७ सप्टें, २०१२

युवकांच्या चश्म्यातून - आरक्षण.



थोड्या दिवसापूर्वी एका वाद विवाद स्पर्धेला परिक्षक म्हणून गेलो होतो. आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धा होती. २० ते २५ वर्षाची मुलं - मुली स्पर्धक होती. धर्माच्या आधारावर आरक्षण द्यावे का ? दिल्यास ते देशाच्या एकतेला बाधक होईल का ? - असा विषय होता.  प्रत्येक कॉलेज मधून दोन्ही बाजूंनी बोलण्यासाठी एक - एक विद्यार्थी पाठवायचा नियम होता. - तरुणांची भाषणं ऐकून टाळकं भणाणून गेलं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी मी समारोपाला थोडसं बोललो. जे बोललो त्यात  भर टाकून लिहतो.








 रामभाउ म्हाळगी प्रबोधिनी च्या मुंबईतल्या कार्यालयात झाली स्पर्धा. विनय सहस्त्रबुद्धे, रविंद्र साठे आणी लोकसत्तेचे मुकुंद संगोराम  कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

मी म्हणालो -

तुमची भाषणं मी ऐकली. टाळकं भणाणून गेलं. घोर निराशेनी - पण थोडा आशेचा किरणही दिसला. आशेचा किरण हा की - अतिशय जिव्हाळ्याच्या - भावनिक - अस्मितेच्या  प्रश्नावर; चर्चा वाद - विवाद करण्याची तुमची तयारी आहे. नाहीतर सध्या मुद्दे  - गुद्द्यांनी आणी लाथांनी सोडवायची पद्धत आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात आहे. मधल्या खाण्याच्या वेळेला तुम्ही एकत्र हसत खेळत होता. नंतर स्टेजवर येउन तावातावाने भांडत होता. लोकशाहीचा पप्पा आणी पुरोगामिपणाचा फादर म्हणजे व्हॉल्टेर हा फ्रेंच विचारवंत. तो म्हणाला होता. "I do not agree with what you have to say, but I'll defend to the death your right to say it" . तुझे विचार मला अजिबात मान्य नाहित. पण वेगळे विचार बाळगण्याच्या - तुझ्या हक्काच्या -  रक्षणासाठी -  मी मरण पत्करायला तयार आहे. याला म्हणतात पुरोगामीपणा ! माणूस विचार करणारा प्राणी आहे यावर श्रद्धा बाळगणार्‍याला मी पुरोगामी म्हणेन. चर्चा करून समोरच्याचे विचार बदलता येतात हा पायाच आहे आहे पुरोगामीपणाचा. अशा प्रकारे ज्ञानाचे आदान प्रदान करत समाज प्रगतीच्या दिशेने पुढे न्यायचा. गामी म्हणजे जाणारा पण जायच कुठे ? पुरो - प्रगतीच्या दिशेला. पुरो - गामी.




                                                                         व्हॉल्टेर


आता निराशेबद्दल आणी डोकं भणाणण्या बद्दल - तुम्हा सर्वांचीच एक गोष्ट मला जाम खटकलीय.  जातीय आरक्षण आणी धार्मिक आधारावरच आरक्षण - यात जमीन आस्मानाचा फरक आहे. हा फरक कुणीच नीटपणी ध्यानात घेतला न्हवता. आरक्षणाचे समर्थक दोन्ही प्रकारच्या  आरक्षणाला पाठिंबा देत होते. आणी विरोधक दोन्हीला विरोध. आजचा विषय 'आरक्षण योग्य का अयोग्य ? ' असा न्हवताच मुळी. मित्रांनो ! विषय धार्मिक आरक्षणाबद्दल होता. त्याहून गंभीर गोष्ट म्हणजे अभ्यासाऐवजी -  "स्व" जास्त डोकावत होता. ज्यांना आरक्षण मिळतय ते त्याच्या बाजूचे आणी मिळत नाही ते विरोधक अशी स्पष्ट विभागणी दिसली ! काहि अपवाद होते. पण मोजकेच. त्याहून धक्कादायक म्हणजे , भारताचे संविधान, त्यातले धर्मस्वातंत्र्य , सेक्यूलर, सर्वधर्मसमभाव आणी धर्मनिरपेक्षता याबद्दल सर्वांनीच दाखवलेले भीषण अज्ञान. तुम्ही सर्व राज्यशास्त्र, इतिहास अशा कलाशाखांचे विद्यार्थी आहात तेंव्हा तुमच्याकडून काही नवे शिकण्यासाठी आलेला मी .....विज्ञानाचा विद्यार्थी.....असो. एक गोष्ट मात्र तुम्ही मला आज शिकवलीत. कोणती ? ते शेवटीच सांगतो भाषणाच्या.


आरक्षणाच्या विरोधकांनी आर्थिक आरक्षणाचा बूट वारंवार उगारला. सगळ्याच गरिबांना द्या वगैरे वगैरे. आरक्षण म्हणजे काय - गरिबी हटाव चा सरकारी कार्यक्रम वाटला की काय तुम्हाला ? का भीक वाटली ? गरिबांना मदत म्हणून भरपूर सरकारी योजना असतात. वेगळ्या रंगाच रेशनकार्ड असतं,  सबसिड्या असतात. बहुसंख्य दलित गरिब आहेत हे खरे आहे.  पण ते गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण दिलेलं नाही. सामाजिक गरजेतून दिलेलं आहे. बर... आरक्षणाची सुरवात कोणी केली ? आंबेडकरांनी ? अजिबात नाही ! शाहू महाराजांनी ? बिल्कूल नाही ! आरक्षणाची सुरवात केली भगवान मनूनी ! किती टक्के ? तर १०० % ...कोणाला ? तर उच्चवर्णीयांना. हे विपरीत आरक्षण होतं मित्रांनो. ब्राह्मण, क्षत्रीय आणी इतर पुढारलेल्या जातींनी गेली हजारो वर्षे या विपरीत आरक्षणाची मजा घेतली. १००% सत्ता, १००% धर्माधिकार, १००% न्यायव्यस्था, १०० % उच्च उत्पादनाचे उद्योग, १००% शेतजमीनी  गेली हजारो वर्षे ठराविक जातींच्याच हातात होत्या. पुण्याच्या एका विद्यार्थ्यानं मगाशी लंगड्या घोड्यांची गोष्ट सांगितली. त्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेल आहे. घोड्यांची शर्यत लावली. सगळे घोडे तगडे. एक मात्र लंगडा. मुद्दाम लंगडा केलेला घोडा. कुणी केला त्याला लंगडा ? तर तगड्या घोड्यांनी. ही काय स्पर्धा झाली ? मेरीट माय फूट ! त्या लंगड्या घोड्याला आरंभरेषेच्या थोडं पुढे उभ कराव लागेल. तेंव्हाच खरी स्पर्धा होईल. हे आहे सामाजिक आरक्षण. २२.५ %. लोकसंखेच्या प्रमाणात. दलित आणी आदिवासिंना , भटक्या आणी विमुक्तांना दिलय. रेषेच्या पुढं उभ केलय. काय चुकलं ? गेली हजारो वर्षे अभ्यासाची परंपरा नाही. पाढे बापानी शिकवले नाहित. आईनी अभ्यास घेतला नाही. देवळात यायला बंदी. शिकायला बंदी. अस्पृष्यता. मग रेषेच्या पुढे उभ करा त्याना. त्यालाच म्हणतात सामाजिक आरक्षण. सरकारी जावई न्हवे. दुबळा भाउ म्हणा.

दुसरी गोष्ट आर्थिक आरक्षणाची. तेही आहेच की दिलेलं . फक्त गरीब व्यक्तींना ते दिलेलं नाही. गरीब जातींना दिलय. त्याला म्हणायच ओ. बी. सी. आरक्षण. गरीब व्यक्तींना कसं देणार आरक्षण ?  गरीब शोधायचा कसा ? माझ  हॉस्पिटल आहे. भावाचा कारखाना आहे. बायकोच्या नावावर काही नाही. ती झाली की गरीब !  माझ होस्पिटल बायकोच्या नावावर केलं की मी झालो गरीब ! समजा एक श्रीमंत व्यापारी आहे. सोन्याच्या दागिन्यांच दुकान आहे त्याचं. . डान्स बार मधे उधळल्या - गड्याच्या गड्या -  नोटांच्या. दारू प्याला.शौक केला. बाई ठेवली. उधळले सगळे पैसे. झाला गरीब. बोला.. देणार त्याला आरक्षण ? एक महा मूर्ख आहे महिपतराव , एक आळशी  आहे सुस्तराव ... दोघेही गरीब आहेत. देताय आरक्षण ह्या दोन रावांना  ? म्हणे आर्थिक आधार ! सरसकट गरीबांना आरक्षण देता येत नाही हो. तो का गरीब झाला हे पहाव लागत. तो त्याच्या वैयक्तिक दुर्गुणांमुळे गरिब आहे का ? की त्याला संधी नाकारलीय व्यवस्थेनं. श्रीमंत होण्याची संधी. भारतात जातिव्यवस्था आहे. ते एक भयानक वास्तव आहे. जेंव्हा जातीच्या जाती गरीब रहातात. तेंव्हा नक्कीच त्याना संधी नाकारलेली असते. समाजान. व्यवस्थेन. अरे सुतारान सुतारच राहायच. लोहारान लोहार. जास्त पैशे मिळणारे धंदे करायचेच नाही त्यानं. कोणी नाकारली संधी ? -  पैशे मिळवण्याची संधी? व्यवस्थेन. म्हणून अनेक जाती गरीब राहिल्या. मग आला मंडल आयोग. मंडल न काय केलं ? निकष लावले. र्थिक, सामाजिक आणी शैक्षणीक . (आसाशै ) मंडल ने पहाणी केली सगळ्या जातींची. शिक्षणाचं प्रमाण कुठल्या जातित कमी आहे ? कोणत्या जाती गरीब आहेत ? त्यांना म्हटलं ओ.बी.सी. आणी दिलं आरक्षण. या ओबिसीत माळी आणी कुणबी यासारख्या शेतकरी जाती आहेत. दैवेज्ञ ब्राह्मण ही उच्चवर्णीय जात ही आहे ओबीसी आरक्षणात. तेंव्हा गरीब किंवा मागास उच्चवर्णीयांना आधीच आरक्षण मिळालेलं आहे.  पुन्हा द्यायचा प्रश्नच कुठे येतो ?  तेंव्हा लक्षात ठेवा आर्थिक आधारावर आरक्षण व्यक्तीला देता येत नाही. गरीब जातीना देता येत  - ते दिलेलंच आहे. मग आर्थिक आरक्षणाचा बूट काय म्हणून?

जातिय आरक्षणाचा काहिना  - काही व्यक्तीना गैर फायदा होतो म्हणे. मागासवर्गीय कलेक्टरचा मुलगाही आरक्षण मिळवतो. अरेच्च्या पुन्हा तेच तेच. जातिच्या लॉब्या असतात की नाही ? ज्यांच्या लॉब्याच नाहीत सत्ताकारणात. त्याना पुढे आणायला आहे आरक्षण. ते व्यक्तीला नाहीच -  समाजाला आहे. बटाट्याची तुलना बटाट्याशी करा हो - टोमेटोशी नको. जर ठराविक समाजाला आरक्षण आहे तर - "व्यक्ती गैरफायदा मिळवतेचा" -  टॉमेटो आणला कुठून ?  हरेक व्यक्तीच्या मागासपणाची कारण शोधणं सरकारला शक्य नाही. जातींच्या मागासपणाची कारणं शोधता येतात आणी त्यावरचा उपाय म्हणजे आरक्षण. मग विचारता हे संपेल कधी ? प्रश्न विनोदी आहे. आरक्षण म्हणजे सत्ताकारणातला न्याय्य वाटा. तो संपायला कशाला पाहिजे ? जेव्हढे टक्के हक्काचा वाटा आहे. तो मिळालाच पाहिजे. कायम.निरंतर.मिळाला पाहिजे आणी  अनुशेष म्हणजे काय ? मागासांना आरक्षण आहे २२.५ % + २७.५ % ओबीसींना = ४९ %.

एकूण आरक्षण ४९ %

बर हे आरक्षण कागदावर आहे. खरोखर जागा भरल्या किती. दिल्लीत कॅबिनेट सचीव दर्जाच्या ९६ पोस्ट आहेत. दलित किती त्यातले १ . फक्त एक. म्हणजे एक टक्का. ओबीसी कीती. अ ग्रेडचे केंद्र सरकारी अधिकारी घेतले तर त्या ओबीसी ४% हून कमी आहेत. म्हणजे ४९% आरक्षण फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात ते आलेलच नाही. राखीव जागांचा अनुशेष भरून काढणे अजून बाकी आहे. आधी अनुशेष भरा नंतर तोंड वर करून विचारा की - संपेल कधी ? पदोन्नती मध्ये आरक्षण दिलं पाहिजे ते म्हणूनच. अनुशेष भरण्यासाठी.

आरक्षणा बाबत दहा  वर्षाचा बोगस मुद्दा 

बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितलं होतं कि आरक्षण दिल्यानंतर १० वर्षांनी त्याचं परीक्षण केलं जावं…

दर दहा वर्षांनी पाहणी करावी आणि आरक्षणाचि वैधता ठरवावी असे बाबासाहेब आंबेडकर म्ह्टले होते . हा मुद्दा निवडणुकीतील राजकीय आरक्षणाचा होता. त्याप्रमाणे दर दहा वर्षांनी तशी पहाणी केली जाते . ओपन राजकीय क्षेत्रातुन किती टक्के मागास वर्गीय निवडुन आले ते पाहिले जाते … त्याचे प्रमाण नगण्य असते म्हणून पुन्हा आरक्षण दर दहा वर्षांनी मिळते .नोकरी आणि शिक्षणातिल आरक्षण बाबासाहेबंनि दिलेले नाही . बाबासाहेबांचे महानिर्वाण  १९५६ सालचे आहे.   शिक्षणातिल आरक्षण १९८२ सालचे आहे .  ज्याप्रमाणे राजकीय आरक्षणाचि दर दहा वर्षांनी वैधता तपासली जाते त्याप्रमाणेच शैक्षणिक आरक्षणाचि दर पाच वर्षांनी वैधता तपासली जाते. ते वैध असते म्हणून दिले जाते.

संदर्भ : https://web.archive.org/web/20090619063917/http://www.education.nic.in/cd50years/g/S/I6/0SI60301.htm


..बाकी हा मुद्दा फक्त राजकीय आरक्षणा  बाबत सत्य आहे. नोकरी आणि शिक्षण याबातीतील अरक्षणा बाबत बाबासाहेबांनी हे विधान केलेलेच नाही . कारण तिथे आरक्षण द्यायचा क्रायटेरियाच वेगळा आहे.   तिथेही जेव्हा मागास सबळ होतात तेव्हा आरक्षणाची  गरज संपते .

४९% आरक्षण फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात ते आलेलच नाही. राखीव जागांचा अनुशेष भरून काढणे अजून बाकी आहे. आधी अनुशेष भरायचे . मग ओपन मधून सुद्धा लोकसंखेच्या प्रमाणात दलित - मागास जेव्हा भारती होतील - तेव्हा आरक्षणाचि गरज संपते .

बाकी दहा वर्षाचा मुद्दा बकवास 

घरात घुशी झाल्या म्हणून कोणी घर जाळत नाही. तस  कुठल्याही सरकारी योजनेत काही दोष रहाणारच. म्हणून कुणी योजनाच बंद करत नाही. शिवाय श्रीमंत ओबीसींना म्हणजे क्रीमी लेयरला आरक्षणाचे लाभ मिळतही नाहीत. तशी तरतूदच कायद्यात आहे. प्रथम अनुशेष भरला पाहिजे. सत्तेत हक्काचा वाटा मिळाला की हळूहळू लंगडा घोडा तगडा होईल. स्वतःच्या हिमतीवरच पळू लागेल. स्पर्धा करेल ओपनशी. माझ्या एका मित्राची गोष्ट. विजय. तो ओबीसी आहे. ओबीसीच्या सीटांचे मार्क क्लोज झाले ओपनच्या वर. त्याला आरक्षणाचा काहिच उपयोग झाला नाही. ओपनलाही काही तोटा नाही. त्या कॉलेजपुरत तरी -  आरक्षण नसल्यातच जमा. या एव्हढ्या शर्यतीपुरता घोडा तगडा झालाय. आरक्षण अस संपतं. आपोआप. हा मुद्दा एका एकाही स्पर्धकान मांडला नाही.


क्रिमी लेयर फक्त ओबिसिना का ? 

ओबीसी आणि एस सी या दोन्ही आरक्षणाचे हेतू भिन्न आहेत . ओबिसिना  (आसाशै ) आणि एससी ना अस्पृश्यता आणि शोषण याविरुद्ध आरक्षण आहे .

१) ओबीसी आरक्षण हे प्रामुख्याने (आसाशै ) आर्थिक/सामजिक /शैक्षणिक मागास जातीना दिले आहे. (मंडल आयोग क्रायटेरिया ) माळी , साळी,   कोळी,  सुतार,  दैवज्ञ ब्राम्हण अशा बारा बलुतेदार  जाती ओबीसीत येतात. यांचे  (आसाशै ) उत्थान झाले कि क्रिमी लेयर लावून वगळता येते. कारण ज्या  क्रायटेरियावर आरक्षण दिले आहे - त्याची पूर्तता होते

 २) एससी / एस टी  चे आरक्षण हे पूर्व अस्पृश्य  शोषित आणि दुर्लक्षित जातीना आहे. यात नवबौद्ध , महार , मांग , चांभार, ढोर , आदिवासी या जाती येतात   त्यांचे (आसाशै ) उत्थान झाले तरी इतरांच्या  (मनातली ) अस्पृश्यता - शोषण आणि हलके मानले जाणे संपत नाही - भेदभाव तसाच राहतो -  म्हणून  एससी / एस टी ला (आसाशै ) क्रिमी लेयर लावता येत नाही . यावर यदी फ़डकेंच्या "खरी हि न्यायाची रीती"   या पुस्तकात  विस्तृत विवेचन आहे.


मुस्लिम आरक्षण.

आता आपण आजच्या खर्‍या विषयावर येवू. धार्मिक आरक्षण. म्हणजे मुस्लिम आरक्षण. कारण मुसलमान अल्पसंख्यातले बहुसंख्य आहेत. मुस्लिमांना आरक्षण द्यावे का ? दिल्यास भारतातली एकात्मता वाढेल का कमी होईल ?


संविधान आणी सर्वधर्म समभाव हा विषय प्रत्येकाने चघळला. आणी प्रचंड घोळ घातला. सभ्य स्त्री - पुरुष हो - आपल्या राज्यघटनेत सर्वधर्मसमभाव नाही. धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य ही घटनेत नाही.  घटनेत सेक्यूलारिझम आहे. सर्वधर्मसमभाव आणी सेक्युलारिझम या एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत.

सर्वधर्म समभाव. सर्व धर्म सारखेच आहेत. त्यांची शिकवण एकच आहे. सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छती -  ही हिंदुधर्माची शिकवण आहे. संविधानातला कायदा न्हवे ! उलट धर्मपालनाचे कोणतेच हक्क संविधान देत नाही.

तुम्ही सगळे प्रेमात पडायच्या वयाचे आहात.   आणी कुणाच्यातरी प्रेमात पण असणार. जो - जी नसेल त्यान कार्यक्रम संपल्यावर मला येऊन भेटावं. शनिवारवाड्यावर जाहिर सत्कार करण्यात यील. असो ..समजा तुम्ही ट्रेन नी कुठेतरी प्रवास करत आहात. समोर एक अप्सरा बसली आहे. यौवन बिजली.. पाहून थिजली.. इंद्रसभा भवताली. अप्सरा दिसली. तुम्ही मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करत आहात. असे प्रेम करण्याचे स्वातंत्र्य ती अप्सरा तुम्हाला अवश्य दील. पण मनातल्या मनात. मांडे खा. पण मनातल्या मनात. तिला ट्रेनमधे डोळा मारला ; की काय खायच ? सँडल !


भारताच्या राज्यघतनेत सेक्युलारिझम आहे. म्हणजे इहवाद आहे. कुठल्याही धर्मावर तुम्ही श्रद्धा ठेवू शकता. प्रेम करू शकता पण कसं ? मनातल्या मनात ! तुम्ही म्हणाल आमच्या धर्मात अस्प्रुश्यता आहे. आम्ही ती पाळणार... मग काय खायचं ? सँडल.

तुम्ही म्हणाल आमच्या कुराणात लिहिलिय . मूर्त्या फोडा. काफरांविरुद्ध जिहाद करा. म्हणा की. पण. मनातल्या मनात म्हणायच. खरोखर कुणी जिहाद करू लागला- तर काय खायच ? ....सँडल.
धर्माच्या चिकित्सेत संविधान शिरत नाही. पण २५ व्या कलमात बजावून सांगतं - धर्म पाळायचा पण मनातल्या मनात. इहलोकात कसं जगायच ? ते कायदा ठरवेल. लग्नाच वय किती असावं ? कायदा ठरवेल धर्म नाही.

संविधान नावाची अप्सरा हातात सँडल घेऊन उभी आहे . मनातल्या मनात धर्म पाळा की ! पण तुमच्या घरात - नाही - नाही तुमच्या बेडरुम मध्ये किती बायका असाव्यात ? त्याच्याशी कसा व्यवहार करावा ? हे कायदा ठरवणार आहे . तुम्ही तुमच्या धर्माचे किती पालन करावे ? हेही कायदा ठरवणार आहे !

सर्व धर्म चांगले आहेत ते जवळ घ्या म्हणजे सर्वधर्म समभाव. शासकीय निर्णयातून धर्म वगळा. धर्म दूर ठेवा म्हणजे सेक्यूलारिझम. म्हणजे च इहवाद. हा सेक्युलारिझम आपल्या संविधानाचा पाया आहे.  आणी अशा प्रकारचा पारलौकिक श्रद्धेसाठीचा कोणताही धर्म तुम्ही पाळू शकता. नवा धर्म बनवू शकता. धर्म बदलू शकता. धर्मांतराचे स्वातंत्र्य ही आहे.(मनातल्या मनात.)


आता मला सांगा. शासकीय निर्णयात धर्म आणायचा नाही हाच जर सेक्युलारिझम चा अर्थ आहे तर धर्मावर आधारित आरक्षण कसे काय देता यील ? दुसरं धर्म ही ऐच्छीक गोष्ट आहे. धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य आहे तर धर्मावर आधारित आरक्षण कसे देता यील ?


नीट विचार करा. समजा मुस्लिमांना आरक्षण दिलं. तर मुस्लिम कोण ? हे ठरवायचं कसं ? सुन्नी म्हणतात की शिया हे खरे मुसलमान नाहीत. कादियानी / अहमदिया पंथाचे लोक खरे मुसलमान नसून ते काफिर आहेत. त्यांच्या विरुद्ध जिहादचे फतवे ही निघतात पाकिस्तानात. मुसलामान कोण ? व्याख्या काय मुसलमानाची ? नाव ? समीर आणी कमल नावाच्या मुसलमानांना मी ओळखतो. अंतुले आडनावाचे मुसलमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.  सरकारने मुसलमानाची पहिल्यांदा व्याख्या करावी लागेल. टोपी, दाढी, नमाज हे सर्व नाकारणारे ही मुसलमान असतातच.

म्हणजे शेवटी सरकारला अ‍ॅफीडेव्हीट घ्यावे लागेल की मी मुसलमान आहे. आणी मगच आरक्षण देता यील.

पण गोची अशी आहे की घटनाकारांनी धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.  आरक्षण मिळवण्यासाठी मी काय करावे ? एक अ‍ॅफीडेव्हीट करावे. मी मुसलमान आहे. आरक्षणाचा लाभ मिळाला की पुन्हा धर्म बदलावा. हिंदू व्हावे. आता सरकार काय करणार ? माझी नोकरी काढून घेणार ? बर मी समजा सुमडीत धर्म बदलला. गुपचूप.  तर सरकारला कसे कळणार ? आरक्षणाचा लाभ मिळालेले लोक इस्लाम पाळतात का ? यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकार मौलवींची कमीटी नेमणार आहे काय ?

अहो दिवसातून पाच वेळा धर्म बदलता येतो. एक अ‍ॅफीडेव्हीट खेळ खलास. जी गोष्ट ऐच्छीक आहे ती गोष्ट कुठल्याही सवलतीसाठी अट म्हणून घालता येत नाही. एवढी साधी गोष्ट सरकारला कळू नये.

जातीचे खोटे दाखले मिळवून सवलती लाटणार्यांवर कायदेशीर कारवाई करता येते. कारण जात बदलता येत नाही. त्यात जन्म घ्यावा लागतो. पण धर्म ही ऐच्छीक बाब आहे. त्यावर आधारित सवलती देता येत नाहीत. धर्मांतराचे स्वातंत्र्य आणी धार्मिक आधारावर सवलती एकाच वेळी कशा देता येतील ? 

समजा उद्या तोगाडीयांनी हिंदू बांधवांना आवाहन केल - कोर्टात अ‍ॅफीडेव्हीट करून सवलती आणी आरक्षण लाटण्याच.. काय करणार तुम्ही ?


सर्वात महत्वाच  - आज मुस्लिमांना आरक्षण आहेच. मुस्लिमातल्या मागास जातींना आरक्षणाचा लाभ मिळतोच आहे. सर्वच धर्मातल्या मागास आणी गरीब जातींना आरक्षण आहे. ते तसेच राहिले पहिजे. पण सरसकट सर्व मुस्लिमांना आरक्षण मिळू शकत नाही. कोणत्याच धार्मिक आधारावर आरक्षण मिळू शकत नाही.  फक्त एका स्पर्धकाने हा मुद्दा मांडला त्याला पहिलं बक्षिस देत आहोत.

मुस्लिमांना समजायला हव की धार्मिक आधारावरच आरक्षण घटनाविरोधी तर आहेच पण;  ते देता येणंही अशक्य आहे. त्यामुळेच ते कोर्टात टिकणार नाही. सरकार तुम्हाला उल्लू बनवते आहे.

 तुमच्या सर्वांकडून शिकलेली एक गोष्ट म्हणजे वक्त्याने उगीच बडबड करत बसू नये वेळ संपली की भाषण बंद करावं. तुम्ही सर्वांनी बरोब्बर दिलेल्या वेळेत भाषण संपवलीत. तुम्च्याकडून मी हे शिकलो. आता आचरणात आणतो आणी भाषण संपवतो.


 - डॉ. अभिराम दीक्षित, मुंबई

  -----------------------------------------------------------------------------------------------------------

टिप : प्रस्तुत लेखन मागासवर्गीय आयोगाने अभ्यास करून शोषित वर्गाला दिलेल्या आरक्षणाबाबत आहे. सध्या तलवारी उपसून राजकीय दडपशाही करून  आरक्षण  मागण्याचा धंदा जोरात आहे. लेखक मागास , अतिमागास आणि इतर मागास जाती जमातींच्या आरक्षणाचा समर्थक आहे. आरक्षण म्हणजे सत्ता  अणि शिक्षण यातले प्रतिनिधित्व.

ज्यांना सत्तेत/ शिक्षणात  पुरेसे  प्रतिनिधित्व नाही त्याना ते दिले पाहिजे . ज्या समाजाला असे प्रतिनिधित्व पहिल्या पासूनच आहे आणि तरी त्यात गरिबी आहे - त्यांच्या विकासा साठी अन्य प्रयत्न केले पाहिजेत . आरक्षण  नाही .  राजपूत , ब्राम्हण ,  जाट , मराठा अशा सत्ता संपन्न समाजां च्या आरक्षणाबाबत वरील लेख लागू होत नाही . त्यांनी केलेल्या मागण्या आणि दिलेली आरक्षणे कोर्टात टिकणारी नाहीत . 

९४ टिप्पण्या:

  1. वैचारिक स्पष्टता उत्तम.विश्लेषण आणि मांडणी अभ्यासपुर्ण.अभिनंदन...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद सर.आणी मार्गदर्शनाबद्दल आभार.

      हटवा
    2. खूप चांगले आणि अभ्यासपूर्ण विचार मांडता तुम्ही, आज ज्ञानात अजून भर पडली.
      धन्यवाद.

      हटवा
    3. why dont you MAKE a PIL on ' there should be the reservation in defense forces'
      now a days reservation is spoiling QUALITY
      for NET exam you are fail even after getting 63% but you will pass if you have 55% and you belongs to OBC.
      in MPSC OPEN candidate with 47 marks is fail but OBC candidate with 8 marks is pass.
      you will get freeship if your father is earning 5 lac per annum but you will not get any concession if you belongs to OPEN and your income is 1,2000

      please reply.

      हटवा
  2. Dear Dr.Abhiram,
    really a nice explanation of the issues underlying and an inert stand on the topic. Really a great article.

    Thanks & regards,
    Dr.Vinay Kate,
    IIM Ahmedbad

    उत्तर द्याहटवा
  3. माहिती पूर्ण आणि वैचारिक दृष्टीकोण असलेला लेख.... उत्तम

    उत्तर द्याहटवा
  4. << माझ्या एका मित्राची गोष्ट. विजय. तो ओबीसी आहे. ओबीसीच्या सीटांचे मार्क क्लोज झाले ओपनच्या वर. त्याला आरक्षणाचा काहिच उपयोग झाला नाही. ओपनलाही काही तोटा नाही. त्या कॉलेजपुरत तरी ->>
    अभिराम सर college च नाव सांगता का?? माझ्या ओळखीत तर प्रत्येक engineering clg च्या CUT off लिस्ट मध्ये कमीत कमी ४० मार्कांचा फरक आहे open आणि nt मध्ये..म्हणजे २० % चा
    जाती आधारित आरक्षणाने जात किंवा जातीभेद नष्ट कसा होणार??
    जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे आरक्षण सामजिक असेल म्हणजेच प्रत्येक वर्गाला संधी मिळावी म्हणून असेल तर college मध्ये admission घेताना एक ठराविक cut off ठरवावा...सर्व जातींच्या मुलांकरता तो कायम असावा आणि कमीत कमी तेवढे marks score केलेल्या obc sc st nt समाजातल्या मुलांना त्या आरक्षणाचा फायदा द्यावा...म्हणजे गुणवत्ता पण टिकून राहील..
    जर हे आरक्षण संधी मिळावे एवढ्याच उद्देशासाठी आहे तर category मधल्या सरसकट लोकांना ५०% fees माफ का? sc st nt यांना तर engg clg मध्ये जवळपास १००% फी माफ आहे....हे कोणत्या आधारावर?
    मी कोणावर अन्याय केला नाही माझ्या मागच्या ४ पिढ्यांनी तरी कोणावर अन्याय केला नाही मग माझ्यात गुणवत्ता असून सुद्धा मला संधी का नाही??माझा अपराध काय?
    माझ्या पेक्षा दसपट श्रीमंत असलेल्या माझ्या मित्राला केवळ त्याने timepass केला मजा केली सर्व pictures बघून काढले म्हणून CET त माझ्यापेक्षा कमी मार्क्स पडले..पण तो catagory मध्ये येत असल्याने त्याला माझ्यापेक्षा चांगल्या college मध्ये सहज प्रवेश मिळाला..आता मला सांगा त्याच्यावर कोणता अन्याय झाला होता ??त्याने कोणत्या हालअपेष्टा सहन केल्या होत्या?त्याला कमी मार्क्स पडले याचे कारण त्याने तेवढे कष्ट घेतले नाहीत अस आहे...तो काही म्हणताय त्या प्रमाणे लंगडा घोडा नव्हता...उलट मी रात्रीचा दिवस करून त्याच clg मध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केले होते....आणि हे काही एका बाबतीत नसते...माझ्या बरोबर चला सर ९०% reservation पुण्यासारख्या शहरांमध्ये फक्त कागदावर मागासवर्गीय पण व्यवहारात बर्यापैकी श्रीमंत किंवा अतिश्रीमंत लोकांनीच लाटलेले आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. totally agree with you.one more point
      सुतारान सुतारच राहायच. लोहारान लोहार. जास्त पैशे मिळणारे धंदे करायचेच नाही त्यानं. कोणी नाकारली संधी ? - पैशे मिळवण्याची संधी? व्यवस्थेन. म्हणून अनेक जाती गरीब राहिल्या.
      पण आत्ता असा नाहीये कोणीही कोणताही धंदा करू शकतो .
      उदारणार्थ तुम्ही कोणताही धंदा करणारा माणूस बघा .


      हटवा
    2. सर्वप्रथम आपल्याला हे समजावे लागेल की २२.५ % मागासांना + २७.५ % ओबीसींना = ४९ % आरक्षण आहे याचा अर्थ उरलेले ५१ % हे Open / General (खुला वर्ग ) चे आरक्षित जागा नसून ही जागा "अनारक्षित" जागा आहे. म्हणजेच त्यावर कुण्या विशिस्टचा अधिकार नाही. याचाच अर्थ ज्यांची ज्यांची क्षमता आणि लायकी गुन्वतेच्या आधारावर सरस ठरते ते लोक ह्या जागेचे मानकरी आहेत. त्यामुड़े मागांस असून देखिल तो इतरांच्या इतकीच क्षमता आणि लायकी असल्यामुड़े तो मागासांना देय असलेल्या आराक्षनाची जागा मुक्त करून तो अनारक्षित जागेवर जातो व आपली जागा आपल्या दुबळया भावा साठी खाली करतो. ही साधी बाब समजुन न घेता बरेच लोक Open ही जागा आरक्षित आहे असे समजुन त्यावर आमची मक्तेदारी आहे असे भासवितात.
      उदहारण द्यायचे झाल्यास रेलवे मधे आरक्षित आणि जनरल असे डबे असतात. ज्याच्या कड़े Reserved ticket (आरक्षित) असते तो आरक्षित जागेवर अथवा अनारक्षित डब्यात म्हणजेच दोन्हीकडे बसू शकतो परन्तु ज्याच्या कड़े general ticket (अनारक्षित) आहे त्याला स्वबड़ावर फ़क्त जनरल डब्यातच जागा मीडवावी लागते.

      हटवा
    3. @ Pravin Khartad:
      "उरलेले ५१ % हे Open / General (खुला वर्ग ) चे आरक्षित जागा नसून ही जागा "अनारक्षित" जागा आहे..!" haa bhaas ahe tumcha..
      51% madhye suddha SC, NT wale 'open' madhun admission ghetat.. jara college madhye jaun bagha.. Jasa brahmananna 'baman','shendi' etc words ne hinawle jaate, teva "atrocity" act lagu nahi.. N baki jatinna lagu hoto.. 60varsh zale aarakshan ahe, kaay sudharla desh saanga?!

      हटवा
    4. @AnonymousMarch 22, 2013 at 7:42 AM
      तुज्या बुद्धी पाहून डोके फिरते रे तुज्या सारखी बुद्धीची लोक आहे जगात हे पाहून दगडावर डोके आपटा वेसे वाटते ५० % लोकांना दूर ठेवून काय दिवे लावणार आहेस तू ? मेरीट च्या गोष्टी तर करूच नकोस आपल्या देशत मोबाईल ,घड्याळ अश्या अनेक गोष्टी बाहेरून आणल्या आहेत तुम्ही काय दिवे लावले ? वेदात सगळे शोधत बसला … अगोदर तुझे मेरीट सांग आणि मग इतरांना बोल

      हटवा
  5. आपले नेमके नि विवेकी विचार सर्व भारतीय लोकांना जागे करतील आणि संविधानिक धर्माचा मुल निर्मल विचार प्रवाह सर्वत्र प्रवाहित करतील असेच आहेत ....विधायक विचारांच्या प्रसारणासाठी अभिनंदन

    उत्तर द्याहटवा
  6. मुद्देसूद.... खडे बोल.....अतिशय योग्य मांडणी....प्रभावी व्यक्तिमत्व...... खूपच छान...दीक्षित साहेब.....!

    उत्तर द्याहटवा
  7. khup chhan.....bharamasath donation deun admission ghetat...te aarakshan nahi ka???? tyanchi gunavatta kon baghanar

    उत्तर द्याहटवा
  8. धर्मिक आधारावर आरक्षण अयोग्य ह्या मुद्द्याशी सहमत. पण जाती आरक्षणावर चे काही मुद्दे खटकतात.

    लंगड्या घोड्याला शर्यतीच्या सुरुवातीला पुढे उभे करणे योग्यच आहे पण. पण त्या घोड्याच्या किती पि्ढ्यांना शर्यतित पूढे उभे करणार.
    जर पुढच्या पिढ्यादेखिल लंगड्या नसुन शर्यतित पुढे उभे राहण्याचा फ़ायदा घेणार असतील तर आरक्षणाने होणारा फ़ायदा कोणाचा.
    जर एखाद्या मागासवर्गीय कलेक्टरचा मुलगा आरक्षण वापरुन शिकणार असेल तर मग ज्यांची पहीली पिढी शिक्षण घेणार आहे अश्या मागसवर्गियांचे काय?

    पालकांकडे बक्कळ पैसा असुन देखिल केवळ जातीच्या दाखल्यावर जवळपास फ़ुकटच मिळणार्‍या शिक्षणाची कदर किति होते हे कॉलेजमधे चक्कर मारले की कळते.

    आर्थिक आधारावर आरक्षणावर गरीब कोण हे कुटुंबाच्या उत्पन्नावर ठरते एका व्यक्तिच्या नव्हे. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच पण हे अपवादच सर्वसाधारण परीस्थीती आहेत अस म्हटले तर पुढची तर्क चुकतात जसे तुम्ही २ रावांबद्दल बोललात. तसे गरीब झालेले राव आहेत पण किति? शेतात मरमर काम करुन पण हलाखित असणारे सर्वसाधारंण गटातील लोकांच्या तुलनेत त्या रावांचे किति प्रमाण आहे?

    उत्पन्नाचे खोटे दाखले मिळणे सोपे आहे पण ही शासनव्यवस्थेतली उणीव हळुहळु दुर होईल अशी आशा आहे.

    जातीच्या आरक्षणाचा होणारा एक विपरित परीणाम म्हणजे जातीव्यवस्था अजुन घट्ट होतेय. जातीचा उल्लेख जोवर होणार तोवर जातीव्यवस्था नष्ट कशी होणार.


    जातीत लग्न न केल्यास बहीष्कार/ हत्या, जातीच्या माणसाला मतदान, जातीच्या नावाखाली परजातीच्या लोकांशी भांडणे खरच आपण जाती बघुन माती खातोय असं नाही का वाटत..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मेरीटच्या गप्पा कुणाला सांगता ?
      आरक्षण हा विषय जेव्हा जेव्हा चर्चेला आला तेव्हा तेव्हा आरक्षण विरोधकांनी मेरीट चा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. जणू काही आरक्षणाचा लाभ घेनार्यांकडे मेरीटची वानवा असते अशा पद्धतीने मांडणी केली गेली. आरक्षण समर्थकांना अत्यंत हीन पद्धतीने हिणवले गेले. आरक्षण व्यवस्थेमुळे भारताची नोकरशाही आणि प्रशासन दुर्बल होईल अशा प्रकारच्या टीका केल्या गेल्या. प्रकाश झा च्याच भाषेत बोलायचे झाले तर "हम मेरीट में विश्वास करते है, आरक्षण में नही." थोडक्यात काय तर मागास समाज आणि मेरीट यांचा जन्मोजन्मीचा काहीही संबंध नाही अशीच भारतातील अभिजन वर्गाची धारणा आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाने अथक परिश्रम घेवून घटना लिहिली. बाबासाहेब या घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असल्याने मागास, शोषित घटकांच्या हक्क-अधिकारांना कायदेशीर रूप देण्यात बाबासाहेबांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी मागास घटकांच्या विकासासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठराविक राखीव जागांची तरतूद केली. आरक्षणाची सुरुवात झाल्यानंतर मागास समाजाचे मेरीट साहजिकच खुल्या वर्गातील इतर मुलांपेक्षा कमी होते. कारण इथल्या अभिजन ब्राम्हण वर्गाने पिढ्यानपिढ्या त्यांना शिक्षण, संपत्ती आणि इतर सामाजिक, राजकीय, आर्थिक अधिकारांपासून वंचित ठेवले होते. त्यामुळे ज्यांना नीट शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत, ज्यांना दोन वेळेला पोटभर अन्न मिळत नाही त्यांची तुलना ए. सी. मध्ये बसून अभ्यास करणाऱ्या, अभ्यासासाठी सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या मुलांशी करणे चूकच आहे. परंतु आजपर्यंत भारतात अशाच प्रकारे समान संधी न मिळालेल्या दोन घटकांची एकमेकांशी खोटी तुलना करून मेरीट चा बागुलबुवा निर्माण केला. भारतात आजपर्यंत अभिजन वर्गाला १०० % आरक्षण समाजाच्या सर्व क्षेत्रात उपलब्ध होते असे असूनही त्यांना म्हणावी तशी देशाची किंवा समाजाची प्रगती साधता आली नाही. आजपर्यंत जे-जे महत्वाचे शोध लागले आहेत ते परदेशातील शास्त्रज्ञांनी लावले आहेत. विमान, रेल्वे इंजिन, पंखा, इस्त्री, वीज, सायकल, दूरदर्शन संच, रेडीओ, कॉम्पुटर आदी अनेक महत्वाचे शोध परकीय शास्त्रज्ञांनी लावले आहेत. आमच्या शास्त्रज्ञांना तसे शोध का लावता आले नाहीत ? आमचे विद्वान मात्र वेदांत किती ज्ञान आहे, नवनवीन शोध आहेत त्याच्या हाकाट्या पिटत राहिले. जर त्यांच्या ठिकाणी मेरीट खच्चून भरले आहे तर अजून देश विज्ञान, संशोधनाच्या क्षेत्रात सर्वांच्या मागे का आहे ? आजपर्यंत सर्व समाजासाठी निस्वार्थी भावनेने झटणारे महामानव बहुतांशी बहुजन समाजातूनच पुढे आलेले आहेत. आजही अनेक बडी मंडळी आपला वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी परदेशातील दवाखान्यात जातात. जर इथल्या एम्स किंवा इतर ठिकाणच्या लोकांना मेरीट चा पुळका आहे तर त्यांनी अंतर्मुख व्हायला हरकत नाही. अटलबिहारी वाजपेयी आणि अगदी कालपरवा सोनिया गांधी उपचारासाठी का परदेशी गेले ? इथे खुल्या वर्गातील लोकांकडे मेरीट नाही कि काय ? त्यामुळे मेरीट च्या गप्पा खोटारड्या आहेत. बहुजन समाजात न्यूनगंड निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची मांडणी केली जाते हे वरचेवर दिसून आले आहे. आणि वेळ पडताच मेरीट च्या समर्थकांचेच मेरीट उघडे पडते. त्यामुळे बहुजन वर्गाला मेरीट च्या गप्पा सांगण्याचा प्रयत्न कुणी करू नये. हिम्मत असेल तर आधी स्वतःचे मेरीट सिद्ध करा.

      हटवा
    2. Very good reply.....after taking all benefits of 'Reservation' in first generation, second generation must be treated as open category....
      Otherwise real backward turns into severe backward & these so called 'beneficiary' backward becomes the rulers in that cast...they don't recognize their poor relatives. They don't keep any relation with them...

      हटवा
    3. एक सोपा प्रश्न एका कमी न्यानी आरक्षणा मुळे इंजिनिअर ला तुम्ही तुमच्या घराची भली मोठी इमारत बांधायला द्याल का ? तुमचे मुल आजारी पडल्यावर आरक्षित सिट वर बसुन डोक्टर कडे न्ह्याल का .....?

      हटवा
    4. And what about Doctors and engineers from private colleges where fees/donations are exorbitant? In a way, so many private professional institutes are reservation for rich class.

      हटवा
  9. Kharokharach Utkrusht aani Abhaspurn aani Tarkshuddha Mandani Abhiram
    Mannhpurvak Abhinandan ...Tumhche Veechar Changle aahet Tumhi Baher Padayla Hav....
    Abhyas Nasnare anek Lok Samajat Bhashne Det Firtat khare Pan Tumchya Vicharanchi aani Yuktivadachi Sarv Samjala garaj aahe..

    Baba Gade
    Sampadak, Dainik Mahanayak Aurangabad.

    उत्तर द्याहटवा
  10. A very enlightening,thoughtful, intellectual, inspiring and meticulous article sir. thanks Vishal Dhok.

    उत्तर द्याहटवा
  11. @Anonymous March 22, 2013 at 7:42 AM
    मेरीटच्या गप्पा कुणाला सांगता ?
    आरक्षण हा विषय जेव्हा जेव्हा चर्चेला आला तेव्हा तेव्हा आरक्षण विरोधकांनी मेरीट चा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. जणू काही आरक्षणाचा लाभ घेनार्यांकडे मेरीटची वानवा असते अशा पद्धतीने मांडणी केली गेली. आरक्षण समर्थकांना अत्यंत हीन पद्धतीने हिणवले गेले. आरक्षण व्यवस्थेमुळे भारताची नोकरशाही आणि प्रशासन दुर्बल होईल अशा प्रकारच्या टीका केल्या गेल्या. प्रकाश झा च्याच भाषेत बोलायचे झाले तर "हम मेरीट में विश्वास करते है, आरक्षण में नही." थोडक्यात काय तर मागास समाज आणि मेरीट यांचा जन्मोजन्मीचा काहीही संबंध नाही अशीच भारतातील अभिजन वर्गाची धारणा आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाने अथक परिश्रम घेवून घटना लिहिली. बाबासाहेब या घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असल्याने मागास, शोषित घटकांच्या हक्क-अधिकारांना कायदेशीर रूप देण्यात बाबासाहेबांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी मागास घटकांच्या विकासासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठराविक राखीव जागांची तरतूद केली. आरक्षणाची सुरुवात झाल्यानंतर मागास समाजाचे मेरीट साहजिकच खुल्या वर्गातील इतर मुलांपेक्षा कमी होते. कारण इथल्या अभिजन ब्राम्हण वर्गाने पिढ्यानपिढ्या त्यांना शिक्षण, संपत्ती आणि इतर सामाजिक, राजकीय, आर्थिक अधिकारांपासून वंचित ठेवले होते. त्यामुळे ज्यांना नीट शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत, ज्यांना दोन वेळेला पोटभर अन्न मिळत नाही त्यांची तुलना ए. सी. मध्ये बसून अभ्यास करणाऱ्या, अभ्यासासाठी सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या मुलांशी करणे चूकच आहे. परंतु आजपर्यंत भारतात अशाच प्रकारे समान संधी न मिळालेल्या दोन घटकांची एकमेकांशी खोटी तुलना करून मेरीट चा बागुलबुवा निर्माण केला. भारतात आजपर्यंत अभिजन वर्गाला १०० % आरक्षण समाजाच्या सर्व क्षेत्रात उपलब्ध होते असे असूनही त्यांना म्हणावी तशी देशाची किंवा समाजाची प्रगती साधता आली नाही. आजपर्यंत जे-जे महत्वाचे शोध लागले आहेत ते परदेशातील शास्त्रज्ञांनी लावले आहेत. विमान, रेल्वे इंजिन, पंखा, इस्त्री, वीज, सायकल, दूरदर्शन संच, रेडीओ, कॉम्पुटर आदी अनेक महत्वाचे शोध परकीय शास्त्रज्ञांनी लावले आहेत. आमच्या शास्त्रज्ञांना तसे शोध का लावता आले नाहीत ? आमचे विद्वान मात्र वेदांत किती ज्ञान आहे, नवनवीन शोध आहेत त्याच्या हाकाट्या पिटत राहिले. जर त्यांच्या ठिकाणी मेरीट खच्चून भरले आहे तर अजून देश विज्ञान, संशोधनाच्या क्षेत्रात सर्वांच्या मागे का आहे ? आजपर्यंत सर्व समाजासाठी निस्वार्थी भावनेने झटणारे महामानव बहुतांशी बहुजन समाजातूनच पुढे आलेले आहेत. आजही अनेक बडी मंडळी आपला वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी परदेशातील दवाखान्यात जातात. जर इथल्या एम्स किंवा इतर ठिकाणच्या लोकांना मेरीट चा पुळका आहे तर त्यांनी अंतर्मुख व्हायला हरकत नाही. अटलबिहारी वाजपेयी आणि अगदी कालपरवा सोनिया गांधी उपचारासाठी का परदेशी गेले ? इथे खुल्या वर्गातील लोकांकडे मेरीट नाही कि काय ? त्यामुळे मेरीट च्या गप्पा खोटारड्या आहेत. बहुजन समाजात न्यूनगंड निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची मांडणी केली जाते हे वरचेवर दिसून आले आहे. आणि वेळ पडताच मेरीट च्या समर्थकांचेच मेरीट उघडे पडते. त्यामुळे बहुजन वर्गाला मेरीट च्या गप्पा सांगण्याचा प्रयत्न कुणी करू नये. हिम्मत असेल तर आधी स्वतःचे मेरीट सिद्ध करा.

    उत्तर द्याहटवा
  12. पुरो म्हणजे पुढे - म्हणजे प्रवाहाबरोबर पोहत पुढे जातो - तो पुरोगामी?
    आरक्षणाची तरतूद पोट भरण्यासाठी नसून प्रतिनिधित्वासाठी आहे असे सांगितले जाते. आपणही तेच सांगितले - की आर्थिक पाठबळ म्हणून इतर अनेक गोष्टी केल्या जातात, त्यासाठी आरक्षण नाही.
    पण प्रतिनिधित्वाची खरी पातळी म्हणजे लोकशाही व्यवस्थेतून मिळणाऱ्या राजकीय संधी - ज्यासाठी आरक्षण आहे असे म्हटले जाते.
    मग आजवरच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांपैकी किती टक्के मागासवर्गीय होते? केंद्रीय मंत्रीमंडळात किती टक्के जागा राखीव आहेत? किती राज्यांच्या मंत्रिमंडळात कायदेशीर टक्केवारी प्रमाणे पदे दिली जातात? आजवर किती राज्ये आणि केंद्र सरकारी समित्या - महामंडळे यांचे अध्यक्ष, अन्य सदस्य आरक्षणाप्रमाणे नेमले गेले?

    यावर उत्तर दिले जाईल की अशी तरतूद करणारा कायदाच नाही. मग आपण कुठल्या "प्रतिनिधित्वाच्या" गप्पा मारत आहात? राजकारणी तर स्वत:पर्यंत काहीच येऊ देत नाहीत - आजवर त्यांनी येऊ दिले नाही. आणि पुरोगामी म्हणवणारे त्यावर कधीच बोलताना आढळत नाहीत.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण आरक्षण विरोध आहात तर सर्व क्षेत्रातील आरक्षणाला आपला विरोध असायला हवा. आज भारतात धार्मिक क्षेत्रातील सर्व अधिकार ब्राम्हण वर्गाकडे आहेत. सर्व शंकराचार्य ब्राम्हण आहेत. बहुतांशी मंदिरे ब्राम्हण वर्गाच्या ताब्यात आहेत. या मंदिरांचे एका दिवसाचे उत्पन्न काही करोडो रुपये आहे. या सर्व मंदिरातून ब्राम्हण हटवावे, ब्राम्हणांचे अनिर्बंध आरक्षण बंद करावे अशी मागणी आपण कधी करता का ? पौरोहीत्यासाठी लागणारी गुणवत्ता फक्त ब्राम्हनाकडेच आहे का ? या प्रश्नांची उत्तरे द्या.

      हटवा
  13. खालील प्रश्न आरक्षण या विषयाच्या पर्ह्व भूमीवर आहेत असे समजून मी उत्तरे देतो

    १. स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे झाली. खरोखरच किती अन्याय्यग्रस्तांचे जीवनमान सुधारले? आणि किती मध्यस्थांचे? - --- आरक्षण हे पिडीत , गरीब किंवा अन्याय ग्रस्त समाजांचे जीवन सुधारण्यासाअठि आहे हीच मुळात चुकीची समजूत आहे. आरक्षण सर्व समाजघटकांना सत्ताकारण , अर्थकारण आणि एलिट क्लास यात प्रतिनिधित्व - वाटा मिळवुन देते. हि एकप्रकारची रक्त विहीन क्रांति असते. उच्च जातीच्या लोब्या जेंव्हा " नाही रे" वर्गाला … मोक्याच्या स्थानापासून दूर ठेवतात तेंव्हा दाबल्या पिच्लेल्यांना संघर्ष करण्याची उर्मी सहाजिकच येते … ज्यांकडे हरायला काही नसते ते युद्धाला कायमच तयार असतात . ज्या देशात मागास समाजाच्या उत्थानासाठी कोणत्याहि योजना नसतात त्या देशांचे काय होते ? यासाठी पाकीस्थान हे पुरेसे बोलके उदाहरण आहे. ……. ………

    २. जातीभेदामुळे झालेले अनेक देशांचे नुकसान आणि जातीचा उल्लेख बंद केल्यावर झालेली प्रगती याचा हि आपण अभ्यास केला आहे का? --- बिळात साप नाही असे मोठ्याने घोकाल्याने सापाचा धोका टळतो काय ? जातिव्यस्थेचा साप अस्तित्वात आहे- त्याचा उल्लेख टाळून काय मिळेल ? ---- जपान मधे अणुबोब च्या विनाशानंतर तिथल्या सामुराइ या उच्च जातीने सर्व अधिकारपदे सोडुन दिली । आणि जो पर्यंत सर्व समाज घटकांना सत्तेत स्थान मिळत नाही तोपर्यंत आम्ही गवत खाउन राहू अशी घोषणा केली… जपानची झालेली प्रगती आपल्या डोळ्यासमोर आहेच . … । ज्या ज्या सुधारलेल्या देशात जाती / वर्गभेद तीव्र होते तेथे आरक्षण किंवा तत्सम सुविधा आहेत. उदा : अमेरिकेत - कृष्ण वर्णीय विद्यार्थ्यांचा कोटा पुर्ण भरल्यासा विद्यापिठांना घसघशीत वाढीव सरकारी अनुदान मिळते …………।

    ३. व्यक्ती म्हणून मला वाटणारे प्रेम आणि निष्ठा या सर्वप्रथम कोठे असाव्यात जात, देश, धर्म, परंपरा संस्कृती, व्यक्ती? या गहन नैतिक प्रश्नाचे उत्तर द्यायला मी समर्थ नाही . पण व्यक्ती समाज देश … याबद्दल सरकारी धोरणे ठरवताना - अन्यायग्रस्त समाजाचा विचार केला जावा असे वाटते.

    ४. आपल्या शिक्षण पद्धतीत १७ किंवा २५ % अभ्यास केला कि पदवी मिळते मग आपण त्यात, गुण, फी, आणि skills सर्वच पातळीवर सुट का दिली जाते. अश्या पद्धतीने गुणवत्ता कशी वाढेल- खरे आहे गुणवत्ता वाढीसाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे.

    आरक्षणाने गुणवत्ता कमी होते हो - अशी हाकाटी कायम केली जाते. कोणाची गुणवत्ता ? हा खरा प्रश्न आहे. देशातल्या पन्नास टक्के जनतेला निर्णयप्र्क्रियेतुन दूर ठेवल्यास त्यांची गुणवत्ता सुधारेल काय ? देशाची गुणवत्ता म्हणजे सर्व समाजाची गुणवत्ता . समाजा एका घरात दोन भाऊ आहेत । त्यापैकी दुबळ्या भावाच्या खाण्यापिण्याकडे आई वडिल अधिक लक्ष पुरवतात । प्रसंगी सशक्त भावाकडे दुर्लक्ष … करतात ।त्यामुळे कुटुंबाची गुणवत्ता कमी होत नाही - वाढते .

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Dear Sir,
      Perfect explanation, hats off.

      In community of 1000 if 10 people are poor we cannot call that community as poor but in 1000 people if 990 are poor certainly that community needs support. We cannot stop giving opportunity for remaining 990 based on 10 rich people.

      I am from SC category and I am the first engineer from my family (From both father and mother side), because of reservation in 60 years my family did good. My grandfather was doing Mharki (Job of lower cast in village) but he gave education to my father so my father came to Mumbai and got job in mill, my father gave education to me and our only inspiration was and today also is Dr.Ambedkar (Shika, Sanghatit hwa and Sangharsh kara).
      So I can say that in 60 years my family saw tremendous change from mharaki to USA (I am working in Washington DC as senior financial consultant)
      Again I only got 60% in my 12th Std but because of my cast I got admission. Also in my engineering I got drop in my first year because till that time I am not getting technique how to study as there is no one in our falimy to guide us. But from second year onward I am consistantaly scoring 55 to 60% till my 8th Semister as I got the technique. Now let me tell you when I am getting 55% to 60% my class mates are still failing in that subjects as there is no spoon feeding to them (Marks in 12th and 10th std don’t show us clear picture as they belongs to coaching class and their practices) some of them are merit holders.

      So I think I was equally talented in my 12th Std also but I was lacking the way I am studying. The point is because of reservation I got admission in engineering. After getting admission all are equal, means I need to score 40 markes to pass the paper just like others.

      After engineering so many of my friends went to USA for doing MS, most of them are from upper cast (you can easily figure out from surname) but we don’t have the money to got to USA though we are equally talented (To do MS in USA you need money there is no 100% scholership).

      Now these my uppercast friends as I can see their families are well educated (Managers, bankers, Doctors) and when I see my community people they are still happy if some one do small diploma.

      I came to USA on my own talent and I am working for USA fedral government as financial consuatant. I am glad and thankful to Indian governent that they showed belive in me in my 12th Std and gave me admission in enfineering. My next generation will not seek any reservation from now onwards but still there are so many people needs hand to grow from all of us.

      Jai Hind

      हटवा
    2. nice samir.....
      but question is that ur next generation will fill form in which category open or reserv????

      हटवा
  14. Dixit saheb obc nha crimiliar lavale madhu limaye hya punyatalya vyaktine tyamule reservation cha 1% pan fayada zala nahi.... az azun bahusankhya jatinchi olakh zali nahi....tya jatihi samazik shaishanik drushtya magashalya ahet.....sadhya he reservation dil jatay 1931 chya caste based census nushar.... tumhi 2014 mad he jagat a hat tar 2014 chya samajik shaishyanik stithi nusharach dyave lagel....tyasathi bharat deshatil pratyek jatichi chaukashi karavi lagel......caste based census kelyanantar hi sarv mahit milu shakate ani tyanushar categarization karata yeil......tumach lekh vachala tar caste based census sat hi tumach Kay mat ahe????... bharat sarkarchya navy a arthik dhorananushar government sector che private sector mad he rupantar zale ahe tyamule reservation 0 zal ahe.... private sector mad he reservation sat hi Kay karat a yeil..... savidhanaamadhe private sector sat hi kahich provision nahiye karan tyavelesh private sector ha fanda navhata...... rservation vachavayache ashel tar rastriykaran karane garajech ahe ....har field government chya under anane garajeche ahe....tumach Kay mat ahe

    उत्तर द्याहटवा
  15. Rajakiy arakshan gandhichi den ahe joshisaheb......puma pactmule rajkiy arakshan art hat swatantra matadar sangh al....pune karalamule stool and stooges art hat dalal ani bhadave nirman ale....rajkiy arakshan bandh karnyachi magani babasahebanhi mareparyant keli......dushar reservation age education ani naukaryatil ....tyala Japan adaquate representation ashehi mhanu shakato.....tyasathi 240 vh kalam obc sat hi.....241 St sat hi ani 242 vh kalam sc sat hi ahe ....240 nushar obc sat hi kaka kalekar ayog Alan pan obc nchi pehachan nashalyamule Nehru be kacharyachya dabyat takala.....nantar 1992 la Mandala ayog ala ani tyane 1931 chya caste based census nushar 52% obc nha 27% reservation dil ani tyatahi crimilayer lavanyat al.....1931 la bharatach vibhajan navhat zal . .... tyamule obcnchi sankhya azachya ghadila 65% chya var nighen...65% obc shinha 27%% reservation fakt....tyamule jar obc nchi pehachan karayachi ashel tar caste base census karavach lagel.....jyanchi jevadhi sankhya tyanchi tevadhi hissedari.... lekh changala hota pan tyat he points missing hote thodi bhar takali

    उत्तर द्याहटवा
  16. सुपरब दिक्षित साहेब मुद्देसूद मांडणी आणि सपष्ट विचार सारणी

    उत्तर द्याहटवा
  17. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  18. HELLO,
    You have tried well but some questions I want to pose you.in your speech you have stated that secularism and equal treatment to the religions are two different thing but this is not the approach supreme court have harboured. as in the case of socialism we have not adopted a socialism on western lines but it is indianised version of socialism similarly secularism is also indianised and supreme court have interpreted it as non-discrimination between religion so secularism and non-discrimination in indian context are one and the same is it not? second question constitution says in Art.15&16 state will not discrimination 'only' on the basis of religion and other grounds this is very important word because 'only' denotes if something is additional to religion then discrimination on the basis of religion is also valid what do you say? in both the above articles one proviso is added in that proviso it is said that 'for the advancement of any socially and educationally backward classes of citizens' government can make special provisions in one judgement of supreme court, court said class is made of cast in most of the cases then why not religion? as religion also constitutes class. Thirdly, you have said in one of your statement that by executing an affidavit person can become a Muslim and after availing reservation benefit he can change his religion first of all I would like to remind you that in Supreme court a case came up in which person who was Hindu and married tried to dupe his wife by converting into Muslim religion to marry second time without giving divorce to his first wife Supreme court crack down and said it is not valid why supreme court will not apply same rule to Reservation also? If you give answers to this questions I have certain other questions also on this blog of yours I will raise in my subsequent comment hope you will answer all these questions with study.

    उत्तर द्याहटवा
  19. dixit saheb kahi bamnana masti chadali aahe fb var Hindutva chya nava aadun reservation la virodh kartat

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ka re dum nahi ka .anonymoys mhanun bhekdaaasarkha boltoy...swata tari kahi fayda ghetla ka reseervatiin chya...tumcha udhhar open chyach lokanni kelay samajla la.

      हटवा
    2. kay kelay re ? open wale obc cha hissa khat aahet aani tond var karun tyana bhikari mhant aahet . ye baramati madhe rashtrawadi congress chya office made ll Jayostu maratha ll

      हटवा
  20. u say 'reservation is forever.'. isn't it funny???doesn't it actually mean that caste system is right???doesn't forever reservation justify caste system??what is your opinion about reservation according to percentage of population??

    उत्तर द्याहटवा
  21. Dear Sir,
    Perfect explanation, hats off.

    In community of 1000 if 10 people are poor we cannot call that community as poor but in 1000 people if 990 are poor certainly that community needs support. We cannot stop giving opportunity for remaining 990 based on 10 rich people.

    I am from SC category and I am the first engineer from my family (From both father and mother side), because of reservation in 60 years my family did good. My grandfather was doing Mharki (Job of lower cast in village) but he gave education to my father so my father came to Mumbai and got job in mill, my father gave education to me and our only inspiration was and today also is Dr.Ambedkar (Shika, Sanghatit hwa and Sangharsh kara).
    So I can say that in 60 years my family saw tremendous change from mharaki to USA (I am working in Washington DC as senior financial consultant)
    Again I only got 60% in my 12th Std but because of my cast I got admission. Also in my engineering I got drop in my first year because till that time I am not getting technique how to study as there is no one in our falimy to guide us. But from second year onward I am consistantaly scoring 55 to 60% till my 8th Semister as I got the technique. Now let me tell you when I am getting 55% to 60% my class mates are still failing in that subjects as there is no spoon feeding to them (Marks in 12th and 10th std don’t show us clear picture as they belongs to coaching class and their practices) some of them are merit holders.

    So I think I was equally talented in my 12th Std also but I was lacking the way I am studying. The point is because of reservation I got admission in engineering. After getting admission all are equal, means I need to score 40 markes to pass the paper just like others.

    After engineering so many of my friends went to USA for doing MS, most of them are from upper cast (you can easily figure out from surname) but we don’t have the money to got to USA though we are equally talented (To do MS in USA you need money there is no 100% scholership).

    Now these my uppercast friends as I can see their families are well educated (Managers, bankers, Doctors) and when I see my community people they are still happy if some one do small diploma.

    I came to USA on my own talent and I am working for USA fedral government as financial consuatant. I am glad and thankful to Indian governent that they showed belive in me in my 12th Std and gave me admission in enfineering. My next generation will not seek any reservation from now onwards but still there are so many people needs hand to grow from all of us.

    Jai Hind

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Great brother proud of you.right explanation--->>Necessity of Reservation & way to End reservations
      धर्म-by दुष्यंत कुमार
      तेज़ी से एक दर्द
      मन में जागा
      मैंने पी लिया,
      छोटी सी एक ख़ुशी
      अधरों में आई
      मैंने उसको फैला दिया,
      मुझको सन्तोष हुआ
      और लगा –-
      हर छोटे को
      बड़ा करना धर्म है ।

      हटवा
  22. अत्यंत परखड विचार,मी पण हा जुन्या मनूने दिलेल्या १०० टक्के आरक्षणाचा मुद्दा एकदा फेसबुकवर असेच एक आरक्षणामुळे देशाचं कसं नुकसान होतंय अशा पोष्टवर प्रतिक्रीया म्हणून मांडला होता.

    उत्तर द्याहटवा
  23. आरक्षणावर वाचलेल्या सर्वोत्तम लेखांपैकी एक !!

    उत्तर द्याहटवा
  24. Shekdo varsha anyaay sahan kelelya African-american hya race madhil vyakti aaj USA cha president zala ahe.
    USA madhe race var aadharit reservation chi kontihi tartuud nahi, tarihi Martin Luther King hyanchyamule aaj tethil jantemadhye racial discrimination cha pramaan naganya ahe.

    Hya ulat 65 varshanantarahi aplya ethe reservation mule Faayda milnaare Vs. Faayda na milnare hee dari vadhun tyatuunach Jaati-potjaatinche ghetto ubhe rahat ahet. Tyauparhi Arakshan milvnarya baryach vyaktinna arakshan ka milale ahe hyacha vichar na karta tyanchyat superiority complex alela mee baghitla ahe. Mag asha veli Apla Dubla Bhaau asa vichaar kon karel? Mag tya aivaji ajuun jasta kashta karuun ha desh soduun sandhichya shodhaat itaratra sthayeek hone haach ek swarthi parantu practical paryay nahi ka?

    उत्तर द्याहटवा
  25. दोन्ही बाजूच्या समर्थकांना, especially आरक्षण विरोधकांना अप्रिय मुद्दे खूप सुंदरपणे समजावून सांगितल्या आहेत.
    परंतु, एका दिवशी मनु साहेबांनी लिवलं आणि दुसऱ्या दिवशी पासून सर्वांनी मान्य केलं, हे थोडं simplistic वाटतं.

    उत्तर द्याहटवा
  26. Doctor, what you've written are symptoms, what about solution? If there are 5 patients admitted in your hospital and 2 of them are critically injured and need to be kept on saline on other three's expense since they are not in a situation to pay you.... You'd definitely pay more attention to them as they are in more need of your attention which is quite uncrushable. But the main question is that , are you justified in ignoring other 3 patients just because they were not as critical ?

    Does equality professes that 'You've come far ahead, now wait here for others until they reach here, no matter what time they take.' or does it profess 'Good that you've come far ahead, now keep making the path clear while those unfortunate persons who couldn't match you can at least find it easier to reach upto you and then might even get ahead of you?'

    उत्तर द्याहटवा
  27. You admonish the students about not understanding the topic of debate correctly, which was "reservations based on religion". But you dwell on caste based reservations for most of your speech... interesting...

    उत्तर द्याहटवा
  28. आपले बहुतांश विचार व मांडणी उत्कुर्ष्ट वाटले... आपण जे आरक्षणाचे जनक म्हणून मनुला संबोधले... खरे आहे...
    भारतीय राज्य घटने नुसार धर्माच्या नावाने आरक्षण देणे कसे चुकीचे होईल हि मांडणी आपण केली... मला वैयक्तिक सुद्धा हेच वाटते. पण एका बाबी कडे आपण सतत दुर्लक्ष करीत आलोत... ती बाब म्हणजे
    The Constitution (Scheduled Castes) Order १९५० या नुसार मुस्लीम्धार्मियांवर, सिख धर्मियांवर आणि ख्रिश्चन धर्मियांवर अन्याय नाही झाले का??? नंतर १९७४-७५ नंतर सिख धर्माला या ओर्डर मधून वगळले... पण इतरांचे काय???
    एकाच निकषावर उतरणारे 'ते' लोक फ़क़्त या सवलती पासून वंचित झाले कि त्यांचे धर्म इस्लाम /ख्रिश्चन आहे?? धर्माच्या आधारावर लाभ देता येत नसतील तर कोण्या लाभ पासून वंचित सुद्धा ठेवता येत नाही... असे तुम्हाला वाटत नाही का?
    आणि जातीवर आधारित आरक्षण हे सुद्धा योग्यच आहे... ओ बी सी मध्ये जवळपास मुस्लिमांच्या ८० बिरादरी (जाती) मंडळाने समाविष्ट केले आहेत.. त्या पैकी आपल्या सरकारने २३ ते ३२ जातींचा समावेश केला... पण वास्तव्तः या पैकी कोणत्याही जातीचे प्रमाणपत्र देण्या साठी रान उठवावे लागते हि एक अडचण आहे... त्यातल्या त्यात ओ बी सी आरक्षण च्या ठिकाणी मुस्लीम ओ बी सी ला डावलून मुलाखत किंवा लेखी परीक्षेच्या नावाखाली त्यांची निवड होत नाही...
    मला आपल्याशी वाद घालायचे नाही.. पण आपले लक्ष या बाबीकडे वेधायचे होते....

    उत्तर द्याहटवा
  29. प्रतिनिधिव (रिजर्वेशन) का विरोध संविधान द्रोह है ,और संविधान द्रोह ही देशद्रोह होता है ,रिजर्वेशन वंचितों को भागीदारी देने का मामला है ,रही बात अनुसूचित की तो ,अनुसूचित अपना हक़ खा रहा है

    उत्तर द्याहटवा
  30. National obc federation कोई मुझे एक आसान सा गणित बता दे ?,अगर ५२% पिछड़ी जात को २७% रिजर्वेशन देने के बाद भी ,५२% पिछड़ी जातियों की सरकारी नौकरीयो में भागीदारी केवल मात्र 3% है ,और अगर रिजर्वेशन ख़त्म कर दिया जाय तो पिछड़ी जातियों की सरकारी नौकरियों में भागीदारी कितनी रह जायेगी ?................अगर ओबीसी के लोग इसका जवाब दे ,तो मुझे बहुत ख़ुशी होगी

    उत्तर द्याहटवा
  31. I don't really give a shit about the status of Backward people
    First of all, get your ass burnt by studying very hard for getting admission into IITs, IIMs, AIIMS etc.
    We actually despise people coming from caste background since they don't know shit about anything & struggle here.
    Let them perish!

    A proud general category student from IIM Lucknow

    उत्तर द्याहटवा
  32. मराठा समाज - मुस्लिम आरक्षण … जातिवाद आणि पुढे
    लवकरच येत आहे : मराठा समाज - मुस्लिम आरक्षण … जातिवाद आणि पुढे

    कोन्ग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने मराठा आणि मुस्लिम आरक्षण लागू करण्याची वल्गना केलेली आहे . माझ्या जिव्हाळ्याच्या मराठा आरक्षणावर बोलणार आहे . त्यातल्या मुस्लीमाची चर्चा करायची मला गरज वाटत नाही . कोन्ग्रेसने केलेले हे केवळ लांगुलचालन नाही …. तर भारताच्या सार्वभौम राज्यघटनेशी केलेला देश द्रोह आहे. आरक्षणाचा घटनेतला अर्थ सामाजिक आहे . धार्मिक नाही . भारताची राज्यघटना सेक्युलर आहे . भारतात शासकीय निर्णयात धर्माला स्थान नाही . असता कामा नये . त्यामुळे कोणत्याहि धर्मावर आधारित असा कोणताही निर्णय शासन करू शकत नाही . निर्णय बुद्धीवादावर आणि विज्ञानाच्या कसोटीवर घ्यायचे आहेत . मुस्लिम आरक्षण न्यायालयाने अनेकदा रद्दबादल ठरवले आहे . कारण ते घटना विरोधी आहे .

    ( मुस्लिम आरक्षणावर आणखी काही मते इथे या लिंक वर वाचा ---- http://drabhiram.blogspot.in/2014/06/blog-post.html )

    मुळात मी आरक्षणाचा समर्थक आहे . गरीब आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या जातीना आरक्षण मिळाले पाहिजे असे आमचे स्पष्ट मत आहे . इथे एक लक्षात घेतले पाहिजे कि मी गरीब जातीबद्दल बोलतोय . गरीब माणसांबद्दल नाही . कारण आजचा गरीब उद्या श्रीमंत होऊ शकतो . त्या उलटहि घडू शकते . शासकीय निर्णय एका व्यक्तीसाठी नसतात समग्र समाजासाठी असतात . शासन मोठ्या पोलिसी बनवण्यासाठी आहे . फिल्मी रडगाण्यासाठी नाही . अरक्षणाचा पाया सामाजिक आहे. असला पाहिजे . आणि सर्व मागासलेल्या जातींना - गरीब जातीना आरक्षण मिळाले पाहिजे.

    (आरक्षणावरचि तात्विक भूमिका . इथे या लिंक वर वाचा ---- http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_7.html )

    मुद्दा इथे मराठा हि मागास जात आहे का ? असा आहे ? त्या आधी मराठा हि एक जात आहे का ? याची चर्चा करावी लागेल .

    मराठा काय आहे ?

    मराठा अथवा मराठा आरक्षण या विषयावर बोलायला बरेच लोक घाबरतात . जणु मराठा या विषयावर न बोलणे आणि त्यावर टिका न करणे … हा महाराष्ट्र धर्म बनला आहे. मराठा असे नामाभिदान लावणारे लाखो गरीब शोषित वंचित पिडीत आहेत . हे सत्य आहे … .. ,,,, आरक्षण …… वंचित आणि शोषित समाजासाठी असते . मराठे गरीब आहेत हे सत्य आहे . पण मराठा हि एक जात आहे काय ? हा खरा प्रश्न आहे.

    जात म्हणजे काय ?

    त्याच्या दोन सर्वमान्य व्याख्या आहेत . पहिली व्याख्या अशी कि आपापसात लग्न करणारे लोक …. आणि दुसरी व्याख्या अशी कि ज्यांचे सामाजिक स्थान एक आहे असे लोक. …… मराठा लोक … ना एकत्र आपापसात लग्न करतात…. नाही त्यांचे सामजिक स्थान एक आहे . देशमुख आणि कुणबी , पाटिल आणि कुळ यांचे सामाजिक स्थान एक नाही, ना पदर जुळल्याशिवाय त्यात लग्न होते. मग त्यामुळे मराठा समाजात अनेक दारिद्र्य रेशेखालाचे गरीब आणि मातब्बर सरंजामदार यांचे मिश्रण आढळून येते . यापुढच्या चर्चेत आरक्षण हे जातीच्या सामाजिक कक्षेत आहे हे लक्षात ठेवावे .

    मराठा हि सांस्कृतिक ओळख आहे . मराठा हि जात नाही . टिळकांच्या वर्तमानपत्राचे नाव (केसरी आणि ) मराठा होते. टिळक स्वत:ला मराठा समजत असत. हि ओळख शिवाजी राजा , भगवा झेंडा आणि भारतमाता अशी आहेच पण दक्खनी राज्य … कुतुबाशहाशी युती …नेमाडेंचा मालिका अंबर ते कोकणी मुस्लिम शिवसेनेचे ! इथपर्यंत येउन थांबते ! सध्या मनसे नावाचा पक्ष मराठी मुस्लिमांच्या हितासाठी मुंबईत कटिबद्ध आहे. सांस्कृतिक ओळख हि कशीही वाहते त्याचा जातीशी काहीही संबध नाही .

    तर मराठा हि जात नाही सांस्कृतिक ओळख आहे . उभ्या महाराष्ट्राची आहे . कुणबी - देशमुख - पाटिल- देसाई या सगळ्या वेगळ्या जाती आहेत . पश्चिम महाराष्ट्रातला आणि विदर्भातला समाज एकजातीय नाही . आरक्षण जातीला असते जात समूहाला नाही . . मग गरीब शेतक़र्याकडे बोट दाखवून देसाई - देशमुख आणि पाटिलाना आरक्षण द्यावे का ? त्याहून मह्त्वाचे म्हणजे हे आरक्षण कोर्टात सहजच कोलमडणार आहे . पण त्यामुळे जो जातीद्वेष पसरेल आणि निवडणुकाचे चलन वळण होईल … त्याचा लॉंग टर्म फायदा महाराष्ट्राला आहे काय ? मराठ्याना आहे काय ?

    उत्तर द्याहटवा
  33. अचूक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा
  34. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  35. आरक्षणाला सपोर्ट हा मुद्दा प्रत्येक सेक्युलर कार्यकर्त्याचा जिव्ह्याल्याचा विषय असतो. तुमच्याकडून या विषयावर विचार अपेक्षित होतेच सर.
    पण तुमचं म्हणणं या वेळी मला पटलेलं नाही.
    तुमचंच लॉजिक वापरून एक प्रश्न विचारतो, जसं तुम्ही म्हणालात कि एखादा श्रीमंत माणूस स्वतःच्या मूर्खपणामुळे गरीब झाला तर त्याला आर्थिक आरक्षण द्यावं का !! सर हाच प्रश्न मी जातीच्या आधारावर असलेल्या आरक्षणाबद्दल पण विचारू शकतो. आजचा तुमचा दलित माणूस त्याच्या जातीमुळे मागास राहिला त्याच्यात कि ऐतखाऊ वृत्ती तयार झाली.... त्यामुळे त्याने नीट अभ्यास केला नाही.... आपल्याला फुकट मिळणार आहे याची खात्री असल्याने तो बुद्ध जयंती, इलेक्शन्स, आंबेडकर जयंती इत्यादी गोष्टी अतिउत्साहात पार पाडू लागला.... आणि या सर्व गोष्टींमध्ये त्याला आपल्या जवाबदारीच भान राहिल नाही ..... त्यामुळे तो गरीब आणि मागास राहिला .... हे पडताळणार नाही का तुम्ही ?? आणि कधी पडताळणार ??
    जातीवर आधारित आरक्षणाला पाठींबा देणं हा अगदी पद्धतशीरपणे वास्तविकतेकडे काणाडोळा करून घेतलेला विचार आहे असं मला वाटतं.
    हि गोष्ट लॉजिक मध्ये बसूच शकत नाही. दर वेळी तुम्ही दलित, ओबीसी म्हटलं कि जे गरीब दिनवाण्या लोकांचे चित्र दाखवता ते अगदी एकतर्फी आहे. याच जातींमधल्या साधन आणि सुस्थापित लोकांची संख्या एकदा विचारात घ्या. मग आरक्षणावर चर्चा करणं योग्य राहील.
    आज कोणत्याही सरकारी ऑफिस मध्ये जा, तिथे कोणाची संख्या जास्त आहे हे पहा. आता म्हणाल कि एकूण दलित संख्येच्या तुलनेत सरकारी पोस्ट्स ची संख्या किती कमी आहे. अहो आता काय यांच्यातल्या सर्वांना श्रीमंत केल्यावर तुम्ही समानता आली म्हणणार का ?
    इतर जातींतले सर्व लोक श्रीमंत आहेत का ? सर्वांकडे १०० एकर शेत्या आहेत का ? बंगल्यात राहतात का सर्व जण ??
    आर्थिक आधारावर आरक्षण देणं आणि त्यातल्या अडचणींच तुम्ही जे विवेचन केलय ते बरोबर आहे. तुमचा दृष्टीकोन पूर्णपणे मान्य. पण म्हणून जातीवर आधारित आरक्षण योग्य ठरत नाही.
    तुमच्याकडे एक लंगडा घोडा नव्हता सर. बरेच लंगडे घोडे होते. त्यांच्यातले बरेच घोडे आता तगडे झाले आहेत. पण तुम्ही दर वेळी त्यातल्या एकाच लंगड्या घोड्या कडे बोट दाखवून तुमच्या घोड्यांचा ताफाच लंगडा आहे असं म्हणत आहात.
    आज स्वातंत्र्यानंतर एवढा मोठा कालावधी उलटून गेला आहे. राजकीय गणितं बदलली आहेत. लोकशाही हा संख्येचा गेम झाला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर जातीवर आधारित आरक्षण कदापि योग्य ठरू शकत नाही.
    आज आपल्या लोकशाहीची जी दयनीय अवस्था आहे त्याला पूर्णपणे हे आरक्षण आणि जातीवाद जवाबदार आहे.
    आणि या संकल्पनेला तुम्ही दुजोरा देताय. आपण मोठे आहात सर. तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी मी शिकतो. इतर लोकही शिकत असतील. शिक्षकाच्या विचारात गडबड झाली तर विद्यार्थी गडबडतो. आपले विचार वाचून लोक प्रेरित होतात. पण या वेळी आपले विचार मला खटकले म्हणून हि कॉमेंट.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. digvijay, lekh punha ekda wacha...
      sarkar pratek waqtiwar abhyas karu shakat nahi..."aaikhau wrutti tayar zali" ha reservation system mule kahi lokaamadye zalela dosh asu shakto pan to niyam sarvanna kasa lawata yaeil... kititari lokanchi aayushya changli zali reservation mule he suddha satya aahe...aaj te samajamadye barobarine rahu shaktat...

      हटवा
  36. लंगड्या घोड्याचे उदाहरण थोडे असंयुक्तिक वाटते, ते अश्या अर्थाने की निसर्ग नियम काही वेगळाच असतो. माणसांच्या बाबतीत संकृतीने निर्माण केलेले विषमतेचे प्रश्न आरक्षणाने सुटणार नाहीत असे माझे प्रांजळ मत आहे. सतत हजारो वर्षांच्या जुन्या परंपरेचा जसा अभिमान बाळगता येणार नाही तसा अन्यायाचा उल्लेखही अन्याय ठरेल. नैसर्गिक न्याय पद्धतीत सर्व गोष्टी यथायोग्य आपली जागा शोधतात त्याप्रमाणे सामाजिक न्याय हि. शेवटी लंगड्या घोड्यांचा उल्लेख करून आपण काय सुचवितो आहोत ह्याचे भान सुद्धा असणे आवश्यक आहे.

    उत्तर द्याहटवा
  37. Mala ahiraam yaanna ek prashna wicharaay cha aahe ......
    Abhiraam mhanaale the vidnyaanache vidharthi aahet mhanoon.
    Pratyek navjaat moolala tharaavik pramanat cheta sansthechya koshika miltat. Ya koshikan war tyachi budhimatta tharat aaste.
    Maza prashna asa aahe ki 1000 warsha dalit asanaryachya moolachya mendoot kahi basal ghadun aale aahet ka?
    Nahi na
    Tyaala biologically disadvantage aahe ka? Fakt vidnyanache parimaan laavun bola...
    Nahi na
    Maag 1000 varshyanchi goolamgiri che radgane kadhi thaambnaar...
    LANGDA GHODA hi kalpana chukichi aahe....nisargane buddhimatta thaarvnyat kuthlahi pakshyapaat kela nahi ani .....
    Aata shikshaan mofat sarwaan uplabdha kele , mandir paani sarwanna uplapdha kele, sprushya_asprushya itihaas jama honyachya maarga war aahe...
    Jaati vyawastha ha ek rog hota, aani aarakshan tyavaar steroid shot hota tyache chaangle parinaam aapan pahile .....pan tyala infinite deoon kasa chalel , ......
    Yhyache dushparinam aata disu laagle aahet, aani pudhe disnaar aahet.....
    Jar aapan biologically same aaslo tar same opportunity milalya mhanje prashnach saampla, pan INFINITE AARAKSHAN ha aagdi chookicha mudda aahe , aarakshan he keva na keva sampayla pahije ha saral tark aahe...
    Tar LANGDA GHODA , ani INFINITE AARAKSHAN he chukiche concept aahet.....

    उत्तर द्याहटवा
  38. खुपच अभ्यासपूर्ण व मुद्देसुद मांडणी आरक्षण ह्या संवेदनशील विषयाची
    आरक्षण समर्थक व विरोधक ह्या दोघानि व्यवस्थित ही माहिती लक्षात घेतली तर ह्या विषयवार होणारे निर्रथक वाद टाळता येतील
    great work दीक्षित सर

    उत्तर द्याहटवा
  39. या देशात जी धर्मनिरपेक्षता आहे ती मुस्लिमांसाठी नाही . या देशात एकही मुस्लिम नसता तरी हा देश धर्म निरपेक्षच राहिला असता . सेक्युलरीझम म्हणजे शासन आधुनिक राहील . शासकीय निर्णय न्याय , नीती , आचरण इत्यादी आधुनीक चष्म्यातून घेतले जातील . किती लग्ने करावीत ? बुरखा घालावा का ? अस्पृश्यता पाळावी का ? तोंडी तलाक असावा का ? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही . सर्व हक्क शासनाकडे आहेत . या देशात फक्त हिंदूच राहिले असते तरीही हा देश सेक्युलरच राहिला असता. मनुस्मृती नाही , कुराण नाही कोणताच फायनल ! असा ग्रंथ नाही . आम्ही नव्या ज्ञानाचे मानवतेचे आणि बहुविधतेचे चाहते …… ती धर्मनिरपेक्षता.....भारताच्या राज्यघटनेला अशीच शासकीय धर्म निरपेक्षता अपेक्षित आहे . हि कोणीच पाळत नाहि. कोङ्ग्रेस्वाले शहाबानो करतात भाजप वाले गोपूजा . माणसाने धर्म पाळायचा असतो . शासनाने नाही .

    उत्तर द्याहटवा
  40. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  41. Tyaala biologically disadvantage aahe ka? ho,Sickle-cell disease paasun aaj hie dalit-aadivasi samaj trast aahe,aani aata paryant tyavar perfect solution hi kaadta aala naahi,gareeb-ameer sare dalit-aadivasi sickel cell chya dokhyat nehmiech astaat,maza ek rahul navacha gareeb auto-rikshaw wala dalit maanus mitra aahe tyachya muliela sickel cell cha traas aahe.svathhchya muilela toh swatahh aayushbhar purnaar naahi,jar toh udya mela tarr tyachya mulieche jeevan kase honaar ?tar tyacha muliela aarakshan tar havech,aaj parayant kaay kell aapan hyaa lokaansaathi hey pann lakshaat thevave? Reservation bundd hovailaach pahije maaze matt pann Samta,Svatantrata,Bandhutva,Nyaya,Samajik-aarthik chei mudde agodar sodvavet.

    उत्तर द्याहटवा
  42. why dont you MAKE a PIL on ' there should be the reservation in defense forces'
    now a days reservation is spoiling QUALITY
    for NET exam you are fail even after getting 63% but you will pass if you have 55% and you belongs to OBC.
    in MPSC OPEN candidate with 47 marks is fail but OBC candidate with 8 marks is pass.
    you will get freeship if your father is earning 5 lac per annum but you will not get any concession if you belongs to OPEN and your income is 1,2000

    please reply

    उत्तर द्याहटवा
  43. १) मनुने आरक्षण केले किती वर्षा पूर्वी ? हजारो वर्षा पूर्वी , त्याची सजा आजच्या समाजाला का?
    २) आरक्षण म्हणजे सत्ताकारणातला न्याय्य वाटा, आसे तुम्ही म्हणता , मग सर्वच जातींची टक्केवारी काढा आणि सम प्रमाणात आरक्षण देवून टाका ना. वादच होणार नाहि.
    ३) लंगडा घोडा रेषेच्या पुढे उभा करायचा, या पेक्षा घोड्याच्या पायावर शस्त्रक्रिया करून त्याला धाव्ण्यायोग्य बनवा आणि मग सगळ्यान बरोबर धावू द्या. ज्या जाती वर अत्याचार झाले, त्या मागास राहिल्या त्या मुलांना शिक्षणाच्या समान संधी प्राप्त का होवू शकता नाहित? कायम का त्यांना रेषेच्या पुढे उभे राहून कमी मेहनत करण्याला उत्तेजित करायचे ?
    ४) लंगड्या घोड्यान कडून प्रशाषणात लंगडी कामे होत आहेत. प्रशासन लंगडे होत आहे प्रमाणात , या वर उपाय काय ?
    ५) क्रिमी लेयर SC / ST साठी लागू नाही , यामुळे एकाच घराण्यात पुन्हा पुन्हा आरक्षण मिळते, या मध्ये १००% तथ्य आहे. याचा survey केला पहिजे. एका जिल्ह्या मध्ये एका जातीच्या किती लोकांना आरक्षणाचा लाभ मिळाला , आणि त्यांची सामाजिक परिस्थिती किती सुधर्लि. किती कुटुंबांची स्थिती सुधारली व किती तशीच रहिलि. अश्या survey नंतर आरक्षणाचा खरोखर फायदा होतो आहे कि नाही हे ठरवता येइल.

    आरक्षण कसे चुकीचे ठरू शकते ते मुबैच्या सध्याच्या महापौर आणि काही वर्ष पूर्वी असलेल्या महादेव देवळे या व्यक्ती वरून दिसून येइल. वैक्ती नगरसेवक म्हणून चांगले काम करीत असेल तर याचा अर्थ आस न्हावे कि ती महापौर म्हणून सुद्ध अचान्गले काम करून शकेल. यात या दोन्ही व्यक्तींचा कुठला हि अपमान करण्याचा हेतू नाही. कदाचित देवळे हे स्वतःच मान्य करतिल.

    ६) माझ्या मते आरक्षणा च्या फायद्यापेक्षा तोटेच अधिक आहेत, प्रशासनाची गुणवत्ता खालावत जात आहे. याला दुसरी करणे हि असतील पण आरक्षण हे एक कारण नक्कीच आहे. मागास जाती प्रगत व्ह्याच्या सोडा प्रगत जाती मागास होत चालल्या आहेत. आरक्षणा चा गेल्या ३०-४० वर्षाचा अभ्यास झाल्या शिवाय ते योग्य का आयोग्य हे ठरवणे कठीण आहे.

    उत्तर द्याहटवा
  44. २००५ च्या आसपास आलेला माझा स्वताचा अनुभव आहे तो कथन करतोय...
    एका जातबाळूशी बोलणे चालू होते त्यावेळी खासगी आस्थापनामध्ये आरक्षण हवे म्हणून ...ची मागणी चालू होती …..
    हा जात बाळू जातीवरच आधारित admission मधून BJ Medical ला Mbbs करून "प्रसूती, आणि स्त्री रोग" विषयी परत एकदा जातीय admission मधून शिकत होता
    जात बाळू : आता आम्हाला खासगी कंपनी मध्ये आरक्षण हवेय ....
    मी : खासगी मध्ये का?
    जात बाळू : कारण खासगी मध्ये पैसा आहे ....
    मी: घ्यांना चालेल....आणि मग सैन्यामध्ये हि ५०% आरक्षण घ्या कि
    जात बाळू : ........ गप्प...................
    """ ‪#‎आपले‬ नशीब सैन्यात जातीय आरक्षण नाहीये ....... .... """
    मी:आम्ही व्यवसाय करतो त्यात आरक्षण हवे का ? ते कसे देणार ????
    जात बाळू ..: व्यवसाय तुम्हाला दिला गेलाय ….तुम्ही वैश्य आहात
    मी: कोणी दिला व्यवसाय ???
    जात बाळू : परंपरागत आहे ते .....वैश्य आहात तुम्ही ! ! !
    मी: अरे पण मी तर आता व्यवसाय चालू केलाय....वडिलांकडून नाही आला माझ्या हाती ....
    जात बाळू : तरी काय .....वैश्य आहात तुम्ही ! ! !
    मी: मग त्याचा काय संबध ....???
    जात बाळू : ........परत..........गप्प.................
    मी:अरे तू स्वत: इतके कमवितो आहेस.... मग तुझ्या जातीच्या दोन आर्थिक मागास मुलांचा शिक्षणाचा खर्च का नाही उचलत ?
    निम्मी मदत मी देतो तुला करतोस का काम चालू बोल ???
    ( ह्या जातबाळू ला स्वत: च्या मजेला पैसे खर्च करायला काहीही वाटत नसे YAMAHA RXG होती त्याकाळी ह्या जातबाळू कडे,२५ किमी प्रती लिटर AVG..आम्ही केवळ सायकलीवर फिरत होतो, किंवा कंपनी च्या बस मधून ...किंवा ह्याच्या त्याच्या बाइक वापरत होतो )
    जातबाळू जरावेळ गप्प बसला ....
    जात बाळू:(परत..........)आम्हाला माहिती आहे… खासगी मध्ये पैसा आहे म्हणून ...आरक्षण हवे ..माझे आई वडील मागास जातीचे म्हणून वर्गाबाहेर बसून शाळा शिकले.... म्हणून मी संधी मिळाली कि त्याचा वचपा काढणार .....
    """"‪#‎अन्याय‬ झाला त्याचा बदला अन्यायाने????"""
    मात्र हा जात बाळू शिक्षणाच्या खर्च विषयी ..चिडी...चूप ....
    मी: तुझ्या गाडीच्या पेट्रोल च्या खर्चात त्या मुलांचे शिक्षण होईल .HERO HONDA SPLENDER घे ६० किमी प्रती लिटर AVG आहे ... मुलांचा शिक्षणाचा निम्मा खर्च मी उचलतो ....
    जात बाळू ..चिडी...चूप ...आणि पळून गेला ......
    असे अनेक जात बाळू स्वत: चे भागले कि..... आर्थिक सवर्ण झाले की आपली वैयक्तिक प्रगती साधतात ....मग काय बदल होणार ?
    डॉ.आंबेड़करांना मागास जातीचे म्हणून संधि नाकारलि गेली होती.....आता तुम्ही सवर्ण असाल तर संधि नाकारलि जाते
    काय फरक झाला???
    धन्य धन्य धन्य भारत भू धन्य

    उत्तर द्याहटवा
  45. थोतांड - म्हणे सवर्णांना 100% आरक्षण होते, बर होते मग आता काय सूड उगवायची शपथ घेतलीय का मग.?

    उत्तर द्याहटवा
  46. nice dixit sir....
    promotion mdhil aarakshana baddl aaplyala ky mhanan aahe? tumchya mitrach udaharan mla ptl nhi jr tyan open ch merit cross kel tr to aapoaapch open mdhye grahya dhrla jail, tyamule ts aarakshan sampanar nhi. ekach kutumbachya kiti pidhyana aarakshan dyaych ha prashn aahe...

    उत्तर द्याहटवा
  47. या सर्व आरक्षणाचे समर्थन करणार्‍या बुद्धिजीवींना हे कस समजत नाही की आरक्षणाचा 90% लाभ हा फक्त शहरी भागाच्या काही ठराविक कुटुंबातील (पिढ्या न पिठ्या )लोकानांनाच होत आहे..... याचाच अर्थ की एकप्रकारे शहरी SC/ST ग्रामीण भागातील SC/ST विकासापासून रोखत आहे ..... असे सुरू राहिले तर आजपासून 200-300 वर्षांनंतर सुद्धा ग्रामीण भागातील SC/ST ची परिस्थिति बदलत नाही (जैसेथे राहणार )...
    उदाहरणार्थ - ग्रामीण भागातील SC/ST च्या तुलनेत शहरातील SC/STविद्यार्थी कोचिंग क्लासेस आणि आरक्षण या दोन्ही सुविधांमुळे (2-3 पिढ्यांपासून नौकारित लाभ घेतल्यामुळे ) परीक्षेत जास्त मार्क मिळवतील (ग्रामीण भागातील गरीब शोषित SC/ST च्या तुलनेत) आणि तत्सम कारणामुळे एकाच कुटुंबातील पिढ्यानाच आरक्षणाचा लाभ होत असल्याचा स्पष्ट होते ........... मग कुठे गेलं तुमचं सर्व लोक बंदुभाव and all that bullshit

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. चर्चा सुरु आहे म्हणून लिहितो--
      साधारण ३०-३५ वर्ष पूर्वीचा प्रसंग आहे. मी माझ्या गावी शेतीव वैद्यकीय व्यवसाय करीत होतो. व्यवसाया मुळे माझे सर्व जाती कडे व त्यांचे माझ्या कडे येणे जाणे होत असे. एके दिवशी एका आजारी दलित वृद्ध कडून मला बोलावण्यात आले तपासून झाल्यावर मला एक गोष्ट दिसली ती म्हणजे प पू बाबासाहेबांचा फोटो त्या घरात नव्हता. त्या बद्दल विचारले असता जे सांगितले गेले ते त्याच शब्दात सांगतो ---हे बाबासाहेब कोण ते मला माहित नाही त्यांना मी पाहिलेही नाही पण पूर्वी तुम्ही(सवर्ण) खळ्यात धान्य आले कि आम्हाला बोलाऊन १-२ पोती धान्य द्यायचे . संद्याकाळी अंगणात उभे राहून 'भाकर द्या मायजी " म्हटले कि घरातून १-२ भाकरी ,कालवण मिळायचे २-४ पाट्या भरून जायच्या वस्ती वर आलो कि सर्व एकत्र जमून जेवायचो दिवस चांगले जात होते . पण ह्या बाबासाहेबांनी काहीतरी केले तेंव्हा पासून तुम्ही आम्हाला धान्य व वाढा देणे बंद केले शेजारी खुर्चीवर बसवतात. तुमच्याच भांड्यातून चहा,पाणी देतात. पण भाकर तुकडा देत नाही संध्याकाळी हि कच्ची बच्ची भाकर मागतात मी देऊ शकत नाही आमच्यातीलच ४-५ बुके शिकलेल्यांनी आमचे अंगठे घेतले गायी देतो,बकर्या देतो कोंबड्या देतो असे म्हणाले . पण माझ्या दारी न गाय आली ना बकरी ना कोबडी . बँकेचे साहेब मात्र कर्ज फेडीसाठी जप्ती ची भाषा करतात. ह्या नेत्यांनी मात्र घरे बांधली मुलाना चांगले कपडे केले फ़टफ़ट्या घेतल्या. म्हशी गायी हरवल्या, मेल्या म्हणुन पुन्हा पुन्हा कर्ज काढले आमच्या बोडख्यावर कर्जाचा डोंगर केला ,सांगा कस जगायच. ?
      त्या वृद्ध ची हकीकत ऐकून मला भडभडून आले मी व माझ्या ४-५ (सवर्ण) मित्रांनी मिळून ४-५ पोती धान्य गोळा केल ,त्याला, त्याच्या बायकोला व मुलांना कपडे शिउन दिले. व सांगितले बाबा रोज घरी येत जा वाढा घेऊन जात जा पण उपाशी राहू नका . तुझ्या आशीर्वादाने मला खूप पैसे मिळतात शेतीतून धान्य पण चांगले येते तू काळजी करू नको.
      मित्रानो हे सांगण्याचा उद्देश एव्हडाच कि तुम्हीच तुमच्या जाती बांधवाना लुटू नका. तुमच्यातले आज बहुतेक सर्व वरच्या जागेवर आहात. प पु बाबासाहेबाच्या आत्म्यास स्मरून शपथ घ्या एकेकाने एकेक मुलगा दत्तक घ्या त्याला शिकवा मोठा करा तरच आरक्षणाचा हेतू साध्य झाला व तीच खरी श्रद्धांजली असेल. नाहीतर २ पिढ्या काय २० पिढ्या जरी आरक्षण दिले तरी निरर्थक आहे.

      हटवा
  48. फारच स्पष्ट! चर्चेंने प्रश्न सुटतात.

    उत्तर द्याहटवा
  49. आपण विजय नावाच्या मित्राची गोष्ट सांगितली. त्यात थोडी शंका आली. खुल्या वर्गासाठी ज्या जागा आहेत त्या सर्व प्रवर्गातील लोकांसाठी आहेत. नाही तर ते खुल्या वर्गाचे आरक्षण होईल. याचा अर्थ सर्व प्रथम गुणवत्तेनुसार या खुल्या जागा भरल्या जातात. त्या संपल्या कि मग प्रत्येकाला आपल्या जातीनुसार आरक्षित जागा मिळतात. आता असे असतांना OBC ची Cut Off खुल्या वर्गाच्या वर जाऊ शकत नाही. कारण जर एखाद्या आरक्षित विद्यार्थ्याला खुल्या cut off पेक्षा जास्त गुण असतील तर त्याला खुली जागा मिळेल. सर्व जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थांनी खुल्या जागा भरल्या कि त्यापेक्षा कमी किंवा तेवढेच गुण मिळालेलं विद्यार्थी आरक्षित जागेत जातील. म्हणजे आरक्षित जातींची cut off खुल्या cut off पेक्षा जास्त होऊ शकत नाही. फार फार तर ती खुल्या वर्गासारखी असू शकते.
    माझ्या माहितीमध्ये काही चूक असल्यास कृपया सांगावी. मी आरक्षणविरोधी नाही, पण आपण दिलेल्या एका माहितीबद्दल शंका आली. कृपया शंकेच निरसन कराव.

    उत्तर द्याहटवा
  50. Arakshan hi rajkarnyanchi dhal zali ahe.sagalya prashnanvar ekach upay arakshan...jyana arakshan ahe tyanchat kahi mhanavi ashi sudarna nahi zali...ani je 67 varshe sattet ahet te dekhil arakshan magatahet mhanje tyancha hi bhala zal nahi..fayda zala rajkarnyancha..aajhi jar government ni tharavala tar sarvana sarvaprakarche shikshan mofat deta yete .navhe te kartavyach ahe pan..mag arakshanacha prashna urtoch kute..bar obc vidyarthyana fees bharne tari shakya ahe ka ho...aso ..sarvana mofat shikshan dene he sarkarch kartavya ahe..nokari madhe asude arakshan tyala ajibat harkat nasavi...aapan sarvansathi laduya apapasat nahi

    उत्तर द्याहटवा
  51. 40% जास्त मार्क असून देखील आरक्षित कोट्यामुळे ज्या हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही, यावर काहीतरी, कधितरी बोलत जा (पोपट) साहेब.

    उत्तर द्याहटवा
  52. Good read!
    One question out of curiosity : If laws are not based on any religion then how muslims got permission to practice polygamy and tripple talaq?

    उत्तर द्याहटवा
  53. Abhiram,
    It is straight forward and no non sense presentation.
    Important thing is that you have put it on Mhalagi Dias
    COURAGE looks very EASY thing when you speak....

    उत्तर द्याहटवा
  54. manu gele pan samajat manu vrutti ajun disat ahe... ti geleli nahi tya sathi kay karta yeil ?

    उत्तर द्याहटवा
  55. ani arakshan konalach nako ahe.... pan shikshanacha jo bajar mandala gela ahe to banda kadhi honar... ? aplya deshatla talent mothya pramanat shikshana sathi baher deshat ka jata hyacha pan vichar vhayla hava.... ekhadyala shikshan parwadat asun to engineering chi fee's 10% bharato ani tyala ti parat milate ani ekhada engineer hota hota purna karja bajari houn bhikela lagto... hya war apala kay mat ahe ?

    उत्तर द्याहटवा
  56. आपल्याला 100% कर्ज हवे आहे का? मी आपल्या आर्थिक गरजांना परताव्याच्या कमी समस्यांसह सर्व्ह करू शकतो म्हणूनच फक्त 2% साठी आम्ही आपल्याला निधी देतो. जे काही तुमची परिस्थिती, स्वयंरोजगार, सेवानिवृत्त, योग्य क्रेडिट रेटिंग आहे, आम्ही मदत करू शकतो. 1 ते 30 वर्षांपर्यंत लवचीक परतफेड. आमच्याशी संपर्क साधा: comfortfrankloanfirm@gmail.com






    आपण एक लांब किंवा अल्पकालीन कर्ज शोधत आहात

    1 पूर्ण नाव: ............................
    2 संपर्क पत्ता: .......................

    3.देश: .....................

    4.सैक्स: ...............

    5. कर्जाची रक्कम आवश्यक आहे: ....................
    6. कालावधी कर्ज: ...................
    7. डायरेक्ट टेलीफोन नंबर: .....................

    खूप प्रेम,

    Comfortfrankloanfirm@gmail.com



    एल
    Mrs: सोई

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *