासाहेब आंबेडकरांचे फ़ाळणिवरिल ( शास्त्रशुद्ध ) पुस्तक वाचले त्यावेळी माझ्या मुलभुत संकल्पनाच उलट्या पालट्या होऊन गेल्या . मी फाळणी हे एक वरदान आहे असे समजू लागलो . प्रा शेषराव मोरेंचे ताजे पुस्तक तर यासंदर्भात पुराव्यांची जंत्रिच देते . फाळणीला गांधिहत्येचे कारण म्हणून हिंदुत्व वादि नथुराम टाहो फोडतात . 

ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... अखंड भारतवादीही असतात... हा एक विनोदच आहे. अखंड भारतात बांग्लादेश तर येतोच पण पाकिस्तान सकट ची सर्व मुस्लिम लोकसंख्या ही येते. अखंड भारतातली मुस्लिम लोकसंख्या ४०% च्या वर  जाते. आज १२% मुस्लिमांसमोर हतबल झालेले राजकीय हिंदू नेत्रुत्व अखंड भारतात शिल्लक तरी राहिल का?

हिंदू लोक शेतकरी. जमिनीला माता मानणारे. भूगोलावर त्यांचे लैच प्रेम. त्यांचा मनात अखंड भारतमाता घर करून बसली आहे. पण अखंड भारत म्हण़जे केवळ भुगोलांची बेरीज न्हवे. त्यात लोकसंख्येची बेरीज आहे. इतिहासाची वजाबाकी आहे आणी धर्माचा भागाकार आहे. 

खरे पाहता हिंदू समाजात आणी धर्मात तुलनेने राष्ट्रवादी गोष्टी कमी आहेत. हिंदूधर्माची मूलभूत शिकवण -   
  •  परधर्म सहिष्णुता विरुद्ध इस्लामी जिहाद 
  •  उम्मत( कुराणसिद्ध मुस्लिम बंधुभाव) विरुद्ध हिंदू ची  जातिव्यवस्था.
ही लढाईच विषम आहे. हिंदुंकडची एकमेव जमेची बाजू म्हणजे त्यांची लोकसंख्या. अखंड भारतात त्या एकमेव जमेच्या बाजूचे महत्व झपाट्याने कमी होणार होते.

फाळणी केवळ भूभागांची झाली नाही. फाळणी मुस्लिम लोकसंख्येची झाली . अन भारतातल्या मुस्लिमांचे सांख्यीकी महत्व झटकन उतरले.

मुस्लिमांचे पायचाटे म्हणून गांधींना अहोरात्र शिव्या देणारे  लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात.  कुरुंदकर म्हणतात " एका मुसलमानाला तीन मतांचा अधिकार देउन; लखनौ कराराच्या वेळी कोंग्रेस मधील मुस्लीम लांगुलचालनाचा पाया; खुद्द लोकमान्य टिळकांनी घातलेला आहे. हे  का विसरतात ?"


फाळणीमुळे अखंड भारताच्या धोक्यापासून हिंदूंचे रक्षण झाले. हे वास्तव समजून घेतले पाहिजे. 


अखंड भारतातलि मुस्लिम लोकसंख्या 




५ ऑगस्ट १९४७ ला झालेल्या फाळणीला जवाबदार कोण ? हा प्रश्न गेली गेली ६५ वर्षे हिंदुस्थानी विचारवंतांना छळतो आहे. हिंदुत्ववादी अखंड हिंदुस्थानचा जप करत यासाठी गांधींच्या अहिंसक स्वभावाला जवाबदार ठरवतात. तर सेक्यूलर विचारवंत फाळणीसाठी संघाचा आक्रमक हिंदुत्ववाद आणी सावरकरांनी द्वीराष्ट्रवादाला दिलेली मान्यता या गोष्टी दोषपूर्ण मानतात. 
 सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल. 
माझ्यासमोरचा प्रश्न फाळणीला जवाबदार कोण असा नाहीच . फाळणीचे श्रेय कोणाला द्यायचे ? असा आहे !



 द्विराष्ट्रवादाची तुतारी : 


द्विराष्ट्रवादाची मागणी फाळणीसाठी न्हवतीच ती अखंड भारतासाठी होती. सर सय्यदांची द्विराष्ट्रवादी भुमिका एकदा समजली की फाळणीची अपरिहार्यता चटकन लक्षात यील.


सर सय्यदांपासुन चालत आलेली आणि पुढे मुस्लिम लीग , इक्बाल आणि राष्ट्रवादी मुस्लिमांनिहि अधोरेखीत केलेला  अखंड भारताची योजना थोड्याफार फरकाने  होती कि - 
मुस्लिम अल्पसंख्य आहेत. पण ती एक राज्यकर्ती जमात आहे. भारत स्वतंत्र झाला की लोकशाही आलीच.  संख्येच्या बळावर हिंदू ही राज्यकर्ती जमात बनेल. डोक्याचे वजन न मोजता डोक्यांची फक्त संख्या मोजणारी ( भुलक्कड ! ) लोकशाही सय्यद अहमदांना मान्य न्हवती. हिंदू आणी मुसलमान हे भारत नावाच्या वधूचे दोन सुंदर डोळे  (द्विराष्ट्रवाद) आहेत म्हणून राजकीय सत्तेचे वाटप दोन्ही डोळ्यांना समान झाले पाहिजे. आणी म्हणूनच  सर्व सत्ताकेंद्रात (लोकसभा ते ग्रामपंचायत) ५० % राखीव जागा मुस्लिमांसाठी असल्या पाहिजेत असे सय्यदांचे म्हणणे होते. ३५ % मुस्लिमांसाठी ५०% जागा आणी हिंदूच्या भावनेसाठी अखंड भारत. असा द्विराष्ट्रवादाच्या मागणीचा आशय आहे.
मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्‍याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली !
सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:!
(अर्थः सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली तर शहाणा माणूस अर्ध्याचा त्याग करतो आणी उरलेल्या अर्ध्या चा स्वीकार करतो ! )

त्यामुळे गांधिंनि फाळणी करून हिंदुचा घात केला आणि म्हणुन नथुराम ने त्यांना मारले .....असे म्हणणारे डबल ढोलकी ठरतात. मग गांधी हत्येचे समर्थन करण्याचे काही कारण उरते काय ? गांधिंनि हिंदुचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून दूरदृष्टीने योजनापूर्वक फाळणी केली असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही . 
पण गांधिहत्येच्या समर्थकांनाहि ते कारण पुढे करता येणार नाही कारण सकृत दर्शनी तरी फाळणी हिंदुना हितकारक ठरली आहे. 







फाळणी मुळे हिंदुचा राजकीय विजय झाला आणि हजार वर्षाच्या धार्मिक भांडणातुन हिंदुंचि मुक्ता झाली . या विषयावर बाबासाहेब आंबेडकरांचि मते अतिशय अभ्यासपुर्ण आहेत. फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - 
" जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक ,  ,  परिणामशुन्य राज्य बनेल । जणु जिवंत प्रेत    , न पुरलेला मृतदेह "  
(पाकिस्तान ३ ४ ०.  DrBabasaheb Ambedkarwritings and speechesVolume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page ३ ४ ० ) 

फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५  साली   बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. --  
" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती .
समता आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला होता . त्यांनी सनातनी वृत्तीचा आयुष्यभर धिक्कार केला . मनुस्मृतीला काडी  लावली . हिंदुच्या सनातन वैदिक धर्माचा त्याग केला . पण  राजकीय दृष्ट्या त्यांना देशहिताची आणि हिंदुच्या राजकीय सामाजिक प्रगतीची चाड होती . धम्म स्वीकारापुर्वी एक वर्ष - बाबासाहेबांनी फ़ाळणिबद्दल देवाचे आभार मानले आहेत. परमेश्वर न मानणार्या बाबासाहेबांनी हलक्याश्या विनोदात लिहिलेले वाक्य अतिशय बोलके आहे .  १९५५ सालीच  बाबासाहेब आंबेडकर लिहितात कि - 
" जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
(DrBabasaheb Ambedkarwritings and speechesVolume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page 146 )

फाळणी झाल्यानंतर  कालौघात तीन देश निर्माण झाले : 
  1. भारत :  विकसित सशक्त एकसंघ आणी भारतीय धर्मांची बहुसंख्या असलेला सेक्युलर देश. 
  2. पाकिस्तान : युद्धग्रस्त मागास  आणि मवाली देश . इस्लामी शरियत कायदा . लोकशाही नाही.  
  3. बांग्लादेश : भूकग्रस्त  , दरिद्री, बकाल  आणि  धर्मांध संघटनांचे घाउक उत्पादन करणारा देश.  


भारतातून बरीच मुस्लिम लोक संख्या वगळली गेली. ती त्यांच्या पाक - बांगलादेशी मार्गाने जायला स्वतंत्र झाली . मुस्लिम बहुल भाग मनाने पाकिस्तानात होताच . नकाशावर रेघा ओढण्याचा राजकीय उपचार गांधी नेहरुंनी मनापासून केला . काय चुकले त्यांचे ? 

मुस्लिम लीग सारखे तत्कालीन राजकीय पक्ष आणि इस्लाम धर्म काफिर भारतीयांबरोबर सेक्युलर राजकारण करू शकत नाही त्यामुळे बाबासाहेब फाळणीचे समर्थक होते . त्यांचा विचार किती योग्य होता ते आजचे तीन देश (भारत , पाकिस्तान आणि बांग्लादेश ) पाहिले कि स्पष्ट होते . 


डॉ आंबेडकरांचे पाकिस्तान ओर पार्टिशन ऑफ इंडिया हे पुस्तक डबल ढोलकी सनातन्यांकडुन  कडुन अनेकदा वापरले जाते. मुस्लिम द्वेषाचे शस्त्र म्हणून अखंड हिंदुराष्ट्रवादि  त्याचा वापर करतात .  वस्तुत: आंबेडकरांनि हे पुस्तक फाळणीचे समर्थन करण्यासाठी लिहिलेले आहेत. दार उल हार्ब आणि दार उल इस्लाम अशी जगाची वाटणी इस्लामी धर्मशास्त्राने केलेली असल्याने मुस्लिमांचे हिंदुबरोबर सहजीवन अशक्य आहे -  फाळणी अपरिहार्य आहे असे आंबेडकर म्हणतात. अखंड भारतात धार्मिक प्रश्न उग्र बनून राहतील आणि मग सामजिक सुधारणांकडे लक्ष द्यायला कुणाला वेळच उरणार नाही . या भावनेतून वेगळ्या चुली मांडणे बरे म्हणत आंबेडकरांनिहि फाळणीला पाठिंबा दिला आहे. सामजिक सुधारणा करता याव्यात  राजकीय लोकशाही - सेक्युलारीझम आणि आधुनिक विचार यांचा भारताला  लाभ व्हावा म्हणून आंबेडकरांचा फाळणीला पाठींबा होता ! द्वेषाने आंधळ्या झालेल्या अखंड हिंदुराश्ट्र वाल्यांनी बाबासाहेबांचे पुस्तक वापरणे हास्यास्पद आहे. 


५५ कोटीचे कारण तसेच फुसके आहे. गांधीना मारायचे प्रयत्न ५५ कोटीच्या आधीपासूनचे आहेत. असे अनेक प्रयत्न नथुराम गटाने बरीच वर्षे केलेले आहेत.
  






गांधिजीं चा खून जातीय मानसिकतेतून झाला का   ? 


गांधिहत्येनंतर ब्राम्हणांची घरे गावगुंडांनी जाळली . उदाहरणार्थ त्यात माझ्या पुर्वजांचेहि घर होते. त्याकाळी माझे आजोबा आणि त्यांचे बंधु गांधीवादी होते. कोन्ग्रेस मध्ये होते. तरीही घर जाळले. अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या .  गांधीचे समर्थक कधी गांधीवादी नव्हते - अहिंसकहि  नव्हते . यांसंदर्भात  गांधिहत्येला जातीवादाची पार्श्वभूमी होती काय ? हा अतिशय  महत्वाचा प्रश्न आहे. नथुराम ब्राम्हण वादि  होता असा चावट प्रचार आजही केला जातो . तो खरा नाही . नथुरामच्या मनात अखंड भारत माता घर करून होती. तो त्याच्या मनातल्या अखंड हिंदुराश्ट्राचा -  परम देश भक्त होता . हिदू मुस्लिम समस्येचे  त्याचे आकलन कमी होते हा महत्वाचा मुद्दा आहे.  

गांधीजीचा खून आणि त्यानंतरची जाळपोळ होईपर्यंत - गांधी  ब्राम्हण विरोधी होते असे कोणालाही कधी वाटले नव्हते . गांधिंची  कोन्ग्रेस देशाचा प्रधान मंत्रि नेहरू आणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रि खेर याना बनवत होती . हे दोघे ब्राम्हण होते .

 गांधी ब्राम्हण विरोधी नव्हते तसा  नथुराम हि ब्राम्हण वादि नव्हता .

नथुराम जहाल हिंदु होता. जहालपणा हे अडाणीपणाचे लक्षण आहे.  त्यामुळे नथुरामला  गांधीजिंचे सखोल राजकारण कळत नव्हते . नथुराम फारसा धार्मिक हि नव्हता तो जमातवादी होता . नथूरामच्या त्याकाळी अस्पृश्यतेला विरोध होता . वेद गीता आदी धर्म ग्रंथांवर केलेली टिका समजून घेतली पाहिजे . तो आंबेडकरांचा अधिकार आहे. अशा अर्थाचे लेखन नथुराम ने केलेले आढळते . नथुराम सनातनी सुद्धा नव्हता . प्रत्येक चुकीचा  माणुस हा सनातनी असला पाहिजे असे काही नाही . पुरोगामी वा अतिजहाल राष्ट्रवादी सुद्धा चुकीचे काम करू शकतात. राजकारणात आणि समाजकारणात सोप्या व्याख्या करणे टाळले पाहिजे. नथूरामने अतिरेकी देशभक्ती , जहाल हिंदुत्व आणि हिंदु मुस्लिम समस्या न समजल्याच्या  अडाणिपणातुन हे अधम  कृत्य केले .






नथुरामला  हिंदु समाजाचे आकलन झालेलेले न्हवते . नथुरामियांना आजही झालेले नाही. हिंसा - अहिंसा - सशस्त्र क्रांति वगैरे बालिश मुद्द्यांभोवती त्याचे वक्तृत्व अजून खेळते आहे.  हिंदु समाज अहिंसक वगैरे कधीच न्हवता. महाभारतातलि भाउबंदकि आधुनिक भारतापर्यंत सनातन  चालू आहे. शेतिच्या बांधावरुन भाऊ भावाचे खून करतो. राज्यावरून चुलत्यांचे रक्त वाहवले जाते.  जातिपातिंचा आजचा संघर्ष थेट एकलव्य किवा शंबुक किंवा परशुराम पर्यंत भिडवला जातो.  हिंदु लोक एक राष्ट्र - एक जीव नाहीत. आजतरी नाहीत . हिंदुना एकजीव - एकाराष्ट्रीय बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यात वाद नाही . त्यासाठी सनातनी वृत्ती सोडुन आधुनिक राष्ट्रवाद स्वीकारावा लागणार आहे .  आधुनिक राष्ट्रवादाच्या, लोकशाहीच्या परिप्रेक्षातुन हिंदुना पहायला शिकवणे हि काळाची गरज होती. त्यासाठी गांधिंनि अहिंसा हे उपकरण वापरले. त्यानेच त्यांनी हिंदु लोकांची मने जिंकली. आज मुस्लिमांविरुद्ध असणारा जहाल राष्ट्रवाद उद्या आपल्यालाहि  खाइल अशी भीती हीदुसमाजातल्या अनेक गटांना वाटते.  महाराष्ट्रातले उदाहरण द्यायचे झाले तर ब्राह्मणेतर चळवळीचे देता येईल . टिळकांची जहाल कोग्रेस -   ब्राह्मणेतर चळवळीला कधीच आपली वाटली नाही. त्या जहाल्पणात काहिंना ब्राह्मण्याचा वास येत होता. पण अहीसक गांधिंच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणेतर पक्ष कोंग्रेस मध्ये आला हे विसरता येईल काय ? गांधिंचि अहिंसा सार्यांना कवेत घेणारी होती . गांधिजिंच्या अहिंसेबद्दल आपण लेखमालेच्या तिसर्या भागात अधिक सविस्तर चर्चा करू. 







 फाळणी झाल्यानंतरहि मुस्लिमांना दंगलीची झळ पोचू नये म्हणुन हा महात्मा भारतात वणवण फिरत होता.  हीदुच्या सुरक्षेसाठि पाकिस्तानात पदयात्रा काढण्याचेही त्यांचे ठरले होते . पाकिस्तानातल्या हिंदुवर होणार्या अत्याचाराने नथुराम पेटुन उठला होता. त्याला इथल्या मुस्लिमांवर सुड उगवायचा होता ...... आणि हिंदुसमाजाला सुडाच्या तत्वा   पासून दूर नेणारा महात्मा त्याला नको होता असाही तर्क लढवता येईल . सूडाचे तत्व अस्तनिताल्या निखार्यासारखे असते ते स्वत:लाही जाळतेच . दशतावादाला खतपाणी घालणार्या पाकिस्तानात आज तोच जिहाद अंतर्गत भस्मासुर बनला आहे हे दिसत नाही काय ? तरी क्षणभर युक्तिवादासाठी मान्य करू ...कि नथुरामला सुड घ्यायचा आहे. गांधिजिंचा खून केल्याने नथूरामचे सूड ध्येय सफल झाले काय ? गांधिहत्येचा परिणाम काय झाला ?  गांधीला गोळी घालताच एका क्षणात  - भारतातल्या मुस्लिम विरोधी दंगली थांबल्या .....   नथुरामच्या गोळीने असंख्य मुस्लिमांचे जीव वाचले . त्याचे सुडाचे तत्व फेल झाले . पाकिस्तान ची निर्मिती हा गांधिविचाराचा पराभव आहे असे कोणास म्हणायचे असेल तर  गांधिहत्येचा परिणाम हा नाथुरामि सुड तत्वाचा पराभव आहे हे हि मान्य करावे लागेल . 


पाकिस्तानची निर्मिती हा गांधीच्या सर्वधर्म समभावाचा पराभव होता असे म्हणणारे लोक कुराणाचा दाखला देण्यात पटाईत आहेत . कुराणातला जिहाद. काफ़िरांना मारण्याच्या आज्ञा . इस्लाम धर्माची ( कुराण प्रणित ) असहिष्णुता याचे दाखले  - कुराणातल्या आयतिंचे क्रमांक देत अवश्य देता येतील . गांधिजिंचि सर्वधर्म समभाव नावाची एक छोटीशी पुस्तिका आहे.  त्यात गांधीजी विनम्रपणे म्हणतात कि दास आणि दस्युंविरोधातल्या ऋग्वेदातल्या ऋचांचे क्रमांक हि असेच दाखवता येतील . मानुस्मृतीतली शुद्रविरोधी टिपणे श्लोकांच्या क्रमांकासहित प्रसिद्ध झालेली आहेत . त्याचा नेमका अर्थ वेगळाच आहे  असा वाद सर्व धर्म मार्तंड घालत बसतात. 

गांधीबाबा हि सुट - धर्माचा आधुनिक अन्वयार्थ काढण्याची सुट .... सर्वच धर्मांना देतात आणि त्याला - सर्वधर्म समभाव असे नाव देतात .  गांधिंच्या मौलाना आझाद नामक शिष्याने कुराणातल्या आयती वापरून सर्व धर्म समाभाव सिद्ध केला होता ! 

( मौलाना आझादांचा फसलेला प्रामाणिक प्रयत्न  वाचण्यासाठी येथे क्लिक करा )  

थोडक्यात गांधिहत्येचे हिंदु म्हणुन समर्थन करता येत नाही हे मला उमगले आहे. त्यांच्या सर्व धर्म समभावा वर टिका करताना भान सोडले जाते हेही समजले  आहे .

तरी अधुनिक दृष्टिकोनाचे  बुद्धिमान विचारवंत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यात वाद का झाले त्याचे खरे स्वरुप काय होते ... हा प्रश्न मला अस्वथ करतो. ..



(क्रमश:)

मला समजलेले गांधिजी या मालिकेतील पुढील भाग : - 


भाग ३) पुस्तकांपलिकडचे गांधी : (आगामी )   





----------------------------------------------------------------------------------------------------------------------

(फ़ाळणिमागिल राजकारण या  विषयावर अधिक अभ्यासासाठी : - प्रा शेषराव मोरे यांचे 'गांधी आणि कोङ्ग्रेसने अखंड भारत का नाकारला ?'  हे पुस्तक अवश्य वाचावे. पुस्तकाच्या निर्मिती - प्रकाशानात आमचाही अल्पसा सहभाग आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया हे पुस्तकही या संदर्भात महत्वाचा दस्तावेज आहे.   )


.

२० जाने, २०१३

अमान मोमीन - यांचे मी कोल्हापुरी.

अमान मोमीन - यांचे मी कोल्हापुरी.

आमच्या लहानपणी सीडी मिळत नसत. केसेटि मिळायच्या. इतका मी प्राचीन आहे. बापाच्या केसेटि पळवून मी गच्चीवर घेऊन जायचा. केसेट दगडांनी तोडायची . त्यातली फिल्म काढायची. त्याच्या टोकाला दगड बांधायचा . मग तिसर्या मजल्यावरच्या गच्चीवरून त्या केसेट्च्या फिल्मची दोरी खालपर्यंत सोडायची असा तो उद्योगी खेळ चाले. त्या जमान्यात ऐकलेली ही केसेट. अमान मोमीन - यांचे मी कोल्हापुरी. आमचे मूळ गाव कोल्हापूर. त्या कोल्हापूराचे आणि विशेषत: त्यातल्या मुस्लिम समाजाचे त्यात वर्णन होते. भाष्य मात्र माणुसकीवर, आधुनिक युगात येऊ पहाणार्या टोकदार धार्मिक अस्मितांवर आहे. त्यावेळी भाष्य कळण्याएव्हढि अक्कल न्हवती. पण गणेशोत्सवात त्या केसेटवर आधारित एकपात्री प्रयोग मी करत असे . त्यातल्या "रांडिच्या" वगैरे शिव्या टाळाव्यात हा घरच्यांचा सल्ला साफ धुडकावत मी तो एकपात्री प्रयोग करत असे. पाच वर्षाच्या दिक्षित आडनावाच्या पोराने गणपतीच्या स्टेजवर अश्या शिव्या देत कार्यक्रम करावा हे लोकांना विशेष वाटले. पण प्रोग्राम सुपर हिट होत असे. 

पुढे ती केसेट ही आमच्या गच्ची खेळातून सुटली नाही. त्याचा दोरा जमिनिपर्यंत पोचला. आणि बापाचा हात आमच्या कान्फ़ाडापर्यंत. वय वाढले.. मार लक्षात राहिला पण केसेटचे पाठांतर विसरून गेलो. त्यात काहीतरी जबरदस्त होत. घेण्यासारख होत एव्हढ मात्र लक्षात राहील. ती केसेट पुढे कैक वर्ष शोधत होतो. मिळाली नाही. परवाच काही कामानिमित्त कोल्हापुरला जाण झालं . भवानी मंडपाच्या बाहेर फ़ुटपाथवर ती च केसेट सीडी स्वरूपात दिसली. उचलली. परवाच ऐकत होतो. अमान मोमीन नावाचा एक अवलिया कोल्हापुरी. राजर्षी शाहू महाराजांच्या कृपेने निघालेल्या होस्टेलात शिकतो काय. नशीब काढत अमेरिकेत पोचतो . पुढे आपल्या खुसखुशीत शैलीत जून कोल्हापूर आपल्या समोर उभा करतो काय ... सारच विलक्षण . अद्भुत आणि नोस्टाल्जिक .

आठवणींची केसेट पुन्हा गुंडाळत गेलो. माझ्या लहानपणी मी ९२ - ९३ ची दंगल मी अनुभवली आहे. भितीन स्वत: बाथरूम मध्ये कोंडून घेतलं आहे. दंगलितला हिंसाचार - खूनसत्र डोळ्यांनी पाहिला आहे. मुंबॆतले बॉम्बस्फोट - धार्मिक - कटुता -विद्वेषपूर्ण हिंदुत्व . इस्लामी जिहादचे नारे. या सार्यांचे चढते उतरते आलेख मी पाहिले आहेत. त्यातली भीती . टोकदार अस्मिता . पण माझ्यावर या सार्या गोष्टीचा मुंबईत रहात असूनही वेगळ्या प्रकारे फरक पडत होता. या सार्याच एक वेगळच एंटर्प्रिटेशन मी करत होतो. धर्म - जात पात - अभिमान. माणुसकी प्रांजळ पणा . अघळ पघळ पणा . माझ्या मित्रांना मी विचित्र वाटतो. (आणि बायकोला येडा).

त्या केसेट मधले शब्द मी विसरून गेलो होतो. पण त्यातली भावना म्हणा किंवा भाष्य म्हणा मनात कुठेतरी खोलवर जागृत होत. आपल्या आयुष्यावर आणि मतांवर अशा लहान लहान गोष्टी खुप प्रभाव टाकत असतात. आपली मने घडवत असतात. मानवी आयुष्यात कसदार साहित्याच मोल फार मोठ आहे. अमान मोमीन यांच्या या केसेट मध्ये थट्टा आहे मस्करी आहे. कामरे खालाचे विनोद आहेत. नक्कल आहे. कुस्ती आहे. मुस्लिम लीग आहे. कोल्हापुरी तांबडा तिखटजाळ रस्सा आहे. शाहू महाराज आहेत. हिंदु मुस्लिम प्रश्न आहेत . जात पातीवर मार्मिक टिप्पणी आहे. धर्म धर्मांधतेवर भाष्य आहे. खाशी कोल्हापुरी अवलीगिरी आहे. पुणेकरांना शालजोडीतले आहेत.

पण त्याहून महत्वाच या सगळ्या कडे खट्याळ पणे पहाणारा एक माणुसकीचा चष्मा आहे. 

तुम्हाला मिळतोय का तो? एकदा ऐकून पहाच . संपुर्ण कार्यक्रम दीड तासाचा आहे. चार भागात मी तो अपलोड केलेला आहे. ओनलाइन ऐकता येत नाही. आधी चारही भाग डाउन लोड करून घ्यावे लागतील . ऐकाच वेळ काढुन आणि प्रतिक्रिया अवश्य कळवा. 

mi kolhapuri aman momin

http://yourlisten.com/channel/content/16943912/Aman_Momin_Mi_Kolhapuri_1

http://yourlisten.com/channel/content/16943896/Aman_Momin_Mi_Kolhapuri_2_

http://yourlisten.com/channel/content/16943904/Aman_Momin_Mi_Kolhapuri_3

http://yourlisten.com/channel/content/16943905/Aman_Momin_Mi_Kolhapuri_4

Dr. ABHIRAM DIXIT

१९ जाने, २०१३

हिंदुत्व विचाराची फ़ेरमांडणि


पुण्याच्या वसंत व्याख्यान मालेत  " हिंदुत्व  विचाराची फ़ेरमांडणि"   या विषयावर २००७ साली  मी भाषण केले होते . हिंदु समाजाचे संघटन आणि सबलीकरण करण्यासाठी काय केले पाहिजे यावर मत व्यक्त केले होते . त्या भाषणाच्या दोन वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्या खाली देत आहे . वाचकांनी स्वत:च योग्य आणि अयोग्य काय ? याचा निष्कर्ष काढायचा आहे . मा. प्रल्हाद मिस्त्री यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचा ऋणी  आहे . 
1. सकाळ




 2. सनातन प्रभात  




हिंदुत्त्व विचारांची फेरमांडणी


फेरमांडणी म्हणजे पुन्हा मांडणी. फेरमांडणीची हिंदुत्त्वाच्या विचारांना गरज आहे.

आत्ताच काही दिवसांपूर्वी ओरिसामधल्या जगन्नाथ मंदिरामध्ये दलितांना सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश दिला होता. बातमी ताजी आहे. सर्वोच्च न्यायालयाने दलितांना प्रवेश दिल्यामुळे तिथल्या पंडितांनी, ब्राह्मणांनी हे मंदिर अशुद्ध झालेलं आहे, विटाळलेलं आहे, असं म्हणून गोमूत्राने, गंगाजलाने ते मंदिर धुऊन काढलं, साफ केलं. पशूचं मूत्र आमच्या हिंदू बांधवांपेक्षा आज हिंदूंनाच पवित्र वाटतं आहे ही हिंदू समाजाची वस्तुस्थिती आहे. एकही हिंदुत्त्ववाद्याला या घटनेचा निषेध करावासा वाटला नाही; म्हणून हिंदुत्त्वाची फेरमांडणी आवश्यक आहे असं मला वाटतं. ही झाली ब्रह्मवृत्ती.

खैरलांजीमध्ये थोड्याच दिवसांपूर्वी दलित स्त्रियांची अब्रू लुटून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांना ठार मारण्यात आलं. दलित कुटुंब अख्खं ठार मारलं गेलं. त्याही घटनेबद्दल हिंदुत्त्ववादी कुठे चकार शब्द बोलले नाहीत. ही झाली हिंदूंची क्षात्रवृत्ती. अशा ब्रह्मवृत्तीचा आणि क्षात्रवृत्तीचा हिंदू समाजात सुकाळ झाल्यामुळे आणि हिंदुत्त्ववाद्यांना त्याच्याशी काही देणंघेणं वाटत नसल्यामुळे मला हिंदुत्त्व विचारांची फेरमांडणी करावी असं वाटतं. साधारणतः कुठलाही शहाणा माणूस हिंदुत्त्व विचारांची फेरमांडणी करायला पाहिजे या विचारांशी सहमत होईल. परंतु हिंदुत्त्व विचारांच्या मांडणीचीच मुळात गरज काय असा कुठलाही सुज्ञ प्रश्न आपल्याला पडू शकतो. म्हणजे कशाला आहे, हिंदू-फिंदू कशाला पाहिजे? आपण हे मानवच आहोत, सगळं मानवराज्य आहे. या मानवतेच्या दृष्टीकोनातूनही सर्व प्रश्न आपल्याला सोडवता येतील. आपल्या सर्व प्रश्नांची उकल आपल्याला या मानवतेच्या दृष्टीकोनातून करता येईल. माणुसकी हाच खरा धर्म आहे. मानवता हाच खरा धर्म आहे. मग त्यासाठी हिंदू या शब्दाबद्द‍ल आग्रह का? 


यासाठी मी माझ्या भाषणाची मांडणी तीन भागात करणार आहे. पहिला भाग आहे, हिंदुत्त्वाच्या मांडणीची गरज. दुसरा भाग आहे, प्रस्थापित हिंदुत्त्वाचे म्हणजे त्या भूमिकेचे मंडन आणि नंतर त्यातलं जे काही मला पटत नाही त्याचं खंडन; हा भाषणाचा दुसरा भाग आहे. भाषणाचा तिसरा भाग हा हिंदुत्त्वाच्या फेरमांडणीचा आहे, म्हणजे पुन्हा मांडणीचा आहे, वेगळ्या प्रकारच्या मांडणीचा आहे. यातला पहिला भाग म्हणजे हिंदुत्त्वाच्या मांडणीची गरज काय हा भाग हिंदुत्त्ववाद्यांच्या आवडीचा आहे. दुसरा भाग डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या आवडीचा आहे, आणि तिसरा भाग सध्या तरी कोणाच्याच आवडीचा नाही, तो आपल्या आवडीचा व्हावा अशी माझी यानिमित्ताने इच्छा आहे.






भाग १ - हिंदुत्त्वाच्या मांडणीची गरज काय आहे?






आपण भाषणाच्या पहिल्या भागाकडे येऊ. हिंदुत्त्वाच्या मांडणीची गरज काय आहे? मानवता हाच खरा धर्म आहे. ते एक उदात्त, अत्युच्च मूल्य आहे. माणुसकी हाच खरा धर्म आहे. परंतु मानवता हा जरी चांगला धर्म असला तरी जगातली अनेक उच्च ध्येये आपल्यासाठी अजून शिल्लक आहेत. म्हणजे, युआन च्वांग जेव्हा पूर्वी भारतात आला होता तेव्हा कुलुपे नव्हती भारतात. कुलूप, ताला ह्याला संस्कृत शब्द नाही. भारतात कुलुपाची पद्धत नव्हती. कशाला, काय, कोण चोरीच करीत नव्हतं. पण जसं घरांना कुलुपं नसावीत ही एक चांगली गोष्ट आहे, तसं माणुसकी ही चांगली गोष्ट आहे, पण जोपर्यंत या जगात चोर आहेत, दरोडेखोर आहेत, खुनी आहेत, बलात्कारी आहेत, तोपर्यंत घराला कुलुपाची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे घरांना कुलुपांची आवश्यकता आज आहे, त्याप्रमाणे सगळी मानवजात जरी एक असली, माणुसकी हाच खरा धर्म असला, तरीही हिंदुंवर केवळ हिंदू म्हणूनच जेव्हा अन्याय होतात, अत्याचार होतात, तेव्हा त्या माणुसकीला कुलूप घालावं लागतं, त्या मानवतेला टाळं ठोकावं लागतं; आणि त्या कुलुपाचं नाव आहे, हिंदुत्त्व. अशी माझी हिंदुत्त्वाच्या मांडणीच्या गरजेची मीमांसा आहे.


आता जर का ज्याप्रमाणे दलितांवर अत्याचार झाले, अन्याय झाले, जर दलितांवर अत्याचार होत असतील, दलितांवर अन्याय होत असतील, तर त्यांनी संघटीत होणं आणि त्या अन्यायाला उत्तर देणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्याचप्रमाणे जर हिंदुंवर हिंदू म्हणून अन्याय होत असतील, अत्याचार होत असतील, पीडा होत असेल, तर त्यांनी हिंदू म्हणून एक होणं, संघटीत होणं आणि त्या अत्याचाराला उत्तर देणं हीही एक नैसर्गिक गोष्ट आहे. आता हिंदुंवर अन्याय होतात की नाही हा कदाचित वादाचा मुद्दा बनू शकेल. पण हिंदुंवर जर अन्याय होत असेल तर त्यांनी एक होणं आणि त्या अन्यायाला उत्तर देणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. आणि हीच हिंदुत्त्वाची मांडणी आहे.






हिंदुंसमोरचं आव्हान इस्लाम आणि ख्रिश्चनिटीचं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात अशा काही घटना घडत आहेत की त्यामुळे हिंदूंनी अतिशय शांत डोक्याने विचार करावा की इस्लाम काय आहे? आपल्या समोर कुठलं कुठलं आक्रमण होतंय? १५ जानेवारी २००६ ला मुंबईमध्ये हज हाउस मध्ये गुलाम हयाबक्ष नावाचा एक इमाम पकडला गेला होता. हज हाउस म्हणेज आपण जी मुसलमानांना सबसिडी देतो ना मक्का मदिनेला जायला, त्याचं ते एक स्टेशन असतं. त्या हज हाउसला जाऊन ते थांबतात, मग पुढे विमानाने मक्का मदिनेला जातात. ते एक त्यांचं धार्मिक केंद्र आहे, म्हणजे आपलं जसं वारकरी भवन असावं तसं. त्या वारकरी भवनामधला इमाम हा एक मोठा धार्मिक अधिकारी असतो. म्हणजे ती काय छोटी मोठी पोस्ट नव्हे. इमाम ही एक वजनाची पोस्ट आहे. तर हा गुलाम हयाबक्ष नावाचा इमाम, १५ जानेवारीच्या सर्व वृत्तपत्रात आहे, पोलिसांनी त्याला पकडलं. इस्लामिक अतिरेक्यांना तो ५०-५० लाख रुपयांच्या देणग्या पाठवीत होता. पोलिसांनी त्याला पकडलं आणि तेव्हाही हिंदूंना कुठे तरी प्रश्न पडायला पाहिजे होता की केवळ सामान्य मुसलमान नव्हे, तर मुसलमानांचा एवढा मोठा धर्मगुरु जर अतितेक्याना मदत करतो आहे, तर हा हज हाउस नेमका प्रकार काय आहे? हा नेमका इस्लाम काय प्रकार आहे? असा प्रश्न त्यावेळी हिंदूंना पडायला हवा होता.
त्यानंतर इमराना प्रकरण बरचं गाजलं. इमराना नावाची एक मुस्लीम स्त्री होती. तिच्यावर तिच्या सासऱ्यानेच बलात्कार केला होता. सासऱ्याने बलात्कार केल्यावर मुल्ला-मौलवी जमले आणि अतिशय तालासुरात सगळ्यांनी सांगितलं की तू आता तुझ्या सासऱ्याला नवरा मान आणि तुझ्या नवऱ्याला मुलगा मान, आणि हा आम्ही आमच्या इस्लामिक धर्मशास्त्रानुसार दिलेला निर्णय आहे. असं मुसलमानांनी, मौला-मौलवींनी उच्चरवाने टीव्हीवर सांगितलं होतं. तेव्हाही हिंदूंना प्रश्न पडायला हवा होता की नेमका हा इस्लाम काय आहे?
त्यानंतर सानिया मिर्झाचं प्रकरण आलं. सानिया मिर्झा, टेनिसपटू. दिसायलाही चांगली आहे, खेळतेही चांगली. तिचं प्रकरण आलं. सगळे मौलवी टीव्हीवर बसून म्हणत होते, टीव्हीवर लाईव्ह कार्यक्रम चालले होते, की मुसलमानांच्या बायकांनी तर घरात बसलं पाहिजे, बुरखे घालून. ही सानिया मिर्झा कशी बाहेर पडते? फतवे काढा तिच्यावर. सानिया मिर्झाविरुद्ध फतवा निघू शकतो. फतवा हा इस्लामिक धर्मादेश असतो की हे कृत्य गैरइस्लामिक आहे, म्हणून बाहेर हो. सानिया मिर्झाविरुद्ध फतवा निघू शकतो, टीव्ही चॅनेल्स बघण्याविरुद्ध फतवे निघू शकतात, व्याज घेणे किंवा न घेणे याच्याविरुद्ध फतवे निघू शकतात, मग इस्लामिक दहशतवादाविरुद्ध एकही फतवा का निघाला नाही? याचाही हिंदूंनी शांत डोक्याने विचार करायची वेळ तेव्हा आलेली आहे.





भिवंडी मध्ये ५ जुलै २००६, दोन पोलिसांची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली. जगताप आणि गांगुर्डे अशा नावाचे दोन पोलीस हवालदार होते. या घटनेशी मी नंतर फार जवळून जोडला गेलो. “Centre For Human Rights, Policy Studies and Awareness “  नावाची एक संस्था मुंबईत आहे. या संस्थेतर्फे या पोलीस हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. या समितीचा एक स्वीकृत सदस्य म्हणून मी भिवंडीत जाऊन राहिलो होतो. तिथल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पोलिसांच्या, तिथल्या रझा अकॅडेमीच्या लोकांच्या, मुस्लिमांच्या, सगळ्यांच्याच मुलाखती घेतल्या आहेत आणि त्याचा एक अहवाल आम्ही प्रसिद्ध केला होता. तो अहवाल पेपरमध्ये छापून आला आहे. प्रसिद्ध झाला आहे; मिळतो. त्याठिकाणी त्यावेळचे जे डीसीपी होते, सेनगावकर साहेब नावाचे डीसीपी होते, त्यांनी मला बोलतांना असं सांगितलं, त्याचा व्हिडीओ इंटरव्ह्यू माझ्याकडे आहे, त्याची सीडी मी बनविलेली आहे, तीही अजून उपलब्द्ध आहे, कुठल्या जिज्ञासूला हवी असेल तर त्याला मी देऊ शकतो. तिथल्या डीसीपींनी बोलतांना मला असं सांगितलं की हे जगताप आणि गांगुर्डे माझे दोन पोलीस हवालदार होते, ती फक्त शेवटची घटना होती. त्याआधी रझा अकॅडेमीने मोठं बंड उभारलं होतं की या जागेवर पोलीस स्टेशन बांधायचं नाही. एका विवक्षित स्थळी तिथे पोलीस स्टेशन बांधायचा कार्यक्रम सुरु होता. मुसलमानांनी सांगितलं, बांधायचं नाही, ही आमची जागा आहे. दंगल झाली, दंगल झाल्यावर पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात काही मुस्लीम दगावले. वाईटच झालं. दगावल्यानंतर जगताप आणि गांगुर्डे नावाच्या दोन पोलीस हवालदारांना पकडलं, हे श्री. सेनगावकर साहेबांच्या तोंडची वाक्यं बोलतो आहे हं मी, त्याची व्हिडीओ सीडी आहे माझ्याकडं. डीसीपी सेनगावकर साहेब म्हणतात - जगताप आणि गांगुर्डे नावाच्या दोन पोलिसांना पकडलं, त्यांचे कपडे काढले. मग चेक केलं, त्यांचा धर्म काय आहे. धर्म कळल्यावर २१ फ्रॅक्चर्स; मी तो पोस्टमार्टेम रिपोर्ट पहिला; त्याची कॉपी माझ्याकडे आहे; २१ हाडे तोडली लाथाबुक्क्यांनी. २१ फ्रॅक्चर्स आहेत दोघांमध्ये.  कानावर वार, डोळ्यांवर वार, बोटे तोडली गेली. त्या भिवंडी मध्ये आम्हाला उर्दू पत्रक मिळाली. त्यावेळी त्यांचा अर्थ कळला नाही. पोलिसांनीच दिली पत्रकं. आता आहेत पत्रकं आमच्याकडे. ती पत्रकं सध्या सध्या हल्ली भाषांतरित करून आम्हाला मिळालीत. पत्रकामध्ये कुराणातल्या आयती लिहिलेल्या – आम्ही या काफरांच्या हृदयात दहशत बसवून देऊ. मग आघात करा तुम्ही त्यांच्या मानेवर, आघात करा बोटांच्या पेरापेरांवर. अशा कुराणातल्या आयती लिहून मिळालेली पत्रकं. 



कुराण : ८ वि सुरह , १२ वि आयात 


अशा प्रकारे आमच्या समोर घटना घडत असतांनाही हिंदू समाजाला वाटलं नाही की हा इस्लाम काय आहे. याच्याकडे आपण एकदा डोळे उघडून बघावं. मुस्लिमांची कुठली आंदोलने देशभर चालू आहेत, ह्याच्याकडे आपण डोळे उघडून बघावं. तसं बघावं असं मला वाटतं म्हणून हिंदुत्त्वाची मांडणी मला आवश्यक वाटते.

नरहर कुरुंदकर नावाचे एक समाजवादी विचारवंत होऊन गेले. १९६८ साली डिसेंबर महिन्यात नांदेडला, महाराष्ट्रात त्यांची एक सभा होती. सभा कोणासमोर? जमाते इस्लामीच्या मुसलमानांसमोर. जमाते इस्लामी ही मुसलमानांना त्यांच्या मूलतत्त्ववादाकडे नेणारी संघटना आहे. तर या जमाते इस्लामीने नरहर कुरुन्दकरांना तिथे भाषणाला बोलवलेलं होत. नरहर कुरुंदकर म्हणजे समाजवादी. आता समाजवादी म्हणजे हिंदूंचे दुश्मन, असं मुसलमानांचं मत होतं. त्यामुळे ते आता आपल्याच बाजूने काहीतरी बोलणार, असं म्हणून त्या ज्येष्ठ समाजवादी विचारवंताला, नरहर कुरुंदकरांना १९६८ साली नांदेडला बोलवलेलं होतं. त्या ठिकाणी नरहर कुरुंदकर काय म्हणाले ते त्यांच्या ‘शिवरात्र’ नावाच्या पुस्तकात भाषण प्रिंट झालेलं आहे. ते भाषण असं आहे – सगळा मुसलमानांचाच जमाव होता, हजारो मुसलमान तेथे जमलेले. एकच नरहर कुरुंदकर ह गैरमुसलमान. मी त्यांना हिंदू म्हणणार नाही. ते समाजवादी होते, त्यामुळे त्यांना धर्मच नव्हता. तिथे नरहर कुरुंदकर उभे होते. त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात अशीच केली – 








मुसलमानांना आवाहन करतांना नरहर कुरुंदकर अस म्हटले, - हे मुसलमानहो, मी मुसलमान नाही; मी हिंदूही नाही. पण मी मुसलमान नाही; हिंदूही नाही म्हणजे माझी कुठल्याच धर्मावर श्रद्धा नाही. मी मुसलमान नाही हे तुम्ही मान्य केलं. पण माझा मुसलमान नसण्याचा हक्क तुम्हाला मान्य आहे का हे मला सांगा.’ नरहर कुरुंदकर त्या भाषणात म्हणतात, ‘मी बोलतो तेवढी ही गोष्ट सोपी नाहीये. जगात चोर असतात हे मान्य करणं वेगळं, पण चोरांचा चोर म्हणून जगायचा हक्क मान्य करणं वेगळी गोष्ट आहे. मी मुसलमान नाही हे तुम्हाला माहीतच आहे. पण मी मुसलमान नाही असा माझा मुस्लीम नसण्याचा हक्क माझ्याकडे आहे का? हे मला सांगा. एवढी सोपी गोष्ट नाही. मी मुसलमान नाही, म्हणजे अल्लाह हा एकमेव देव आहे हे मी मनात नाही. कुठलाही देव मानण्याचं, न मानण्याचं स्वातंत्र्य माझ्याजवळ आहे. अल्लाह हा एकमेव देव आहे हे मी मनत नाही. हे तुमच्या नमाजातलं रोजचं वाक्य आहे – ‘या इलाही इलिल्लाही मुहम्मद रसुलील्लाही, अल्लाह हा एकमेव देव आहे, सर्वश्रेष्ठ, आणि त्याचे प्रेषित मुहम्मद पैगंबर साहेब आहेत’  हे वाक्य मी मानत नाही. अल्लाहचा एकमेव प्रेषित म्हणजे मुहम्मद पैगंबर साहेब आहेत, हे मी मानत नाही. एवढ सोपं नाही. ज्याला इमान म्हणता, त्या पाच गोष्टींवर इस्लामनुसार श्रद्धा ठेवावी लागते – सर्वश्रेष्ठ अल्लाह, अल्लाहचे देवदूत, देवदूतांनी मुहम्मद पैगंबरांना सांगितलेले कुराण, पैगंबर साहेब आणि अंतिम निर्णय दिन. हे इस्लामचे पाच आधार आहेत, ते मी मानत नाही. मी मानत नाही, एवढं तुम्हाला मान्य असणं ठीक आहे. पण असं मान्य असण्याचा माझा अधिकार तुम्हाला मान्य आहे का? हे तुम्ही मला सांगा.’ या प्रश्नाचं उत्तर नरहर कुरुंदकरांना माहित होतं. या प्रश्नाचं उत्तर ते ज्यांच्या समोर बोलत होते त्या मुस्लीम श्रोतृ समाजालाही माहित होतं. पण त्या प्रश्नाचं उत्तर हिंदू समाजाला माहित नाही. मुसलमान नसणे ही एक गोष्ट, मुस्लीम नसण्याचा अधिकार आपला, मान्य करतात का मुसलमान ही दुसरी गोष्ट.


नरहर कुरुंदकर त्यांच्या पुढच्या भाषणात म्हणतात – समाजवादी विचारवंत आहेत, त्यांचं ते पुस्तकही मी आणलं आहे, जिज्ञासूंना मी दाखवू शकतो. नरहर कुरुंदकर म्हणतात – ‘मी मुसलमान नाही, मी तुमचा धर्म मानत नाही. जो काफिर आहे तो नरकात जाणार ही तुमची श्रद्धा मी मानत नाही. अशी श्रद्धा मान्य करण्याचा माझा अधिकार मुस्लीम देशात मला नाही. नाही म्हणजे काय, मी जर असं म्हटलो तर माझं डोकं फोडण्याचा अधिकार तेथील राजसत्तेनेच मुसलमानांना दिला आहे, पाकिस्तानात दिला आहे, बंगला देशात दिला आहे, अजून सौदी अरेबिया वगैरे सर्व मुस्लीम देशात दिलेला आहे. आणि थे जर मी असं बोललो तर माझं डोकं फोडण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारता. आम्ही डोक्याला कफन बांधूनच फिरतो असं तुम्ही म्हणता. त्यामुळे तुमच्याशी या विषयावर बोलण्यात काही अर्थ आहे का?’ अशा प्रकारचा प्रश्न मुसलमानांना कुरुंदकरांनी विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर मुसलमानांना माहित होतं, हिंदूंना माहित नाही ही माझी खंत आहे. इस्लामनुसार या अल्लाहच्या पृथ्वीवर जगण्याचं स्वातंत्र्य हिंदूंना नाही. नाही म्हणजे, तुम्ही आता जगतायत. तुम्ही जगतायत हे मान्य करणं वेगळं, पण जगण्याचा अधिकार मान्य करणं वेगळं. इस्लामनुसार जो मनुष्य इस्लामच्या पाच तत्त्वांवर श्रद्धा ठेवत नाही, रोजा, नमाज, जकात करत नाही त्याला निश्चितपणे नरक आहे. धर्माचं स्वातंत्र्य असणं वेगळं, की स्वातंत्र्य आहे तुला, पण नंतर नरक आहे, ही शिक्षाही तुमच्या स्वातंत्र्यात  समाविष्ट आहे. चोरी करायचं स्वातंत्र्य आहे, पण चोरी केल्यानंतर तुम्हाला कायदा जी शिक्षा देईल ती त्या स्वातंत्र्याचंच अनुकृत्य आहे. तसचं इस्लाम धर्मानुसार मुसलमान न राहण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु जर तुम्ही मुसलमान नसाल तर तुम्हाला नरकात ज्या काही शिक्षा मिळतील, अंगावर उकळतं तेल टाकलं जाईल, त्याचे जबाबदार तुम्ही स्वतःच. कुराणातल्या आयती आहेत! अशा प्रकारच्या इस्लामचं आव्हान आपल्या तोंडासमोर उभं आहे.


आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी सद्दाम हुसेनला ठार मारल्यानंतर बंगलोर मध्ये मोठी दंगल झाली. बंगलोर मध्ये जी दंगल झाली त्या दंगली मध्ये भारतात वाहनांची नासधूस तोडफोड करण्यात आली. आता तसं म्हणता आमचं काही देणं घेणं नव्हतं. तिथे अमेरिकेने सद्दाम हुसेनला मारलं. त्यात भारत सरकार सहभागी नव्हतं, इथले हिंदू सहभागी नव्हते. पण मी कधी एक इंग्रजी गोष्ट वाचली होती – पंचिंग बॅग. एका कारखानदाराने ----- आपल्या घराबाहेर  पंचिंग बग ठेवल्या होत्या. कामगार चिडले की जाऊन त्या पंचिंग बगला मारायचं. मग थोडा राग कमी होईल. त्या मालकावर जो राग आलेला असेल त्या कामगारांना, तो त्या पंचिंग बगवर ते कामगार काढत असत. या हिंदूंची पंचिंग बग झाली आहे. मुसलमानांना कुणाचाही राग आला की इथे तोडफोड करायची. काय संबंध होता इराक इराणमध्ये युद्ध चालू आहे आणि भारतात तोडफोड करण्याचा? 

ही जी मुस्लीम एकता आहे, हा जो जागतिक-विश्व-मुस्लीम बंधुभाव आहे, त्याला इस्लाममध्ये उम्मा म्हणजे इस्लामिक बंधुत्त्व असं म्हणतात.



या उम्माविषयी बोलतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर , पुरोगामी विचारवंत, त्यांना हिंदू धर्माविषयी काहीही प्रेम नाही, त्यांना इस्लामविषयी बिलकुल राग नाही, त्यांना मुसलमानांची बिलकुल चीड नाही, ते डॉ. आंबेडकर, याची तटस्थ समीक्षा करतांना ‘Pakistan OR Partition of India’  या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात पान नं २९४ ते २९६ वर असं म्हणतात, ‘सारं जग, या साऱ्या जगाची वाटणी इस्लामने दोन भागात केली आहे – दार-उल-हरब आणि दार-उल-इस्लाम. दार-उल-हरब म्हणजे War land, युद्धभूमी. दार-उल-इस्लाम म्हणजे शांतता-भूमी, Islamic Peace.  इस्लाम म्हणजे शांतता.’ जो मुस्लीम होईल त्याच्यासाठी शांतता, जो गैरमुसलमान आहे, मुसलमान नाही, जो श्रद्धाहीन    काफर आहे, त्या काफरांचं मृत्यूनंतरचं स्थान निश्चितपणे नरक आहे, याच्यात कुठलाही वाद नाही. कुठल्याही मुस्लीम धर्म पंडितला जाऊन विचारा- काफरांना मृत्युनंतर काय? आम्हाला मृत्युनंतर काय? अतिशय उघडपणे तुम्हाला सांगतील- तुम्हाला मृत्युनंतर उकळत्या तेलाचा अग्नी आहे. बघा आता विचार करा. सत्यधर्म एकच आहे, तो अल्लाहने पाठविलेला आहे, अल्लाहने त्याच्या प्रेषितांना जगातल्या एकमेव सत्यधर्मासह  पाठविलेला आहे. तो सत्यधर्म पाठविल्यामुळे अनेकेश्वरवाद्यांना, मर्तीपूजकांना कितीही वाईट वाटलं तरी काही हरकत नाही, अशा कुराणातल्या आयती आहेत. इस्लाम हे तुमच्या समोरचं आव्हान आहे. ते आव्हान हिंदुत्त्ववाद्यांना, हिंदूंना अजूनही नीटपणे समजलेलं नाही.  







आत्ताच एक सच्छर कमिटीचा अहवाल प्रसिद्ध झाला. मुस्लिमांचं ठीक आहे, ते त्यांचा धर्म पळताहेत. त्या सच्छर कमिटीच्या अहवालामध्ये तीन भाग आहेत. पहिला भाग- त्यांनी मुसलमानांचे इंटरव्ह्यू घेतलेत की, मुसलमानांच्या मागण्या काय आहेत. दुसरा भाग- सांख्यिकी डाटा आहे सगळा. आणि तिसऱ्या भागात त्यांनी काही शिफारसी केल्यात की, मुस्लीम हितासाठी काय करायला पाहिजे. पहिला जो भाग आहे, त्याच्यामध्ये मुस्लिमांच्या मागण्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये मुस्लिमांची एक लक्षणीय मागणी आहे, एकमुखाने केलेली मागणी आहे – ते असं म्हणतात की जे मुस्लीमबहुल भाग आहेत, त्या मुस्लीमबहुल भागामधला एस. सी., एस. टी. चा कोटा काढून टाका. म्हणजे ज्या भागात मुसलमान बहुसंख्य असतात, त्या भागात ज्या राखीव जागा निवडणुकीत लावलेल्या आहेत, त्या काढून टाका. नाहीतर आम्हाला हिंदू उमेदवारांना निवडून द्यावं लागतं. दलित-मुस्लीम भाई-भाईच्या घोषणा एकीकडे द्यायच्या, दुसरीकडे त्यांना उमेदवार मात्र मुसलमान पाहिजे. हे मुस्लीम मन कशातून बनलं आहे, याचा आपण एकदा विचार करायची वेळ आहे. दुसरा भाग सांख्यिकीचा आहे. संख्याशास्त्रीय माहिती. त्या संख्याशास्त्रीय माहितीमध्ये त्यांनी सगळी आकडेवारी दिलेली आहे की मग किती टक्के शिक्षण आहे, किती टक्के रोजगार आहे, किती टक्के नोकऱ्या आहेत. या सगळ्या संख्याशास्त्रीय माहितीमध्ये एक कोटी बंगलादेशी included  आहेत. म्हणजे बंगला देश मधल्या सरकारच्या नतद्रष्टेपणामुळे बंगला देशमधले मुसलमान दरिद्री आहेत, ते भारतात येतात, आणि ते भारतात आल्यावर ते का दरिद्री आहेत याच्यासाठी हिंदूंनी सहन करायचं आहे. हिंदूंनी त्यांच्यासाठी आपले हक्क सोडायचे आहेत. तिसरा भाग शिफारसींचा आहे. शिफारसींमध्ये असं म्हणतात, मुळात हा संख्याशास्त्रीय डाटाच चुकलेला आहेत. एक कोटी बांगला देशींसकट संख्याशास्त्रीय Statistical Analysis झालेलं आहे. तिसरा भाग कर्जांचा आहे. Economical and Political Weekly नावाचं एक मासिक असतं. त्याच्या गेल्या अंकामध्ये ही सारी माहिती आलेली आहे. तिसरा भाग कर्जांचा, त्यांच्या शिफारसींचा आहे. शिफारस अशी आहे की मुसलमानांना बँका कर्ज देत नाहीत, तेव्हा त्यांना कर्ज मिळवून द्या. अशा प्रकारे मुसलमानांना कर्ज दिली पाहिजेत, म्हणून एक शिफारस करण्यात आली आहे. बँका मुसलमानांना का कर्ज देत नसतील? बँकांचा उद्देश सरळ असतो. बँका काही जातीयवादी वगैरे नसतात. जो कर्ज फेडतो त्याला बँका कर्ज देतात.  मुसलमानांकडून कर्ज वसूल करण्याची हिम्मत नसल्यामुळे बँका पैसे देत नाही, मुसलमानांना कर्ज देत नाहीत. ह्याचा भार हिंदुंवरच पडणार आहे, जर का सक्ती केली गेली बँकांना. वसुली झाली नाही, तर भार कोणी सोसायचा तो? म्हणजे वाढेल ते व्याज कोणी सोसायचं? ते हिंदूंनी सोसायचं! म्हणजे त्या औरंगजेबाच्या काळामध्ये जिझिया लावला होता, की तुम्ही हिंदू आहात, आणि हिंदू असणं हे एक पाप आहे, महापाप आहे, तुम्ही काफर आहात, आणि काफर असल्यामुळे इस्लामी राजसत्तेला जिझिया द्या. अशा प्रकारचा जिझिया स्वतंत्र भारतातही आपल्यावर थोड्या फार फरकाने लादला जातो आहे. म्हणून हिंदुत्त्वाची मांडणी आवश्यक आहे, असं मला वाटतं.




मी एक कुत्रं पाळलं आहे. नाव आहे मिनिमी. अतिशय छोटं कुत्रं आहे. ल्हासा अक्सो जातीचं कुत्रं आहे. (२२.५२) त्याचे फार केस असतात, म्हणजे शेडा कुठला, बुडखा कुठला ते कळत नाही. डोळ्यांवर केस येतात, मागनं केस येतात. आणि मग ते त्याला भुंकायचं जरी असलं तरी त्याला दिसत नाही. मग ते असं डोकं वर करतं आणि करतं - भू. छोटसं कुत्रं, अकरा इंच. मी घरी आलो की ते अकरा इंचाचं कुत्रं नाचत, पळत येतं, कंबर हलवत येतं. आणि अशी ती माझ्या माझ्यासमोर शेपूट हलवते. लांगुलचालन या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे, शेपूट हलविणे. लांगुल म्हणजे शेपूट, आणि चालन म्हणजे हलविणे. मी पाच फूट अकरा इंच, ही मिनिमी अकरा इंचाची. तिला मी रोज खायला प्यायला देतो, ती माझ्यासमोर लांगुलचालन करते, मी समजू शकतो. पण ऐशी कोटीचा हिंदू समाज १२ -१३ टक्के मुसलमानांसमोर कसं लांगुलचालन करतो, हे कसं समजणार? हे कसं समजून घेणार? हे समजून घ्यायचा एक प्रयत्न व्हावा म्हणून मला हिंदुत्त्व विचारांची मांडणी आवश्यक आहे असं वाटतं. हिंदूंचे स्वतःचे म्हणून काही प्रश्न आहेत. ख्रिश्चन Conversion चा प्रश्न. आता इथे दापोडीमध्ये लाखालाखाच्या सभा भरताहेत. येशूचं पाणी वाटून, त्याचं व्हिडीओ शूटिंग घेतलेलं आहे आम्ही, येशूचं पाणी प्या सगळे रोग बरे होतील; येशूचं पाणी प्या आंधळ्याला डोळे येतील; लंगडा चलने लगेगा. माईक वरून सांगितलं जातं. आणि या अंधश्रद्धा पसरवून लाख लोकांच्या सभा दापोडी-बोपोडी कडे होतायत. हे हिंदू समाजावरचं आक्रमण आहे. आणि हे आक्रमण हिंदू समाजासमोर असल्यामुळे - प्रामुख्याने ते इस्लाम आणि ख्रिश्चनिटीचं आहे, ते अंधश्रद्धांच्या जोरावर आहे. तर भारतात मुस्लीम आणि ख्रिश्चन हे सोडून जे इतर भारतीय आहेत, त्यांना मी हिंदू असं म्हणतो. जे काफर आहेत त्यांना मी हिंदू असं म्हणतो. जे हिदन आहेत, त्यांना मी हिंदू असं म्हणतो. सावरकरही त्यांनाच हिंदू म्हणतात. एका चलाख व्याख्येत सावरकर म्हणतात, आसिंधुसिंधूपर्यंता, यस्य भारत भूमिका । पितृभूः पुण्यभूश्चैव स वै ‘हिंदु’रिति स्मृतः ।।  म्हणजे ज्याची पितृभूमी आणि मुख्यतः पुण्यभूमी किंवा Holy Land, त्यांची मंदिरे, गुरुद्वारा, बुद्धाची गया, जैनांची मंदिरे ही सगळी भारतापुरतीच आहेत, बाहेर नाहीत इस्लामसारख्या श्रद्धा. हे सगळे हिंदू आहेत. मी त्यांना हिंदू म्हणतो, सावरकर त्यांना हिंदू म्हणतात. प्रश्न असा आहे, ते स्वतःला हिंदू म्हणतात का? भाषणाचा पहिला भाग मी इथे संपवतो. heहिंदुत्त्वाच्या मांडणीची गरज काय आहे हा भाग मी इथे संपवतो.







भाग २प्रस्थापित हिंदूत्त्वाची मांडणी








भाषणाच्या दुसऱ्या भागाकडे येऊ. भाषणाचा दुसरा भाग आहे – प्रस्थापित हिंदूत्त्वाची मांडणी. हिंदुत्त्वाची प्रस्थापित मांडणी काय आहे? आता हिंदुत्त्ववादी लोक काय बोलतात हा दुसरा भाग आहे. पहिला भाग मी एका प्रश्नाने संपवला होता, मी त्यांना हिंदू म्हणतो, ते स्वतःला हिंदू म्हणतात का? उत्तर आहे – नाही. हिंदू या शब्दाविषयी, हिंदूंच्याच मनात अतिशय चीड आहे, राग आहे. पहिला भाग हिंदुत्त्व ज्यांना आवडला होता, दुसरा भाग त्यांना अजिबात आवडणार नाही. हिंदू स्वतःला हिंदू म्हणत नाहीत. कारण काय? हिंदू या शब्दाविषयी हिंदूंच्याच मनात इतका राग का? याचा शांत डोक्याने विचार करायची वेळ आहे.


आंबेडकर म्हणाले होते, हिंदू म्हणजे काय – तर किराण्याचं दुकान. किराण्याच्या दुकानात आपण गेलो; कांदे मागितले कांदे मिळतील; बटाटे मागितले बटाटे मिळतील; तांदूळ मागितले तांदूळ मिळतील; दूध मागितलं दूध मिळेल; ब्रेड मागितला ब्रेड मिळेल. किराणा मागून बघा; किराणा मिळणार नाही. किराण्याच्या दुकानात किराणा सोडून सगळं मिळतंय. हिंदूंच्या बाजारात हिंदू सोडून सगळं मिळतंय. मराठे आहेत, ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत, दलित आहेत, द्रविड आहेत, उत्तर प्रदेशी आहेत, त्यांचे त्यांचे संघ आहेत. कन्नडचा भाषावाद आहे, मराठीचा भाषावाद आहे, आंध्र प्रदेशची तेलंगण समिती आहे, एकमेकांचं किराण्याचं दुकान आहे. हिंदू सोडून प्रत्येक गोष्ट या दुकानात मिळते, याचं कारण काय? ह्याला जबाबदार कोण? आणि या प्रश्नावरचं माझं उत्तर असं आहे की ह्याला प्रस्थापित हिंदुत्त्ववादीच जबाबदार आहेत. 



एक चूक हिंदुत्त्ववाद्यांकडून कायम केली जाते. जर का मुसलमानांचा इस्लाम आहे, तर मग आमचाही हिंदू धर्म आहे. ते कुराण घेऊन येतात; मग आम्ही पण काहीतरी घेऊनच जायला पाहिजे. मग कधी गीता शोधली जाते, कधी मनुस्मृती शोधली जाते, कधी वेद शोधले जातात किंवा अजून कुठलं तरी धर्मग्रंथाचं पुस्तक शोधलं जातं. आणि जर त्यांचा इस्लाम असेल तर मग आमच्या हिंदू धर्म की जय! ही घोषणा एवढ्यावरच थांबत नाही. ही घोषणा थोडी आणखी पुढे जाते, आणि ती घोषणा अशी बनते – आर्य, सनातन, हिंदू धर्म की जय! माझं असं मत आहे, की हिंदूंच्या विघटनाला आणि हिंदूंच्या किराणा बाजाराच्या दुकानाला या घोषणा कारणीभूत आहेत. आर्य, सनातन, वैदिक हिंदू धर्म की जय, म्हणजे काय? आर्य या शब्दासरशी किती लोकांचा विरोध आहे? पूर्ण द्रविड, खालची चळवळ घ्या. पूर्ण तमिळनाडूमध्ये रामास्वामी पेरियारनी एवढी मोठी जी दलित चळवळ उभारली ती फक्त आर्य या शब्दाच्या विरोधात उभारली.  जर तुम्ही आर्य सनातन वैदिक केलं, तर तामिळनाडू गेला. तिथं हिंदुत्त्ववादी कधीही पाय मारू शकत नाहीत. अर्थ तुम्ही काहीही काढा, त्यांना तो कधीही मान्य होणार नाही. तुम्ही आर्य म्हणजे संस्कृती आहे म्हणा, कृण्वन्तो विश्वमार्यं म्हणा, काहीही म्हणा; ते द्रविडांना कधीही मान्य होऊ शकत नाही. द्रविड चळवळीला कधीही मान्य होऊ शकत नाही. त्यांची तशी मानसिकताच बनलेली आहे. सनातन म्हटल की मग जैनांचं काय? बौद्धांचं काय? शिखांचं काय? ते तुमच्या सनातन धर्माचे कधीच नव्हते, त्यामुळे तुमच्या सनातन या एकाच शब्दासरशी जैन, बौद्ध, शीख हिंदूंच्या चळवळीतून तुटून पडतात. पहिल्या आर्य शब्दाने द्रविड जातात; सनातन शब्दाने जैन, बौद्ध, शीख जातात. वैदिक म्हटलं की मोठीच भानगड. 


लोकमान्य टिळकांचाच फोटो लावलेला आहे; ते वंदनीय आहेत; पण अनुकरणीय असलेच पाहिजेत असं काही नाही. लोकमान्य टिळकांनी हिंदूची व्याख्या करतांना – साधनानां अनेकता; परत प्रामाण्य वेदांपाशी जे असेल, प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु; अशी केलेली होती. परत ९८% हिंदूंनी वेद कधी पाहिलेले नाहीत. ९९% लोकांनी ते कधीही वाचलेले नाहीत. ९९.९९% लोकांना वेद हा आपला धर्मग्रंथ आहे हेच माहित नाही. अशा वेळी वैदिक या शब्दाच्या उच्च घोष णाबाजिने काय होतं?  ज्या ज्या वैदिक स्कूल आहेत; इथे घैसास वैदिक स्कूल आहे, बऱ्याच वैदिक पाठशाळा आहेत; तिथे ब्राह्मण सोडून बाकी कुठल्याही जातीला प्रवेश नाही. एखादा दुसरा तुरळक अपवाद सोडून द्या.  In general पूर्ण भारतात ही वैदिक या शब्दाची अवस्था आहे. वैदिक म्हटलं की ९९.९९% हिंदूं यातून बाहेर गेलेल आहेत. 


आर्य सनातन वैदिक हिंदुधर्म की जय; ही हिंदूंच्या विघटनाची घोषणा आहे. ही हिंदूंना तोडणारी घोषणा आहे. हिंदूंना जोडणारी घोषणा नाही. आणि आजच्या हिंदुत्त्वाची सगळी मांडणी अशाच प्रकारे प्रतिगामी आहे, अशाच प्रकारे मध्ययुगीन आहे. त्यामुळे हिंदुस्थानात हिंदुत्त्ववादीच अल्पसंख्यांक आहेत. बाकी कुठल्याही दशात हे शक्य नाही. हिंदुत्त्ववाद्यांच्या पराभूत, मध्ययुगीन, प्रतिगामी मानसिकतेमुळे हिंदुस्थानात हिंदुत्त्ववादी अल्पसंख्यांक आहेत. हिंदू बहुसंख्य आहेत; हिंदू ८०% आहेत; पण हिंदुत्त्ववाद्यांचं सरकार कुठेही बसू शकत नाही. ते हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर तर बसूच शकत नाही. फार तर माधवा सारखी वेगळ्या जातीपातींची मोट -------- बांधून उभारता येईल. किंवा वेगळ्या प्रादेशिक अस्मितेवर उभारता येईल. हिंदू म्हणून हिंदुस्थानात हिंदूंचं सरकार बसूच शकत नाही; ही वास्तविकता आहे. हिंदुत्त्ववादी अल्पसंख्यांक आहेत; कारण हिंदुत्त्वाची मांडणी चुकलेली आहे. हिंदुत्त्वाची मांडणी कशी चुकलेली आहे; हे आपण थोडक्यात बघू आणि मग हिंदुत्त्वाच्या फेरमांडणीकडे वळू.


आताच मुस्लिमांची लोकसंख्या वाढते आहे, वाढते आहे, म्हणून बराच गाजावाजा करण्यात आला. मुस्लिमांची लोकसंख्या वाढते आहे, हे एक सत्य आहे. आणि हिंदूंपेक्षा जास्त वेगाने वाढते आहे हेही एक सत्य आहे. ती काही भागांमध्ये अधिक  Concentrated आहे, हेही एक सत्य आहे. ह्याच्यावर उत्तर काय दिले आहे? बरं म्हणजे जे धोके पुढचे दाखविले गेले, की एक ५०-६० वर्षात अखंड भारतात म्हणजे भारत, पाकिस्तान, बंगला देश धरून; मुस्लीम बहुसंख्य होतील. किंवा अडीचशे तीनशे वर्षांनी आताच्याच भारतात मुस्लीम बहुसंख्य होण्याचा धोका आहे. अडीचशे तीनशे जाऊ दे. पण काही जिल्ह्यांमध्ये मुस्लीम लोकसंख्य वाढते आहे. आणि तिथे फाळणीची मागणी जोर धरू शकते. आताच गिलानीचं पाहिलं आपण; तलवारी घेऊनच निघाला होता, टीव्हीवर. तर अशी भीती घातली गेली, ठीक आहे. ह्याच्यावर हिंदुत्त्ववाद्यांचं उत्तर काय होतं? हिंदुत्त्ववादी म्हटले, तुम्ही पण लोकसंख्या वाढवा. म्हणजे मुसलमान चुका करताहेत्त, ते गटारात खेळताहेत, चिखलात उड्या मारताहेत. मग गटारात खेळण्याचा हक्क दोघांचा. ते गटारात उड्या मारताहेत मग आम्हीही गटारात उड्या मारणार. ते त्यांची लोकसंख्या वाढवताहेत; मग आम्हीही लोकसंख्या वाढवणार. ते चुका करताहेत मग आम्हीही चुका करणार. म्हणजे चुका करायचा हक्क दोघांचा. अशी हिंदुत्त्वाची मांडणी आहे. सरसकट सर्व हिंदुत्त्ववाद्यांची ही भूमिका आहे.






काय होईल हिंदूंची लोकसंख्या वाढवून? बरं हे practical तरी आहे का? एकीकडे ब्रह्मचर्याचं स्तोम करायचं. दुसरीकडे म्हणायचं लोकसंख्या पण वाढवा. कसं शक्य आहे दोन्ही एकावेळी? लोकसंख्या वाढवून हिंदूंसमोरचे कुठले प्रश्न सुटणार आहेत? आताच आपल्या पुणेकरांना अनुभव असेल; भारनियमनाने बेजार आहेत. एक वर्षापूर्वी माझ्या घरून इथे यायला दहा मिनिटे लागायची, आज वीस मिनिटे लागताहेत. रस्ते पुरत नाहीत वाहनांना. वीज इथल्या माणसांना पुरत नाहीये. रस्ते, वीज, पाणी यासारख्या मुलभूत सुविधा आज आपल्या देशाकडे अपुऱ्या पडताहेत याच लोकसंख्येला. जर अशीच लोकसंख्या वाढवली; तर काहीच मिळणार नाही; वाढलेले हिंदू एकमेकातच लढून मरतील, वीज आणि पाण्यासाठी ! Quality नको तर quantity तरी असेल; ती quantity काय करायची आहे?  ती सगळी quantity अंतर्गतच लढेल. यादव्या माजतील; बेरोजगारीत. अशा प्रकारची भूमिका हिंदुत्त्ववाद्यांकडून घेतली जाते.


शंकराचार्यांचं प्रकरण झालं. शंकराचार्यांच्या वेळी, जर ते निर्दोष असतील तर सुटलेच पाहिजेत; प्रश्नच नाही. प्रश्न न्यायालयाचा होता. ते आमचे शंकराचार्य आहेत, म्हणजे काहीतरी महान आहेत कायद्यापेक्षा; त्यामुळे त्यांना सोडा; मग उद्या मुसलमानांनी जर त्यांच्या इमामाला सोडा अशी मागणी केली तर तुम्ही त्याला कोणत्या बेसवर विरोध करणार आहात? अशा प्रकारच्या प्रतिगामी मागण्या, म्हणजे मुसलमान ज्या चुका करतात, त्या चुका आम्ही पण करणार; मुसलमान जो मूर्खपणा करतात, तो मूर्खपणा आम्ही पण करणार; अशा प्रकारची मांडणी हिंदूंच्या प्रमुखांकडून होत असत. मंदिर अधिग्रहण  कायद्याचं हेच झालं. त्यामध्ये मशिदी आणि चर्चेस आले पाहिजेत, हे एकदम बरोबर. पण मंदिरे अधिग्रहण न करून काय होणार आहे? ही मंदिरे हिंदूंचे कोणते प्रश्न सोडवताहेत? मस्त  झाल्या यांच्याकडे पालख्या. सोन्याच्या रथातून शंकराचार्य फिरतात. शिर्डीच्या साईबाबांना सोन्याचं सिंहासन देत होते. कुठली सामाजिक अशी कामं केली आहेत ह्यांनी? जर का ते सरकार दरबारी गेलं, तर असं काही नाही की त्याचा सदुपयोग होईल. पण एक शक्यता तर राहते ना की काहीतरी परिस्थितीत बदल होऊ शकेल. म्हणजे मुस्लिमांची का नाहीत? मग आमचीही करू नका, आणि त्यांचीही करू नका. अशा प्रकारच्या भूमिका या प्रतिगामी आहेत, त्या इतर लोक चुका करतात, म्हणून आम्हीही करणार अशा प्रकारच्या आहेत. अशा प्रकारची भूमिका हिंदुत्त्ववाद्यांकडून घेतली जाते.


अगदी recent, शेवटचं. काल बालगंधर्व कलामंदिरामध्ये एक अतिशय सुदर प्रदर्शन भरलेलं होतं. हे प्रदर्शन काश्मिरी पंडितांच्या डॉ. शृंगु यांनी भरवलेलं होतं. काश्मिरी पंडितांचे किती हाल झाले, त्यांना किती छळ सोसावा लागला, त्यांना कशा प्रकारे विस्थापित करण्यात आलं, कशाप्रकारे त्यांच्याविरुद्ध भावना भडकविण्यासाठी काश्मिरात जिहादी पोस्टर्स लागलीत, कशा प्रकारे त्यांना कॉर्नर करून काश्मीरमधून हाकलून दिलं गेलं, ह्याचं सगळ्याचं सचित्र प्रदर्शन तिथे मांडलेलं होतं. आता संपलं, काल शेवटचा दिवस होता. ते सगळं प्रदर्शन फिरून आलो की मग सगळ्यात शेवटचा स्टल, तो सगळ्यात छान होता. तो शेवटचा स्टल होता हिंदू जनजागृती समितीचा. पुस्तकं होती - श्राद्ध कसे करावे, हात कसे जोडावेत, पूजा कशी करावी, मंत्र-जपजाप्य-होमहवन हे कसं करावं; अशा प्रकारच्या पुस्तकांचा स्टल सगळ्यात शेवटी. म्हणजे हिंदूंनी हे सगळं बघायचं, मग शेवटी काय करायचं – श्राद्ध. दुसरं करणार तरी काय? श्राद्धच घालायला पाहिजे मेलेल्यांचं. एक सनातन धर्माचे सद्गृहस्थ, माझ्याकडे आले, त्यांचा पेपरही घेतो मी कधी कधी. मधली दोन पानं भूत बोलत असतं, देव बोलत, शिवाजी महाराज बोलतात, स्वर्गातून. सावरकर स्वर्गातून बोलतात ह्यांच्याशी, पेपरमध्ये छापतात. काय हिंदू हित होणार आहे? हिंदुंचं काय भलं होणर आहे? कुठला शहाणपणा हिंदूंना ----- शिकायला मिळणार आहे? आणि हिंदूंच्या कुठल्या म्हणजे बाहेरच्या अन्यायांचं परिमार्जन होणार आहे? अशा प्रकारे हिंदुत्त्वाची मांडणी आहे. 







आणि मी काय म्हणतो, फक्त गाढवपणाबद्दल बोलत नाही; माझा आक्षेप हिंदूंच्या सनातन धर्मावरच आहे, वेदांवर आहे, मनुस्मृतीवर आहे. वेदांमध्ये पुरुषसुक्त आहे, त्यात विषमता आहे. ‘ब्राह्मणोsस्य मुखमासीत, बाहुराजन्य कृतः; आणि शेवटी पदाभ्यां शूद्रोsजायत. ही बेसिक विषमता आहे. याचं तुम्ही कुठेही समर्थन करू शकत नाहीत. मग नाही, देवाच्या मूर्तीला पायालाच हात लावतो ना. मग तसं राष्ट्रपुरुषाच्या पायाशी कधी काही भेद नाही, एक दोन दिवस ब्राह्मणाला पायाशी ठेवा, मग आम्ही मानू. अशा प्रकारची विषमता ही ऋग्वेदातल्या दहाव्या मंडलातल्या १२ व्या ऋचेत आहे. मनुस्मृतीत आहे. मनुस्मृतीतला आठवा अध्याय वाचून बघा; जिकडे तिकडे मनूचं समर्थन करण्याची ज्यांना हौस येते. सगळी विषमता आहे. कोण कुणाला कशी शिक्षा द्यावी; ब्राह्मणाच्या शेजारी शद्र बसला तर त्याच्या कमरेला डाग द्या - अध्याय ८-२८०. हा सनातन धर्म आहे. श्रुती-स्मृती पुराणोक्त हाच सनातन धर्म आहे. आणि माझा बेसिक आक्षेपच त्याच्यावर आहे. त्या धर्माचा जयजयकार करून हिंदू कधीही संघटीत होऊ शकत नाहीत. हिंदूंना काहीही उत्तरं मिळू शकत नाहीत. आणि नेमकी अशाच प्रकारची सनातनी मागणी हिंदुत्त्ववाद्यांकडून केली जाते. अशाच प्रकारच्या प्रतिगामी भूमिका हिंदुत्त्ववाद्यांकडून घेतल्या जातात. त्यामुळे हिंदुस्थानात हिंदुत्त्ववादी अल्पसंख्यांक आहेत. त्यामुळे हिंदुस्थानात हिंदुत्त्ववादी कधीही सत्ता कमवू शकले नाहीत, मिळवू शकले नाहीत. आणि ते ठीक आहे, सगळं जे आहे ते आहे. सावरकर म्हणतातच – वंदनीय, पूजनीय, आदरणीय; पण अनुकरणीय नाही; आचरणीय नाही.






 पण आता करतोय काय आपण? राजस्थानमधल्या विधानसभेत भाजपने मनूचा पुतळा बांधलेला आहे. सरसंघचालकांची स्टेटमेंटस् – जातीव्यवस्थेतच आरक्षण आहे. कसली आरक्षणं? काय, गावकुसाबाहेर रहायची? विहिरीवर पाणी न भरायची? का सवर्णांची विष्ठा डोक्यावर उचलून न्यायची? कसली, आरक्षणं कसली आहेत? जातीव्यवस्थेत कुठली आरक्षणं आहेत? अशा प्रकारे हिंदुत्त्वाचं विघटन करायचं, हिंदू समाज छिन्नविच्छिन्न करायचा, असे उद्योग सगळे हिंदुत्त्ववादी दररोज उठून करत असतात. आणि ही हिंदुत्त्ववाद्यांची प्रस्थापित मांडणी आहे. चुकीची आहे, असं मला वाटतं.




आपण भाषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊ. एकदा हिंदुराष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय ते ठरवावं. झाडं, नद्या, डोंगर, किल्ले, चित्रं, नकाशे ह्याला हिंदुराष्ट्रवाद म्हणतात का? मी ह्याला हिंदुराष्ट्र म्हणत नाही. या भारतात राहणारे हिंदू लोक की ज्यांचे स्वतःचे असे काही प्रश्न आहेत, ज्यांच्या स्वतःवर अशी काही आक्रमणं आहेत, त्या लोकांना मी हिंदू म्हणतो, त्या समाजाला मी हिंदू म्हणतो. हिंदू ह एक प्रादेशिक शब्द आहे, समाज आहे. आणि असा हा समाज, ऐशी कोटींचा; तो अजून राष्ट्रच बनलेला नाही. एक राष्ट्र म्हणजे काय? अंगाला  टाचणी टोचली की डोळ्यातून टचकन पाणी यायला पाहिजे. कारण शरीराचा  आणि डोळ्याचा काही संबंध नसतो ना, पण त्या शरीरातला आत्मा एक असतो. त्या शरीरातला जीव एक असतो. हिंदूंच्या हाता पोटाला  टाचण्या टोचून बघा. दोन चार हिंदू मरू देत, कुठे काय फरक पडतो का त्यांना? कितीही मोडतोड  होऊ दे तरी काही फरक पडतो का त्यांना? 

आताच जत तालुक्यामध्ये, सांगलीत महाराष्ट्रात अजूनही अस्पृश्यता पाळली जाते. दलितांना वेगळं पाणी आहे. दलितांना कपबश्या वेगळ्या आहेत. हा हिंदू समाजाचाच घटक, आज त्याला मंदिरात प्रवेश दिला जात नाहीये, जत तालुक्यात. आमच्या संस्थेचे काही सदस्य जाऊन त्यांना रिपोर्ट करून आले आहेत. ---  जत तालुक्यात आजही दलितांना पाणी दिलं जात नाही.  


 टाचणी टोचली तरीही हिंदू समाज खडबडून जागा होत नाही. त्याबाबतीत त्याला  आपण काही करावं असं वाटत नाही, ज्यांना वाटतं त्यांना राष्ट्र म्हणतात. त्यांना एक देश म्हणतात. हिंदू समाज कुठे आहें राष्ट्र? हिंदू हा तर समाजसुद्धा राहिलेला नाही. त्याला समाज तरी म्हणावं की नुसती लोकं म्हणावं अशी शक्यता मला वाटते. का म्हणावं त्यांना राष्ट्र ? 


काय राष्ट्राचा गुणधर्म दाखवितात? एक दोन इंग्लिश लोकं मरू देत, अख्खा इंग्लंड चवताळून उठेल. अमेरिकेची एक ट्वीन टॉवर बिल्डींग पडली, अमेरिका उसळून उठली. २-४ तो तिकडे सद्दाम हुसेन मेला, इकडे भारतातले मुसलमान चवताळून उठतात. काय त्यांच्यात बंधुभाव आहे!


 हिंदु समाजाचे हित आणि सनातनी धार्मिकता यात निट फरक केला पाहिजे . या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अतिशय महत्वाचे आहेत . बाबासाहेब हिंदु राष्ट्र - सनातनी पणा यांचे विरोधक होते - त्याच वेळी ते हिंदु समाजाचे हिंतचितक होते . बाबासाहेबांचे विचार लक्षात घेतले तर फ़ेर्मांडणिचे आकलन अगदी सहज होईल .

हिंदुराष्ट्र जर या देशात खरोखरच निर्माण झाले तर ती या देशावरील खूप मोठी आपत्ती असेल यात शंकाच नाही. हिंदु काय म्हणतात याला महत्व नाही, हिंदुधर्मातील विचार हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा विध्वंस करणारे आहेत, त्यामुळेच ते लोकशाहीला पुरक नाहीत.म्हणून कोणतीही किमंत देवून हिंदुराष्ट्रास प्रतिबंध करायला हवा " Dr.B.R.Ambedkar.
Writings and Speeches Vol.8 'Pakistan and Partition of India ' page no.358

हा हिंदु राष्ट्राचा उल्लेख हि बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे .धार्मिक आधारावाचे (थिओक्रेटिक ) म्हणजे हिंदु कायद्यावर - स्म्रुतिंवर आधारलेले धर्म राष्ट्र हे -- समता आणि बंधुता यांचा विध्वंस करणारे आहेत असे बाबासाहेबांचे मत होते . परंतु फाळणी करून हिंदु बहुल भागाचे सेक्युलर - आधुनिक राष्ट्र बनवता येईल असा त्यांचा कयास होता . अखंड हिंदुस्थान हे धार्मिक मारामार्यांचे घर बनेल त्यामुळे पाकिस्तान वेगळे करावे . आणि हिंदुच्या भल्यासाठी खंडित भारत तयार करावा असा होरा दिसतो. फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. --

" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " 

समता आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला होता . त्यांनी सनातनी वृत्तीचा आयुष्यभर धिक्कार केला . मनुस्मृतीला काडी लावली . हिंदुच्या सनातन वैदिक धर्माचा त्याग केला . पण राजकीय दृष्ट्या त्यांना देशहिताची आणि हिंदुच्या राजकीय सामाजिक प्रगतीची चाड होती . धम्म स्वीकारापुर्वी एक वर्ष - बाबासाहेबांनी फ़ाळणिबद्दल देवाचे आभार मानले आहेत. परमेश्वर न मानणार्या बाबासाहेबांनी हलक्याश्या विनोदात लिहिलेले वाक्य अतिशय बोलके आहे . १९५५ सालीच बाबासाहेब आंबेडकर लिहितात कि -

" जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " 

(Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page 146 )


फाळणी झाल्यानंतर कालौघात तीन देश निर्माण झाले :

भारत : विकसित सशक्त एकसंघ आणी भारतीय धर्मांची बहुसंख्या असलेला सेक्युलर देश.
पाकिस्तान : युद्धग्रस्त मागास आणि मवाली देश . इस्लामी शरियत कायदा . लोकशाही नाही.
बांग्लादेश : भूकग्रस्त , दरिद्री, बकाल आणि धर्मांध संघटनांचे घाउक उत्पादन करणारा देश.


 मुसलमानांच्या जिहादची मला भीती वाटत नाही; ते ठीक आहे; त्याला कायदा आणि सुव्यवस्था बघेल. त्या आपण करायच्या गोष्टीच नाहीयेत. मुसलमानांच्या उम्मतची मला वाटते. त्यांचा तो बंधुभाव आहे, उम्मत आहे, जगभरचा मुसलमान जो एकवटलेला आहे; जगातले सोडा हो, भारतातले, महाराष्ट्रातल्या तरी हिंदूंमध्ये ती उम्मत आहे का? तो बंधुभाव आहे का? ते एकजीवत्त्व  आहे का? अंगाला  टाचणी टोचल्यावर हिंदूंच्या डोळ्यात पाणी येतं का? हिंदू लोक एक  राष्ट्र आहेत का? 








आणि अखंड हिंदुस्थान करा, अखंड हिंदुस्थान करके रहेंगे, सिंधू नदी परत आणू या, ह्याने काय होणारेय? या देशातला हिंदू समाजच अजून एक झालेला नाही. या १२-१३ टक्के मुसलमानांच्या समोरच तो शेपूट हलवत उभा आहे. तुम्ही हेsss मोठे भरपूर सार्‍या दुनियाभरचे मुसलमान एक करून करणार काय? भारत-पाकिस्तान-बंगला देश सगळे मुसलमान आणून आता करणार काय? अशा प्रकारे हिंदुत्त्वाची ही जी प्रस्थापित मांडणी आहे, ती मला चुकीची वाटते. 

राष्ट्र म्हणजे एकजीवत्त्व आहे. राष्ट्र म्हणजे जातीव्यवस्थेचं निर्दालन आहे. राष्ट्र म्हणजे जातीव्यवस्था गाडून, वर्णव्यवस्था सोडून सर्व हिंदू समाजाने एक होणं आहे, एकजीव होणं आहे, तसं हिंदूंना अजून जमलेलं नाही. जे जे हिंदुहिताच्या आड येईल, त्याला त्याला विरोध करणं म्हणजे हिंदूराष्ट्रवाद आहे. हिंदुहित, मी हिंदुत्त्ववादी आहे, त्याचा अर्थ मी हिंदुधर्मवादी आहे असा नाही. मी हिंदुत्त्ववादी आहे, याचा अर्थ मी हिंदुहितवादी आहे, हिंदू समाजाच्या हितवादी आहे. मग हिंदू समाजाच्या हिताच्या पक्षात जे असेल त्याचा मी समर्थक आहे, आणि हिताच्या पक्षात जे नसेल त्याचा मी समर्थक नाही. जर मनुस्मृतीमुळे, वर्णव्यवस्थेमुळे हिंदू समाजाचं हित होत नसेल, तर मी त्याचा विरोध करणार आहे. जर का हिंदुत्त्ववाद्यांच्या चुकीच्या आडमुठ्या भूमिकांमुळे हिंदू समाजाचं हित होत नसेल तर मी त्याचा विरोध करणार आहे.

ह्याला मी हिंदूंचा राष्ट्रवाद असं म्हणतो.   
कायदा करून हिंदुराश्ट्र बनवणे अतिशय घातक ठरणारे आहे . 





भाग ३ : हिंदुत्व विचाराची फेरमांडणी 

शेवटचा टप्पा फेरमांडणीचा आहे. फेरमांडणीसाठी मी बरोबर दहा मुद्दे काढले. पहिलं, फेर मांडणी कशी व्हायला पाहिजे? समता, ममता आणि बंधुता या तत्त्वांवर फेरमांडणी झाली पाहिजे. समता ही बेसिक अट. कुठल्याही प्रकारचं समर्थन चालणार नाही. कुठल्याही प्रकारचं वर्णव्यवस्थेचं, चातुर्वर्ण्याचं, सगळं अनुवंश वगैरे झूठ आहे. सावरकरांपासून लोकांनी लिहून ठेवलेलं आहे – हुशार माणसाचा मुलगा हुशार होतो, शूर माणसाचा मुलगा शूर होतो, या सगळ्या गाढवपणाच्या संकल्पना आहेत, अनुवंश हा आचरटपणा आहे. सावरकरांनी लिहून ठेवलेलं आहे, त्यात आपण अधिक खोलात शिरायला नको. जिज्ञासूंनी सावरकरांचेच लेख याच्यावरचे वाचावेत. अनुवंश हा आचरटपणा आहे. हापूसला जर पायरीचं कलम लावलं तरच ते अधिक चांगलं फळ देतं. पारशांचा वंश अंतर्गत लग्नं करून खलास व्हायच्या मार्गावर आला आहे. अनुवंश हा गाढवपणा आहे. आणि तो जातिव्यवस्थेचा एक वैज्ञानिक आधार म्हणून सांगितला जातो. जातीव्यवस्था तोडणं, समता, ममता आणि बंधुता यांच्यावर हिंदुत्त्वाची फेरमांडणी करणं असा हिंदुत्त्वाच्या फेरमांडणीचा पहिला मुद्दा आहे.






दुसरा मुद्दा आहे – राखीव जागा. मला कळत नाही, हिंदुत्त्ववाद्यांना दररोज उठून राखीव जागांना विरोध करायला काय मजा वाटते? आज करुणानिधींचं स्टेटमेंट ‘सकाळ’ मध्ये आलेलं आहे. ‘सकाळ’ मध्ये करुणानिधींनी सरळ सरळ यादवीची भाषा केलेली आहे – ‘शूद्र जेव्हा हक्क मागतात तेव्हा तो नेहमीच डावलला जातो. शंभर कोटी लोकांचं भवितव्य दोन लोकांनी ठरवणं गैर आहे.’ एका राज्याचा मुख्यमंत्री बोलतो आहे. काय खदखदतंय याची जाणीव हिंदू समाजाला आहे का? डॉ. आंबेडकरांनी स्वतःच घटनेमध्ये या रिझर्वेशनच्या पायाभूत अशा काही अटी घालून ठेवलेल्या आहेत. हे त्यांनी दलितांवर अजिबात उपकार केलेले नाहीत. हे उपकार त्यांनी सवर्णांवर केलेले आहेत; हे आपल्याला समजलं पाहिजे. राखीव जागा हा दलितांवरचा उपकार नव्हे. राखीव जागा हा सवर्णांवरचा उपकार आहे. आज भारतात सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश एक दलित होऊ शकतो; अशी ही एक सामाजिक क्रांती आहे. ज्याला पाणी भरू दिलं जात नव्हतं, तो आज सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होऊ शकतो. ही सामाजिक क्रांती भारतात रक्ताचा एक थेंबही न सांडता झालेली आहे. बाकीच्या देशातही क्रांत्या झाल्यात. फ्रांसमध्ये झाली, रशियात झाली. प्रत्येक क्रांती गिलोटिनच्या पात्याखाली झाली. गिलोटिन म्हणजे मोठं ब्लेड लावायचं, त्यात जे आपले विरोधक असतील, प्रतिगामी असतील त्यांना लाईनीत उभं करायचं, वरून ब्लेड सोडायचं, ब्लेड सोडलं की खाटकन् सगळी मुंडकी तुटून खाली पडायची. ती सगळी टोपलीत भरायची आणि घेऊन जायची. परत दुसरे प्रतिगामी आणायचे. अशा प्रकारे गिलोटिनच्या पात्यांखाली हरेक देशात क्रांती झाली. भारतात मात्र गिलोटिनशिवाय, रक्ताचा एकही थेंब न सांडता आम्ही क्रांती करून दाखवली; याचं श्रेय आंबेडकरांना, रिझर्वेशनला आहे. ज्याच्या हातात काही नसतं, he has nothing to lose but poverty, गरीबीशिवाय ज्याच्याकडे हरायला काहीच नसतं तो माणूस यादवीसाठी तयार आहे, तो माणूस गिलोटिनसाठी नेहमी तयार आहे. तयार कोण नाहीये? ज्यांच्या हातात आहे सगळं ते तयार नाहीत.


अशा प्रकारे ही जी transfer of power आहे, समसमान वाटणी लोकांना करून देणं आहे, इतकी पाच हजार वर्षे उच्च वर्णीयांना आरक्षण होतंच की. पाच हजार वर्षे शिक्षणाचा हक्क नव्हता; पाच हजार वर्षे पाणवठ्यावर पाणी भरू दिलं जात नव्हतं. सत्ता, संपत्ती करायचा हक्क नव्हता; हे सत्य आहे. हलाखीचीच परिस्थिती होती दलितांची. त्यांना जर रिझर्वेशन दिलं तर याच्यामध्ये सवर्णांनी चिडण्यासारखं काय? आणि त्याच्यामध्ये हिंदुत्त्ववाद्यांनी भाग घेण्याचं कारण काय? एक आई दोन मुलांबद्दल भेदभाव कसा करू शकते? म्हणजे, मुस्लिमांना आरक्षण द्यावं की नाही हा हिंदुत्त्ववाद्यांचा विषय होऊ शकतो. पण हिंदूंच्यातल्याच एखाद्या गटाला आरक्षण द्यावं की नाही हा हिंदुत्त्ववाद्यांचा विषयच नाहीये. हिंदुत्त्ववादी म्हणजे हिंदूंच्या हितासाठी लढणारे लोक. त्यांनी ‘रिझर्वेशन आर्थिक आधारावर द्या’ - हा सगळ्यात मोठा ढोंगीपणा आहे. आर्थिक आधारावर कसं देणार आरक्षण? मला वाटतं काल परवा तिकडे मनोहर जोशी सरांचं भाषण झालेलं आहे. त्यांच्याआधी बरेच राजकारणी बोलून गेले असतील. या राजकारण्यांची वर्तमानपत्रात जाहीर झालेली संपत्ती वाचा. माझ्यापेक्षा कमी. सी.ए. ठरवतो हो. आपलं उत्पन्न किती दाखवायचं हे सी. ए. ठरवतो. सगळ्यात श्रीमंत असतील न त्यांना सगळ्यात सोपं आहे आर्थिक आरक्षण मिळवणं. आर्थिक आरक्षण प्रक्टिकलच नाही. आर्थिक आरक्षण आपल्याला दाखविताच येणार नाही. अंबानी स्वतः किती वैयक्तिक कर भरत असेल?   तेव्हा आर्थिक आरक्षण ही एक दिशाभूल आहे. आरक्षण हे सामाजिक असलं पाहिजे; आणि ते बंधुतेच्या नात्याने दिलं गेलं असलं पाहिजे. 


अहो, साधं जपानचं उदाहरण घ्या. जपानमध्ये अणुबॉंम्ब पडायच्या आधी एक सामुराय नावाची जमात होती. हे सामुराय तिथले राजेही होते आणि धर्मकारणीही होते. जपानची संपूर्ण सत्ता त्या सामुरायींच्या हातात होती. ज्या दिवशी जपानवर अटम बॉंब पडला, त्याच्या दुसर्‍या दिवशी त्या सगळ्या सामुरायींनी जाहीर केलं – ‘उद्यापासून पाचशे वर्षे प्रयेक सामुराय गवत खाऊन राहील; आमच्या सर्व जपान्यांना जोपर्यंत शिक्षण मिळत नाही, सत्ता मिळत नाही, तोपर्यंत जपानचं काहीही भलं होणार नाही.’ असं म्हणून या सगळ्यांनी आपली सगळी सत्तेची पदं सामुरायींनी सोडून दिली. या सामुरायींएवढं आवाहन हिंदूंना करतच नाही. पन्नास टक्के मागताहेत ना? त्याला का विरोध करताहेत? आणि चला हिंदू समाजाचं मी समजू शकतो, जातीयवादी, म्हणजे नॅचरल आहे. हिंदुत्त्ववादी ह्याला कोणत्या तोंडाने विरोध करताहेत? त्यांचा इथे बोलण्याचा संबंध काय येतो? अशा प्रकारे फेरमांडणी मध्ये पहिला मुद्दा समतेचा, दुसरा मुद्दा राखीव जागांचा आणि तिसरा मुद्दा आंतरजातीय विवाहाच्या पुरस्काराचा.












फेरमांडणीचा चौथा मुद्दा असेल ट्रयच्या घोड्यांवर हल्ला करणे. ट्रयच्या घोड्याची एक गोष्ट सांगितली जाते. दोन देशातलं युद्ध सुरु होतं. त्यांना काही तटबंदी फोडून आत शिरता येत नव्हतं. ज्यांना शिरता येत नव्हतं. त्यांनी शत्रूसमोर एक मोठा लाकडी घोडा आणून ठेवला. लाकडी घोडा आणून ठेवल्यावर हे सगळे आतमधले रात्री खूष झाले.  मग यांनी दरवाजे उघडले, तो घोडा आत आणला. नगरात त्याची स्थापना केली, त्याची पूजा केली, त्याला शेंदूर वाहिला. नंतर सगळे रात्री घरी जाऊन झोपले. त्या रात्री त्या ट्रयच्या घोड्यातून सैनिक खाली उतरले. त्या सैनिकांनी दारं उघडली आणि सगळे शत्रू चालून आत आले. अशा प्रकारे जे ट्रॉZयचे घोडे हिंदुत्त्ववाद्यांमध्ये आहेत, जे हिंदुत्त्ववादी नाहीत; ज्यांचे   interest वेगळे आहेत; ज्यांचे  interest  स्वतःच्या जातीपातीत गुंतले आहेत,; अशा ट्रयच्या घोड्यांवर हल्ला करणे; हा हिंदुत्त्वाच्या फेरमांडणीचा चौथा मुद्दा आहे. त्याशिवाय हिंदुसंघटन होणारच नाही.


 मी, लोकांना असं वाटतं की हे काहीतरी संघाच्या विरोधी आहेत वगैरे. तसं काही नाही. संघाविषयी मला कुठलाही आकस नाहीये. त्यामुळे मी त्यांच्याविषयी बोलणं थांबवतो. थोडं सावरकरवाद्यांविषयीच बोलतो. माझ्या अगदी घरातले लोक. त्याच्या कंपूत मी वावरत असतो. पंढरपूरचे वा. ना. उत्पात; ब्राह्मणसंमेलनात जातात; तिथे जानवी घाला म्हणून फतवे काढतात; त्या कुमार केतकरांसारख्या सभ्य माणसाला हाणामारीच्या ऑर्डर वरतून देतात; ‘गर्वसे कहो हम ब्राह्मण है’ म्हणून पुस्तिका काढतात; हा काय प्रकार आहे? तुम्ही सावरकरांचं नाव घेऊ नका मग. तुम्ही हिंदूसंघटनाचं नाव घेऊ नका. तुम्ही तुमचं काय संघटन असेल ते स्पष्ट बोला. 

अशा प्रकारे जे ट्रयचे घोडे स्वतःच्या वेगळ्या  interest  साठी भगवा टिळा लावून हिंदुत्त्ववाद्यांमध्ये शिरलेले आहेत; त्या ट्रयच्या घोड्यांवर हल्ला करणे हा फेरमांडणीचा चौथा मुद्दा आहे.



पाचवा मुद्दा, धर्म बाजूला ठेवावा लागेल. धर्माचं उदात्तीकरण करून चालणार नाही. धर्म, जानवं, शेंडी हे चालणार नाही. वेद, मनुस्मृती, आख्यानं, पुराणं यांच्यातून हिंदू अजिबात संघटीत होत नाहीत. हिंदूंना त्याच्या हितासाठी समोरच्या धोक्यांपुरती जाणीव करून देऊन; त्यांच्या अंतर्गत समस्यांची जाणीव करून देऊन प्रेमाने, ममत्वाने एकत्र आणावं लागणार आहे. त्यासाठी हिंदूंचा धर्म बाजूला ठेवावा लागेल; कारण हिंदूंना असा धर्मच नाहीये बेसिकली. हिंदूंचे अनेक धर्म आहेत. जाते जाते कुलाचारा;| प्रयेक जातीचा कुळाचार वेगळा आहे, तोच त्याचा धर्म आहे. हिंदू ही जीवनपद्धती नाही; आंबेडकरही म्हणाले आहेत – Hindu is a nation in making , एक राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेतला समाज. हळूहळू बनतो आहे; एक होतो आहे. हळूहळू त्यांच्यामध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना तयार होते आहे. ती कशी जोपासता येईल हा आपला मुद्दा आहे. त्यामुळे धर्म बाजूला ठेवावा लागेल. मुसलमान धार्मिक आहेत; मग आम्हीपण आमचा धर्म आणतो; अशा प्रकारच्या भूमिका चालणार नाहीत. त्यांना धर्म नाही ही एक चांगली गोष्ट आहे, आणि हे लोकांना पटत नाही – हिंदुत्त्ववाद्यांना; ही एक खोटी गोष्ट आहे. मागे मी हुबळीला गेलो होतो. 

तिथे  कार्यक्रम होता; त्रिशूलदीक्षेचा. तिथे गेलो होतो बोलावल्यावर. तिथे गेल्यावर समोर बजरंगी होते; बजरंगी म्हणजे कसे असतात, तुम्हाला माहित आहे. सगळे दहा हजार बजरंगी बसले होते. त्या बजरंग्यांसमोर मी असं सांगितलं - ‘तुमच्या हिंदूंच्या हितासाठी तुम्हाला तुमची मनुस्मृती जाळावी लागेल; त्यात विषमता आहे; अस्पृश्यता आहे. सगळे समोर बसलेले बजरंगी टाळ्या वाजवत होते; मागे व्यासपीठावर बसलेल्या शंकराचार्यांची तोंडे मात्र बघण्यासारखी झाली होती. हे हिंदूंना कळणार नाही हे काही मला पटत नाही. हे हिंदूंना कळेल; हे हिंदुत्त्ववाद्यांनाच कळेल की नाही हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. हिंदूंना हिंदुत्त्वाची फेरमांडणी निश्चित कळेल. हिंदूंना हिंदुत्त्वाची फेरमांडणी निश्चित अपील होईल; ती हिंदुत्त्ववाद्यांना कशी अपील होईल; हे माझ्यासमोरचं आव्हान आहे.





 सहावी गोष्ट, सेक्युलॅरीझम. या शब्दाचा जो द्वेष केला जातो तो द्वेष सोडा. सेक्युलॅरीझम म्हणजे सर्वधर्मसमभाव नव्हे. सर्व धर्म चांगले आहेत; र्इश्वर अल्ला तेरे नाम; ते कुराणही छान; ती मनुस्मृतीही छान; अशा प्रकारच्या भोंगळपणाला सेक्युलॅरीझम म्हणत नाहीत. सेक्युलॅरीझमचा अर्थ कुठल्याही डिक्शनरीत कुठंही इहवाद असा आहे. इहवाद याचा अर्थ धर्म वेगळा, निर्बंध वेगळा. एक पारलौकिक, एक इहलौकिक. पारलौकिक जगातलं पूर्ण स्वातंत्र्य सेक्युलॅरीझम देतो. म्हणजे तुम्ही श्रद्धा कशावर ठेवायची; अल्लावर, देवावर, कृष्णावर काहीही. पण आज या जगात कसं वागायचं याचं कोणतंच स्वातंत्र्य सेक्युलॅरीझम देत नाही. या सगळ्या गोष्टी स्टेटनी - म्हणजे माणसांनी विचार करुन बुद्धीने ठरवायच्या असतात. मी म्हणतो नेहमी सावरकर सेक्युलर होते. सावरकर काय म्हणतात - धर्म वेगळा, निर्बंध वेगळा; केमाल पाशावरच्या लेखातले शब्द आहेत. एकाचा विषय इहलोक, दुसर्‍याचा विषय परलोक. परलोकाने इहलोकात ढवळाढवळ करता कामा नये. सर्व धर्मग्रंथ हिंदु-मुसलमान सर्वांचे वंदनीय, पूजनीय, आदरणीय; आज अनुकरणीय नाहीत; आज आचरणीय नाहीत. आज कसं वागायचं ते मी माझ्या बुद्धीने ठरवेन; विचार करुन ठरवेन.

एवढं सेक्युलॅरिझम आहे. …  त्वेष बाळगण्याचं काहीच कारण नाही. याउलट सेक्युलॅरिझम ही एक हिंदूंच्या हिताची गोष्ट आहे; हे हिंदूंना समजावून दिलं पाहिजे. विरोध स्युडो-सेक्युलॅरिझमला करता येर्इल की हा सेक्युलॅरिझम तुम्ही फक्त हिंदूंच्या कानफटात मारायला वापरता; पण तिकडे मुसलमानांना त्यांचा धर्म - हसून हसून देतायत. पण हे काही मुसलमानांचं भलं नाही. हाही हिंदूंनी एकदा शांत डोक्याने विचार करावा. मुसलमानांचं कोणतं ऐेहिक लांगुलचालन हिंदू नेत्यांनी केलं आहे? मुसलमानांना दिलंय काय त्यांनी? मुसलमानांनी बुरखा मागितला, बुरखा दिला; मुसलमानांनी हज सबसिडी मागितली, हज सबसिडी दिली; मुसलमानांनी नमाज रस्त्यावर पढायची परवानगी मागितली, रस्त्यावर पढायची परवानगी दिली. मुसलमानांना आधुनिक शिक्षण कोणी दिलं? मुसलमानांना शहाणं कुणी केलं? मुसलमानांना विज्ञाननिष्ठ कोणी केलं? ते कुणीच केलं नाही. मुसलमानांच्या सर्व पारलौकिक मागण्या मान्य केल्या; ऐेहिकामध्ये मुसलमानांच्या उत्थानासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी कोणतीच गोष्ट हिंदू लोकांनी केलेली नाही; कोणतीच गोष्ट हिंदूंच्या राजकारण्यांनी केलेली नाही.


सातवा मुद्द‍ा असेल, मुस्लीमांचं प्रबोधन. मुस्लीमांचं प्रबोधन हीही हिंदुत्ववाद्यांना आपली एक जबाबदारी वाटावी,  म्हटली पाहिजे. मुस्लीमांचं प्रबोधन कसं करायचं? मुसलमानांना आपल्याला सांगायचं काय शेवटी?  की बाबांनो, आमचा जगण्याचा हक्क मान्य करा. एवढंच आपल्याला त्यांच्याकडून मुख्यतः आपल्या स्वतःसाठी हवं आहे. आपल्या जगण्याचा हक्क मान्य करा; ते केवळ आमच्यासाठी नव्हे, ते तुमच्यासाठी आहे. आताच   मुस्लीम वस्तीतच बॉंबस्फोट झाला होता. मुसलमानांच्या वस्तीतच बॉंबस्फोट झाला होता. देवबंद आणि बरेलवी अशा प्रकारचे दोन सेक्ट (पंथ) आहेत. मुसलमानांच्यात समता आहे; मुसलमान एक आहेत असं काही नाही. तीन जाती आहेत – अश्रफ, अफझल आणि हुसेन; ---------     म्हणजे उच्च वर्णीय, ओबीसी आणि शूद्र. असे त्यांच्यातही तीन भेद आहेत. त्यांच्यामध्ये देवबंद आहेत, बरेलवी आहेत, शिया सुन्नीचा मोठा फरक आहे; अहमदी आहेत, ज्यांना इतर लोक मुसलमानही म्हणत नाहीत. अशा प्रकारचे भिन्न पंथ-उपपंथ आहेत. परत त्यांची एकमेकांविषयीची मानसिकता अशीच आहे; की हा काफर आहे;  माझाच एक खरा; हा मुसलमान जरी स्वतःला म्हणत असला तरी हा खरा मुसलमान नव्हे. 






इंटरनेट जर कोणी वापरत असेल तर तिकडे देवबंद आणि बरेलवी असा एक सर्च देउन बघा. दोघांनी एकमेकांविरुद्ध काढलेले शेकडो फतवे मिळतील. तू काफर आहेस, तू काफर आहेस, तू काफर आहेस असं मुसलमान एकमेकांनाच म्हणतात. या देवबंद आणि बरेलवी मधल्या संघर्षातून मालेगावमध्ये शब्बे-बारात सणाला बॉंबस्फोट झाला होता. शब्बे-बारात या सणाच्या दिवशी मुसलमान त्यांच्या थडग्यासमोर मेणबत्त्या लावत असतात. हे एक प्रकारचं शिर्क, शिर्क म्हणजे परमेश्वराच्या अस्तित्त्वात भागीदार मानणं. हा शिर्क इस्लामच्या लेखी एक गुन्हा आहे; म्हणजे दुसर्‍या गटाच्या लेखी. असं असल्यामुळे हा प्युअर इस्लाम नाही म्हणून मालेगावमध्ये झालेला तो बॉंबस्फोट आहे. हा जो कट्टरवाद तुम्ही जोपासताहेत, हा जो तुम्ही सगळं इस्लाम इस्लाम करत बसला आहेत; यातून तुमचं तरी काय भलं झालं आहे?. मुसलमानांनी आधुनिक होण्यामध्ये हिंदूंचं तर कल्याण आहे; पण मुसलमानांचं तर कोटकल्याण आहे; अशा प्रकारची भूमिका हिंदुत्त्ववाद्यांनी घेणं आवश्यक आहे. तुम्ही चुका करताहेत म्हणून आम्ही पण चुका करतो; अशी भूमिका नव्हे; आम्ही चुका करत नाहीत आणि तुम्हालाही करू देत नाहीत; अशा प्रकारची भूमिका हिंदुत्त्ववाद्यांनी घेणं आवश्यक आहे. 






आणि भारतीयत्त्वासाठी, मानवतेकडे शेवटी एक पाउल म्हणून; काय अनंत काळ कुठलीही भांडणे टिकणारी नाहीत, हिंदू-मुस्लीमांचं प्रबोधन होउन त्यांनी शेवटी जायचंच आहे. या मानवतेकडे एक पाउल टाकलं पाहिजे. सावरकरांचं ‘हिंदुत्त्व’ हे पुस्तकच एका तुकाराम महाराजांच्या अभंगाने संपतं – आमुचा स्वदेश, भुवनत्रयामध्ये वास काय आमचा देश, पृथ्वी सगळं एकच. पण जोपर्यंत चोरी-दरोडेखोरी असेल तोपर्यंत कुलुप घालायला लागेल; ते कुलुप म्हणजे हिंदुत्त्व. त्या कुलुपाची किल्ली नेहमी आपल्या खिशातच ठेवावी. ज्यावेळी भांडणं संपतील त्यावेळी मानवतेकडे जाण्यास हिंदूंनी उत्सुक असावं असा हिंदुत्त्वाच्या फेरमांडणीचा शेवटचा मुद्द‍ा आहे.


हिंदुत्त्वाचा राष्ट्रीय गोधळ चाललेला आहे. या राष्ट्रीय गोंधळामध्ये हिंदुत्त्ववाद्यांची अडचण काय आहे? हिंदुत्त्ववाद्यांची अडचण अशी आहे की त्यांचे आचार अतिशय चांगले आहेत. आसाम, मिझोरामपासून पूर्ण वेळ संघाचे प्रचारक जातात; जीव देतात स्वतःचा, अख्खं आयुष्य फुकट घालवतात; तिथल्या आदिवासी समाजासाठी, म्हणजे त्यांना ते वनवासी म्हणतात, मी आदिवासी म्हणतो. ठीक आहे, आपण शब्दांच्या भांडणात पडायला नको. 

पण तिथल्या आदिवासी समाजासाठी ते स्वतःचा जीव देतात, आयुष्यभर राब राब राबतात; कष्ट करतात. कुठल्याही डावे-पुरोगामी वगैरे असल्या धंद्यात पडत नाहीत; सगळे त्यांच्या परिषदा, सभा, संमेलनात रंगलेले आहेत. संघाच्या लोकांचे आचार अतिशय चांगले आहेत. जेवढे आंतरजातीय विवाह संघात होत असतील तेवढे कुठल्याही डाव्या-पुरोगाम्यांच्या चळवळीत होत नाहीत. त्यांचे आचार अतिशय चांगले आहेत, पण विचार अतिशय वार्इट.

वागतायत ठीक वागतायत; म्हणजे बरं आहे; पण रोजच्या रोज ही मध्ययुगीन जी भाषा हिंदुत्त्ववाद्यांकडून बोलली जाते; प्रतिगामी भाषा बोलली जाते; त्यासाठी हिंदुत्त्वाची वैचारिक फेरमांडणी आवश्यक आहे. अशी फेरमांडणी आवश्यक आहे असं मला वाटल्यामुळे मी आजचा भाषणप्रपंच केलेला आहे.

हिंदुत्त्वाचा राष्ट्रीय गोंधळ संपवण्यासाठी आम्ही आज आमचा एक गोंधळ घातलेला आहे. या गोंधळामध्ये मला माहितीये की आपण कुठल्याच लॉबीचे राहत नाही. लॉबीत राहण्याचेही काही फायदे असतात. म्हणजे एक संघाची लॉबी असते; एक ब्राह्मणांची लॉबी असते; एक डाव्या-पुरेगाम्यांची, त्यांची पण लॉबी असते; एकमेकाला पुरस्कार द्या; हे करा; ते करा. अशी फेरमांडणी केली तर आपण कुठल्याच लॉबीत राहत नाहीत; पण त्याने हिंदूंचं हित निश्चित होर्इल; असं मला वाटल्यामुळे मी या फेरमांडणीचा प्रयत्न केला. 







यामध्ये कोणाच्या काही भावना दुखावल्या असतील तर मला क्षमा करा; आणि माझ्या बालसुलभ उत्साहाचा तो एक भाग आहे असं आपण समजा. तुम्ही चिडावं किंवा तुमच्या भावना दुखवाव्यात असा माझा उद्द‍ेश नव्हता. तर याही हिंदुहिताच्या पोषक दृष्टीने काही विधायक होर्इल का अशा प्रकारे एक नवीन विचारांची दिशा हिंदुत्त्ववाद्यांसमोर ठेवावी असा माझ्या भाषणाचा हेतू होता.

हिंदुत्त्वाचा राष्टीय गोंधळ चालला होता. आज आम्ही  आमचा गोंधळ इथे घालतो आहोत; पण आमच्यामध्ये वैचारीक गोंधळ अजिबात नाही. मी मूळचा शाहू महाराजांच्या कोल्हापूरचा.

कोल्हापुरात जागरण गोंधळाची एक परंपरा आहे. अंबाबार्इला जागरण  गोंधळ घालतात. एका हातात पेटती मशाल आणि दुसर्‍या हातामध्ये संबळ घेऊन वाजवत वाजवत गोंधळी येतो; आणि उधं, उधं, उधं, उधं उधं, उधं, उधं, उधं करून सर्व देवदेवतांचा जयजयकार करायला लागतो. याला देवीचा जागरण गोंधळ म्हणतात. आम्ही जो घालतो आहोत, तो हिंदु समाजाचा जागरण गोंधळ आहे असं म्हणून मी माझं भाषण संपवतो.

वन्दे मातरम्.


(हे भाषण जुने असून त्यातील काही संदर्भ काही मुद्दे आणि काही विचार आता कालबाह्य आहेत . )

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *